शहरं
Join us  
Trending Stories
1
लेकी- सुनांवर अन्याय करणाऱ्यांना इथून पुढे...; महिलांच्या संरक्षणासाठी शिंदेंनी उचलला विडा
2
उपराष्ट्रपतीपदासाठी विरोधक तामिळनाडूचाच उमेदवार देणार; ठरल्यात जमा, बलाबल काय...
3
Crime News : पुन्हा निळ्या ड्रमचे प्रकरण आले, बायको घरमालकाच्या प्रेमात पडली; पतीला संपवले अन्...
4
२०१४ मध्येच भाजपा शिवसेनेला हात दाखवणार होती,पण...; प्रफुल्ल पटेलांचा १० वर्षांनी गौप्यस्फोट
5
Mumbai Rain: 'गो अराऊंड'चा मेसेज आणि 9 विमानांच्या मुंबई विमानतळावर बराच वेळ घिरट्या
6
'अलास्का' इथं डोनाल्ड ट्रम्पच्या भेटीला पोहचले डुप्लिकेट पुतिन; सोशल मीडियात चर्चांना उधाण, कारण...
7
सोहम बांदेकरचं 'ठरलं तर मग'! 'या' अभिनेत्रीसोबत बांधणार लग्नगाठ? होतोय अभिनंदनाचा वर्षाव
8
Asia Cup 2025 : गिलमुळे धोक्यात होतं तिलक वर्माचं स्थान; शेवटी BCCI निवडकर्त्यांनी असा काढला तोडगा
9
गुंतवणूकदार होणार मालामाल! 'ही' ऑटोमोबाईल कंपनी देणार प्रति शेअर १०० रुपये लाभांश, तुम्हालाही संधी?
10
मोठी नाचक्की...! ऑपरेशन सिंदूरवेळी कराची बंदरातून पाकिस्तानी नौदल पळून गेलेले; कुठे लपलेले...
11
Russia-Ukraine War : एकीकडे शांतता चर्चा, दुसरीकडे बॉम्ब वर्षाव: झेलेन्स्की अमेरिकेत असताना रशियाने युक्रेनला हादरवले!
12
Russia Ukrain War : डोनाल्ड ट्रम्प युक्रेनचे दोन तुकडे करणार? क्रिमिया अन् दोन मोठी शहरे रशियाला मिळणार
13
तरुण वयात ₹१०० ची बचत वृद्धापकाळात देऊ शकते ३ कोटींची रक्कम; SIP मध्ये गुंतवणुकीसाठी वापरू शकता 'हा' फॉर्म्युला
14
दहावीतील विद्यार्थ्याची नववीतील विद्यार्थ्याने केली हत्या, चाकूने सपासप वार केले आणि...  
15
Mumbai Local: मुंबईत मुसळधार पाऊस! हार्बर आणि मध्य मार्गावरील लोकल सेवा विस्कळीत
16
आभाळ फाटले! मुखेड तालुक्यातील सहा गावांत पाणी शिरले; बेपत्ता १२ जणांचा शोध सुरु
17
Mumbai Rain Alert: मुंबईत रेड अलर्ट; तीन ते चार तासात 'अतिमुसळधार' कोसळणार, शाळांना सुट्टी जाहीर
18
परळी हादरलं! लग्नावरून परतताना जीप पुरात वाहून गेली; तिघे बचावले, एकाचा मृत्यू
19
School Holiday: मुंबईत शाळांना सुट्टी जाहीर, पाणी साचल्याने अनेक ठिकाणी वाहतूक ठप्प; ४८ तासांसाठी रेड अलर्ट जारी
20
Video: टोलनाक्यावरील कर्मचारी की गुंड; लष्कराच्या जवानावर तुटून पडले, खांबाला बांधून दांडक्याने मारले

कृषी विभागाने फिरविली वृक्षलागवडीकडे पाठ

By admin | Updated: December 18, 2014 22:54 IST

शेतीच्या कामात शेतकऱ्यांना वेळोवेळी सल्ले देऊन शेतकऱ्यांचा मार्गदर्शक म्हणून उपाधी मिळविलेल्या कृषी विभागाने यावर्षी वृक्ष लागवडीकडे सपशेल दुर्लक्ष केले असून जिल्हाभरात ४६ हजार वृक्षांची

गडचिरोली : शेतीच्या कामात शेतकऱ्यांना वेळोवेळी सल्ले देऊन शेतकऱ्यांचा मार्गदर्शक म्हणून उपाधी मिळविलेल्या कृषी विभागाने यावर्षी वृक्ष लागवडीकडे सपशेल दुर्लक्ष केले असून जिल्हाभरात ४६ हजार वृक्षांची लागवड करण्याचे उद्दिष्ट दिले असताना केवळ ३२० वृक्षांची लागवड करून आपली जबाबदारी झटकण्याचा प्रयत्न केला आहे. शेती, उद्योग, वाढत्या लोकसंख्येसाठी राहण्याची व्यवस्था, यामुळे मोठ्या प्रमाणात जंगलतोड झाली. वृक्षांची संख्या वाढवून पर्यावरण संतुलीत ठेवण्याच्या उद्देशाने राज्य शासनाने संपूर्ण राज्यात शतकोटी वृक्ष लागवड ही योजना सुरू केली. या योजनेंतर्गत वनविभाग, जिल्हा परिषद, सामाजिक वनीकरण विभाग, कृषी विभाग व वनविकास महामंडळाला वृक्ष लागवडीचे उद्दिष्ट देण्यात आले होते. त्यापैकी वनविभागाने ५४.६६ टक्के, जिल्हा परिषद १५१.२० टक्के, सामाजिक वनीकरण विभागाने ८२.२६, वनविकास महामंडळाने ४८.१४ व इतर विभागाने २४ टक्के वृक्ष लागवडीचे उद्दिष्ट साध्य करण्यात यश आले आहे. कृषी विभागाला यावर्षी ४६ हजार ६०० वृक्षांची लागवड करण्याचे उद्दिष्ट देण्यात आले होते. त्यापैकी केवळ ३२० वृक्षांची लागवड केली आहे. कृषी विभागाला देण्यात आलेल्या उद्दिष्टापैकी पूर्ण १ टक्कासुद्धा उद्दिष्ट साध्य करता आले नाही. विशेष म्हणजे याच विभागाला मागील वर्षी २५ हजार वृक्ष लागवडीचे उद्दिष्ट दिले होते. त्यापैकी २० हजार ७७३ वृक्षांची लागवड केली होती. उद्दिष्टाच्या जवळपास ८० टक्के उद्दिष्ट साध्य करण्यात कृषी विभागाला यश आले होते. कृषी विभागाची ही कामगिरी बघूनच यावर्षी त्यांचे उद्दिष्ट वाढवून ४६ हजार करण्यात आले होते. हे उद्दिष्ट सहज साध्य होईल, असा विश्वास इतर विभागातील अधिकाऱ्यांना असताना कृषी विभागाच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांनी या योजनेकडे यावर्षी पूर्णपणे पाठ फिरविली. त्यामुळे पावसाळा संपूण आता दोन महिन्याचा कालावधी लोटला आहे. तरी केवळ ३२० वृक्षांची लागवड करण्यात आली आहे. याचाच अर्थ कृषी विभागाने शतकोटी वृक्ष लागवड योजनेला फारसे गांभीर्याने घेतले नसल्याचे सहज दिसून येते.कृषीसेवकाकडून शेतकरी वेळोवेळी मार्गदर्शन घेत असल्याने गावातील सर्वच शेतकरी कृषीसेवकाला चांगल्या पद्धतीने ओळखतात. कृषीसेवकाने शेतीविषयक मार्गदर्शन करतानाच पर्यावरणाचेही महत्व समजावून सांगून वृक्ष लागवडीसाठी प्रोत्साहन केले असते तर कृषी विभागाला दिलेले उद्दिष्ट सहज गाठता आले असते. मात्र वृक्ष लागवड करणे हे आपले कामच नसल्याचे ठरविल्याने उद्दिष्ट गाठता आले नाही. विशेष म्हणजे वरिष्ठ अधिकाऱ्यांचेही याकडे दुर्लक्ष झाले असल्याचे स्पष्ट दिसून येत आहे. (नगर प्रतिनिधी)