शहरं
Join us  
Trending Stories
1
मंत्रिपदाचा आणि जिंकण्याचा संबंध नाही, आत्मचिंतनाची गरज; बावनकुळेंचा मुनगंटीवारवर निशाणा?
2
डोनाल्ड ट्रम्प यांचा मोठा निर्णय; २९ देशांतील अमेरिकन राजदुतांना तडकाफडकी परत बोलावले; काय आहे कारण?
3
Staff Gift: कंपनी असावी तर अशी! कर्मचाऱ्यांना दितेय मोठे मोठे फ्लॅट, किंमतही कोट्यवधींमध्ये
4
बांगलादेशात उस्मान हादीनंतर आता NCP नेत्याची हत्या; अज्ञात हल्लेखोराने डोक्यात झाडली गोळी
5
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटेंच्या शिक्षेला सुप्रीम कोर्टाकडून स्थगिती; आमदारकीही जाणार नाही, आज काय घडलं?
6
आयटी ते शेती... भारत-न्यूझीलंड मुक्त व्यापार कराराचे नेमके फायदे काय? 'या' गोष्टी होणार स्वस्त
7
"कुटुंबाच्या प्रतिमेसाठी गप्प होतो, पण आता..."; नितेश राणेंच्या पोस्टने महायुतीत धडकी, कणकवलीतील धक्का जिव्हारी?
8
हातावर मेहेंदी, हिरवा चुडा अन् मुंडावळ्या; प्रियदर्शिनी इंदलकरची लगीनघाई? 'तो' फोटो व्हायरल
9
नको असलेला पसारा २०२५ मध्येच सोडा, नवीन वर्षात 'मिनिमलायझेशन'ची सवय लावा
10
ऐन निवडणुकीत महायुती सरकारनं निवडणूक कायद्यात केला महत्त्वाचा बदल; काय परिणाम होणार?
11
YouTube वर १ बिलियन व्ह्यूज आले तर किती पैसे मिळतात? आकडा ऐकून हैराण व्हाल!
12
नोकरी गेली खड्ड्यात, आज राजीनामा देणारच, कारण...; ढसाढसा रडत शिक्षिकेने बनवला Video
13
बिबट्यानंतर आता लांडग्याची दहशत... तीन वर्षाच्या चिमुरड्याला उचलून नेलं; कुठे घडला प्रकार?
14
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या दराचा नवा उच्चांक, चांदीच्या दरात ७,२१४ रुपयांची वाढ; सोन्याच्या दरातही जोरदार तेजी
15
"साजिद अकरमशी माझा कोणताही संबंध नाही"; दहशतवाद्याच्या पत्नीचा मृतदेह स्वीकारण्यास नकार
16
'मी हे विकत घेऊ शकत नाही' असे म्हणणे सोडा! रॉबर्ट कियोसाकींनी सांगितला श्रीमंतीचा नवा मंत्र
17
VIDEO : "सर्वस्व दिलं, तरीही मनासारखं नाही घडलं!" रोहित शर्मा 'त्या' गोष्टीबद्दल पहिल्यांदाच बोलला
18
'बॉर्डर २'मध्ये दिसणार सुनील शेट्टी आणि अक्षय खन्ना? सनी देओलच्या सिनेमासंदर्भात मोठी अपडेट आली समोर
19
आता मनमानी चालणार नाही! रुग्णालयांना आधीच सांगावा लागणार आयसीयू-व्हेंटिलेटरचा खर्च; 'यांची' मंजुरीही आवश्यक
20
थरारक घटना! टेकऑफनंतर काही मिनिटांतच Air India विमानाचा यू टर्न; हवेत अडकला प्रवाशांचा श्वास
Daily Top 2Weekly Top 5

कृषी विभागाने फिरविली वृक्षलागवडीकडे पाठ

By admin | Updated: December 18, 2014 22:54 IST

शेतीच्या कामात शेतकऱ्यांना वेळोवेळी सल्ले देऊन शेतकऱ्यांचा मार्गदर्शक म्हणून उपाधी मिळविलेल्या कृषी विभागाने यावर्षी वृक्ष लागवडीकडे सपशेल दुर्लक्ष केले असून जिल्हाभरात ४६ हजार वृक्षांची

गडचिरोली : शेतीच्या कामात शेतकऱ्यांना वेळोवेळी सल्ले देऊन शेतकऱ्यांचा मार्गदर्शक म्हणून उपाधी मिळविलेल्या कृषी विभागाने यावर्षी वृक्ष लागवडीकडे सपशेल दुर्लक्ष केले असून जिल्हाभरात ४६ हजार वृक्षांची लागवड करण्याचे उद्दिष्ट दिले असताना केवळ ३२० वृक्षांची लागवड करून आपली जबाबदारी झटकण्याचा प्रयत्न केला आहे. शेती, उद्योग, वाढत्या लोकसंख्येसाठी राहण्याची व्यवस्था, यामुळे मोठ्या प्रमाणात जंगलतोड झाली. वृक्षांची संख्या वाढवून पर्यावरण संतुलीत ठेवण्याच्या उद्देशाने राज्य शासनाने संपूर्ण राज्यात शतकोटी वृक्ष लागवड ही योजना सुरू केली. या योजनेंतर्गत वनविभाग, जिल्हा परिषद, सामाजिक वनीकरण विभाग, कृषी विभाग व वनविकास महामंडळाला वृक्ष लागवडीचे उद्दिष्ट देण्यात आले होते. त्यापैकी वनविभागाने ५४.६६ टक्के, जिल्हा परिषद १५१.२० टक्के, सामाजिक वनीकरण विभागाने ८२.२६, वनविकास महामंडळाने ४८.१४ व इतर विभागाने २४ टक्के वृक्ष लागवडीचे उद्दिष्ट साध्य करण्यात यश आले आहे. कृषी विभागाला यावर्षी ४६ हजार ६०० वृक्षांची लागवड करण्याचे उद्दिष्ट देण्यात आले होते. त्यापैकी केवळ ३२० वृक्षांची लागवड केली आहे. कृषी विभागाला देण्यात आलेल्या उद्दिष्टापैकी पूर्ण १ टक्कासुद्धा उद्दिष्ट साध्य करता आले नाही. विशेष म्हणजे याच विभागाला मागील वर्षी २५ हजार वृक्ष लागवडीचे उद्दिष्ट दिले होते. त्यापैकी २० हजार ७७३ वृक्षांची लागवड केली होती. उद्दिष्टाच्या जवळपास ८० टक्के उद्दिष्ट साध्य करण्यात कृषी विभागाला यश आले होते. कृषी विभागाची ही कामगिरी बघूनच यावर्षी त्यांचे उद्दिष्ट वाढवून ४६ हजार करण्यात आले होते. हे उद्दिष्ट सहज साध्य होईल, असा विश्वास इतर विभागातील अधिकाऱ्यांना असताना कृषी विभागाच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांनी या योजनेकडे यावर्षी पूर्णपणे पाठ फिरविली. त्यामुळे पावसाळा संपूण आता दोन महिन्याचा कालावधी लोटला आहे. तरी केवळ ३२० वृक्षांची लागवड करण्यात आली आहे. याचाच अर्थ कृषी विभागाने शतकोटी वृक्ष लागवड योजनेला फारसे गांभीर्याने घेतले नसल्याचे सहज दिसून येते.कृषीसेवकाकडून शेतकरी वेळोवेळी मार्गदर्शन घेत असल्याने गावातील सर्वच शेतकरी कृषीसेवकाला चांगल्या पद्धतीने ओळखतात. कृषीसेवकाने शेतीविषयक मार्गदर्शन करतानाच पर्यावरणाचेही महत्व समजावून सांगून वृक्ष लागवडीसाठी प्रोत्साहन केले असते तर कृषी विभागाला दिलेले उद्दिष्ट सहज गाठता आले असते. मात्र वृक्ष लागवड करणे हे आपले कामच नसल्याचे ठरविल्याने उद्दिष्ट गाठता आले नाही. विशेष म्हणजे वरिष्ठ अधिकाऱ्यांचेही याकडे दुर्लक्ष झाले असल्याचे स्पष्ट दिसून येत आहे. (नगर प्रतिनिधी)