शहरं
Join us  
Trending Stories
1
"...का तूच खातो सगळं रेटून? आम्हाला तर माहीत आहे, या जीआरवरच संपूर्ण मराठवाडा बसतो!"; भुजबळांना डीवचत जरांगेंचा दावा!
2
४०० किलो RDX सह १४ दहशतवादी भारतात घुसले; आत्मघातकी हल्ल्याची धमकी देणारा मुंबई पोलिसांना मेसेज
3
दूध, ब्रेड, पनीर, भाज्या.., त्या २० गोष्टी ज्या तुम्ही दररोज खरेदी करता, GST कपातीनंतर किती होणार स्वस्त?
4
लॉटरी लागली नाही, तरी तिकिटाचे पैसे वाया जाणार नाहीत, सरकार व्याजासह परत देणार; प्रस्ताव विचाराधीन
5
Ajit Pawar: ज्या कार्यकर्त्यांसाठी अजित पवारांनी अंजली कृष्णा यांना दिला दम, त्यांच्यावरच गुन्हा दाखल
6
अनंत चतुर्दशी २०२५: एक दृष्टांत, प्रत्यक्ष देव प्रकट; तुम्ही घेतले का शेषशायी विष्णू दर्शन?
7
वाढत्या महागाईत निवृत्तीचे नियोजन कसे कराल? 'या' टिप्स फॉलो करुन चाळीशीच्या आत कोट्यधीश व्हा
8
रात्री सव्वा अकरा वाजता मेसेज अन् मॅच फिक्स करण्यासाठी १ कोटींची ऑफर! UP T20 लीगवर फिक्सिंगचं सावट
9
मृत्यू पंचकात अनंत चतुर्दशी-चंद्रग्रहण २०२५: १५ मिनिटांचे स्तोत्र म्हणा; अनंताची कृपा मिळवा
10
ट्रम्प टॅरिफ-टॅरिफ करत राहिले अन् भारताने सिंगापूरसोबत अब्जावधीचे ५ मोठे करार केले...
11
अनंत चतुर्दशी २०२५: ७ शुभ मुहुर्तावर द्या गणपती बाप्पाला निरोप; ‘या’ मंत्रांनी कल्याण होईल!
12
अमिताभ बच्चन यांच्याकडून 'लालबागचा राजा'ला भरभरुन दान, 'इतक्या' लाख रुपयांचा दिला चेक, व्हिडीओ व्हायरल
13
अनंत चतुर्दशी २०२५: गणपती उत्तरपूजेला गुरुजी मिळत नाही? ‘असे’ करा विसर्जन पूजन, पाहा, विधी
14
"धमकी देणं एका उपमुख्यमंत्र्यांना शोभतं का? त्या महिलेची..."; अंजली दमानिया अजित पवारांवर भडकल्या
15
Latur Crime: सुटकेसमध्ये मिळाला होता महिलेचा मृतदेह, पतीसह पाच जणांनाा अटक; AIच्या मदतीने गुन्ह्याचा तपास
16
प्रिया मराठेच्या आठवणीत ऑनस्क्रीन वहिनीला अश्रू अनावर, म्हणाली, "ती माझी मुलगी होती..."
17
ADR चा धक्कादायक रिपोर्ट! मंत्र्यांकडे २३,९२९ कोटींची माया, ४७ टक्के मंत्र्यांवर ३०२ चे गुन्हे
18
अनिल अंबानींच्या अडचणी वाढल्या; आणखी एका सरकारी बँकेनं 'फ्रॉड'चा ठपका ठेवला, शेअर आपटला
19
तोरणमाळ सातपायरी घाटात दरड कोसळली; मुसळधार पावसामुळे रस्ता बंद, गावाशी संपर्क तुटला
20
मराठ्यांची ‘सरसकट ओबीसीची मागणी स्वीकारलेली नाही’; CM देवेंद्र फडणवीस यांची स्पष्टोक्ती

दहावी-बारावीच्या काेऱ्या उत्तरपत्रिकांचा शाळांवर बाेजा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 21, 2021 04:37 IST

गडचिराेली : काेराेना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर इयत्ता दहावी व बारावीच्या बाेर्डाच्या परीक्षा राज्य शासनाने पुढे ढकलल्या आहेत. या परीक्षा शाळास्तरावर ...

गडचिराेली : काेराेना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर इयत्ता दहावी व बारावीच्या बाेर्डाच्या परीक्षा राज्य शासनाने पुढे ढकलल्या आहेत. या परीक्षा शाळास्तरावर हाेणार आहेत. मात्र १५ दिवसांपूर्वीच नागपूर बाेर्डातून उत्तरपत्रिका व तत्सम साहित्य केंद्र असलेल्या शाळांच्या ठिकाणी पाेहाेचविण्यात आले आहे. परीक्षांच्या तारखा अजून ठरल्या नाही. मात्र काेऱ्या उत्तरपत्रिकांचा शाळांवर भार वाढला आहे. मुख्याध्यापकांना उत्तरपत्रिकांकडे बारकाईने लक्ष ठेवावे लागत आहे.

गडचिराेली जिल्ह्यात यावर्षीच्या शैक्षणिक सत्रात इयत्ता बारावीला जवळपास १२ हजार २६० परीक्षार्थी विद्यार्थी आहेत. तसेच दहावीच्या विद्यार्थ्यांची संख्या जिल्हाभरात १५ हजार १४५ आहे. काेराेना संसर्गामुळे प्रत्यक्ष वर्ग भरविणे बंद आहे. शिक्षक व कर्मचाऱ्यांना आवश्यकतेनुसार कर्तव्य बजावण्याचे आदेश आहेत. मात्र मुख्याध्यापक व लिपिकांना कामासाठी दरराेज शाळेत जावे लागत आहे. दहावी व बारावीच्या परीक्षा नेमक्या केव्हा हाेणार, असा प्रश्न प्राचार्य, मुख्याध्यापक व शिक्षकांना पडला आहे. शिवाय तारखा केव्हा जाहीर हाेणार, अशी विचारणा पालक व विद्यार्थी करीत आहेत.

बाॅक्स...

हे साहित्य आहे कस्टडीत

महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक परीक्षा मंडळ पुणेच्या वतीने इयत्ता दहावी, बारावीची बाेर्डाची परीक्षा घेण्यात येणार आहे. या परीक्षा मंडळाचे विभागीय कार्यालये नागपूरला आहे. नागपूर बाेर्डातून काेऱ्या उत्तरपत्रिका, पुरवणी, मॅप, ग्राफ, स्टिकर व तत्सम साहित्य परीक्षा केंद्र असलेल्या शाळांमध्ये पुरविण्यात आल्या. संबंधित शाळांच्या प्राचार्य व मुख्याध्यापकांच्या कस्टडीत परीक्षेचे हे सर्व साहित्य ठेवण्यात आले आहेत. या साहित्याची देखभाल करण्यासाेबतच नियंत्रण ठेवण्याची संपूर्ण जबाबदारी मुख्याध्यापकांवर साेपविली आहे.

बाॅक्स...

दहावी-बारावीच्या विद्यार्थ्यांमध्ये अनिश्चितता

- दरवर्षी इयत्ता बारावीची परीक्षा फेब्रुवारी अखेरीसपासून तर दहावीची परीक्षा मार्च महिन्याच्या पहिल्या आठवड्यापासून सुरू हाेत हाेती.

- यावर्षी काेराेनामुळे परीक्षा पुढे ढकलण्यात आल्या आहेत. मात्र अजूनही तारखा निश्चित न झाल्याने विद्यार्थी चिंताग्रस्त झाले आहेत. परीक्षा केव्हा हाेणार, असा प्रश्न आहे.

- बाेर्डाची परीक्षा आटाेपल्याशिवाय दहावी व बारावीचे विद्यार्थी तणावमुक्त हाेत नाही. आधीच काेराेना परिस्थितीने विद्यार्थी हैराण झाले. त्यात परीक्षेच्या तारखा अजूनही ठरल्या नाही. परीक्षा केंद्रावर हाेणार की शिक्षण घेत असलेल्या शाळेत हाेणार, हेही अनिश्चित आहे. एकूणच परीक्षा लांबल्यामुळे दहावी-बारावीचे विद्यार्थी ताणतणावात आहेत.

काेट...

शाळेमध्ये ठेवण्यात आलेल्या उत्तरपत्रिका व तत्सम साहित्य खराब हाेऊ नये, त्यांना उधळी लागू नये, याची संपूर्ण खबरदारी घेतली जात आहे. शाळा प्रशासनासह परीक्षेच्या साहित्यांवर पूर्णपणे लक्ष आहे.

- हेमंत रामटेके, प्राचार्य, शिवाजी हायस्कूल

..............

आमच्या शाळेत इयत्ता दहावी व बारावीच्या काेऱ्या उत्तरपत्रिका पाेहाेचल्या आहेत. जाेपर्यंत नागपूर बाेर्डाकडून काही सूचना येत नाही, ताेपर्यंत या उत्तरपत्रिका सुरक्षित ठेवणे आमची जबाबदारी आहे.

- सागर म्हशाखेत्री, प्राचार्य, कमलताई मुनघाटे, हायस्कूल

.........................

आमच्या शाळेत गेल्या अनेक वर्षांपासून दहावी, बारावीचे परीक्षा केंद्र आहे. परीक्षा पुढे ढकलण्यात आल्या असल्या तरी प्राप्त झालेल्या उत्तरपत्रिका व साहित्यांकडे पूर्ण लक्ष ठेवले जात आहे. दरराेज शाळेत जाऊन उत्तरपत्रिकांच्या नियंत्रणासाेबतच भाैतिक सुविधांकडे लक्ष दिले जात आहे.

- सुनील चंदनगिरीवार, प्राचार्य, जि.प.हायस्कूल