शहरं
Join us  
Trending Stories
1
मनोज जरांगेंच्या ताफ्याला जालना पोलिसांचा 40 अटींसह हिरवा कंदील, ड्रोनद्वारे राहणार नजर
2
भारतासमोर 'ट्रम्प'नीती अयशस्वी; मोदी फोन न उचलण्याचं कारण काय, अमेरिकन एक्सपर्ट सांगतात..
3
वैष्णोदेवी भूस्खलनात आतापर्यंत ३० मृत्युची नोंद; बचावकार्य सुरू, मृतांची संख्या वाढण्याची शक्यता
4
ट्रम्प टॅरिफचा भारताच्या कोण-कोणत्या क्षेत्रांवर परिणाम होणार? 'या' सेक्टरला बसू शकतो सर्वाधिक फटका!
5
अंतरवाली सराटीतून आज मराठा बांधव मुंबईकडे, गावा-गावात स्वागताची जय्यत तयारी
6
KCL 2025: पदार्पणाच्या सामन्यात हॅटट्रिक, भारताच्या युवा गोलंदाजाचा केसीएलमध्ये धुमाकूळ!
7
"एवढे शुल्क लाऊ की तुमचं...!"; पंतप्रधान मोदींसोबतच्या फोन कॉलसंदर्भात ट्रम्प यांचा मोठा दावा!
8
Vasai: वसईत चार मजली इमारतीचा भाग कोसळला; दोघांचा मृत्यू, ९ जण जखमी!
9
गणेश चतुर्थी २०२५: गणपतीच्या नावापुढे 'बाप्पा' आणि 'मोरया' हे शब्द का आणि कसे जोडले गेले? वाचा!
10
Amravati: पॉर्न व्हिडिओ पाहण्यापासून रोखल्याने मुलांचा वडिलांवर हल्ला, अमरावतीतील घटना!
11
भारताचे ‘सुदर्शन चक्र’ होणार ढाल अन् तलवारही, भारताचे आत्मनिर्भर होण्याच्या दृष्टीने आणखी एक पाऊल
12
खासगी शिकवणीकडे वाढला विद्यार्थ्यांचा ओढा, शालेय शिक्षणावर केंद्र सरकारने केलेल्या सर्वेक्षणातील निष्कर्ष
13
आजचे राशीभविष्य : बुधवार २७ ऑगस्ट २०२५; उत्पन्नापेक्षा खर्च वाढेल, आरोग्याकडे लक्ष द्यावे लागेल
14
भारत-पाकिस्तानसह ७ युद्धे मी थांबवली; ट्रम्प यांचा पुन्हा दावा
15
एका पक्षकाराला सकाळी, दुसऱ्याला दुपारी बोलावले अन् प्रकरण निकाली! राज्य माहिती आयोगाचा असाही कारभार
16
मेट्रो ४साठी फ्रान्समधील कंपनी बनविणार ३९ ड्रायव्हरलेस ट्रेनसेट
17
पंकज भोयर वर्धेबरोबरच भंडाऱ्याचेही पालकमंत्री, सावकारे यांची बुलढाण्याचे सहपालकमंत्रीपदी नियुक्ती
18
डोनाल्ड ट्रम्प यांचा ४ वेळा फोन, पण PM मोदींचा बोलण्यास नकार; जर्मन वृत्तपत्राचा दावा
19
मिरारोडमध्ये सदनिकेचा स्लॅब पडून ४ वर्षाच्या बालकाचा मृत्यू; तिघे जखमी 
20
जरांगे पाटलांबद्दल आक्षेपार्ह पोस्ट टाकल्याने तरुणाला काळं फासलं; समर्थकांकडून तरुणाला मारहाण

शिक्षणात शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांचे योगदान

By admin | Updated: January 17, 2015 22:58 IST

विविध शैक्षणिक उपक्रमांची प्रत्यक्ष अंमलबजावणी करण्यात शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांचे मोलाचे योगदान असून त्यांच्या पाठीशी सरकार ठामपणे उभे राहील, यापुढे कोणताही निर्णय घेताना

गडचिरोली : विविध शैक्षणिक उपक्रमांची प्रत्यक्ष अंमलबजावणी करण्यात शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांचे मोलाचे योगदान असून त्यांच्या पाठीशी सरकार ठामपणे उभे राहील, यापुढे कोणताही निर्णय घेताना शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांवर अन्याय होणार नाही, याची सरकार खबरदारी घेईल, असे प्रतिपादन राज्याचे आदिवासी विकास राज्यमंत्री अम्ब्रीशराव आत्राम यांनी केले.महाराष्ट्र राज्य माध्यमिक शाळा शिक्षकेत्तर संघटनांच्या महामंडळाच्यावतीने राज्यस्तरीय अधिवेशन व चर्चासत्राचे आयोजन गडचिरोली येथील विद्याभारती कन्या हायस्कूलमध्ये करण्यात आले आहे. या अधिवेशनाचे उद्घाटन अम्ब्रीशराव आत्राम यांच्या हस्ते १७ जानेवारी रोजी करण्यात आले, याप्रसंगी ते बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी आ. शोभाताई फडणवीस तर प्रमुख अतिथी म्हणून आ. ना. गो. गाणार, शिक्षणाधिकारी उल्हास नरड, नगराध्यक्षा निर्मला मडके, सुरेश पोरेड्डीवार, अनिल म्हशाखेत्री, स्वागताध्यक्ष म्हणून प्राचार्य राजू मुनघाटे, किशोर वनमाळी, सुधीर भातकुलकर, प्राचार्य संजय नार्लावार, प्राचार्य मनिष शेटे, सुनील चडगुलवार, सुखदेव कंद, मंडळाचे सहकार्यवाह शिवाजी खांडेकर, वाल्मिकी सुराशे, मनोज पराते, अविनाश चडगुलवार, प्रीती भोसले, शोभा तांबे, लिलादास जसुजा, प्रमोद पाटील, बाबासाहेब पाटील, तानाजी माने, प्रमोद पिपरे आदी मान्यवर उपस्थित होते. अधिवेशनादरम्यान ‘विदर्भ मातीचे’ या स्मरणिकेचे प्रकाशन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. अधिवेशनाला ३४ जिल्ह्यातील हजारो शिक्षकेत्तर कर्मचारी उपस्थित होते. यावेळी मार्गदर्शन करताना अम्ब्रीशराव आत्राम यांनी शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांच्या समस्या सोडविण्यासाठी आपण मुख्यमंत्री व शिक्षणमंत्र्यांकडे प्रयत्न करू, सरकार नवीन आहे. त्यामुळे शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांनी थोडा धीर धरावा. शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांवर अन्याय होईल, असा कोणताच निर्णय शासन कधीच घेणार नाही. यापूर्वीचे सरकार दिलेले आश्वासन कधीच पाळत नव्हते. त्यामुळे नागरिकांचा सरकारवर विश्वास राहला नव्हता. मात्र सध्याच्या सरकारमधील मंत्री जे बोलतात. ते करून दाखवितात, असे मार्गदर्शन केले. अधिवेशनाच्या प्रास्ताविकदरम्यान मंडळाचे सहकार्यवाह शिवाजी खांडेकर यांनी शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांसमोर असलेल्या समस्या मान्यवरांच्या लक्षात आणून दिल्या. २३ आॅक्टोबर २०१३ चा अन्यायकारक निर्णय रद्द करण्याचे आश्वासन शिक्षणमंत्र्यांनी शिक्षकेत्तर महामंडळाच्या पदाधिकाऱ्यांना मुंबई येथे १६ जानेवारी रोजी झालेल्या बैठकीत दिले असून हे आश्वासन मंत्र्यांनी पाळावे, असे आवाहन मान्यवरांना केले. संचालन प्रा. नरेंद्र आरेकर यांनी केले.