शहरं
Join us  
Trending Stories
1
९ जुलैला भारत बंद, २५ कोटी कामगार संपावर; शाळा, कॉलेज, बँका आणि बाजारासह काय-काय बंद राहणार? जाणून घ्या
2
तिरुपतीला गेलेल्या अहिल्यानगरच्या तिघांचा दुर्वैवी मृत्यू; कार उलटल्याने झाला भीषण अपघात
3
'भारतासह ब्रिक्स देशांना द्यावा लागणार अतिरिक्त १० टक्के कर"; व्यापार करारापूर्वी ट्रम्प यांचे विधान
4
"एक स्पष्ट आदेश... पक्षातील कोणीही..."; मराठीचा मुद्दा गाजत असतानाच राज ठाकरेंची फेसबूक पोस्ट
5
"रेल्वे कर्मचाऱ्याला तमीळ येत नव्हतं, म्हणून दुर्घटना घडली", आता तामिळनाडू रेल्वे-व्हॅन अपघातातही भाषेची एन्ट्री!
6
२ कोटींच्या विम्यासाठी मित्राला गाडीत जिवंत जाळलं; नऊ महिने सुरु होती प्लॅनिंग, पत्नीचाही सहभाग
7
भारताचे INS महेंद्रगिरी शत्रूला पाणी पाजायला तयार! चीन-पाकिस्तानची झोप उडणार, काय आहे यात खास? जाणून थक्क व्हाल!
8
ठाकरे बंधूंची युती होईल का, किती टिकेल? स्वामी अविमुक्तेश्वरानंद सरस्वतींची मोठी भविष्यवाणी
9
मराठी शाळा बंद, ५००० शिक्षकाचं आंदोलन, मुख्यमंत्र्यांनी त्याकडे लक्ष द्यावं- सुप्रिया सुळे
10
“ज्येष्ठ कलाकार मनमोहन माहिमकर यांना बेघर होऊ देणार नाही”; DCM एकनाथ शिंदेंनी दिली ग्वाही
11
महाराष्ट्रातील सीईटी कक्षाकडून घेण्यात येणाऱ्या प्रवेश नोंदणीला मुदतवाढ; विद्यार्थी हितासाठी निर्णय!
12
टॉप 10 अब्जाधिशांच्या यादीतून बिल गेट्स बाहेर, संपत्तीत मोठी घसरण
13
कोट्यवधी लोकांना खूशखबर, पीएफच्या खात्यात जमा झाले व्याजाचे पैसे, असा तपासा बॅलन्स
14
१४ वर्षांच्या पोराचा आणखी एक पराक्रम! आता वैभव सूर्यंवशीनं मोडला शुबमन गिलचा विक्रम
15
११ तासांत काय घडलं? अविनाश जाधव यांनी सगळं सांगितलं; अटक, सुटका ते मोर्चाची Inside Story
16
येमेनमध्ये भारतीय नर्स निमिषा प्रियाला फाशीची शिक्षा; न्यायालयाने तारीख ठरवली
17
इतके पैसे कुठून आणता? निशिकांत दुबेंचा ठाकरे बंधूंवर निशाणा; मालमत्तांची यादीच शेअर केली
18
हिंदी भाषेची सक्ती कुणी केली? अजित पवार आणि एकनाथ शिंदेंचं नाव घेत सुप्रिया सुळे म्हणाल्या...
19
भारतीय क्रिकेटर स्मृती मन्धानाला इंग्लंडमध्ये मिळाला 'लाल गुलाब'; फोटो व्हायरल, रंगली चर्चा
20
गोपाल खेमका हत्याकांडात मोठा गौप्यस्फोट, एका व्यावसायिकानेच दिली होती सुपारी, समोर आलं असं कारण

शिक्षणात शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांचे योगदान

By admin | Updated: January 17, 2015 22:58 IST

विविध शैक्षणिक उपक्रमांची प्रत्यक्ष अंमलबजावणी करण्यात शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांचे मोलाचे योगदान असून त्यांच्या पाठीशी सरकार ठामपणे उभे राहील, यापुढे कोणताही निर्णय घेताना

गडचिरोली : विविध शैक्षणिक उपक्रमांची प्रत्यक्ष अंमलबजावणी करण्यात शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांचे मोलाचे योगदान असून त्यांच्या पाठीशी सरकार ठामपणे उभे राहील, यापुढे कोणताही निर्णय घेताना शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांवर अन्याय होणार नाही, याची सरकार खबरदारी घेईल, असे प्रतिपादन राज्याचे आदिवासी विकास राज्यमंत्री अम्ब्रीशराव आत्राम यांनी केले.महाराष्ट्र राज्य माध्यमिक शाळा शिक्षकेत्तर संघटनांच्या महामंडळाच्यावतीने राज्यस्तरीय अधिवेशन व चर्चासत्राचे आयोजन गडचिरोली येथील विद्याभारती कन्या हायस्कूलमध्ये करण्यात आले आहे. या अधिवेशनाचे उद्घाटन अम्ब्रीशराव आत्राम यांच्या हस्ते १७ जानेवारी रोजी करण्यात आले, याप्रसंगी ते बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी आ. शोभाताई फडणवीस तर प्रमुख अतिथी म्हणून आ. ना. गो. गाणार, शिक्षणाधिकारी उल्हास नरड, नगराध्यक्षा निर्मला मडके, सुरेश पोरेड्डीवार, अनिल म्हशाखेत्री, स्वागताध्यक्ष म्हणून प्राचार्य राजू मुनघाटे, किशोर वनमाळी, सुधीर भातकुलकर, प्राचार्य संजय नार्लावार, प्राचार्य मनिष शेटे, सुनील चडगुलवार, सुखदेव कंद, मंडळाचे सहकार्यवाह शिवाजी खांडेकर, वाल्मिकी सुराशे, मनोज पराते, अविनाश चडगुलवार, प्रीती भोसले, शोभा तांबे, लिलादास जसुजा, प्रमोद पाटील, बाबासाहेब पाटील, तानाजी माने, प्रमोद पिपरे आदी मान्यवर उपस्थित होते. अधिवेशनादरम्यान ‘विदर्भ मातीचे’ या स्मरणिकेचे प्रकाशन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. अधिवेशनाला ३४ जिल्ह्यातील हजारो शिक्षकेत्तर कर्मचारी उपस्थित होते. यावेळी मार्गदर्शन करताना अम्ब्रीशराव आत्राम यांनी शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांच्या समस्या सोडविण्यासाठी आपण मुख्यमंत्री व शिक्षणमंत्र्यांकडे प्रयत्न करू, सरकार नवीन आहे. त्यामुळे शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांनी थोडा धीर धरावा. शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांवर अन्याय होईल, असा कोणताच निर्णय शासन कधीच घेणार नाही. यापूर्वीचे सरकार दिलेले आश्वासन कधीच पाळत नव्हते. त्यामुळे नागरिकांचा सरकारवर विश्वास राहला नव्हता. मात्र सध्याच्या सरकारमधील मंत्री जे बोलतात. ते करून दाखवितात, असे मार्गदर्शन केले. अधिवेशनाच्या प्रास्ताविकदरम्यान मंडळाचे सहकार्यवाह शिवाजी खांडेकर यांनी शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांसमोर असलेल्या समस्या मान्यवरांच्या लक्षात आणून दिल्या. २३ आॅक्टोबर २०१३ चा अन्यायकारक निर्णय रद्द करण्याचे आश्वासन शिक्षणमंत्र्यांनी शिक्षकेत्तर महामंडळाच्या पदाधिकाऱ्यांना मुंबई येथे १६ जानेवारी रोजी झालेल्या बैठकीत दिले असून हे आश्वासन मंत्र्यांनी पाळावे, असे आवाहन मान्यवरांना केले. संचालन प्रा. नरेंद्र आरेकर यांनी केले.