शहरं
Join us  
Trending Stories
1
पर्यावरणप्रेमींच्या तीव्र विरोधासमोर केंद्र सरकार झुकलं, ‘अरवली’ला वाचवण्यासाठी घेतला मोठा निर्णय   
2
बीडच्या ‘सह्याद्री देवराई’ला भीषण आग; अभिनेते सयाजी शिंदे यांनी जोपासलेली हजारो झाडे संकटात
3
थायलंड-कंबोडिया सीमेवरील विष्णूची मूर्ती बुलडोझरने पाडली, भारताने घेतला तीव्र आक्षेप  
4
बांगलादेशमध्ये हिंसाचार सुरूच, पेट्रोल बॉम्ब हल्ल्यानंतर आता मध्यरात्री ढाका विद्यापीठात मोडतोड
5
नाताळाच्या पूर्वसंध्येला बांगलादेशची राजधानी हादरली, पेट्रोल बॉम्बच्या स्फोटात एकाचा मृत्यू
6
नवीन वर्षात बदलणार काँग्रेसचं 'पॉवर' समीकरण; प्रियांका गांधींना मिळणार महत्त्वाची जबाबदारी
7
IPL 2026 आधीच RCBच्या स्टार खेळाडूला होणार अटक? तब्बल ५ कोटी मोजून घेतलंय संघात
8
पोलिसांवर गुन्हा दाखल करण्याच्या मागणीसाठी सक्षम ताटेची आई व प्रेयसीचा आत्मदहनाचा प्रयत्न, दिला निर्वाणीचा इशारा...
9
‘प्लॅन २०४९’, चीनची भारताच्या अरुणाचल प्रदेशवर नजर, लष्करी बळावर कब्ज्याची तयारी
10
"आम्हाला मतदान केलं तर प्रश्न सोडवू, पण दुसरीकडे केलं तर..."; नितेश राणेंचा मतदारांना इशारा
11
VIDEO: धावत्या ट्रेनमध्ये WWE स्टाईल राडा! 'इंटरसिटी'मध्ये प्रवाशांमध्ये तुफान हाणामारी
12
Sukesh Chandrashekhar : "माय लव्ह, हे तेच घर आहे जे..."; जेलमध्ये असलेल्या सुकेशने जॅकलिनला गिफ्ट केला आलिशान बंगला
13
Vijay Hazare Trophy: ४०० हून अधिक धावांचं लक्ष्य ४७.३ षटकांतच गाठलं, कर्नाटकच्या संघाची इतिहासात नोंद!
14
'मला पंतप्रधान मोदींना भेटायचे आहे', उन्नाव बलात्कार पीडिता राहुल गांधींना म्हणाली...
15
प्रेमविवाह फसला; लग्नाच्या दुसऱ्या दिवसापासून जोडपे झाले वेगळे, ८ दिवसांत घटस्फोट
16
Smartphones: २०२५ मधील 'टॉप ५' पैसा वसूल स्मार्टफोन, यादीत मोठ्या ब्रँड्सचा समावेश!
17
रेल्वे प्रवासादरम्यान माजी मंत्र्यांच्या बॅगवर चोरांचा डल्ला, फोन, रोख रक्कम आणि दागिने लंपास
18
इंडिगोच्या वर्चस्वाला धक्का; केंद्र सरकारकडून ‘या’ दोन नव्या विमान कंपन्यांना मान्यता
19
Prashant Jagtap Resignation: २७ वर्षांची साथ सोडली; प्रशांत जगतापांचा राष्ट्रवादी शरद पवार पक्षाला रामराम
20
“राहुल गांधींसारखे पार्ट टाइम राजकारणी होऊ नका, कठोर मेहनत घेत राहा”; नितीन नबीन यांचा संदेश
Daily Top 2Weekly Top 5

महाविद्यालयातून विद्यार्थ्यांना जीवनाचे वास्तव शिकवा- अभय बंग

By admin | Updated: December 18, 2015 01:47 IST

पहिल्या शिक्षण क्रांतीत शिक्षणाचा प्रसार झाला. आता दुसऱ्या शिक्षण क्रांतीत गुणवत्तेत वाढ झाली पाहिजे.

गोविंदगंधचेही विमोचन : विद्याभारती (श्री गोविंदराव मुनघाटे) कला व विज्ञान महाविद्यालयाच्या रौप्य महोत्सवाची सांगताकुरखेडा : पहिल्या शिक्षण क्रांतीत शिक्षणाचा प्रसार झाला. आता दुसऱ्या शिक्षण क्रांतीत गुणवत्तेत वाढ झाली पाहिजे. आदिवासींच्या मुलांना रशियाचा नकाशा शिकवून फायदा नाही. त्याच्या जीवनाचे वास्तव शाळा महाविद्यालयातून शिकविले पाहिजे. महाविद्यालयातील किती मुले नोकरीवर लागली. यावरून महाविद्यालयाची गुणवत्ता ठरत नाही. ज्या गावातून मुले बाहेर गेली. ती गावाच्या भल्यासाठी किती परत आली. यावरून ठरते. जीवनाशी सुसंगत असे शिक्षण शिकविल्यास हे शक्य आहे, असे प्रतिपादन समाजसेवक डॉ. अभय बंग यांनी केले. दंडकारण्य शैक्षणिक व सांस्कृतिक विकास संशोधन संस्थेद्वारा संचालित विद्याभारती (श्री गोविंदराव मुनघाटे) कला व विज्ञान महाविद्यालय कुरखेडा यांचा रौप्य महोत्सवी वर्ष सांगता सोहळा १७ डिसेंबर रोजी महाविद्यालयात संपन्न झाला. याप्रसंगी ते अध्यक्षस्थानावरून बोलत होते. यावेळी प्रमुख अतिथी म्हणून डॉ. राजन गवस, कुलगुरू डॉ. एन. व्ही. कल्याणकर, सहकार नेते अ‍ॅड. बाबासाहेब वासाडे, संस्थेचे अध्यक्ष प्राचार्य डॉ. राजाभाऊ मुनघाटे, सचिव प्रा. डॉ. प्रमोद मुनघाटे, उपाध्यक्ष सेवानिवृत्त प्राचार्य भैय्यासाहेब ठाकरे, प्राचार्य वाघरे, डॉ. सतिश गोगुलवार, सुधीर भातकुलकर, मनोहर हेपट, प्राचार्य कोकोडे, प्राचार्य बुध्दे, वामनराव फाये, माधवदास निरंकार, डॉ. रमेश कटरे आदी मान्यवर उपस्थित होते. यावेळी कुलगुरू डॉ. एन. व्ही. कल्याणकर म्हणाले की, गडचिरोली जिल्ह्याचा विद्यार्थी बुध्दीने कुठेही कमी नाही. शहरातल्या विद्यार्थ्यात नसलेला प्रामाणिकपणा हा गुण इथल्या विद्यार्थ्यांमध्ये आहे. अ‍ॅड. बाबासाहेब वासाडे यांनी गडचिरोली जिल्ह्यात शैक्षणिक क्रांतीचे अग्रणी गोविंदराव मुनघाटे हे आहेत. कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या तोडीचे शैक्षणिक कार्य गोनांनी या जिल्ह्यात केले, असे प्रतिपादन त्यांनी केले.कार्यक्रमादरम्यान रामदास सोरते, दुधराव तितिरमारे व महाविद्यालयाच्या जडणघडणीत योगदान देणारे सामाजिक कार्यकर्ते, माजी विद्यार्थी, प्राध्यापक, कर्मचारी यांचा मान्यवरांच्या हस्ते स्मृतीचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला. त्याचबरोबर मान्यवरांच्या हस्ते ‘गोविंदगंध’ या स्मरणिकेचे विमोचनही करण्यात आले. प्रास्ताविक प्राचार्य डॉ. राजाभाऊ मुनघाटे, संचालन प्रा. नरेंद्र आरेकर तर आभार किशोर खोपे यांनी मानले. प्रा. ज्ञानेश वाकुडकर यांच्या सखेसाजनी कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. (तालुका प्रतिनिधी)