शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2025 : गुजरात टायटन्ससह रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु अन् पंजाब किंग्जला मिळालं प्लेऑफ्सचं तिकीट
2
ज्योती मल्होत्रा बनली होती पाकिस्तानसाठी 'अ‍ॅसेट', 'ऑपरेशन सिंदूर'च्या काळात होती शत्रूच्या संपर्कात
3
RSS मुख्यालयावरील हल्ल्याचा सूत्रधार सैफुल्लाचा १९ वर्षांनंतर खात्मा, संघ वर्तुळातून ‘अज्ञात’ व्यक्तीच्या कृतीचे स्वागत
4
मुंबईत तिहेरी हत्याकांड! दोन कुटुंबाचा वाद विकोपाला, कोयत्यानेच एकमेकांवर हल्ला; ४ जण जखमी
5
'गौरव गोगोई ट्रेनिंगसाठी पाकिस्तानला गेले होते', काँग्रेसच्या खासदारावर भाजपच्या मुख्यमंत्र्याचा गंभीर आरोप
6
Mumbai: ड्रग्ज तस्करांना दणका! १३ कोटींचे एमडी जप्त; मुंबई आणि नवी मुंबईतील पाच जणांना अटक
7
Solapur Fire: आगीत ८ जणांचा मृत्यू, PM मोदींनी व्यक्त केला शोक; CM फडणवीसांकडून पाच लाखांच्या मदतीची घोषणा
8
किंग कोहलीपेक्षा फास्टर निघाला KL राहुल! टी-२० त जलदगतीने गाठला ८००० धावांचा पल्ला
9
हल्दी घाटीमध्ये सराव, CDS ची रणनीती आणि..., अशी आहे ऑपरेशन सिंदूरच्या यशाची Inside Story  
10
गडचिरोली: यू-टर्न घेताना घात झाला अन् भरधाव ट्रक येऊन धडकला, कारमधील चौघे जागीच ठार
11
नाम तो सुना होगा! केएल राहुलनं शतकी खेळीसह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा एकमेव फलंदाज
12
कुख्यात दहशतवादी सैफुल्लाह खालिद ठार, भारतात झालेल्या तीन हल्ल्यांमागे होता हात, पाकिस्तानमध्ये अज्ञातांनी झाडल्या गोळ्या  
13
शिक्षण घोटाळ्यात नागपूर पोलिसांची एसआयटी स्थापन, अनेक मोठ्या अधिकाऱ्यांचा भांडाफोड होण्याची शक्यता
14
या महिलेवर लक्ष ठेवा, त्याने वर्षभरापूर्वीच दिला होता इशारा, आता त्या ट्विटची होतेय चर्चा
15
अभिनेत्री नुसरत फारियाला ढाका विमानतळावर अटक; कोणत्या प्रकरणात झाली कारवाई?
16
आणखी एका पाकिस्तानी हेराला ठोकल्या बेड्या, ISIला भारताची गोपनीय माहिती पुरवणारा अरमान अटकेत  
17
RR विरुद्धच्या विजयासह PBKS चा प्लेऑफ्सचा पेपर झाला सोपा! आता GT च्या निकालावर असतील नजरा, कारण...
18
भोकरदन तालुक्यात दोन वेगवेगळ्या ठिकाणी वीज कोसळून दोघांचा दुर्दैवी मृत्यू
19
समुद्रात तैनात केला जाणार मेड इन इंडिया 'रक्षक', गौतम अदानी यांच्या कंपनीने केली मोठी डील
20
IPL 2025: मोठी बातमी! SRHचा स्टार क्रिकेटर कोरोना पॉझिटिव्ह; काव्या मारनची डोकेदुखी वाढली!

महाविद्यालयातून विद्यार्थ्यांना जीवनाचे वास्तव शिकवा- अभय बंग

By admin | Updated: December 18, 2015 01:47 IST

पहिल्या शिक्षण क्रांतीत शिक्षणाचा प्रसार झाला. आता दुसऱ्या शिक्षण क्रांतीत गुणवत्तेत वाढ झाली पाहिजे.

गोविंदगंधचेही विमोचन : विद्याभारती (श्री गोविंदराव मुनघाटे) कला व विज्ञान महाविद्यालयाच्या रौप्य महोत्सवाची सांगताकुरखेडा : पहिल्या शिक्षण क्रांतीत शिक्षणाचा प्रसार झाला. आता दुसऱ्या शिक्षण क्रांतीत गुणवत्तेत वाढ झाली पाहिजे. आदिवासींच्या मुलांना रशियाचा नकाशा शिकवून फायदा नाही. त्याच्या जीवनाचे वास्तव शाळा महाविद्यालयातून शिकविले पाहिजे. महाविद्यालयातील किती मुले नोकरीवर लागली. यावरून महाविद्यालयाची गुणवत्ता ठरत नाही. ज्या गावातून मुले बाहेर गेली. ती गावाच्या भल्यासाठी किती परत आली. यावरून ठरते. जीवनाशी सुसंगत असे शिक्षण शिकविल्यास हे शक्य आहे, असे प्रतिपादन समाजसेवक डॉ. अभय बंग यांनी केले. दंडकारण्य शैक्षणिक व सांस्कृतिक विकास संशोधन संस्थेद्वारा संचालित विद्याभारती (श्री गोविंदराव मुनघाटे) कला व विज्ञान महाविद्यालय कुरखेडा यांचा रौप्य महोत्सवी वर्ष सांगता सोहळा १७ डिसेंबर रोजी महाविद्यालयात संपन्न झाला. याप्रसंगी ते अध्यक्षस्थानावरून बोलत होते. यावेळी प्रमुख अतिथी म्हणून डॉ. राजन गवस, कुलगुरू डॉ. एन. व्ही. कल्याणकर, सहकार नेते अ‍ॅड. बाबासाहेब वासाडे, संस्थेचे अध्यक्ष प्राचार्य डॉ. राजाभाऊ मुनघाटे, सचिव प्रा. डॉ. प्रमोद मुनघाटे, उपाध्यक्ष सेवानिवृत्त प्राचार्य भैय्यासाहेब ठाकरे, प्राचार्य वाघरे, डॉ. सतिश गोगुलवार, सुधीर भातकुलकर, मनोहर हेपट, प्राचार्य कोकोडे, प्राचार्य बुध्दे, वामनराव फाये, माधवदास निरंकार, डॉ. रमेश कटरे आदी मान्यवर उपस्थित होते. यावेळी कुलगुरू डॉ. एन. व्ही. कल्याणकर म्हणाले की, गडचिरोली जिल्ह्याचा विद्यार्थी बुध्दीने कुठेही कमी नाही. शहरातल्या विद्यार्थ्यात नसलेला प्रामाणिकपणा हा गुण इथल्या विद्यार्थ्यांमध्ये आहे. अ‍ॅड. बाबासाहेब वासाडे यांनी गडचिरोली जिल्ह्यात शैक्षणिक क्रांतीचे अग्रणी गोविंदराव मुनघाटे हे आहेत. कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या तोडीचे शैक्षणिक कार्य गोनांनी या जिल्ह्यात केले, असे प्रतिपादन त्यांनी केले.कार्यक्रमादरम्यान रामदास सोरते, दुधराव तितिरमारे व महाविद्यालयाच्या जडणघडणीत योगदान देणारे सामाजिक कार्यकर्ते, माजी विद्यार्थी, प्राध्यापक, कर्मचारी यांचा मान्यवरांच्या हस्ते स्मृतीचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला. त्याचबरोबर मान्यवरांच्या हस्ते ‘गोविंदगंध’ या स्मरणिकेचे विमोचनही करण्यात आले. प्रास्ताविक प्राचार्य डॉ. राजाभाऊ मुनघाटे, संचालन प्रा. नरेंद्र आरेकर तर आभार किशोर खोपे यांनी मानले. प्रा. ज्ञानेश वाकुडकर यांच्या सखेसाजनी कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. (तालुका प्रतिनिधी)