शहरं
Join us  
Trending Stories
1
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटेंच्या शिक्षेला सुप्रीम कोर्टाकडून स्थगिती; आमदारकीही जाणार नाही, आज काय घडलं?
2
डोनाल्ड ट्रम्प यांचा मोठा निर्णय; २९ देशांतील अमेरिकन राजदुतांना तडकाफडकी परत बोलावले; काय आहे कारण?
3
'मी हे विकत घेऊ शकत नाही' असे म्हणणे सोडा! रॉबर्ट कियोसाकींनी सांगितला श्रीमंतीचा नवा मंत्र
4
VIDEO : "सर्वस्व दिलं, तरीही मनासारखं नाही घडलं!" रोहित शर्मा 'त्या' गोष्टीबद्दल पहिल्यांदाच बोलला
5
आता मनमानी चालणार नाही! रुग्णालयांना आधीच सांगावा लागणार आयसीयू-व्हेंटिलेटरचा खर्च; 'यांची' मंजुरीही आवश्यक
6
थरारक घटना! टेकऑफनंतर काही मिनिटांतच Air India विमानाचा यू टर्न; हवेत अडकला प्रवाशांचा श्वास
7
सैराटची पुनरावृत्ती! आंतरजातीय विवाहामुळे बदल्याची आग; बापानेच केली गर्भवती लेकीची हत्या
8
रस्त्यांवर झाडू मारतोय भारतीय 'सॉफ्टवेअर डेव्हलपर'! महिना सव्वा लाखाची कमाई; कंपनी का देते इतके पैसे?
9
विधवा वहिनीचं दीरासोबतच सुरू झालं अफेअर अन् अचानक घरातून झाली गायब! एक महिन्यानंतर जे समोर आलं... 
10
तुम्ही वापरत असलेला चार्जर FAKE तर नाहीये ना? कसा ओळखायचा ओरिजनल चार्जर, टाळू शकता मोबाइलचं होणारं नुकसान
11
Mumbai Crime: मुंबईतील धक्कादायक प्रकार! चालत्या लोकलमधून मुलीला खाली फेकलं; Video व्हायरल, आरोपीला पकडलं
12
भीषण अपघात! इंडोनेशियात डिव्हायडरला धडकून बस महामार्गावर उलटली, १६ जणांचा मृत्यू
13
सहा पक्षांच्या जय, पराजयाचा संदेश काय? भाजपपेक्षा एकनाथ शिंदेंना सर्वाधिक यश? एवढा विस्तृत लेख कुठेच मिळणार नाही...
14
बॉलिवूडचे चर्चेतले चेहरे अक्षय खन्ना-सनी देओल २९ वर्षांनंतर एकत्र दिसणार? 'या' सिनेमाची चर्चा
15
Budh Gochar 2025: २०२५ ला निरोप देताना 'या' ७ राशींचे नशीब चमकणार, आयुष्यात येणार सुवर्णकाळ
16
लग्नाच्या आदल्या रात्री वडील ओरडले; नवरदेवाच्या लागलं मनाला, वरातीऐवजी घरातून निघाली अंत्ययात्रा!
17
कोट्यधीश होण्याचे स्वप्न आता होणार पूर्ण! २१X१०X१२ हा फॉर्म्युला वापरा; ५१ व्या वर्षी व्हाल मालामाल
18
KVP Scheme: पैसा दुप्पट करणारी सरकारी स्कीम; विना जोखीम 'इतक्या' महिन्यांत तुमचे पैसे होतील दुप्पट
19
केंद्रीय मंत्री किरेन रिजिजू अजमेर दर्ग्यावर चादर चढवणार; म्हणाले, "दुआ करने जा रहा हूं..."
20
भाडं वाढणार; १००, २००, ५०० कोटी नाही तर, 'इतक्या' कोटींचा होणार रेल्वेला बंपर फायदा, जाणून घ्या
Daily Top 2Weekly Top 5

लेव्ही घोटाळ्याची फेरचौकशी करा

By admin | Updated: April 19, 2015 01:29 IST

२००५-०६ या वर्षात गडचिरोली जिल्ह्यात उघडकीस आलेल्या व राज्यभर गाजलेल्या बनावट लेव्ही घोटाळ्यात तत्कालीन शासकीय अधिकाऱ्यांना आरोपी ...

गडचिरोली : २००५-०६ या वर्षात गडचिरोली जिल्ह्यात उघडकीस आलेल्या व राज्यभर गाजलेल्या बनावट लेव्ही घोटाळ्यात तत्कालीन शासकीय अधिकाऱ्यांना आरोपी करून नव्याने या प्रकरणाची चौकशी करण्याचे आदेश देण्यात यावे, अशी मागणी देसाईगंज येथील सामाजिक कार्यकर्ते राधेश्याम परसरामजी काबरा यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली आहे. राधेश्याम काबरा यांनी मुख्यमंत्र्यांना १७ एप्रिल रोजी पाठविलेल्या निवेदनात म्हटले आहे की, ६ जून २००५ ला तत्कालीन जिल्हाधिकारी यांच्यासमोर ६३ व्या लोकशाही दिनात तक्रार करण्यात आली होती. त्यानंतर १८ राईस मिल मालकांविरूद्ध देसाईगंज पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल करण्यात आले होते. पोलीस स्टेशन देसाईगंजने १४ नोव्हेंबर २००५ ला तक्रारकर्ते म्हणून माझा बयानही घेतला होता व या संपूर्ण प्रकरणाचे पुरावे आपण पोलिसांना दिले होते. देसाईगंज पोलिसांनी याप्रकरणी प्रथम श्रेणी न्याय दंडाधिकारी देसाईगंज यांच्या न्यायालयात १८ प्रकरण न्यायप्रविष्ट केले होते. सदर खटल्यात ९ ते १२ मार्च २०१५ या कालावधीत १७ मामल्यांचा निकाल लागून सर्व आरोपींची निर्दोष मुक्तता झाली आहे. फौजदारी मामला क्रमांक ७९/२००६ चा आरोपी फरार असल्यामुळे या प्रकरणाचा निकाल लागलेला नाही. तक्रारकर्ता व मुख्य साक्षीदार मी असताना सदर मामला चालविताना साक्षीकरिता मला बोलविण्यात आले नाही व माझे नावही साक्षीदाराच्या यादीतून वगळण्यात आले. तसेच सरकारी यंत्रणेतील तत्कालीन जिल्हाधिकारी श्रीवास्तव, सुब्रत राथो, नितीन गद्रे, अनिल काळे, अतिरिक्त जिल्हाधिकारी पी. बी. काळभोर, दिलीप चिलमुलवार, जिल्हा पुरवठा अधिकारी बागडे, सकलेचा, संजय पवार, देसाईगंजचे उपविभागीय अधिकारी टी. जी. कासार, एफ. एस. जाधव, सी. के. डांगे, एम. ए. राऊत, तहसीलदार एम. व्ही. चौधरी, बी. एफ. डफाडे, एच. बी. वाडीधरे, अनिल दलाल, धान्य पुरवठा निरीक्षक खोब्रागडे, पठाण, विनायक खरवडे, भारतीय खाद्य निगमचे तांत्रिक खरेदी अधिकारी ए. एन. पाटील, सिंग व इतर शासकीय अधिकारी यांना या प्रकरणात आरोपी न करताच हे प्रकरण चालविण्यात आलेले आहे. सदर प्रकरण दाखल झाल्यानंतर मोठी आर्थिक उलाढाल झाल्याचा आरोपींनी जामीन मिळविण्यासाठीही केली, असा आरोप काबरा यांनी मुख्यमंत्र्यांना पाठविलेल्या तक्रारीत केला आहे. २००५-०६ मध्ये याप्रकरणात विधानसभेतही वादळी चर्चा झाली होती. शासकीय अधिकारी व राईस मिल मालक यांनी संगनमत करून शासनाला कोट्यवधी रूपयांचा चुना लेव्हीच्या नावावर लावला. सीआयडीमार्फत या प्रकरणाचा तपास होऊनही आरोपींना शिक्षा होऊ शकली नाही. शासकीय अधिकारी, कर्मचाऱ्यांना आरोपी न करता दोषारोप पत्र दाखल करण्यात आले. त्यामुळे या प्रकरणातील आरोपी निर्दोष सुटले. या प्रकरणाची फेर चौकशी नव्याने करून संबंधित आरोपींवर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी काबरा यांनी मुख्यमंत्र्यांकडे केली आहे. (प्रतिनिधी)