शहरं
Join us  
Trending Stories
1
भाजप आणि RSS मध्ये कुठलाही वाद नाही; संघप्रमुख मोहन भागवतांची स्पष्टोक्ती
2
कोल्हापुरातील शेतकऱ्यांना शक्तिपीठ महामार्गाबाबत दिलासा? राज्य सरकारने दिले आदेश; वाचा सविस्तर
3
नाशिकच्या देवळाली कॅम्पजवळ सैनिकाचे हँग ग्लायडर एका घरावर कोसळले; सरावादरम्यान दुर्घटना
4
'हम दो हमारे तीन', प्रत्येक कुटुंबात तीन मुले असावीत': आरएसएस प्रमुख मोहन भागवत
5
Vidarbha Rain Alert: विदर्भातील 'या' जिल्ह्यांमध्ये पावसाचा जोर वाढणार, IMD ने दिला सतर्कतेचा इशारा
6
डॉन ‘डॅडी’ला जामीन मंजूर, पण शुक्रवारी सुटकेची शक्यता कमीच
7
अथर्व सुदामेनंतर आता डॅनी पंडितने शेअर केलेल्या रीलची चर्चा, दिला हिंदू-मुस्लीम ऐक्याचा संदेश
8
‘पोक्सो’ प्रकरणात आरोपी कुकला २० वर्षे सक्तमजुरी, प्रमुख जिल्हा व सत्र न्यायालयाचा निकाल
9
विश्वासघातकी पक्षांनी 'समृद्ध उत्तर प्रदेश' ही ओळखच मिटवली; CM आदित्यनाथ यांचा सपा, काँग्रेसवर हल्ला
10
Video: उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे राज ठाकरेंच्या 'शिवतीर्थ'वर दाखल; गणपती बाप्पाचं घेतलं दर्शन
11
जगभरात सर्वात वेगवान इंटरनेट असणारे १० देश; भारत कितव्या स्थानावर, जाणून घ्या
12
भयावह! हुंड्यासाठी जाळून मारणाऱ्या निक्कीच्या वडिलांनाही पैशांची हाव; सुनेचा गंभीर आरोप
13
पवनारातून होणार शक्तिपीठ महामार्गाची पायाभरणी, शासनाचा आदेश निघाला!
14
वीज कोसळून २९ शेळ्यांचा जागीच मृत्यू, रखवालदार बचावले; जैतापूर गावातील घटनेने खळबळ
15
तब्बल ७०० किलोमीटर दूर गर्लफ्रेंडला भेटायला गेला, पण तिने बॉयफ्रेंडसोबत जे केलं ते ऐकून बसेल धक्का!
16
जपानमध्ये स्मार्टफोनवर निर्बंध! मोबाईल दिवसातून फक्त २ तास वापरू शकता, नियम काय आहेत?
17
हायवाच्या धडकेत रिक्षाचा चक्काचूर, सहा जण जागीच ठार; गावावर कोसळला दुःखाचा डोंगर
18
विपिन भाटी खरं बोलतोय? निक्की हत्याकांडात झाला मोठा खुलासा, पोलिसांच्या तपासात नवा ट्विस्ट!
19
Asia Cup : संजूनं भक्कम केली ओपनिंगची दावेदारी! 'खंबीर' खेळीमुळं गंभीरचा प्लॅन फिस्कटणार?
20
रशियाचा पुन्हा एकदा युक्रेनवर मोठा हल्ला; ६२९ मिसाईल आणि ड्रोन डागले, अनेकांचा मृत्यू

लेव्ही घोटाळ्याची फेरचौकशी करा

By admin | Updated: April 19, 2015 01:29 IST

२००५-०६ या वर्षात गडचिरोली जिल्ह्यात उघडकीस आलेल्या व राज्यभर गाजलेल्या बनावट लेव्ही घोटाळ्यात तत्कालीन शासकीय अधिकाऱ्यांना आरोपी ...

गडचिरोली : २००५-०६ या वर्षात गडचिरोली जिल्ह्यात उघडकीस आलेल्या व राज्यभर गाजलेल्या बनावट लेव्ही घोटाळ्यात तत्कालीन शासकीय अधिकाऱ्यांना आरोपी करून नव्याने या प्रकरणाची चौकशी करण्याचे आदेश देण्यात यावे, अशी मागणी देसाईगंज येथील सामाजिक कार्यकर्ते राधेश्याम परसरामजी काबरा यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली आहे. राधेश्याम काबरा यांनी मुख्यमंत्र्यांना १७ एप्रिल रोजी पाठविलेल्या निवेदनात म्हटले आहे की, ६ जून २००५ ला तत्कालीन जिल्हाधिकारी यांच्यासमोर ६३ व्या लोकशाही दिनात तक्रार करण्यात आली होती. त्यानंतर १८ राईस मिल मालकांविरूद्ध देसाईगंज पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल करण्यात आले होते. पोलीस स्टेशन देसाईगंजने १४ नोव्हेंबर २००५ ला तक्रारकर्ते म्हणून माझा बयानही घेतला होता व या संपूर्ण प्रकरणाचे पुरावे आपण पोलिसांना दिले होते. देसाईगंज पोलिसांनी याप्रकरणी प्रथम श्रेणी न्याय दंडाधिकारी देसाईगंज यांच्या न्यायालयात १८ प्रकरण न्यायप्रविष्ट केले होते. सदर खटल्यात ९ ते १२ मार्च २०१५ या कालावधीत १७ मामल्यांचा निकाल लागून सर्व आरोपींची निर्दोष मुक्तता झाली आहे. फौजदारी मामला क्रमांक ७९/२००६ चा आरोपी फरार असल्यामुळे या प्रकरणाचा निकाल लागलेला नाही. तक्रारकर्ता व मुख्य साक्षीदार मी असताना सदर मामला चालविताना साक्षीकरिता मला बोलविण्यात आले नाही व माझे नावही साक्षीदाराच्या यादीतून वगळण्यात आले. तसेच सरकारी यंत्रणेतील तत्कालीन जिल्हाधिकारी श्रीवास्तव, सुब्रत राथो, नितीन गद्रे, अनिल काळे, अतिरिक्त जिल्हाधिकारी पी. बी. काळभोर, दिलीप चिलमुलवार, जिल्हा पुरवठा अधिकारी बागडे, सकलेचा, संजय पवार, देसाईगंजचे उपविभागीय अधिकारी टी. जी. कासार, एफ. एस. जाधव, सी. के. डांगे, एम. ए. राऊत, तहसीलदार एम. व्ही. चौधरी, बी. एफ. डफाडे, एच. बी. वाडीधरे, अनिल दलाल, धान्य पुरवठा निरीक्षक खोब्रागडे, पठाण, विनायक खरवडे, भारतीय खाद्य निगमचे तांत्रिक खरेदी अधिकारी ए. एन. पाटील, सिंग व इतर शासकीय अधिकारी यांना या प्रकरणात आरोपी न करताच हे प्रकरण चालविण्यात आलेले आहे. सदर प्रकरण दाखल झाल्यानंतर मोठी आर्थिक उलाढाल झाल्याचा आरोपींनी जामीन मिळविण्यासाठीही केली, असा आरोप काबरा यांनी मुख्यमंत्र्यांना पाठविलेल्या तक्रारीत केला आहे. २००५-०६ मध्ये याप्रकरणात विधानसभेतही वादळी चर्चा झाली होती. शासकीय अधिकारी व राईस मिल मालक यांनी संगनमत करून शासनाला कोट्यवधी रूपयांचा चुना लेव्हीच्या नावावर लावला. सीआयडीमार्फत या प्रकरणाचा तपास होऊनही आरोपींना शिक्षा होऊ शकली नाही. शासकीय अधिकारी, कर्मचाऱ्यांना आरोपी न करता दोषारोप पत्र दाखल करण्यात आले. त्यामुळे या प्रकरणातील आरोपी निर्दोष सुटले. या प्रकरणाची फेर चौकशी नव्याने करून संबंधित आरोपींवर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी काबरा यांनी मुख्यमंत्र्यांकडे केली आहे. (प्रतिनिधी)