शहरं
Join us  
Trending Stories
1
अभिनेता-नेता विजयने जाणीवपूर्वक उशीर केल्याने झाली मोठी चेंगराचेंगरी; मृतांची संख्या ४१ वर
2
लडाखला परके करताय, वांगचुक यांना सोडा; कारगिल डेमोक्रॅटिक अलायन्सची मागणी
3
शेतकऱ्यांचं मरण : महिनाभरात २६ लाख हेक्टरला फटका; खरिप हंगामातील ५२ लाख हेक्टरवरील पिके गेली पाण्यात
4
सायबर फसवणुकीवर आता एआयचा लगाम; मोबाइल नंबर व आयपी ॲड्रेस होतील ब्लॉक
5
अखेर 'त्या' आईने लढाई जिंकली, २० वर्षांनंतर ६० लाखांची भरपाई; नेमकं प्रकरण काय?
6
ट्रम्प बनले व्हिलन! केली नवी घोषणा; चित्रपटांवरही लावला १००% टॅरिफ
7
चांदी दीड लाख रूपये किलो, सप्टेंबरमध्ये २१,५२७ रुपयांची झेप; सोन्याचीही ११ हजारांची उडी
8
Asia Cup 2025: मोहसीन नक्वी टीम इंडियाला ट्रॉफी द्यायला झाले तयार, पण आता ठेवली 'ही' एक अट
9
तब्बल २२ वाहने चोरणाऱ्या आंतरराज्य चोरट्याला सांगलीत अटक; १६ लाखांचा मुद्देमाल जप्त
10
भरधाव ट्रकच्या धडकेत दुचाकीस्वार पती-पत्नी जागीच ठार; कोहमारा-वडसा मार्गावरील घटना
11
भाजपा पदाधिकाऱ्याची पत्नीसह ३ ठिकाणी मतदारयादीत नावे, एका दुकानावर २५ नावे- काँग्रेसचा आरोप
12
पंतप्रधान मोदी करणार ‘मुख्यमंत्री अल्पमुदतीचे रोजगारक्षम अभ्यासक्रम’ कार्यक्रमाचे उद्घाटन
13
'या' दिवसापर्यंत गपचूप ट्रॉफी भारताला द्या नाहीतर...; BCCIचे मोहसीन नक्वी यांना 'अल्टीमेटम'
14
दहिसर टोलनाका वाहतूककोंडी दूर करण्यासाठी मंत्री प्रताप सरनाईक यांनी सुचवल्या उपाययोजना
15
१०० वर्षांनी हंस महालक्ष्मी योग: ८ राशींचे कल्याण, कल्पनेपलीकडे लाभ; अपार यश, भरघोस भरभराट!
16
“शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान, भरीव मदत सरकार देईल, उद्या मंत्रिमंडळ बैठकीत...”: संजय शिरसाट
17
"दुसऱ्याच महिन्यात रंगेहाथ पकडलं...!" धनश्री वर्माचा खळबळजनक खुलासा, युजवेंद्र चहलनं लग्नाच्या पहिल्याच वर्षात दिला होता धोका?
18
अंधेरी क्रीडा संकुल महापालिकेने स्वतः उभारावे; गोपाळ शेट्टी यांची पालिका आयुक्तांकडे मागणी
19
"ही सगळी नाटकं, पाकिस्तानसोबत खेळायलाच नको होतं"; भारत-पाक सामन्यावरुन आदित्य ठाकरेंनी सुनावलं
20
भाजप कार्यालय आमच्यासाठी इमारत नाही, मंदिर आहे; पंतप्रधान मोदींनी व्यक्त केल्या भावना...

पहिल्या टप्प्यातील मतदानासाठी यंत्रणा सज्ज

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 14, 2021 05:00 IST

कोरची, कुरखेडा, देसाईगंज, आरमोरी, धानोरा आणि गडचिरोली या सहा तालुक्यांमध्ये शुक्रवारी मतदान होणार आहे. या तालुक्यांमध्ये एकही नामांकन दाखल न झालेल्या २ ग्रामपंचायती आहेत. तसेच १३ ग्रामपंचायतींमध्ये सदस्यांची पूर्णपणे बिनविरोध निवड झाली आहे. याशिवाय १३ ग्रामपंचायतींमध्ये काही जागा बिनविरोध निवडल्या गेल्या तर काही जागांवरील नामांकन वैध ठरले नाही. त्या १३ ग्रामपंचायतींमध्येही प्रत्यक्ष मतदान होणार नाही.

ठळक मुद्दे१७० ग्रामपंचायतींमधील ११२४ जागा, ६१८ मतदान केंद्रांवर अडीच हजार कर्मचाऱ्यांची ड्युटी

लाेकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली : ग्रामपंचायत निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यासाठी दि.१५ ला मतदान होत आहे. त्यासाठी निवडणूक यंत्रणा सज्ज झाली आहे. उत्तर भागातील ६ तालुक्यांपैकी कोरची आणि धानोरा तालुक्यातील संवेदनशील मतदान केंद्रांवर ड्युटी लागलेल्या अधिकारी-कर्मचाऱ्यांना बुधवारी हेलिकॉप्टरने बेस कॅम्पवर पोहचवण्यात आले. इतर केंद्रांवरील कर्मचारी गुरूवारी रवाना होतील. कोरची, कुरखेडा, देसाईगंज, आरमोरी, धानोरा आणि गडचिरोली या सहा तालुक्यांमध्ये शुक्रवारी मतदान होणार आहे. या तालुक्यांमध्ये एकही नामांकन दाखल न झालेल्या २ ग्रामपंचायती आहेत. तसेच १३ ग्रामपंचायतींमध्ये सदस्यांची पूर्णपणे बिनविरोध निवड झाली आहे. याशिवाय १३ ग्रामपंचायतींमध्ये काही जागा बिनविरोध निवडल्या गेल्या तर काही जागांवरील नामांकन वैध ठरले नाही. त्या १३ ग्रामपंचायतींमध्येही प्रत्यक्ष मतदान होणार नाही. आता मतदानासाठी १७० ग्रामपंचायती उरल्या असून त्यातील ११२४ जागांसाठी प्रत्यक्ष मतदान होणार आहे.एकूण ६१८ केंद्रांवर मतदान होणार आहे. प्रत्येक केंद्रावर ४ कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. याशिवाय सुरक्षेच्या दृष्टीने पोलीस व इतर सुरक्षा दल कार्यरत राहणार आहे. धानोरा तालुक्यातील दोन ग्रामपंचायतींमध्ये एकही नामनिर्देशनपत्र दाखल न झाल्याने त्या ठिकाणी मतदान होणार नाही. तसेच पूर्णत: बिनविरोध होणाऱ्या ग्रामपंचायतींमध्ये गडचिरोली व कोरची तालुक्यात प्रत्येकी ४, आरमोरी व धानोरा तालुक्यात प्रत्येकी २ आणि कुरखेडा तालुक्यातील एका ग्रामपंचायतचा समावेश आहे. दुसऱ्या टप्प्यातील ग्रामपंचायतींसाठी येत्या २० जानेवारीला मतदान हाेणार आहे. या टप्प्यात चामाेर्शी, अहेरी, एटापल्ली, मुलचेरा, भामरागड आणि सिराेंचा या सहा तालुक्यात निवडणूक हाेत आहे. या भागात एटापल्ली, भामरागड, सिराेंचा आणि अहेरी हे तालुके संवेदनशील आहेत. त्यामुळे त्या भागातही मतदान प्रक्रिया सुरक्षितपणे पार पाडण्याचे आव्हान पाेलीस यंत्रणेपुढे राहणार आहे. 

मतदानाच्या दिवशी सुटी किंवा दोन तासांची सवलत राज्य निवडणूक आयोगाने जाहीर केल्यानुसार मतदानाची वेळ सकाळी ७.३० ते दुपारी ३ वाजेपर्यंत राहणार आहे. सर्व मतदारांना मतदानाचा हक्क योग्यरीतीने बजावता यावा यासाठी शासनाकडून परिपत्रकाच्या आधारे सूचना करण्यात आली आहे. निवडणूक होणाऱ्या मतदान क्षेत्रात मतदार असलेले कामगार/अधिकारी/कर्मचारी यांना निवडणुकीच्या दिवशी भरपगारी सुटी देण्याची सूचना करण्यात आली आहे.   अपवादात्मक परिस्थितीत कामगार, अधिकारी, कर्मचारी इत्यादींना पूर्ण दिवस सुटी देणे शक्य नसेल तर मतदान क्षेत्रातील कामगारांना हक्क बजावण्यासाठी केवळ दोन ते तीन तासांची सवलत देता येईल. अशी सवलत न देणाऱ्यांबद्दल तक्रार आल्यास योग्य ती कारवाई करण्यात येईल, असे जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी गडचिरोली यांनी कळविले.

 

टॅग्स :gram panchayatग्राम पंचायतElectionनिवडणूक