शहरं
Join us  
Trending Stories
1
हल्ल्याची छायाचित्रे पाहून भारतीयांचे रक्त उसळते आहे; दहशतवाद्यांना होईल शिक्षा, पीडितांना न्याय मिळेल : मोदी
2
किती अधिकाऱ्यांना मंत्रालयात सुनावणीसाठी बोलावणार?
3
भारत-फ्रान्स यांच्यात आज होणार Rafale-M jetsचा करार; भारतीय नौदल होणार अधिक सामर्थ्यवान
4
DC vs RCB : भर मैदानात कोहली-केएल राहुल यांच्यात वाजलं? नेमकं काय घडलं? (VIDEO)
5
पाकिस्तानी नागरिकांनी दिलेल्या वेळेत भारत सोडला नाही तर बसणार मोठा दणका, काय होणार शिक्षा?
6
Shocking!! सायबर चौकात दहशत! कोल्हापुरात सराईत गुंडाकडून तलवारीने हल्ला; दोघे जखमी
7
राज्याला हादरवणाऱ्या शिक्षण घोटाळ्याची ईडीने मागविली माहिती; SIT गठीत करण्याच्या हालचालींना वेग
8
ट्रक-बोलेरोच्या भीषण अपघातात चार जण जागीच ठार; एक जण गंभीर जखमी, रुग्णालयात दाखल
9
धक्कादायक! नागपुरातील भोसले घराण्याची ऐतिहासिक तलवार आंतरराष्ट्रीय कंपनीकडून ऑनलाईन विक्रीला
10
"देशाच्या सुरक्षेसाठी शिवसैनिक जवानांसारखा लढेल, ही लढाई..."; DCM एकनाथ शिंदे यांचे वक्तव्य
11
भुवीनं साधला मोठा डाव! IPL च्या इतिहासात सर्वाधिक विकेट्स घेणारा ठरला दुसरा गोलंदाज
12
पाकिस्तानात मोठी कारवाई! खैबर पख्तूनख्वा प्रांतात घुसखोरी करणारे ५४ TTP समर्थक ठार
13
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित एक ओव्हर नाही टिकला; पण दोन चेंडूत विराटची बरोबरी करून परतला
14
मध्य प्रदेशात भीषण अपघात; भरधाव कार विहिरीत कोसळली, 12 जणांचा मृत्यू
15
"शरद पवारांनी जाणीवपूर्वक 'ते' वक्तव्य केले"; पहलगामबाबतच्या 'त्या' विधानावरुन भुजबळांचे स्पष्टीकरण
16
पाकिस्तानात भीतीचे वातावरण; लष्कर प्रमुखानंतर बिलावल भुट्टोचे कुटुंबीय देश सोडून पळाले
17
जसप्रीत बुमराहची रेकॉर्ड ब्रेक स्पेल; मुंबई इंडियन्सकडून 'अशी' कामगिरी करणारा पहिलाच!
18
सीमेवर तणाव वाढताच पाकिस्तानने चीनकडे मागितले १.४ बिलियन डॉलर
19
"लाडक्या बहि‍णी १५०० मध्ये खूष, २१०० रुपये देऊ असं कुणीच म्हटलं नाही"; नरहरी झिरवाळांचे विधान
20
MI vs LSG : बॅटिंग-बॉलिंग सगळ्यात भारी! पुन्हा दिसतोय MI चा चॅम्पियनवाला तोरा

जुन्या जागी रूजू न होणाऱ्या शिक्षकांना निलंबित करा

By admin | Updated: May 11, 2015 01:23 IST

दीड वर्षापूर्वी करण्यात आलेल्या बोगस बदल्या शासनाने रद्द केल्यानंतर सदर शिक्षकांना जुन्याच जागी रूजू होण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.

गडचिरोली : दीड वर्षापूर्वी करण्यात आलेल्या बोगस बदल्या शासनाने रद्द केल्यानंतर सदर शिक्षकांना जुन्याच जागी रूजू होण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. मात्र आठ दिवसांचा कालावधी उलटूनही बहुतांश शिक्षक रूजूच झाले नाहीत. अशा शिक्षकांवर कारवाई करावी, अशी मागणी शिक्षक संघटनांकडून होत आहे. मे २०१३ नंतर गडचिरोली जिल्हा परिषदेत सुमारे सहा महिने शिक्षकांच्या बदल्या करण्यात आल्या. यामुळे अनेक शिक्षकांवर अन्याय झाला. या विरोधात काही शिक्षक संघटनांनी आवाज उठवत शासनाकडे तक्रार केली होती. त्यानंतर या तक्रारीची दखल घेत शासनाने २२० शिक्षकांच्या बदल्या रद्द केल्या आहेत. सदर शिक्षकांना २ मे रोजी पंचायत समितीमधून जुन्या जागेवर परतण्यासाठी भारमुक्त करण्यात आले आहे. काही शिक्षकांनी न्यायालयात धाव घेतली आहे. काही शिक्षक मूळ आस्थापनेवर रूजू झाले आहेत. मात्र काही अजूनही रूजू झाले नाहीत. अशा शिक्षकांचा अहवाल शिक्षण विभागाने मागितला आहे. त्यामुळे त्या शिक्षकांवर कारवाई होण्याची शक्यता वर्तविली जात आहे. २ मे रोजीच शिक्षकांना भारमुक्त करण्यात आले आहे. त्यामुळे उच्च न्यायालयाने जरी स्थगिती दिली तरी त्यांना जुन्या ठिकाणी रूजू होणे भाग ठरणार आहे. जिल्हा परिषदेच्या आदेशानंतरही मूळ आस्थापनेवर रूजू न होणाऱ्या शिक्षकांवर निलंबनाची कारवाई मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी करावी, अशी मागणी शिक्षक संघटनांकडून होत आहे. (नगर प्रतिनिधी)