शहरं
Join us  
Trending Stories
1
“जीवनात ही घडी अशीच राहू दे”; फोटो शेअर करत बाळा नांदगावकरांची पांडुरंगाकडे प्रार्थना
2
मनातलं सगळंच सांगितलं; प्रताप सरनाईकांचं उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना ३ पानी खुलं पत्र
3
बर्मिंगहॅमच्या मैदानात पावसाची बॅटिंग! इंग्लंडच्या ७ विकेट्स घेण्यासाठी टीम इंडियाला किती षटके मिळणार?
4
“एकाचं भाषण अपूर्ण अन् दुसऱ्याचं अप्रासंगिक, तर पूर्ण कार्यक्रम अवास्तव”; भाजपाची टीका
5
१६ वर्षे अत्याचार झालेल्या मुलींच्या मृतदेहाची लावत होता विल्हेवाट; एका घटनेमुळे केला खुलासा
6
आधी कॅब चालकांची करायचे हत्या, दऱ्यांमध्ये फेकायचे मृतदेह; सीरियल किलरला अखेर अटक
7
शेतकऱ्यांसाठी खुशखबर! पीएम किसानचा २०वा हप्ता 'या' दिवशी खात्यात येणार? आत्ताच यादी तपासा!
8
राज्यात सुरू असलेल्या भाषा वादावर बाबा रामदेव यांची पहिली प्रतिक्रिया, स्पष्टच बोलले; दिला असा सल्ला
9
सोलापूर : 'तुझ्यामुळेच माझी बायको...'; सावत्र दिराने भावजयीच्या मानेवर कुऱ्हाडीने केला वार, जागेवरच गेला जीव
10
“विठ्ठला...! सरकारला कर्जमाफी देण्याची सद्बुद्धी दे...”; आषाढी एकादशीला बच्चू कडूंची पोस्ट
11
हाफिज सईद आणि मसूद अजहर भारताकडे सोपवू, पण...; बिलावल भुट्टो यांची 'ती' मागणी काय?
12
ENG vs IND : इंग्लंड टेस्ट मॅच ड्रॉ करण्यासाठी खेळणार? कोच म्हणाला, आम्ही एवढेही मूर्ख नाही की,...
13
'देशात गरीब वाढत चाललेत आणि काही श्रीमंताच्या हातात संपत्ती चाललीये'; नितीन गडकरींनी व्यक्त केली चिंता
14
"२० कोटी दिले तरी ...", बिग बॉस १९ मध्ये सहभागी होण्याच्या चर्चांवर राम कपूरने सोडलं मौन
15
ज्या घटनेमुळे बापाने केली हत्या, त्यात आईचा होता सहभाग; कोल्हापुरातील प्रकरणात काय आले समोर?
16
BRICS शिखर परिषदेसाठी PM मोदी ब्राझीलमध्ये दाखल; भारताला काय फायदा? जाणून घ्या...
17
भारतीय चलनी नोटांवर फक्त महात्मा गांधीजींचेच चित्र का? आरबीआयने स्वतःच सांगितले कारण
18
2028 च्या राष्ट्राध्यक्ष पदाच्या निवडणुकीत उतरणार 'America Party'? इलॉन मस्क यांनी वेगळीच हिंट दिली!
19
संपत्तीवरून वाद झाला, काकीनेच पुतण्याचा गेम केला! तरुणाचा दुर्दैवी मृत्यू 
20
अमेरिकेचा मोठा निर्णय! १ ऑगस्टपासून १०० देशांवर लादणार नवीन शुल्क, भारतावर काय परिणाम?

जुन्या जागी रूजू न होणाऱ्या शिक्षकांना निलंबित करा

By admin | Updated: May 11, 2015 01:23 IST

दीड वर्षापूर्वी करण्यात आलेल्या बोगस बदल्या शासनाने रद्द केल्यानंतर सदर शिक्षकांना जुन्याच जागी रूजू होण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.

गडचिरोली : दीड वर्षापूर्वी करण्यात आलेल्या बोगस बदल्या शासनाने रद्द केल्यानंतर सदर शिक्षकांना जुन्याच जागी रूजू होण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. मात्र आठ दिवसांचा कालावधी उलटूनही बहुतांश शिक्षक रूजूच झाले नाहीत. अशा शिक्षकांवर कारवाई करावी, अशी मागणी शिक्षक संघटनांकडून होत आहे. मे २०१३ नंतर गडचिरोली जिल्हा परिषदेत सुमारे सहा महिने शिक्षकांच्या बदल्या करण्यात आल्या. यामुळे अनेक शिक्षकांवर अन्याय झाला. या विरोधात काही शिक्षक संघटनांनी आवाज उठवत शासनाकडे तक्रार केली होती. त्यानंतर या तक्रारीची दखल घेत शासनाने २२० शिक्षकांच्या बदल्या रद्द केल्या आहेत. सदर शिक्षकांना २ मे रोजी पंचायत समितीमधून जुन्या जागेवर परतण्यासाठी भारमुक्त करण्यात आले आहे. काही शिक्षकांनी न्यायालयात धाव घेतली आहे. काही शिक्षक मूळ आस्थापनेवर रूजू झाले आहेत. मात्र काही अजूनही रूजू झाले नाहीत. अशा शिक्षकांचा अहवाल शिक्षण विभागाने मागितला आहे. त्यामुळे त्या शिक्षकांवर कारवाई होण्याची शक्यता वर्तविली जात आहे. २ मे रोजीच शिक्षकांना भारमुक्त करण्यात आले आहे. त्यामुळे उच्च न्यायालयाने जरी स्थगिती दिली तरी त्यांना जुन्या ठिकाणी रूजू होणे भाग ठरणार आहे. जिल्हा परिषदेच्या आदेशानंतरही मूळ आस्थापनेवर रूजू न होणाऱ्या शिक्षकांवर निलंबनाची कारवाई मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी करावी, अशी मागणी शिक्षक संघटनांकडून होत आहे. (नगर प्रतिनिधी)