शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्राचे नवे राज्यपाल कोण? सीपी राधाकृष्णन राजीनामा देणार; १२ सप्टेंबरला उपराष्ट्रपतीपदाची शपथ घेण्याची शक्यता
2
पुण्यात भलामोठा आयकर रिटर्न घोटाळा; आयटी, मल्टीनॅशनल कंपन्यांचे कर्मचारी अडकले... 
3
बालेंद्र शाहांचा नकार; सुशीला कार्की होणार नेपाळच्या पंतप्रधान? तरुणांचा सर्वाधिक पाठिंबा...
4
नेपाळमधील सत्तापालटावर चीनची पहिली प्रतिक्रिया; माजी पंतप्रधान ओलींचं नाव घेणं टाळलं!
5
मुंबई महापालिका निवडणुकीसाठी शिंदेसेनेची 'जम्बो टीम'; २१ नेत्यांची मुख्य कार्यकारी समिती जाहीर
6
आर्टिफिशियल फ्लेवर्स, प्रिझर्व्हेटिव्ह्जशिवाय घरीच करा 'अ‍ॅपल जॅम'; मुलं म्हणतील, यम्मी...
7
ठाकरेंचा आवाज छत्रपती शिवाजी महाराज पार्कवर घुमणार; दसरा मेळाव्याला महापालिकेची परवानगी
8
Samruddhi Mahamarg : ‘समृद्धी महामार्गावर’वर दिसणारे ते खिळे नाहीत, मग काय?; समजून घ्या 'इपॉक्सी ग्राउटिंग' तंत्रज्ञान
9
वायफाय राउटरच्या बाजूला ठेवल्यात 'या' गोष्टी? आताच बाजूला करा अन्यथा...
10
आयटी सेक्टरमध्ये तेजी! गुंतवणूकदारांनी कमावले २.६४ लाख कोटी रुपये; 'हे' स्टॉक्स ठरले टॉप गेनर
11
वॉशिंग्टन सुरक्षित केले म्हणून डोनाल्ड ट्रम्प हॉटेलमध्ये जेवायला गेले...; लोकांनी जे केले...
12
अमरावतीची 'हवा'च न्यारी! देशात डंका, राष्ट्रीय स्तरावर पटकावला पहिला क्रमांक
13
उपराष्ट्रपती निवडणुकीत 'क्रॉस व्होटिंग'च्या संशयाची सुई; कोणत्या खासदारांनी ऐनवेळी पलटी मारली?
14
भरणी श्राद्ध २०२५: गुरुवारी भरणी श्राद्ध, एकदा करावे की दरवर्षी? अधिकार कोणाला आणि नियम काय?
15
भारतीय अर्थव्यवस्था सुसाट! टॅरिफचा धाक दाखवणाऱ्या अमेरिकेला 'फिच' रिपोर्टने धक्का! इतका वाढणार जीडीपी
16
भयंकर! नेपाळनंतर फ्रान्समध्ये सरकारविरुद्ध मोठं आंदोलन; रस्त्यावर जाळपोळ अन् तोडफोड
17
जिच्यासाठी माजी उपसरपंच गोविंद बर्गे यांनी आयुष्य संपवलं, ती पूजा गायकवाड कोण?
18
मस्तच! नवरात्रात कन्या पूजनानंतर मुलींना द्या 'ही' यूजफुल गिफ्ट्स; आनंदाने उजळतील चिमुकल्यांचे चेहरे
19
फुलांचा गजरा माळून गेली आणि फसली, ऑस्ट्रेलियात भारतीय अभिनेत्रीवर कारवाई, नेमकं कारण काय?  
20
कतारनंतर आता तुर्कीवर हल्ला करणार इस्रायल? हमासशी आहे थेट कनेक्शन!

जुन्या जागी रूजू न होणाऱ्या शिक्षकांना निलंबित करा

By admin | Updated: May 11, 2015 01:23 IST

दीड वर्षापूर्वी करण्यात आलेल्या बोगस बदल्या शासनाने रद्द केल्यानंतर सदर शिक्षकांना जुन्याच जागी रूजू होण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.

गडचिरोली : दीड वर्षापूर्वी करण्यात आलेल्या बोगस बदल्या शासनाने रद्द केल्यानंतर सदर शिक्षकांना जुन्याच जागी रूजू होण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. मात्र आठ दिवसांचा कालावधी उलटूनही बहुतांश शिक्षक रूजूच झाले नाहीत. अशा शिक्षकांवर कारवाई करावी, अशी मागणी शिक्षक संघटनांकडून होत आहे. मे २०१३ नंतर गडचिरोली जिल्हा परिषदेत सुमारे सहा महिने शिक्षकांच्या बदल्या करण्यात आल्या. यामुळे अनेक शिक्षकांवर अन्याय झाला. या विरोधात काही शिक्षक संघटनांनी आवाज उठवत शासनाकडे तक्रार केली होती. त्यानंतर या तक्रारीची दखल घेत शासनाने २२० शिक्षकांच्या बदल्या रद्द केल्या आहेत. सदर शिक्षकांना २ मे रोजी पंचायत समितीमधून जुन्या जागेवर परतण्यासाठी भारमुक्त करण्यात आले आहे. काही शिक्षकांनी न्यायालयात धाव घेतली आहे. काही शिक्षक मूळ आस्थापनेवर रूजू झाले आहेत. मात्र काही अजूनही रूजू झाले नाहीत. अशा शिक्षकांचा अहवाल शिक्षण विभागाने मागितला आहे. त्यामुळे त्या शिक्षकांवर कारवाई होण्याची शक्यता वर्तविली जात आहे. २ मे रोजीच शिक्षकांना भारमुक्त करण्यात आले आहे. त्यामुळे उच्च न्यायालयाने जरी स्थगिती दिली तरी त्यांना जुन्या ठिकाणी रूजू होणे भाग ठरणार आहे. जिल्हा परिषदेच्या आदेशानंतरही मूळ आस्थापनेवर रूजू न होणाऱ्या शिक्षकांवर निलंबनाची कारवाई मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी करावी, अशी मागणी शिक्षक संघटनांकडून होत आहे. (नगर प्रतिनिधी)