शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी: उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांनी दिला पदाचा राजीनामा
2
धनखड यांचा राजीनामा, आता पद कोण सांभाळणार, नव्या उपराष्ट्रपतींची निवड कशी होणार? अशी आहे संपूर्ण प्रक्रिया
3
शेतकऱ्याचा मुलगा ते उपराष्ट्रपती, अशी राहिली आहे जगदीप धनखड यांची वादळी कारकीर्द
4
संविधानाचे कलम ६७(अ) काय सांगते? ज्याअंतर्गत जगदीप धनखड यांनी दिला उपराष्ट्रपतीपदाचा राजीनामा
5
गोव्याहून इंदूरला येणाऱ्या इंडिगो विमानाचे आपत्कालीन लँडिंग, १४० जण करत होते प्रवास
6
सुनील तटकरे यांच्या सांगण्यावरूनच विजयकुमार घाडगे यांना मारहाण, मनोज जरांगे-पाटील यांचा आरोप
7
दातांवर उपचार करताना महिलेचे कानही झाले बरे, २० वर्षांपासून येत नव्हतं ऐकू, असा घडला चमत्कार
8
ऑनलाइन बेटिंग अ‍ॅपसंदर्भात ईडीची कारवाई, राणा दग्गुबाती अन् प्रकाश राजसह ४ कलाकारांना समन्स
9
'आखडू' पाकिस्तानची मस्ती भारत जिरवणार! BCCIच्या एका निर्णयाने पाकचे ११६ कोटी बुडणार...
10
स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्यासह 'या' दोन विभूतींना भारतरत्न देण्यात यावा, राज्यसभेत मागणी
11
"स्पष्टीकरण दिलं तरी जे घडलं ते भूषणावह नाही"; कोकाटेंच्या व्हिडीओवर CM फडणवीस स्पष्टच बोलले
12
धक्कादायक! प्रफुल्ल लोढाविरोधात बलात्कार प्रकरणी बावधन पोलिस ठाण्यातही गुन्हा दाखल
13
मनोज जरांगेंनी घेतली महादेव मुंडे यांच्या कुटुंबाची भेट; बीडसह राज्यभर आंदोलनाचा दिला इशारा...
14
"...तर आम्ही तुम्हाला बरबाद करू’’, अमेरिकन सिनेटरची भारतासह या देशांना धमकी, कारण काय?  
15
अखेर वेळ ठरली; अधिवेशनात ऑपरेशन सिंदूरवर 25, तर आयकर विधेयकावर 12 तास चर्चा होणार
16
४१ वर्षांनंतर नवीन अवतारात येतेय Kinetic DX; याच महिन्यात होणार लॉन्च, किंमत...
17
१८९ लोकांचा बळी घेणाऱ्या मुंबई स्फोटातील आरोपींना सोडण्याचे आदेश; CM फडणवीस म्हणाले, "निकाल खूपच धक्कादायक"
18
केरळच्या महिलेनं शारजाहमध्ये स्वतःला संपवलं, हिंसक व्हिडिओ पाहून कंपनीने पतीला नोकरीवरून काढलं!
19
"महाराष्ट्र देशाच्या आणि जगाच्या क्रिएटर्स इकॉनॉमीचे केंद्र बनेल’’, देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला विश्वास
20
मुंबई ट्रेन बॉम्बस्फोट प्रकरण; सर्व आरोपींची निर्दोष सुटका, कुणावर काय आरोप? जाणून घ्या...

शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर अधीक्षक अभियंत्यांना घेराव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 6, 2021 04:34 IST

देसाईगंज तालुक्यातील अनेक शेतकऱ्यांनी या भागात विविध पिकांची लागवड केली आहे. सध्या पिकांना पाणी देण्याचे काम शेतकऱ्यांना करावे लागते; ...

देसाईगंज तालुक्यातील अनेक शेतकऱ्यांनी या भागात विविध पिकांची लागवड केली आहे. सध्या पिकांना पाणी देण्याचे काम शेतकऱ्यांना करावे लागते; परंतु काही दिवसांपासून तालुक्यातील पोटगाव,कोरेगाव, विहीरगाव परिसरात ट्रान्स्फाॅर्मर ओव्हरलोड झाल्याने कृषीपंप काम करीत नाही. तालुक्यातील वारंवार वीजपुरवठा खंडित हाेत आहे. तसेच सौरऊर्जा पंप काम करीत नाही. या समस्येमुळे नागरिक त्रस्त झाले आहेत. ही समस्या लवकर साेडवावी, अशी मागणी पदाधिकाऱ्यांनी अधीक्षक अभियंता गाडगे यांच्याकडे निवेदनाद्वारे केली. अभियंता गाडगे व देसाईगंजचे उपअभियंता साळवे यांनी शेतकरी बांधवांना न्याय देण्याचे आश्वासन दिले. निवेदन देताना युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष महेंद्र ब्राह्मणवाडे, रजनीकांत मोटघरे, नंदू वाईलकर, नरेंद्र गजपुरे, शाम मत्ते, आबाजी बुल्ले, पांडुरंग मत्ते, कालिदास सहारे, दयाराम मत्ते, वसंता राऊत, रामदासजी बुल्ले, यशवंत मत्ते, हरी सहारे, चितरु गायकवाड, गजानन बुल्ले, मुरली बनपूरकर, यादव मस्के, लांजेवार, गाैरव एनप्रेड्डीवार, मयूर गावतुरे व युवक काँग्रेस कार्यकर्ते उपस्थित होते.

बाॅक्स

... तर आंदाेलन करणार

देसाईगंज तालुक्यात उच्च विद्युत दाबाची व अनियमित वीजपुरवठ्याच्या समस्येचा सामना शेतकऱ्यांना सहन करावा लागत आहे. ही समस्या येत्या ८ दिवसात न साेडविण्यास तीव्र आंदाेलन करण्यात येईल, असा इशारा युवक काॅँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी अधीक्षक अभियंत्यांना दिला. याशिवाय जिल्ह्यात नवीन मीटर उपलब्ध नसल्याने अनेकांना नवीन कनेक्शन मिळविण्यासाठी त्रास सहन करावा लागत आहे. त्यामुळे नवीन कनेक्शन लवकर उपलब्ध करावे, अशी मागणी याप्रसंगी केली.