शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबईची 'लाइफ'लाइन पाण्यात; रायगड, पुणे परिसराला आजही 'रेड अलर्ट', नांदेड जिल्ह्यात आठ बळी
2
पावसाची दहशत! ८००हून जास्त लोकल रद्द; २५०+ विमानांना फटका, भुयारी मेट्रो स्थानकांवर पाणीगळती
3
काच फोडून मोनोचे प्रवासी बाहेर! 'एवढेच व्हायचे बाकी होते', प्रवाशांच्या संतप्त प्रतिक्रिया
4
वाहतूक बंद, साचले पाणी; परिस्थितीचा गैरफायदा घेत ॲप आधारित खासगी वाहनांची मनमानी भाडेवाढ
5
मिठी नदी धोका पातळीपर्यंत; रहिवाशांचा गोंधळ; गर्दी नियंत्रित करताना यंत्रणेच्या नाकीनऊ
6
४२,८९२ कोटींची गुंतवणूक, २५,८९२ रोजगाराची निर्मिती; १० गुंतवणूक सामंजस्य करारांवर स्वाक्षरी
7
ऑनलाइन गेमिंगला बसणार चाप! विधेयकाला केंद्राची मंजुरी; पैसे ट्रान्सफर करण्यास बँकांना मनाई
8
‘लोकमत’कडून नमामी गंगे प्रकल्पासाठी ५७.५० लाखांचा निधी; देवेंद्र दर्डा यांनी दिला धनादेश
9
ज्याला दिलं हृदय त्यानेच घेतला जीव! प्रेमविवाह करणाऱ्या अंजलीचा शेवट कसा झाला?; आरोपी पतीला अटक
10
खासदार श्रीकांत शिंदेंच्या बंगल्यातही शिरलं पाणी; विकासकामांवर बोलायचं नाही, मनसेचा खोचक टोला
11
Mumbai Rain Updates Live: शाळा-कॉलेजला २० ऑगस्टला सुट्टी जाहीर केल्याचा मेसेज खोटा - BMC
12
जग पाहण्याआधीच बाळाचा जीव गेला, आईनं गमावलं लेकरू; महाराष्ट्रात आरोग्य सेवेचे धिंडवडे निघाले
13
School Holiday: मुसळधार पावसाचा इशारा, प्रशासन सतर्क; २० ऑगस्टला कोणकोणत्या जिल्ह्यात शाळांना सुट्टी? वाचा
14
उपराष्ट्रपती निवडणूक: सी.पी राधाकृष्णन विरुद्ध सुदर्शन रेड्डी लढतीत कुणाचं पारडं मजबूत?
15
४० तोळं सोने अन् २० लाख खर्च करून लग्न लावलं; २ वर्षात पोरीनं स्वत:ला कायमचं संपवलं
16
मोनो रेल्वे बंद का पडली? CM देवेंद्र फडणवीसांनी दिले चौकशीचे आदेश, प्रवाशांना न घाबरण्याचं आवाहन
17
भारतातील श्रीमंत कुटुंबे रशियन तेलाचा फायदा घेत आहेत, डोनाल्ड ट्रम्प यांच्या मंत्र्यांचे मोठे विधान
18
Asia Cup 2025 : गिल वर्षभरानंतर संघात आला अन् उप-कर्णधार झाला! सूर्यकुमार यादवनं सांगितली आतली गोष्ट
19
पावसामुळे लोकल ठप्प, स्टेशनवर प्रवाशांची गर्दी; मुंबईकरांचे प्रचंड हाल, घरी परतण्यासाठी तारांबळ
20
भारताकडे शक्तिशाली क्षेपणास्त्रे, आमचे अनेक हवाई तळ उडवले; शरीफ यांच्या सहकाऱ्याने पाकिस्तानची पोलखोल केली

उपोषणाला १० संघटनांचा पाठिंबा

By admin | Updated: December 18, 2014 01:08 IST

२०१३ च्या मे महिन्यात जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागामार्फत शिक्षकांच्या मोठ्या प्रमाणात बदल्या करण्यात आल्या.

गडचिरोली : २०१३ च्या मे महिन्यात जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागामार्फत शिक्षकांच्या मोठ्या प्रमाणात बदल्या करण्यात आल्या. यात गैरप्रकार झाल्याचे चौकशीत सिद्ध झाले आहे. मात्र वरिष्ठ अधिकाऱ्यांनी यासंदर्भात कोणतीही कारवाई केली नाही. बोगस बदल्या रद्द करण्याच्या मागणीसाठी शिक्षकांनी उपोषण सुरू केले आहे. या शिक्षकांच्या मागण्या रास्त असल्याचे सांगत जिल्ह्यातील १० संघटनांनी शिक्षकांच्या उपोषणाला पाठिंबा जाहीर केला असल्याची माहिती भ्रष्टाचार विरोधी जनआंदोलन न्यासचे जिल्हाध्यक्ष डॉ. शिवनाथ कुंभारे यांनी पत्रकार परिषदेत दिली.पाठिंबा जाहीर केलेल्या १० संघटनांमध्ये भ्रष्टाचार विरोधी जनआंदोलन न्यास, अखिल भारतीय श्री गुरूदेव सेवा मंडळ गडचिरोली, डॉ. पंजाबराव देशमुख राष्ट्रीय शिक्षक परिषद, मराठा सेवा संघ, जिल्हा मानवाधिकार संघटना, कॉस्ट्राईब जिल्हा संघटना, राष्ट्रवादी शिक्षक संघटना, सर्वोदय मित्रमंडळ, इंडियन इन्स्टिट्यूट आॅफ युथ वेल्फेअर व ओबीसी कर्मचारी संघटनांचा समावेश आहे. पत्रकार परिषदेत बोलतांना डॉ. कुंभारे म्हणाले, प्रशासनाने गठित केलेल्या चौकशी समितीच्या अहवालामध्ये जिल्ह्यात २२० बोगस बदल्या झाल्याचे सिद्ध झाले आहे. गैरव्यवहार झाल्याच्या बाबीला प्रशासन दुजोरा देत आहे. मात्र याबाबत जि. प. प्रशासन तसेच विभागीय प्रशासनाच्यावतीने कोणतीही कारवाई करण्यात आली नाही. त्यामुळे लोकशाही शासनप्रणाली ही खेदाची बाब आहे, असे डॉ. कुंभारे यांनी यावेळी म्हणाले.शिक्षकांच्या उपोषणाबाबत आपण संघटनेच्यावतीने जि. प. मुख्य कार्यकारी अधिकारी संपदा मेहता यांची भेट घेऊन चर्चा केली. वरिष्ठस्तरावरून कारवाई संदर्भात कोणतेही निर्देश न आल्यामुळे कारवाईची प्रक्रिया हाती घेता आली नाही, असे त्यांनी सांगितल्याचे डॉ. कुंभारे यावेळी म्हणाले. विधानसभेच्या अधिवेशन काळात शिक्षकांचे उपोषण सुरू असल्याने जिल्ह्यातील आमदारांनी बोगस बदल्या प्रकरणी विधानसभेत लक्षवेधी लावावी, अशीही मागणी शेषराव येलेकर यांनी यावेळी केली. पत्रकार परिषदेला दादाजी चापले, दादाराव चुधरी, पंडीतराव पुडके, पी. वाय. भांडेकर, डॉ. मुर्लीधर बद्दलवार, मनोहर हेपट, सुखदेव वेठे, भाष्कर नरूले आदी उपस्थित होते. (स्थानिक प्रतिनिधी)