शहरं
Join us  
Trending Stories
1
"७५ टक्के नगराध्यक्ष महायुतीचे, ४८ टक्के नगरसेवक एकट्या भाजपाचे; एवढा मोठा विजय...," CM फडणवीसांनी आकड्यांसह सांगितली ताकद
2
"कुटुंब आणि लग्न हे केवळ शारीरिक संतुष्टीचे माध्यम नाही तर...", 'लिव्ह-इन रिलेशनशिप'वर मोहन भागवत स्पष्टच बोलले
3
मिस्टर अँड मिसेस नगरसेवक! बदलापूरमध्ये डझनभर जोडप्यांनी निवडणूक लढवली; चार जिंकली, तर पाच...
4
भंडारा उधळला आणि भडका उडाला, जेजुरीत विजयी मिरवणुकीला गालबोट; दोघे भाजले, १८ जखमी
5
Smriti Mandhana Record : स्मृती मानधनाचा मोठा पराक्रम! अशी कामगिरी करणारी ठरली पहिली भारतीय बॅटर
6
इलॉन मस्क यांची संपत्ती ७५० अब्ज डॉलर्सच्या पार; भारताच्या टॉप ४० श्रीमंतांएवढी एकट्याची 'माया'
7
"PM मोदींच्या योजनांवरचा आशीर्वाद"; अमित शाहंकडून कौतुकाची थाप, महायुतीच्या विजयाने दिल्लीत जल्लोष
8
“नगरपालिका निकालाने विरोधकांचे पानिपत, आता मनपासाठी एक दिलाने कामाला लागा”: DCM शिंदे
9
"जर व्हेनेझुएला विरोधात कुठल्याही प्रकारची लष्करी कारवाई झाली तर..."; ब्राझीलच्या राष्ट्राध्यक्षांची अमेरिकेला थेट धमकी!
10
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?
11
विनायक चतुर्थी अंगारक योग २०२५: ‘असे’ करा व्रत, गणेश पूजनात ३ गोष्टी हव्याच; पाहा, सोपी पद्धत
12
प्रियकरासोबत मिळून पतीची हत्या, पण एक चूक नडली अन पोलिसांनी ठोकल्या बेड्या  
13
"पक्षाने जे प्रवेश दिले त्याचा फायदाच झाला"; मुनगंटीवारांच्या नाराजीवर CM फडणवीसांचे भरपाई देण्याचे आश्वासन
14
IND vs PAK : मैदानात फुल राडा! आयुष म्हात्रे–वैभव सूर्यवंशीचा पाक गोलंदाजाशी वाद; VIDEO व्हायरल
15
धावत्या ट्रेनमध्ये प्रेमीयुगुलाचा रोमान्स, VIDEO व्हायरल; नेमका कुठे घडला 'हा' लज्जास्पद प्रकार?
16
‘हा महायुतीचा सामूहिक विजय, आम्ही जिथे लढलो तिथे…”, निकालांनंतर अजित पवारांचं मोठं विधान          
17
'हिंदूंनी एकजुटीने...', बांगलादेशातील हिंदू अत्याचारांवर RSS प्रमुख मोहन भागवतांचे मोठे वक्तव्य
18
भाजपाचे ५ आमदार असतानाही काँग्रेसने दिली मात! चंद्रपुरात विजय वडेट्टीवार ठरले किंगमेकर
19
Daund Local Body Election Result 2025: दौंडला दोन्ही गट सत्तेत; नगराध्यक्षपदी राष्ट्रवादी काँग्रेसच्या दुर्गादेवी जगदाळे
20
एकनाथ शिंदेंच्या ठाण्यातील दोन बालेकिल्ल्यांना भाजपाकडून सुरुंग, अंबरनाथ, बदलापूरमध्ये फुललं कमळ
Daily Top 2Weekly Top 5

छत्तीसगडच्या व्यापाऱ्यांना हाेताे जनावरांचा पुरवठा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 8, 2021 05:58 IST

देसाईगंज : शेतकऱ्यांकडे असलेल्या हाडकुळ्या जनावरांची नाममात्र किमतीत खरेदी करून छत्तीसगड राज्यातील बड्या व्यापाऱ्यांना पुरवठा करणारी टाेळी देसाईगंज तालुक्यात ...

देसाईगंज : शेतकऱ्यांकडे असलेल्या हाडकुळ्या जनावरांची नाममात्र किमतीत खरेदी करून छत्तीसगड राज्यातील बड्या व्यापाऱ्यांना पुरवठा करणारी टाेळी देसाईगंज तालुक्यात सक्रिय झाली आहे. तालुका मुख्यालयापासून १२ किलोमीटर अंतरावर असलेल्या कळमगाव येथील अड्ड्यावर रात्रीच्या सुमारास छत्तीसगड राज्यात पाळीव जनावरे पुरविली जात असल्याची धक्कादायक माहिती हाती आली आहे. गेल्या काही दिवसांपासून तालुक्यात पाळीव जनावरांच्या खरेदी, विक्री व तस्करीचा व्यवसाय जाेमात सुरू आहे. कळमगाव या जंगलव्याप्त गावात मागील काही महिन्यांपासून तालुक्यातील जनावरांची खरेदी करून अड्ड्यावर जमा केले जाते. सक्रिय टाेळीच्या माध्यमातून खरेदी करण्यात आलेली जनावरे रात्रीच्या सुमारास वाहनात काेंबून कळमगाव येथील अड्ड्यावर पाेहोचविली जात आहेत. गडचिराेली जिल्ह्यातील काही तालुका मुख्यालय तसेच छत्तीसगड राज्यात दलालाच्या मार्फत पुरवठा केला जातो. एका जनावराची १० ते १५ हजार रुपयात विक्री करून दिवसाकाठी एका जनावरामागे तस्करांना दीड ते दाेन हजार रुपये मिळतात. २० ते २५ जनावरांचे ३० ते ४० हजार रुपये मिळतात. गाेवंश तस्करीच्या गाेरखधंद्यातील दलाल गांधीनगर येथील रहिवासी असल्याचे सांगण्यात येत असून मागील अनेक वर्षांपासून त्यांचे स्थानिक पाेलिसांशी मधूर संबंध असल्याची माहिती आहे. दरम्यान, दलालाने जनावरांची खरेदी करण्यासाठी टाेळी तयार केली असून या माध्यमातून हा धंदा जाेमात सुरू आहे. पाळीव जनावरे पुरवठा करणाऱ्या दलालांना प्रती जनावर ५०० रुपये कमिशन दिले जात आहे. कायद्याने पाळीव जनावरे व गाेवंश तस्करी व विक्रीवर बंदी आहे. मात्र, देसाईगंज तालुक्यात कत्तलीसाठी पाळीव जनावरे पुरविण्याचा धंदा सध्या जाेमात सुरू आहे. मात्र, या गाेरखधंद्यास पाेलीस विभागाची मूकसंमती असल्याचे बाेलले जात आहे.

बाॅक्स...

वाघाच्या भीतीने तस्करांचे फावले

देसाईगंज तालुका मुख्यालयापासून १२ किलोमीटर अंतरावर असलेले कळमगाव हे जंगलव्याप्त गाव असून या गावाच्या परिसरात वाघाचे अस्तित्व असल्याने काेणत्याही प्रशासकीय विभागाचे अधिकारी व कर्मचारी या भागात दाैरे करीत नाहीत. कारवाईची जबाबदारी असलेल्या पाेलीस विभागाचसुद्धा या जंगलव्याप्त गावात जाऊन धाडसत्र राबविण्याची हिंमत दिसून येत नाही. एकूणच वाघाच्या भीतीने पाळीव जनावर तस्करांचे चांगलेच फावले आहे.