शहरं
Join us  
Trending Stories
1
माणिकराव कोकाटेंच्या शिक्षेला सुप्रीम कोर्टाकडून स्थगिती; आमदारकीही जाणार नाही, आज काय घडलं?
2
डोनाल्ड ट्रम्प यांचा मोठा निर्णय; २९ देशांतील अमेरिकन राजदुतांना तडकाफडकी परत बोलावले; काय आहे कारण?
3
आता मनमानी चालणार नाही! रुग्णालयांना आधीच सांगावा लागणार आयसीयू-व्हेंटिलेटरचा खर्च; 'यांची' मंजुरीही आवश्यक
4
थरारक घटना! टेकऑफनंतर काही मिनिटांतच Air India विमानाचा यू टर्न; हवेत अडकला प्रवाशांचा श्वास
5
सैराटची पुनरावृत्ती! आंतरजातीय विवाहामुळे बदल्याची आग; बापानेच केली गर्भवती लेकीची हत्या
6
रस्त्यांवर झाडू मारतोय भारतीय 'सॉफ्टवेअर डेव्हलपर'! महिना सव्वा लाखाची कमाई; कंपनी का देते इतके पैसे?
7
विधवा वहिनीचं दीरासोबतच सुरू झालं अफेअर अन् अचानक घरातून झाली गायब! एक महिन्यानंतर जे समोर आलं... 
8
तुम्ही वापरत असलेला चार्जर FAKE तर नाहीये ना? कसा ओळखायचा ओरिजनल चार्जर, टाळू शकता मोबाइलचं होणारं नुकसान
9
Mumbai Crime: मुंबईतील धक्कादायक प्रकार! चालत्या लोकलमधून मुलीला खाली फेकलं; Video व्हायरल, आरोपीला पकडलं
10
भीषण अपघात! इंडोनेशियात डिव्हायडरला धडकून बस महामार्गावर उलटली, १६ जणांचा मृत्यू
11
सहा पक्षांच्या जय, पराजयाचा संदेश काय? भाजपपेक्षा एकनाथ शिंदेंना सर्वाधिक यश? एवढा विस्तृत लेख कुठेच मिळणार नाही...
12
बॉलिवूडचे चर्चेतले चेहरे अक्षय खन्ना-सनी देओल २९ वर्षांनंतर एकत्र दिसणार? 'या' सिनेमाची चर्चा
13
Budh Gochar 2025: २०२५ ला निरोप देताना 'या' ७ राशींचे नशीब चमकणार, आयुष्यात येणार सुवर्णकाळ
14
लग्नाच्या आदल्या रात्री वडील ओरडले; नवरदेवाच्या लागलं मनाला, वरातीऐवजी घरातून निघाली अंत्ययात्रा!
15
कोट्यधीश होण्याचे स्वप्न आता होणार पूर्ण! २१X१०X१२ हा फॉर्म्युला वापरा; ५१ व्या वर्षी व्हाल मालामाल
16
KVP Scheme: पैसा दुप्पट करणारी सरकारी स्कीम; विना जोखीम 'इतक्या' महिन्यांत तुमचे पैसे होतील दुप्पट
17
केंद्रीय मंत्री किरेन रिजिजू अजमेर दर्ग्यावर चादर चढवणार; म्हणाले, "दुआ करने जा रहा हूं..."
18
भाडं वाढणार; १००, २००, ५०० कोटी नाही तर, 'इतक्या' कोटींचा होणार रेल्वेला बंपर फायदा, जाणून घ्या
19
एस एस राजामौलींच्या 'वाराणसी'चं बजेट १३०० कोटी? प्रियंका चोप्रा म्हणाली, "अर्धे पैसे माझ्या..."
20
शरीफ उस्मान हादीचा मारेकरी देश सोडून पळाला? बांगलादेश पोलिसांनी सत्य परिस्थिती केली स्पष्ट
Daily Top 2Weekly Top 5

छत्तीसगडच्या व्यापाऱ्यांना हाेताे जनावरांचा पुरवठा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 9, 2021 04:30 IST

देसाईगंज : शेतकऱ्यांकडे असलेल्या हाडकुळ्या जनावरांची नाममात्र किमतीत खरेदी करून छत्तीसगड राज्यातील बड्या व्यापाऱ्यांना पुरवठा करणारी टाेळी देसाईगंज तालुक्यात ...

देसाईगंज : शेतकऱ्यांकडे असलेल्या हाडकुळ्या जनावरांची नाममात्र किमतीत खरेदी करून छत्तीसगड राज्यातील बड्या व्यापाऱ्यांना पुरवठा करणारी टाेळी देसाईगंज तालुक्यात सक्रिय झाली आहे. तालुका मुख्यालयापासून १२ किमी अंतरावर असलेल्या कळमगाव येथील अड्ड्यावर रात्रीच्या सुमारास छत्तीसगड राज्यात पाळीव जनावरे पुरविली जात असल्याची धक्कादायक माहिती हाती आली आहे. गेल्या काही दिवसांपासून तालुक्यात पाळीव जनावरांच्या खरेदी, विक्री व तस्करीचा व्यवसाय जाेमात सुरू आहे.कळमगाव या जंगलव्याप्त गावात मागील काही महिन्यांपासून तालुक्यातील जनावरांची खरेदी करून अड्ड्यावर जमा केले जातात. सक्रिय टाेळीच्या माध्यमातून खरेदी करण्यात आलेली जनावरे रात्रीच्या सुमारास वाहनात काेंबून कळमगाव येथील अड्ड्यावर पाेहचविले जात आहेत. गडचिराेली जिल्ह्यातील काही तालुका मुख्यालय तसेच छत्तीसगड राज्यात दलालाच्या मार्फतीने पुरवठा केली जातात. एका जनावराची १० ते १५ हजार रुपयात विक्री करून दिवसाकाठी एका जनावरामागे तस्करांना दीड ते दाेन हजार रुपये मिळतात. २० ते २५ जनावरांचे ३० ते ४० हजार रुपये मिळतात. गाेवंश तस्करीच्या गाेरखधंद्यातील दलाल गांधीनगर येथील रहिवासी असल्याचे सांगण्यात येत असून मागील अनेक वर्षांपासून त्यांचे स्थानिक पाेलिसांशी मधुर संबंध असल्याची माहिती आहे. दरम्यान, दलालाने जनावरांची खरेदी करण्यासाठी टाेळी तयार केली असून या माध्यमातून हा धंदा जाेमात सुरू आहे. पाळीव जनावरे पुरवठा करणाऱ्या दलालांना प्रति जनावर ५०० रुपये कमिशन दिले जात आहे. कायद्याने पाळीव जनावरे व गाेवंश तस्करी व विक्रीवर बंदी आहे. मात्र देसाईगंज तालुक्यात कत्तलीसाठी पाळीव जनावरे पुरविण्याचा धंदा सध्या जाेमात सुरू आहे. मात्र या गाेरखधंद्याला पाेलीस विभागाची मूकसंमती असल्याचे बाेलल्या जात आहे.

बाॅक्स... वाघाच्या भीतीने तस्करांचे फावले

देसाईगंज तालुका मुख्यालयापासून १२ किमी अंतरावर असलेले कळमगाव हे जंगलव्याप्त गाव असून या गावाच्या परिसरात वाघाचे अस्तित्व असल्याने काेणत्याही प्रशासकीय विभागाचे अधिकारी व कर्मचारी या भागात दाैरे करीत नाहीत. कारवाईची जबाबदारी असलेल्या पाेलीस विभागाचीसुद्धा या जंगलव्याप्त गावात जाऊन धाडसत्र राबविण्याची हिंमत दिसून येत नाही. एकूणच वाघाच्या भीतीने पाळीव जनावर तस्करांचे चांगलेच फावले आहे.