पुरेशी उपलब्धता : नऊ हजार मेट्रिक टन खत शिल्लकगडचिरोली : खरीप हंगामासाठी गडचिरोली जिल्ह्यात २० हजार ५१० मेट्रिक टन खताचा पुरवठा करण्यात आला आहे. विक्री होऊन गोदामात अजुनही ८ हजार ७३० मेट्रिक टन खत शिल्लक आहे. त्यामुळे धानपिकासाठी कोणत्याच खताची कमतरता भासणार नाही, अशी माहिती कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांनी लोकमतशी बोलताना दिली आहे. गडचिरोली जिल्ह्यात सर्वाधिक पेरणी खरीप हंगामात केली जाते. यावर्षी सुमारे दोन लाख हेक्टरवर पेरणी होईल, असा अंदाज कृषी विभागाने वर्तविला आहे. त्यानुसार कृषी विभागाने नियोजन केले असून खत, बियाणे, किटकनाशके यांचा वेळीच पुरवठा होईल, याची खबरदारी घेतली जात आहे. गडचिरोली जिल्ह्याला जवळपास खरीप हंगामात ३७ ते ४० हजार मेट्रिक टन खताची गरज भासते. रब्बी हंगामात खतांचा पुरवठा करण्यात आला होता. त्यापैकी काही खताची विक्री झाली. ३१ मार्च २०१५ पर्यंत ३ हजार ३६५ मेट्रिक टन खताची विक्री झाली होती. त्यामुळे सदर खत शिल्लक होते. त्याचबरोबर पावसाळ्याला सुरूवात झाल्यानंतर १७ हजार १४४ मेट्रिक टन खताचा पुरवठा करण्यात आला. दोन्ही मिळून २० हजार ५१० मेट्रिक टन खत खरीप हंगामासाठी उपलब्ध झाले. त्यापैकी ११ हजार ७८० मेट्रिक खताची विक्री झाली असून अजुनही ८ हजार ७३० मेट्रिक टन खत गोदामामध्ये शिल्लक आहे. एकूण मागणीच्या जवळपास ७५ टक्के खत उपलब्ध झाल्याने यावर्षी खताचा तुटवडा जाणवणार नाही, अशी आशा अधिकाऱ्यांनी व्यक्त केली आहे.संयुक्त खताची मागणी वाढलीगडचिरोली जिल्ह्यात आजपर्यंत मिश्र खतांचा सर्वाधिक वापर केला जात होता. मिश्र खतांचा वाटा एकूण खत वापराच्या सुमारे ५० टक्के एवढा राहत होता. मिश्र खताबरोबरच संयुक्त खत सुध्दा चांगले आहे. याचे महत्त्व कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांनी पटवून दिल्यानंतर शेतकरी संयुक्त खतांचा वापर करीत आहेत. त्यामुळे त्यांची मागणीही वाढली आहे.
खरीप हंगामासाठी २० हजार मेट्रिक टन खताचा पुरवठा
By admin | Updated: July 15, 2015 01:43 IST