शहरं
Join us  
Trending Stories
1
'हम दो हमारे तीन', प्रत्येक कुटुंबात तीन मुले असावीत': आरएसएस प्रमुख मोहन भागवत
2
संगमनेरचे आमदार अमोल खाताळ यांच्यावर हल्ला, सुरक्षारक्षकांनी हल्लेखोर तरुणाला घेतले ताब्यात
3
डॉन ‘डॅडी’ला जामीन मंजूर, पण शुक्रवारी सुटकेची शक्यता कमीच
4
ना बनवणार, ना विकणार! 'या' ८ जिल्ह्यांमध्ये फटाक्यांवर बंदी; नियमांचे पालन न केल्यास ५ वर्षांचा तुरुंगवास
5
भाजप आणि RSS मध्ये कुठलाही वाद नाही; संघप्रमुख मोहन भागवतांची स्पष्टोक्ती
6
कोल्हापुरातील शेतकऱ्यांना शक्तिपीठ महामार्गाबाबत दिलासा? राज्य सरकारने दिले आदेश; वाचा सविस्तर
7
नाशिकच्या देवळाली कॅम्पजवळ सैनिकाचे हँग ग्लायडर एका घरावर कोसळले; सरावादरम्यान दुर्घटना
8
नागपूर महामेट्रोच्या वित्त संचालकांना सायबर गुन्हेगारांकडून गंडा, गुगलवर बँकेचा नंबर शोधणे पडले महागात
9
Vidarbha Rain Alert: विदर्भातील 'या' जिल्ह्यांमध्ये पावसाचा जोर वाढणार, IMD ने दिला सतर्कतेचा इशारा
10
अथर्व सुदामेनंतर आता डॅनी पंडितने शेअर केलेल्या रीलची चर्चा, दिला हिंदू-मुस्लीम ऐक्याचा संदेश
11
‘पोक्सो’ प्रकरणात आरोपी कुकला २० वर्षे सक्तमजुरी, प्रमुख जिल्हा व सत्र न्यायालयाचा निकाल
12
विश्वासघातकी पक्षांनी 'समृद्ध उत्तर प्रदेश' ही ओळखच मिटवली; CM आदित्यनाथ यांचा सपा, काँग्रेसवर हल्ला
13
Video: उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे राज ठाकरेंच्या 'शिवतीर्थ'वर दाखल; गणपती बाप्पाचं घेतलं दर्शन
14
जगभरात सर्वात वेगवान इंटरनेट असणारे १० देश; भारत कितव्या स्थानावर, जाणून घ्या
15
भयावह! हुंड्यासाठी जाळून मारणाऱ्या निक्कीच्या वडिलांनाही पैशांची हाव; सुनेचा गंभीर आरोप
16
पवनारातून होणार शक्तिपीठ महामार्गाची पायाभरणी, शासनाचा आदेश निघाला!
17
वीज कोसळून २९ शेळ्यांचा जागीच मृत्यू, रखवालदार बचावले; जैतापूर गावातील घटनेने खळबळ
18
तब्बल ७०० किलोमीटर दूर गर्लफ्रेंडला भेटायला गेला, पण तिने बॉयफ्रेंडसोबत जे केलं ते ऐकून बसेल धक्का!
19
जपानमध्ये स्मार्टफोनवर निर्बंध! मोबाईल दिवसातून फक्त २ तास वापरू शकता, नियम काय आहेत?
20
हायवाच्या धडकेत रिक्षाचा चक्काचूर, सहा जण जागीच ठार; गावावर कोसळला दुःखाचा डोंगर

उन्हाळ्याची चाहूल; पाण्यासाठी भटकंती

By admin | Updated: April 20, 2015 01:29 IST

विहिरींमध्ये साचलेला गाळ, बंद असलेल्या पाणीपुरवठा योजना व हातपंप यामुळे अहेरी तालुक्यता पाणीटंचाईचे सावट निर्माण झाले आहे.

अहेरी : विहिरींमध्ये साचलेला गाळ, बंद असलेल्या पाणीपुरवठा योजना व हातपंप यामुळे अहेरी तालुक्यता पाणीटंचाईचे सावट निर्माण झाले आहे. त्यामुळे नागरिक व प्राण्यांना पाण्यासाठी भटकंती करावी लागत आहे. ही तर उन्हाळ्याची चाहूल असून मे व जून हे दोन महिने आणखी शिल्लक आहेत. या कालावधीत तालुक्यातील पाणीटंचाईची समस्या तीव्र होणार असून प्रशासनाने वेळीच उपाययोजना न केल्यास पाणी संकट आणखी गडद होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.एप्रिल महिन्याला सुरुवात होताच गडचिरोली जिल्ह्यात पाणीटंचाईची समस्या सुरू होते. यापासून अहेरी तालुका सुद्धा अपवाद नाही. एप्रिल महिन्याची ऊन पडू लागताच विहिरीतील पाण्याची पातळी कमी होण्यास सुरुवात होते. तालुक्यातील बहुतांश नागरिक शेतीचा व्यवसाय करीत असल्याने या नागरिकांना स्वत:ची तहाण भागविण्याबरोबर पाळीव प्राण्यांच्याही पाण्याची व्यवस्था करावी लागते. उन्हाळ्यात पाण्याची गरज वाढते. मात्र जलसाठे निकामी होत असल्याने पाण्याचे प्रमाण कमी होते. अशी विपरित परिस्थिती निर्माण होते. ग्रामीण भागातील पाण्याची गरज हातपंप व विहिरीच्या माध्यमातून पूर्ण केल्या जाते. मात्र विहिरींमधील गाळ मागील अनेक वर्षांपासून ग्राम पंचायतीच्या मार्फतीने उपण्यात आला नाही. त्यामुळे विहिरीचे जलस्त्रोत कमी झाले आहेत. विहिरींमध्ये साचलेल्या गाळामुळे विहिरींची पाणी साठवण क्षमता कमी झाली आहे. याबाबत गावकऱ्यांकडून ग्राम पंचायतीला कळविण्यात येते. मात्र ग्राम पंचायत प्रशासन निधी नसल्याचे कारण पुढे करीत विहिरीतील गाळाचा उपसा करण्याकडे दुर्लक्ष करीत आहेत. दिवसेंदिवस भूगर्भ पातळी खोलात जात असल्याने बहुतांश विहिरी एप्रिल महिन्याच्या सुरुवातीलाच कोरड्या पडतात. गावाला पाणीपुरवठा करण्याचे दुसरे साधन हातपंप आहे. मात्र हातपंपाची स्थितीसुद्धा फारशी चांगली नाही. बहुतांश हातपंप बंद असल्याने सदर हातपंप केवळ शोभेच्या वस्तू बनल्या आहेत. याबाबत पंचायत समिती प्रशासनाकडे अनेकदा तक्रार करून त्याचा काहीही फायदा होत नाही. तालुक्यातील दुर्गम भागात पाणीटंचाईची समस्या तीव्र होते. मात्र या गावांना प्रशासनातील अधिकारी भेट देत नसल्याने या गावांमधील समस्या प्रशासनाच्या लक्षात येत नाही. नागरिकांना मात्र पाणीटंचाईचे चटके सहन करावे लागतात. (तालुका/शहर प्रतिनिधी)