शहरं
Join us  
Trending Stories
1
डोनाल्ड ट्रम्प यांचा मोठा निर्णय; २९ देशांतील अमेरिकन राजदुतांना तडकाफडकी परत बोलावले; काय आहे कारण?
2
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटेंच्या शिक्षेला सुप्रीम कोर्टाकडून स्थगिती; आमदारकीही जाणार नाही, आज काय घडलं?
3
ऐन निवडणुकीत महायुती सरकारनं निवडणूक कायद्यात केला महत्त्वाचा बदल; काय परिणाम होणार?
4
YouTube वर १ बिलियन व्ह्यूज आले तर किती पैसे मिळतात? आकडा ऐकून हैराण व्हाल!
5
बिबट्यानंतर आता लांडग्याची दहशत... तीन वर्षाच्या चिमुरड्याला उचलून नेलं; कुठे घडला प्रकार?
6
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या दराचा नवा उच्चांक, चांदीच्या दरात ७,२१४ रुपयांची वाढ; सोन्याच्या दरातही जोरदार तेजी
7
"साजिद अकरमशी माझा कोणताही संबंध नाही"; दहशतवाद्याच्या पत्नीचा मृतदेह स्वीकारण्यास नकार
8
'मी हे विकत घेऊ शकत नाही' असे म्हणणे सोडा! रॉबर्ट कियोसाकींनी सांगितला श्रीमंतीचा नवा मंत्र
9
VIDEO : "सर्वस्व दिलं, तरीही मनासारखं नाही घडलं!" रोहित शर्मा 'त्या' गोष्टीबद्दल पहिल्यांदाच बोलला
10
'बॉर्डर २'मध्ये दिसणार सुनील शेट्टी आणि अक्षय खन्ना? सनी देओलच्या सिनेमासंदर्भात मोठी अपडेट आली समोर
11
आता मनमानी चालणार नाही! रुग्णालयांना आधीच सांगावा लागणार आयसीयू-व्हेंटिलेटरचा खर्च; 'यांची' मंजुरीही आवश्यक
12
थरारक घटना! टेकऑफनंतर काही मिनिटांतच Air India विमानाचा यू टर्न; हवेत अडकला प्रवाशांचा श्वास
13
सैराटची पुनरावृत्ती! आंतरजातीय विवाहामुळे बदल्याची आग; बापानेच केली गर्भवती लेकीची हत्या
14
रस्त्यांवर झाडू मारतोय भारतीय 'सॉफ्टवेअर डेव्हलपर'! महिना सव्वा लाखाची कमाई; कंपनी का देते इतके पैसे?
15
विधवा वहिनीचं दीरासोबतच सुरू झालं अफेअर अन् अचानक घरातून झाली गायब! एक महिन्यानंतर जे समोर आलं... 
16
तुम्ही वापरत असलेला चार्जर FAKE तर नाहीये ना? कसा ओळखायचा ओरिजनल चार्जर, टाळू शकता मोबाइलचं होणारं नुकसान
17
Mumbai Crime: मुंबईतील धक्कादायक प्रकार! चालत्या लोकलमधून मुलीला खाली फेकलं; Video व्हायरल, आरोपीला पकडलं
18
भीषण अपघात! इंडोनेशियात डिव्हायडरला धडकून बस महामार्गावर उलटली, १६ जणांचा मृत्यू
19
सहा पक्षांच्या जय, पराजयाचा संदेश काय? भाजपपेक्षा एकनाथ शिंदेंना सर्वाधिक यश? एवढा विस्तृत लेख कुठेच मिळणार नाही...
20
बॉलिवूडचे चर्चेतले चेहरे अक्षय खन्ना-सनी देओल २९ वर्षांनंतर एकत्र दिसणार? 'या' सिनेमाची चर्चा
Daily Top 2Weekly Top 5

उन्हाळ्याची चाहूल; पाण्यासाठी भटकंती

By admin | Updated: April 20, 2015 01:29 IST

विहिरींमध्ये साचलेला गाळ, बंद असलेल्या पाणीपुरवठा योजना व हातपंप यामुळे अहेरी तालुक्यता पाणीटंचाईचे सावट निर्माण झाले आहे.

अहेरी : विहिरींमध्ये साचलेला गाळ, बंद असलेल्या पाणीपुरवठा योजना व हातपंप यामुळे अहेरी तालुक्यता पाणीटंचाईचे सावट निर्माण झाले आहे. त्यामुळे नागरिक व प्राण्यांना पाण्यासाठी भटकंती करावी लागत आहे. ही तर उन्हाळ्याची चाहूल असून मे व जून हे दोन महिने आणखी शिल्लक आहेत. या कालावधीत तालुक्यातील पाणीटंचाईची समस्या तीव्र होणार असून प्रशासनाने वेळीच उपाययोजना न केल्यास पाणी संकट आणखी गडद होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.एप्रिल महिन्याला सुरुवात होताच गडचिरोली जिल्ह्यात पाणीटंचाईची समस्या सुरू होते. यापासून अहेरी तालुका सुद्धा अपवाद नाही. एप्रिल महिन्याची ऊन पडू लागताच विहिरीतील पाण्याची पातळी कमी होण्यास सुरुवात होते. तालुक्यातील बहुतांश नागरिक शेतीचा व्यवसाय करीत असल्याने या नागरिकांना स्वत:ची तहाण भागविण्याबरोबर पाळीव प्राण्यांच्याही पाण्याची व्यवस्था करावी लागते. उन्हाळ्यात पाण्याची गरज वाढते. मात्र जलसाठे निकामी होत असल्याने पाण्याचे प्रमाण कमी होते. अशी विपरित परिस्थिती निर्माण होते. ग्रामीण भागातील पाण्याची गरज हातपंप व विहिरीच्या माध्यमातून पूर्ण केल्या जाते. मात्र विहिरींमधील गाळ मागील अनेक वर्षांपासून ग्राम पंचायतीच्या मार्फतीने उपण्यात आला नाही. त्यामुळे विहिरीचे जलस्त्रोत कमी झाले आहेत. विहिरींमध्ये साचलेल्या गाळामुळे विहिरींची पाणी साठवण क्षमता कमी झाली आहे. याबाबत गावकऱ्यांकडून ग्राम पंचायतीला कळविण्यात येते. मात्र ग्राम पंचायत प्रशासन निधी नसल्याचे कारण पुढे करीत विहिरीतील गाळाचा उपसा करण्याकडे दुर्लक्ष करीत आहेत. दिवसेंदिवस भूगर्भ पातळी खोलात जात असल्याने बहुतांश विहिरी एप्रिल महिन्याच्या सुरुवातीलाच कोरड्या पडतात. गावाला पाणीपुरवठा करण्याचे दुसरे साधन हातपंप आहे. मात्र हातपंपाची स्थितीसुद्धा फारशी चांगली नाही. बहुतांश हातपंप बंद असल्याने सदर हातपंप केवळ शोभेच्या वस्तू बनल्या आहेत. याबाबत पंचायत समिती प्रशासनाकडे अनेकदा तक्रार करून त्याचा काहीही फायदा होत नाही. तालुक्यातील दुर्गम भागात पाणीटंचाईची समस्या तीव्र होते. मात्र या गावांना प्रशासनातील अधिकारी भेट देत नसल्याने या गावांमधील समस्या प्रशासनाच्या लक्षात येत नाही. नागरिकांना मात्र पाणीटंचाईचे चटके सहन करावे लागतात. (तालुका/शहर प्रतिनिधी)