शहरं
Join us  
Trending Stories
1
GST कपातीनंतर EMI मध्ये तुर्तास दिलासा नाही, रेपो दर जैसे थे; ईएमआय कमी होण्यासाठी वाट पाहावी लागणार
2
पूरग्रस्तांच्या मदतीसाठी शेतकऱ्यांकडूनचे वसूली, ऊसासाठी प्रतिटन १५ रुपये कपात; राजू शेट्टींचा हल्लाबोल
3
अनिल देशमुखांवर झालेला 'तो' हल्ला बनावट; पोलिसांच्या बी समरी रिपोर्टमधून धक्कादायक दावा
4
काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे रुग्णालयात दाखल, प्रकृती बिघडली
5
1 October 2025 Rules Change: रेल्वे तिकीट बुकिंगपासून ते UPI पेमेंट पर्यंत, आजपासून झाले 'हे' महत्त्वाचे ८ बदल
6
प्रियकराने सोनमला संपविले अन् अजगर असलेल्या विहिरीत फेकले; दोन वर्षांनी पोलिस शोधायला गेले...
7
६३ कोटींचा दसरा मेळावा, भाजपाचा गंभीर दावा; उद्धव ठाकरेंवर जहरी टीका, ९ आकड्याचं गणित सांगितलं
8
RBI Policy पूर्वी शेअर बाजाराची ग्रीन झोनमध्ये सुरुवात; सेन्सेक्स १०० अंकांनी वधारला, फार्मा शेअर्समध्ये तेजी
9
अमेरिकेत 'शटडाऊन'चं संकट, सरकारी कामकाज बंद; ६० मतांची होती गरज, ट्रम्प यांना मिळाली ५५ मते
10
'कल्कि २' मधून बाहेर पडल्यानंतर दीपिका पादुकोणचं मोठं वक्तव्य; म्हणाली- 'मी नेहमी माझ्या अटींवर...'
11
"असीम मुनीर म्हणाले, तुम्ही कोट्यवधी लोकांचे जीव वाचवले"; डोनाल्ड ट्रम्प आता काय बोलले?
12
LPG Price 1 October: एलपीजी सिलिंडर महागला, दसऱ्यापूर्वी मोठा झटका; दिल्ली ते मुंबईपर्यंत इतकी वाढली किंमत
13
"दुबईच्या शेखला सेक्स पार्टनर हवा," बाबा चैतन्यानंदाची विद्यार्थीनींकडे अश्लील मागणी; चॅटमध्ये नेमके काय?
14
"...तर तुमची चूक माफ करणार नाही"; प्रिया मराठेच्या निधनानंतर शंतनूची पहिली पोस्ट, वाचून डोळे पाणावतील
15
युएन महासभेत गाझाचा मुद्दा; ट्रम्प यांनी मुनीर आणि शरीफ यांच्या पाठिंब्याचा केला खुलासा!
16
फिलीपिन्समध्ये भूकंपाचा धक्का, २२ जणांचा मृत्यू; अनेक इमारती कोसळल्या
17
चिनी इन्फ्लूएन्सरनं केलं 'फॉलोअर'शी लग्न! व्हायरल होतेय त्यांची प्रेमकहाणी
18
सोनम वांगचुक यांच्या अडचणी वाढणार! प्रशासनाने सांगितले, त्यांच्याविरुद्ध कारवाई करण्यासाठी पुरेसे पुरावे
19
राशीभविष्य १ ऑक्टोबर २०२५: 'या' राशीतील लोकांना आज खूप मोठा आर्थिक लाभ होण्याची शक्यता
20
दळवी, तटकरेंमध्ये शाब्दिक 'वॉर' सुरूच! पालकमंत्रिपदावरील वाद दिवसेंदिवस शिगेला

उन्हाळ्यात खिरनी झाडाच्या फांद्या देतात गारवा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 5, 2020 05:01 IST

गृहप्रवेश असो की लग्नकार्य, यात खिरनीच्या फांद्यांचा मंडप आवर्जुन ग्रामीण भागात टाकल्या जाते. उन्हाळ्याच्या दिवसात एप्रिल, मे महिन्यात प्रचंड तापमान असल्याने नागरिक हैैराण होतात. त्यातल्या त्यात गृहप्रवेश किंवा लग्नकार्य म्हटले की, आप्तेष्ठांची गर्दी आपसुकच जमते. एकाच ठिकाणी शेकडो नागरिक गोळा होत असल्याने वाढत्या तापमानाचा अधिकच त्रास होतो. अशावेळी नागरिकांच्या अंगातून घामाच्या धारा निघतात.

ठळक मुद्देधार्मिक व इतर महत्त्वाच्या कार्यात झाडाला विशेष महत्त्व, ग्रामीण भागात मंडप टाकण्याची क्रेझ कायम

लोकमत न्यूज नेटवर्कसिरोंचा : हिंदू धर्मात विविध शुभकार्य तसेच आणि महत्त्वाच्या कार्यात खिरनी वृक्षाचे महत्त्व अनन्य साधारण आहे. खिरनी वृक्षाचे पान उन्हाळ्याच्या दिवसात माणसाला थंडावा देतात. त्यामुळे ही परंपरा सिरोंचा तालुक्यात आजही कायम आहे.गृहप्रवेश असो की लग्नकार्य, यात खिरनीच्या फांद्यांचा मंडप आवर्जुन ग्रामीण भागात टाकल्या जाते. उन्हाळ्याच्या दिवसात एप्रिल, मे महिन्यात प्रचंड तापमान असल्याने नागरिक हैैराण होतात. त्यातल्या त्यात गृहप्रवेश किंवा लग्नकार्य म्हटले की, आप्तेष्ठांची गर्दी आपसुकच जमते. एकाच ठिकाणी शेकडो नागरिक गोळा होत असल्याने वाढत्या तापमानाचा अधिकच त्रास होतो. अशावेळी नागरिकांच्या अंगातून घामाच्या धारा निघतात. या प्रचंड तापमानापासून दिलास मिळविण्याकरिता खिरनी झाडाच्या फाद्यांपासून टाकलेला मंडप उपयुक्त ठरतो. मंडप टाकण्यापासून लग्नकार्याच्या विधीला सुरूवात होते. मंडपपूजन ते देवपूजापासून विवाहविधी त्यानंतर भोजनावळी असा हा कार्यक्रम असतो. ग्रामीण भागातील लग्नकार्य म्हटले की आप्तेष्ठ व पाहुण्यांची रेलचेल असते. ज्या घरी लग्नकार्य आहे, त्या घरी चार दिवसांपूर्वी मंडप टाकून त्याचे पूजन केले जाते. सिरोंचा तालुकालगतच्या तेलंगणा राज्यातही ही परंपरा कायम आहे.तेलंगणामध्ये खिरनी झाडाला ‘पालापोरका’ म्हणतात. सदर पालापोरका म्हणजे खिरनी झाडाच्या फांद्या आणण्यासाठी ग्रामीण भागातील नागरिक बैलबंडीचा वापर करतात. शेजारच्या नागरिकांना घेऊन जंगलात जाऊन खिरनी झाडाच्या फांद्या जमा केल्या जातात.कोरोनाने पारंपरिक मंडप दिसेनाग्रामीण भागात बऱ्याच युवक, युवतींचे विवाह जुळले आहे. मात्र कोरोनाच्या संचारबंदीने नियोजित लग्नकार्य पुढे ढकलण्यात आले आहे. त्यामुळे दरवर्षी एप्रिल महिन्यात झाडांच्या फाद्यांपासून टाकल्या जाणारे पारंपरिक मंडप यावर्षी दिसेनासे झाले आहेत. डेकोरेशनाच्या माध्यमातून कापडाचा मंडप टाकल्या जातो. मात्र मुख्य विधी होणाऱ्या जागेवर पारंपरिकच मंडप असतो.फळ बहुगुणीखिरनी वृक्षाचे फळ चवीला गोळ असतात. सदर फळ पिकल्यावर पिवळ्या रंगाचे होतात. किसमिससारखा या फळाचा आकार असतो. फळामध्ये दुधाची मात्रा अधिक असते. त्यामुळे या फळाला कॅल्शीयमचा स्त्रोत मानले जाते. हे फळ ग्रिष्म ऋतुत मिळतात. या फळाला मागणी सुद्धा चांगली असते. तालुक्याच्या ग्रामीण भागातील लोक जंगलात जाऊन शहरात हे फळे विकायला आणतात. यातून आदिवासी नागरिकांना रोजगार मिळत असतो. खिरनी वृक्षाचे पान आठ ते दहा दिवस वाळत नाही. त्यामुळेच अधिक थंडावा मिळत असतो.