शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?
2
नगर परिषदा, पंचायत निवडणुकीत भाजपाला भरघोस यश; प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण म्हणाले...
3
'घरी बसणाऱ्यांना मतदारांनी नाकारले' ; नगरपरिषद निवडणुकांवर एकनाथ शिंदेंची पहिली प्रतिक्रिया
4
वर्षाखेरीस IPO बाजारात 'धुमधडाका'! या आठवड्यात ११ नवीन कंपन्यांचे आगमन; गुंतवणुकीची मोठी संधी
5
चांदेकरवाडीत पाणंद रस्त्यावर लिंबू आणि बाहुली, अंधश्रद्धेचा प्रकार, ग्रामस्थांत भीतीची सावली
6
दोन पराभवांनंतर अखेर संजयकाका पाटलांनी मैदान मारले, आर. आर. आबांचा रोहित पाटील पराभूत
7
Siddhi Vastre: अवघ्या २२ वर्षांची तरुणी भाजपवर पडली भारी; मोहोळमध्ये इतिहास घडवणारी सिद्धी वस्त्रे आहे तरी कोण?
8
"दरवाजे उघडून बाहेरच्यांना प्रवेश दिल्याचा हा परिणाम"; चंद्रपूरातील पराभवानंतर मुनगंटीवारांचा घरचा आहेर
9
Maharashtra Local Body Election Results 2025 : अख्खं मंत्रिमंडळ ईश्वरपुरात, तरीही जयंत पाटलांनी महायुतीला दिला धक्का; सांगली जिल्ह्यातील नगराध्यक्षांची यादी एका क्लिकवर
10
विमा घेताय? केवळ जाहिरातींवर जाऊ नका; 'या' ४ तांत्रिक गोष्टी तपासा, अन्यथा क्लेमवेळी होईल पश्चात्ताप!
11
उद्धवसेना-मनसे युतीची बोलणी संपली, संजय राऊतांनी दिली महत्त्वाची माहिती; "अजूनही ७२ तास..."
12
"म्हणून पुन्हा एकदा सांगतो, शून्य अधिक शून्य...", निकाल लागताच भाजपचा उद्धव ठाकरेंवर पहिला प्रहार
13
Shrivardhan Nagar Parishad Election Result 2025: रायगडमध्ये मोठा ट्विस्ट! श्रीवर्धनमधील ठाकरे गटाचा विजयी नगराध्यक्ष शिंदेसेनेत प्रवेश करणार?
14
Maharashtra Nagaradhyaksha Winners List: महाराष्ट्रातील नगरपरिषद, नगरपंचायतींमध्ये कोण झालं नगराध्यक्ष? वाचा, पक्षनिहाय यादी
15
Muktainagar Nagar Panchayat Election Result 2025: “रक्षा खडसे भाजपात एकाकी पडल्या”; मुक्ताईनगरातील शिंदेसेनेच्या विजयानंतर एकनाथ खडसेंचा दावा
16
"पैसे भरा, मृतदेह न्या", पोटच्या पोरासाठी बापाने मागितली भीक; घर गहाण ठेवलं, कर्ज काढलं, पण...
17
धारुरमध्ये हे काय घडलं? भाजपचे सर्व उमेदवार आपटले...! पंकजा मुंडे यांना मोठा धक्का, म्हणाल्या...
18
रेल्वे प्रवासासाठी आता मोजावे लागणार जादा पैसे! जास्त सामान नेण्यावरही अतिरिक्त शुल्क लागू होणार
19
Sangamner Nagar Parishad Election Result 2025: संगमनेरमध्ये पुन्हा 'तांबे-थोरात' पॅटर्न; डॉ. मैथिली तांबे महाराष्ट्रात सर्वाधिक मताधिक्याने विजयी
20
Khed Nagar Parishad Election Result 2025: “कोकणातील विजय हा मुंबई मनपा विजयाची नांदी”; एकनाथ शिंदे यांच्या शिलेदाराचे मोठे भाकित
Daily Top 2Weekly Top 5

नागरिकांच्या सहकार्याने निवडणूक तणावमुक्त करण्यात यश

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 2, 2019 06:00 IST

यावेळी डीआयजी रंजन म्हणाले, आमचे जवान जरी बाहेरचे असले तरी आम्ही जिथे जातो त्या भागाला आपलं समजून काम करतो. त्यामुळेच आमचे जवान कोणत्याही आदेशाची वाट न पाहता लोकांच्या कोणत्याही अडचणीत धावून जातात. नागरी कृती कार्यक्रमाच्या माध्यमातून लोकांना आमच्याशी जोडण्याचा प्रयत्न आम्ही करत आहोत. कोणत्या गावात कशाची गरज आहे याची माहिती आम्ही ग्रामसभांकडून घेऊन त्यांना त्या सुविधा देण्याचा प्रयत्न करत आहोत.

ठळक मुद्देडीआयजी रंजन यांचे प्रतिपादन : सीआरपीएफची सेवा आपलेपणातून

लोकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली : गडचिरोली जिल्ह्यात अनेक वर्षानंतर एवढी शांत आणि तणावमुक्त वातावरणात विधानसभा निवडणूक पार पडली. जिल्ह्यातील नागरिकांच्या सहकार्यामुळेच हे शक्य झाले अशी भावना केंद्रीय राखीव पोलीस दलाचे उपमहानिरीक्षक मानस रंजन यांनी व्यक्त केली. शुक्रवारी पत्रकार परिषद घेऊन त्यांनी गडचिरोली जिल्ह्यात सीआरपीएफकडून नक्षलविरोधी अभियानासोबतच राबविल्या जाणाऱ्या इतर उपक्रमांची माहिती दिली.यावेळी डीआयजी रंजन म्हणाले, आमचे जवान जरी बाहेरचे असले तरी आम्ही जिथे जातो त्या भागाला आपलं समजून काम करतो. त्यामुळेच आमचे जवान कोणत्याही आदेशाची वाट न पाहता लोकांच्या कोणत्याही अडचणीत धावून जातात. नागरी कृती कार्यक्रमाच्या माध्यमातून लोकांना आमच्याशी जोडण्याचा प्रयत्न आम्ही करत आहोत. कोणत्या गावात कशाची गरज आहे याची माहिती आम्ही ग्रामसभांकडून घेऊन त्यांना त्या सुविधा देण्याचा प्रयत्न करत आहोत. या जिल्ह्यात सर्वाधिक समस्या रोजगाराची आहे. त्यामुळे आम्ही विविध माध्यमांतून युवकांना स्वयंरोजगार देऊन आपल्या पायावर उभे करण्याचा प्रयत्न करत आहोत. ज्यांना काहीच येत नाही त्यांचे कौशल्य विकसित करण्यासाठी प्रशिक्षणही दिले जात आहे. आतापर्यंत तलाव खोलीकरण, नवीन हातपंप, सोलर लाईट, शिवणयंत्रांचे वाटप, कुक्कुटपालन व्यवसायासाठी हातभार अशी अनेक कामे सीआरपीएफने या जिल्ह्यात केली असून आम्ही येथे आहे तोपर्यंत ती पुढेही सुरू राहतील असे डीआयजी रंजन म्हणाले. यावेळी सीआरपीएफ १९२ बटालियनचे कमांडंट जियाऊ सिंह, उपकमांडंट कैलास गंगावने हे उपस्थित होते.शेजारच्या राज्यामुळे नक्षलवाद जिवंतगडचिरोली जिल्ह्यातून नक्षलवाद बराच कमी झाला असला तरी शेजारच्या राज्यांमध्ये तो टिकून आहे. त्याची झळ या जिल्ह्याला बसत असल्याचे यावेळी डीआयजी रंजन म्हणाले, पूर्वी गडचिरोली जिल्ह्यात नक्षलवाद्यांची शिबिरे लागायची. अनेक दिवस त्या ठिकाणी त्यांचा मुक्काम असायचा. आता ती स्थिती नाही. नक्षलवाद्यांना एक दिवसही गावाजवळ राहणे कठीण झाले आहे. त्यामुळे पुढील काही काळात या जिल्ह्यातून नक्षलवाद पूर्णपणे नष्ट होईल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.

टॅग्स :Policeपोलिस