शहरं
Join us  
Trending Stories
1
कर्नाटकात मोठी दुर्घटना, गणेश विसर्जन मिरवणुकीत घुसला ट्रक; 8 जणांचा मृत्यू, अनेक जखमी
2
'हे फक्त ट्रेलर...'; दिशा पाटनीच्या घराबाहेर फायरिंग! गोल्डी बरार अन् रोहित गोदारानं घेतली जबाबदारी, सांगितलं कारण? 
3
"भारतावर 50 टक्के टॅरिफ लवणं सोपं नव्हतं"; ट्रम्प म्हणाले, दोन्ही देशांत मतभेद...
4
Phil Salt Fastest Century : टी-२० मध्ये ३०० पारचा आकडा गाठत इंग्लंडनं मोडला टीम इंडियाचा रेकॉर्ड
5
आसाममध्ये टाटा इलेक्ट्रॉनिक्ससमोर नवं आव्हान, घनदाट जंगलात साप आणि हत्तींचा धोका; आता काय करणार TATA?
6
पत्नीच्या डोक्यात शिरलं 'प्रेमाचं भूत', प्रियकरासोबत गेली हॉटेलवर, पाठलाग करत पतीही पोहोचला अन् मग...!
7
नेपाळमध्ये अखेर ठरले! सुशीला कार्कीच होणार अंतरिम पंतप्रधान, संसदही केली बरखास्त
8
PAK vs OMAN : पाकनं मॅच जिंकली; पण रुबाब अन् दरारा टीम इंडियाचाच! ते कसं? जाणून घ्या सविस्तर
9
गुंडा गावाजवळील ओढ्याला पूर; दोन महिला बेपत्ता, शोध कार्य सुरू
10
घराच्या बाल्कनीतुन जाणारा फ्लायओव्हर बघितला का? नागपुरात ९९८ कोटींच्या इंडोरा-डिघोरी रस्त्याचे विचित्र बांधकाम चर्चेत
11
PAK vs OMAN : पाक फलंदाजांनी ओमान संघासह पंच अन् सामनाधिकाऱ्यांना गंडवलं; नेमकं काय घडलं?
12
“मनसेच्या मदतीची गरज म्हणून उद्धव ठाकरे मातोश्री बाहेर पडले”; शिंदे गटाचे नेते स्पष्टच बोलले
13
मॅथ्यू हेडनचं डोकं फिरल्यासारखं वक्तव्य! लेकीचा इंग्लिश बॅटर जो रुटला मेसेज, म्हणाली...
14
भारतानं चीनचं टेन्शन वाढवलं, शेजारील देशाला पुरवणार ब्रह्मोस क्षेपणास्त्र
15
Saim Ayub Golden Duck! ...अन् म्हणे हा बुमराहला सिक्सर मारणार! ओमानच्या गोलंदाजानं काढली हवा
16
अमेरिकेनंतर आता मेक्सिकोची घोषणा! आशियाई देशांवर ५० टक्के टेरिफ लागणार; चीन, भारतावरही परिणाम
17
तोडफोड, जाळपोळ अन् लूटमार; Gen Z आंदोलनामुळे नेपाळच्या हॉटेल व्यवसायाचं मोठं नुकसान!
18
दोन ठाकरे एकत्र येण्याचा मुहूर्त ठरला; या दिवशी... चंद्रकांत खैरेंनी केली घोषणा
19
आरक्षणावरून आरोप-प्रत्यारोप, महायुतीचे असंतुष्ट मंत्री सरकारसाठी डोकेदुखी ठरणार? चर्चा सुरू
20
“मोदींवर टीका करून मोठे होता येत नाही, जनहितासाठी ठाकरे बंधूंनी एकत्र यावे”; भाजपा नेते थेट बोलले

नागरिकांच्या सहकार्याने निवडणूक तणावमुक्त करण्यात यश

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 2, 2019 06:00 IST

यावेळी डीआयजी रंजन म्हणाले, आमचे जवान जरी बाहेरचे असले तरी आम्ही जिथे जातो त्या भागाला आपलं समजून काम करतो. त्यामुळेच आमचे जवान कोणत्याही आदेशाची वाट न पाहता लोकांच्या कोणत्याही अडचणीत धावून जातात. नागरी कृती कार्यक्रमाच्या माध्यमातून लोकांना आमच्याशी जोडण्याचा प्रयत्न आम्ही करत आहोत. कोणत्या गावात कशाची गरज आहे याची माहिती आम्ही ग्रामसभांकडून घेऊन त्यांना त्या सुविधा देण्याचा प्रयत्न करत आहोत.

ठळक मुद्देडीआयजी रंजन यांचे प्रतिपादन : सीआरपीएफची सेवा आपलेपणातून

लोकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली : गडचिरोली जिल्ह्यात अनेक वर्षानंतर एवढी शांत आणि तणावमुक्त वातावरणात विधानसभा निवडणूक पार पडली. जिल्ह्यातील नागरिकांच्या सहकार्यामुळेच हे शक्य झाले अशी भावना केंद्रीय राखीव पोलीस दलाचे उपमहानिरीक्षक मानस रंजन यांनी व्यक्त केली. शुक्रवारी पत्रकार परिषद घेऊन त्यांनी गडचिरोली जिल्ह्यात सीआरपीएफकडून नक्षलविरोधी अभियानासोबतच राबविल्या जाणाऱ्या इतर उपक्रमांची माहिती दिली.यावेळी डीआयजी रंजन म्हणाले, आमचे जवान जरी बाहेरचे असले तरी आम्ही जिथे जातो त्या भागाला आपलं समजून काम करतो. त्यामुळेच आमचे जवान कोणत्याही आदेशाची वाट न पाहता लोकांच्या कोणत्याही अडचणीत धावून जातात. नागरी कृती कार्यक्रमाच्या माध्यमातून लोकांना आमच्याशी जोडण्याचा प्रयत्न आम्ही करत आहोत. कोणत्या गावात कशाची गरज आहे याची माहिती आम्ही ग्रामसभांकडून घेऊन त्यांना त्या सुविधा देण्याचा प्रयत्न करत आहोत. या जिल्ह्यात सर्वाधिक समस्या रोजगाराची आहे. त्यामुळे आम्ही विविध माध्यमांतून युवकांना स्वयंरोजगार देऊन आपल्या पायावर उभे करण्याचा प्रयत्न करत आहोत. ज्यांना काहीच येत नाही त्यांचे कौशल्य विकसित करण्यासाठी प्रशिक्षणही दिले जात आहे. आतापर्यंत तलाव खोलीकरण, नवीन हातपंप, सोलर लाईट, शिवणयंत्रांचे वाटप, कुक्कुटपालन व्यवसायासाठी हातभार अशी अनेक कामे सीआरपीएफने या जिल्ह्यात केली असून आम्ही येथे आहे तोपर्यंत ती पुढेही सुरू राहतील असे डीआयजी रंजन म्हणाले. यावेळी सीआरपीएफ १९२ बटालियनचे कमांडंट जियाऊ सिंह, उपकमांडंट कैलास गंगावने हे उपस्थित होते.शेजारच्या राज्यामुळे नक्षलवाद जिवंतगडचिरोली जिल्ह्यातून नक्षलवाद बराच कमी झाला असला तरी शेजारच्या राज्यांमध्ये तो टिकून आहे. त्याची झळ या जिल्ह्याला बसत असल्याचे यावेळी डीआयजी रंजन म्हणाले, पूर्वी गडचिरोली जिल्ह्यात नक्षलवाद्यांची शिबिरे लागायची. अनेक दिवस त्या ठिकाणी त्यांचा मुक्काम असायचा. आता ती स्थिती नाही. नक्षलवाद्यांना एक दिवसही गावाजवळ राहणे कठीण झाले आहे. त्यामुळे पुढील काही काळात या जिल्ह्यातून नक्षलवाद पूर्णपणे नष्ट होईल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.

टॅग्स :Policeपोलिस