शहरं
Join us  
Trending Stories
1
शेवटच्या 3 सेकंदांत 'RUN' वरून 'CUTOFF' झालं 'फ्यूल कंट्रोल स्विच' अ्न...; एअर इंडिया प्लेन क्रॅशवेळी शेवटच्या क्षणाला नेमकं काय घडलं?
2
Air India Plane Crash :'रिपोर्ट लीक कसा झाला?' अहमदाबाद विमान अपघाताच्या अहवालावर पायलट असोसिएशनने आक्षेप घेतला
3
पंतची मोठी चूक! चोरटी धाव घेण्याच्या नादात फुकटात फेकली विकेट! बेन स्टोक्सचा डायरेक्ट थ्रो अन्...
4
नरेंद्र मोदींनंतर PM म्हणून काँग्रेसकडून राहुल गांधींचा पर्याय? शं‍कराचार्यांचे मोठे विधान
5
“७५ वर्षांचा नियम RSSला लागू करायचा असेल, म्हणून मोहन भागवत तसे म्हणाले असतील”: शंकराचार्य
6
गुरु-चंद्र-राहुचा वसुमान ग्रहण योग: ७ राशींना भरभराट, भाग्योदय; पैसा-प्रतिष्ठा, कल्याण होईल!
7
सात वर्षांपूर्वीच दिला होता ७३७ जेटमधील स्विचच्या समस्येबद्दल इशारा; एअर इंडिया विमान अपघाताला ठरले कारण?
8
"जयंत पाटलांच्या राजीनाम्याची बातमी खोडसाळपणा...", प्रदेशाध्यक्षपदावरुन जितेंद्र आव्हाड यांनी स्पष्टच सांगितलं
9
पंतची कडक फटकेबाजी! चौकारासह जोफ्राचं स्वागत अन् स्टोक्सला उत्तुंग षटकार मारत साजरी केली फिफ्टी
10
Radhika Yadav : "मी मुलीचा वध केला, मला फाशी द्या"; राधिकाला संपवल्यावर भावासमोर काय म्हणाले वडील?
11
'तो मला बायको म्हणायचा', मुंबईतील शिक्षिकेचा विद्यार्थ्यासोबतच्या संबंधाबद्दल चक्रावून टाकणारा खुलासा
12
Sankashti Chaturthi 2025: चातुर्मासातली पहिली संकष्टी, बाराही राशींसाठी ठरणार खास; पूर्ण होणार प्रत्येक आस!
13
१८० प्रवाशांऐवजी केवळ १५५ जणांनाच घेऊन उडाले एअर इंडियाचे विमान! विमानतळावर गोंधळ,नेमके झाले काय?
14
पतीचा भर रस्त्यात तमाशा; पत्नीवर केले सपासप वार, जांघेत अडकली तलवार! कशावरून झाला वाद?
15
“२० देशांनी भारताच्या बाजूने मतदान केले, १२ किल्ले जागतिक वारसा स्थळ घोषित झाले”: CM फडणवीस
16
CHYD च्या नवीन पर्वात निलेश साबळेंना मिस करशील का? गौरव मोरे म्हणाला, "मी त्यांच्यासोबत..."
17
लव्ह जिहादवरील 'पुस्तका'द्वारे लोकांना भडकवायचा छांगूर बाबा, आणखी ४ सहकाऱ्यांचाही खुलासा; या जिल्ह्यांत सुरू होता धर्मांतराचा खेळ
18
ट्रम्प सरकारची नोकरदारांवरच कुऱ्हाड! १३०० कर्मचाऱ्यांना कामावरून काढणार, लवकरच पाठवणार नोटीस
19
"पैशांची एखादी बॅग देऊ...आजकल हमारा नाम बहुत चल रहा है"; शिरसाटांची मिश्कील टिप्पणी
20
“महायुतीच्या अपयशावर बोट ठेवणार, पक्षाची प्रतिष्ठा वाढवणार”; शशिकांत शिंदेंची पहिली प्रतिक्रिया

अनुदान कपातीचा शेतकऱ्यांना फटका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 7, 2020 05:00 IST

शेती व शेतकऱ्यांचा विकास करायचा असेल तर यांत्रिकीकरणाशिवाय पर्याय नाही. मात्र गरीब शेतकरी महागडी यंत्रे खरेदी करू शकत नाही. त्यामुळे शासनाकडून कृषी यंत्र व अवजारे खरेदीसाठी शासनाकडून जवळपास निम्मे अनुदान दिले जाते. ट्रॅक्टर, रोटावेटर, दालमिल आदी अवजारे व यंत्रांसाठी अनुदान दिले जाते.

ठळक मुद्देअवजारांसाठी पैसेच नाही : फळ लागवड करणारे शेतकरीही वंचित

लोकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली : लॉकडाऊनमुळे शासनाने अनेक योजनांच्या निधीत कपात केली आहे, तर काही निधी परत मागविला आहे. याचा फटका कृषी अवजारांच्या अनुदानालाही बसला आहे. शासनाकडून कृषी विभागाला अनुदानच प्राप्त झाले नसल्याने यावर्षी कृषी अवजारे वितरणाची प्रक्रिया पूर्णपणे ठप्प पडली आहे.कोरोनामुळे शासनाने लॉकडाऊन जाहीर केले. लॉकडाऊनच्या कालावधीत अनेक उद्योग, व्यवसाय बंद पडले होते. त्यामुळे शासनाला मिळणाऱ्या उत्पन्नाचे स्त्रोत आटले. परिणामी शासनाने अनेक योजनांच्या निधीमध्ये कपात केली आहे. याचा फटका कृषी विभागाच्या योजनांचा सुध्दा बसला आहे.शेती व शेतकऱ्यांचा विकास करायचा असेल तर यांत्रिकीकरणाशिवाय पर्याय नाही. मात्र गरीब शेतकरी महागडी यंत्रे खरेदी करू शकत नाही. त्यामुळे शासनाकडून कृषी यंत्र व अवजारे खरेदीसाठी शासनाकडून जवळपास निम्मे अनुदान दिले जाते. ट्रॅक्टर, रोटावेटर, दालमिल आदी अवजारे व यंत्रांसाठी अनुदान दिले जाते.पावसाळ्यापूर्वी शेतकऱ्यांकडून अर्ज मागविले जातात. गडचिरोलीसह काही जिल्ह्यांनी ऑनलाईन व ऑफलाईन अर्ज मागितले जाते. मात्र शासनाकडून अनुदानच प्राप्त झाले नसल्याने पुढची प्रक्रिया पूर्णपणे ठप्प पडली आहे. त्यामुळे शेतकरी यंत्र व अवजारांपासून वंचित आहेत.शासनाने आर्थिक अडचण लक्षात घेऊन इतर योजनांच्या निधीत कपात केली. मात्र कृषी अवजारे व यंत्रे वितरण ही कृषी विभागाची अत्यंत महत्त्वाकांक्षी योजना आहे. या योजनेसाठी तरी निधी उपलब्ध करून द्यावा, अशी मागणी आहे.या अवजारांसाठी दिले जात होते अनुदानट्रॅक्टर, पॉवर ट्रिलर, स्वयंचलीत धान रोवणी यंत्र, धान कापणी यंत्र, नऊ फाळी नागर, रोटावेटर, खत व बी टोबण यंत्र, पॉवर विडर, ऊस कटाई यंत्र, मिनी राईसमिल, मिनी दालमिल, कापूस थ्रेडर आदींसाठी शासनाकडून अनुदान दिले जात होते. मात्र यावर्षी ही प्रक्रिया ठप्प पडली आहे.फळ शेतीला चालना देण्यासाठी शेतकऱ्यांना काही प्रमाणात अनुदान दिले जात होते. मात्र याही योजनेसाठी यावर्षी अनुदान प्राप्त झाले नाही. त्यामुळे फळ लागवड योजना सुध्दा ठप्प पडली आहे.

टॅग्स :Farmerशेतकरीagricultureशेती