शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतात श्रीमंतांच्या संपत्तीत ६२% वाढ, इतर ९९% लोकांची संपत्ती वाढली १%, पण प्रगतीला धोका
2
आजचे राशीभविष्य,०५ नोव्हेंबर २०२५: बोलण्यावर संयम ठेवा; रागावर व वाणीवर संयम ठेवावा लागेल
3
“निवडणूक आयोगाचा कारभार ‘दस नंबरी’, दुबार तिबार नावांची जबाबदारी कोणाची?”: हर्षवर्धन सपकाळ
4
'चिप'ची भीती दाखवून मुलीवर अत्याचार; जन्मदात्या आईचे हादरवणारं कृत्य, कोर्टाने दिली १८० वर्षांची शिक्षा!
5
“मतदार याद्यांमध्ये घोळ, सत्ताधाऱ्यांकडून कबूल, दुबार मतदानावर आयोग गप्प का?”: सुप्रिया सुळे
6
आशिया चषकाचा वाद: जय शाह यांच्या उपस्थितीमुळे मोहसिन नकवींची बैठकीला दांडी
7
रेल्वे अपघातानंतर नातेवाइकांचा आक्रोश; हेल्पलाइन नंबरवर टीबीमुक्त अभियानाचा जागर
8
चेंबूरमधील मेंदी प्रकरणाला नवी कलाटणी; शाळा प्रशासनाने सर्व आरोप फेटाळून लावले
9
अखेर बिगुल वाजला ! राज्यातील २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींच्या निवडणुकांची घोषणा
10
चीनची कार थेट आकाशातून जाणार, ‘उडणाऱ्या कार’चे उत्पादन झाले सुरू
11
हिंदुजा समूहाला जागतिक पातळीवर पोहोचवणारे चेअरमन गोपीचंद हिंदुजा यांचे निधन
12
मंत्री गुलाबराव पाटील कॅबिनेटमध्ये संतापले; पूरग्रस्त शेतकरी आणि नागरिकांबाबतचा होता विषय
13
लवकरच ‘बीएसएनएल’ नेटवर्क; मुंबईत २ हजार टॉवर उभारणी करणार ; इंट्रा सर्कल रोमिंगचा करार
14
तारापूर अणुऊर्जा प्रकल्पातील एक प्लांट बंद; २७० मेगावॉट विजेचा तुटवडा भासण्याची शक्यता
15
लोको पायलटने रेड सिग्नल दुर्लक्ष केला, छत्तीसगडमध्ये झालेल्या प्रवासी ट्रेन आणि मालगाडी अपघातामागील कारण काय?
16
आठवीत शाळा सोडली; मुलांसोबत टेनिस बॉलवर खेळत ‘क्रांती’ घडवली, आणि आज ती वर्ल्ड चॅम्पियन!
17
"मुख्यमंत्री होताच...!"; योगी आदित्यनाथ यांच्या 'टप्पू-पप्पू-अप्पू' विधानावरून तेजस्वी यादव यांचा मोठा पलटवार
18
बिहार विधानसभा निवडणुकीत PK यांच्या जनसुराजला किती जागा मिळणार? ओवेसींच्या पक्षाचं काय होणार? असा आहे सर्व्हेचा अंदाज
19
अजित पवारांची बिहार विधानसभा निवडणुकीत वेगळी चूल; तेजस्वी यादवांविरोधात उतरवला उमेदवार, १५ उमेदवार कोण?
20
बिलासपूरजवळ भीषण रेल्वे अपघातात १० जणांचा मृत्यू ! जखमींच्या किंकाळ्यांनी परिसर थरारला; महाराष्ट्रातील प्रवासी किती?

मध्यान्ह भोजनात आता विद्यार्थ्यांना मिळणार सुमारे बारा प्रकारचे व्यंजन

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 10, 2025 15:34 IST

Gadchiroli : प्रधानमंत्री पोषण शक्ती निर्माण योजनेअंतर्गत मिळणार मध्यान्ह भोजन

लोकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली : पहिली ते आठवीच्या विद्यार्थ्यांना दिल्या जाणाऱ्या मध्यान्ह भोजनात (शालेय पोषण आहार) आता १२ प्रकारचे खाद्यपदार्थ बनवून दिले जाणार आहेत. याबाबतचा शासन निर्णय शालेय शिक्षण व क्रीडा विभागाने निर्गमित केला आहे. यामुळे मध्यान्ह भोजनाची चव पुन्हा रुचकर होण्यास मदत होणार आहे.

प्रधानमंत्री पोषण शक्ती निर्माण योजनेअंतर्गत मध्यान्ह भोजन दिले जाते. राज्यस्तरावरून शाळांना तांदूळ, डाळ उपलब्ध करून दिली जाते. त्यापासून तीन प्रकारचे खाद्यपदार्थ बनविण्याचे निर्देश ११ जून २०२४ च्या शासन निर्णयात देण्यात आले होते. मात्र, तीनच प्रकारचे खाद्यपदार्थ खाणे विद्यार्थ्यांना कंटाळवाणे होत होते. यात सुधारणा करण्याच्या सूचना २८ जानेवारी रोजी निर्गमित केलेल्या शासन निर्णयात करण्यात आल्या आहेत, हे विशेष.

या व्यंजनांचा आस्वाद घेता येणार

  • व्हिजिटेबल पुलाव, मसाले भात, मटार पुलाव, मूगडाळ खिचडी, चणा पुलाव, सोयाबीन पुलाव, मसुरी पुलाव, मूग, शेवगा, वरण-भात, मोड आलेल्या मटकीची उसळ, अंडा पुलाव, गोड खिचडी/नाचणी सत्त्व यांचा समावेश आहे.
  • कोणता खाद्यपदार्थ कसा शिजचावा, याच्या मार्गदर्शक सूचना शासन निर्णयात देण्यात आल्या आहेत. त्यानुसार खाद्य पदार्थ बनवावा लागेल. 

साखरेसाठी लोकसहभाग

  • अंडा पुलाव व गोड खिचडी/नाचणी सत्त्व हे एकमेकांना पर्याय आहेत. गोड खिचडी बनविण्यासाठी आवश्यक असलेली साखर लोकसहभागातून गोळा करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.
  • त्यामुळे शिक्षकांना पुन्हा लोकवर्गणीसाठी प्रयत्न करावा लागेल. त्यामुळे शिक्षकांमध्ये नाराजी आहे.

समिती ठरविणार पाककृतीचा दिवसजिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली असलेली समिती कोणत्या दिवशी कोणते व्यंजन शिजवायचे, याचा निर्णय घेईल. तसेच वेळापत्रक सर्व शाळांना दिले जाईल. त्याचे पालन करणे प्रत्येकाला बंधनकारक राहणार आहे

"पाककृतीत केलेला बदल निश्चितच स्वागतार्ह आहे. यामुळे शालेय पोषण आहार चविष्ट होण्यास मदत होईल. मात्र, खीर बनविण्यासाठी शासनाने साखरही देण्याची गरज आहे."- पुंडलिक देशमुख, जिल्हाध्यक्ष, शिक्षक भारती संघटना

 

टॅग्स :Gadchiroliगडचिरोली