शहरं
Join us  
Trending Stories
1
‘पीओके’मधील दहशतवादी नेटवर्कवर भारत करणार प्रहार; उच्चस्तरीय विचारविनिमय सुरू; ४२ सक्रिय दहशतवादी तळ केंद्राच्या रडारवर
2
नौदलाच्या ताफ्यात येणार फ्रान्सची २६ राफेल विमाने; ६४ हजार कोटींच्या खरेदी करारावर देशांच्या स्वाक्षऱ्या
3
गूढ कायम.. खरं, खोट्याचा होईना उलगडा; डॉ. वळसंगकरांच्या आत्महत्येला दहा दिवस ओलांडले
4
‘म्हाडा’चे ५ हजार घरांचे दिवाळी गिफ्ट; जुन्या इमारतीचाही पुनर्विकास होणार
5
१९ चाळींचा पुनर्विकास एमएमआरडीए करणार; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत महत्त्वपूर्ण निर्णय
6
‘लिव्ह इन’, उत्तराखंड आणि समान नागरी संहिता
7
बुलेट ट्रेन २०२८ अखेरीस मुंबईतून धावणार सुसाट, नवी मुंबई विमानतळ गेम चेंजर ; मुख्यमंत्री फडणवीस
8
मुलांचा ताबा देताना धर्म विचारात घेतला जाऊ शकत नाही : हायकोर्ट
9
कान टोचले, बरे झाले ! केंद्राने विशेष पत्रक काढून माध्यमांना काही मार्गदर्शक सूचना दिल्या
10
पाण्यासाठी भारत-पाक युद्ध पेटण्याची वेळ येऊन ठेपली ?
11
मोठमोठे रस्ते बांधत आहात, इकडे लाेकांचा जीव जाताेय; जखमींवर कॅशलेस उपचारांवरून सर्वाेच्च न्यायालयाने केंद्राला फटकारले
12
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
13
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
14
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
15
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
16
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
17
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
18
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!

मध्यान्ह भोजनात आता विद्यार्थ्यांना मिळणार सुमारे बारा प्रकारचे व्यंजन

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 10, 2025 15:34 IST

Gadchiroli : प्रधानमंत्री पोषण शक्ती निर्माण योजनेअंतर्गत मिळणार मध्यान्ह भोजन

लोकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली : पहिली ते आठवीच्या विद्यार्थ्यांना दिल्या जाणाऱ्या मध्यान्ह भोजनात (शालेय पोषण आहार) आता १२ प्रकारचे खाद्यपदार्थ बनवून दिले जाणार आहेत. याबाबतचा शासन निर्णय शालेय शिक्षण व क्रीडा विभागाने निर्गमित केला आहे. यामुळे मध्यान्ह भोजनाची चव पुन्हा रुचकर होण्यास मदत होणार आहे.

प्रधानमंत्री पोषण शक्ती निर्माण योजनेअंतर्गत मध्यान्ह भोजन दिले जाते. राज्यस्तरावरून शाळांना तांदूळ, डाळ उपलब्ध करून दिली जाते. त्यापासून तीन प्रकारचे खाद्यपदार्थ बनविण्याचे निर्देश ११ जून २०२४ च्या शासन निर्णयात देण्यात आले होते. मात्र, तीनच प्रकारचे खाद्यपदार्थ खाणे विद्यार्थ्यांना कंटाळवाणे होत होते. यात सुधारणा करण्याच्या सूचना २८ जानेवारी रोजी निर्गमित केलेल्या शासन निर्णयात करण्यात आल्या आहेत, हे विशेष.

या व्यंजनांचा आस्वाद घेता येणार

  • व्हिजिटेबल पुलाव, मसाले भात, मटार पुलाव, मूगडाळ खिचडी, चणा पुलाव, सोयाबीन पुलाव, मसुरी पुलाव, मूग, शेवगा, वरण-भात, मोड आलेल्या मटकीची उसळ, अंडा पुलाव, गोड खिचडी/नाचणी सत्त्व यांचा समावेश आहे.
  • कोणता खाद्यपदार्थ कसा शिजचावा, याच्या मार्गदर्शक सूचना शासन निर्णयात देण्यात आल्या आहेत. त्यानुसार खाद्य पदार्थ बनवावा लागेल. 

साखरेसाठी लोकसहभाग

  • अंडा पुलाव व गोड खिचडी/नाचणी सत्त्व हे एकमेकांना पर्याय आहेत. गोड खिचडी बनविण्यासाठी आवश्यक असलेली साखर लोकसहभागातून गोळा करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.
  • त्यामुळे शिक्षकांना पुन्हा लोकवर्गणीसाठी प्रयत्न करावा लागेल. त्यामुळे शिक्षकांमध्ये नाराजी आहे.

समिती ठरविणार पाककृतीचा दिवसजिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली असलेली समिती कोणत्या दिवशी कोणते व्यंजन शिजवायचे, याचा निर्णय घेईल. तसेच वेळापत्रक सर्व शाळांना दिले जाईल. त्याचे पालन करणे प्रत्येकाला बंधनकारक राहणार आहे

"पाककृतीत केलेला बदल निश्चितच स्वागतार्ह आहे. यामुळे शालेय पोषण आहार चविष्ट होण्यास मदत होईल. मात्र, खीर बनविण्यासाठी शासनाने साखरही देण्याची गरज आहे."- पुंडलिक देशमुख, जिल्हाध्यक्ष, शिक्षक भारती संघटना

 

टॅग्स :Gadchiroliगडचिरोली