शहरं
Join us  
Trending Stories
1
'काँग्रेसचा अजेंडा; पण तुम्ही ना कलम 370, ना CAA...', पीएम मोदींचे काँग्रेसला ओपन चॅलेंज
2
"...तर काँग्रेसनं सांगावं, 'याचा' अर्थ काय?" मनमोहन सिंगांच्या वक्तव्यावरून अमित शाह यांचा हल्लाबोल
3
“PM मोदी नेहमी फोन करून प्रकृतीबाबत उद्धव ठाकरेंची विचारपूस करायचे”: देवेंद्र फडणवीस
4
India's T20 World Cup Squad Press Conference - ...अभी मैं बोलकर क्या करूंगा! रोहितने घेतली फिरकी, विराटच्या स्ट्राईक रेटवर भारी रिॲक्शन 
5
प्रभू श्रीराम आणि शिव शंकरांवरील खर्गेंचं 'ते' वक्तव्य, पंतप्रधान मोदी म्हणाले अत्यंत 'खतरनाक'; योगीही भडकले
6
India's T20 World Cup Squad Press Conference - शिवम दुबेची निवड का केली? रोहित शर्माने कारण सांगितलं, पण प्लेइंग इलेव्हनबाबत मोठं विधान 
7
9 हजार कोटींचे कर्ज...पाकिस्तानची झोळी भरणाऱ्या IMF कडे एवढा पैसा कुठून येतो?
8
CSK Fan Mystery Girl Photos: IPL 2024 मध्ये दिसलेली CSKची नवीन 'मिस्ट्री गर्ल' कोण? MS Dhoni ची आहे 'जबरा फॅन', पाहा Photos
9
पाच लाखांच्या मताधिक्याने श्रीकांत शिंदे निवडून येणार, पाच वर्ष सेवा करणार: CM एकनाथ शिंदे
10
“...तर अशी वेळ येईल की देवेंद्र फडणवीसांना कुणी साधा नमस्कारही करणार नाही”: रवींद्र धंगेकर
11
India's T20 World Cup Squad Press Conference - रिंकू सिंग अन् शुबमन गिल यांचा काय गुन्हा? अजित आगरकर म्हणाला, दोघांबद्दल वाईट वाटतंय पण..
12
पाकिस्तानात पावसामुळे भिजलेले गव्हाचे पीक सुकविण्यासाठी वापरली लष्कराची हेलिकॉप्टर्स? जाणून घ्या दाव्यामागील सत्य
13
Amit Shah : "भारत जोडो यात्रेचा समारोप 4 जूनला काँग्रेस 'ढूंढो' यात्रेने होईल"; अमित शाह यांचा घणाघात
14
ब्रिजभूषण यांचा पत्ता कट; BJP ने त्यांच्या मुलाला दिले तिकीट, रायबरेलीचाही उमेदवार जाहीर
15
रस्त्यावर पाणीच पाणी, वीजपुरवठाही खंडित… मुसळधार पाऊस, वादळी वाऱ्याचा UAEला तडाखा!
16
Champions Trophy 2025 मध्ये भारतीय संघाचे सर्व सामने 'लाहोर'मध्ये; PCB ने ICC ला सोपवला ड्राफ्ट
17
चेन्नईतील श्रीदेवीचं आलिशान घर! जिथे जान्हवीचं गेलं बालपण, आता राहता येणार रेन्टवर
18
“उत्तर मुंबईकरांचा मिळणारा प्रतिसाद महायुतीच्या महाविजयाची नांदी”; पीयूष गोयल यांना विश्वास
19
लॉटरी खेळण्याच्या व्यसनापायी 'त्याने' ऑफिसच्या पैशांवरच मारला डल्ला; असा झाला पर्दाफाश
20
मोबाईलचोरामागे पोलीस धावला... टोळीने घेरलं... पाठीत इंजेक्शन टोचलं... उपचारादरम्यान मृत्यू

विद्यार्थ्यांना मिळणार शुद्ध व थंडगार पाणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 17, 2017 11:06 PM

राज्याच्या आदिवासी विकास विभागाकडून भारतीय संविधान २७५/१ योजनेअंतर्गत एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प गडचिरोली कार्यालयाला कोट्यवधीचा निधी प्राप्त झाला आहे.

ठळक मुद्देगडचिरोली प्रकल्प : २४ शासकीय आश्रमशाळांमध्ये योजना मंजूर

लोकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली : राज्याच्या आदिवासी विकास विभागाकडून भारतीय संविधान २७५/१ योजनेअंतर्गत एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प गडचिरोली कार्यालयाला कोट्यवधीचा निधी प्राप्त झाला आहे. या निधीतून प्रकल्प कार्यालयाच्या वतीने कार्यवाही सुरू करण्यात आली असून प्रकल्पाअंतर्गत असलेल्या २४ आश्रमशाळांमध्ये पाणी शुद्धीकरण यंत्र बसविण्यात येणार आहे. काही शाळांमध्ये हे काम अंतिम टप्प्यात असून २०१८ या नवीन वर्षापासून सर्वच २४ शासकीय आश्रमशाळेतील विद्यार्थ्यांना पिण्याचे शुद्ध व थंड पाणी मिळणार आहे.गडचिरोली प्रकल्पाआंतर्गत कारवाफा, सोडे, रांगी, पेंढरी, गोडलवाही, मुरूमगाव, येरमागड, कोरची, मसेली, रामगड, सोनसरी, अंगारा, घाटी, भाकरोंडी, कुरंडी माल, रेगडी, पोटेगाव, मार्र्कंडादेव, भाडभिडी, कोटगूल, गॅरापत्ती व गडचिरोली येथील इंग्रजी माध्यमाची शासकीय आश्रमशाळा अशा मिळून एकूण २४ शासकीय आश्रमशाळा आहेत. आदिवासी विकास विभागाच्या योजनेनुसार सर्वच २४ शासकीय आश्रमशाळांमध्ये जलशुद्धीकरण यंत्राची योजना मंजूर करण्यात आली आहे. प्रती आश्रमशाळा ५० हजार रूपयातून हे यंत्र बसविले जात आहे.गडचिरोली प्रकल्पातील आश्रमशाळांमध्ये इयत्ता पहिली ते बारावीपर्यंतचे मिळून जवळपास १० हजार विद्यार्थी निवासी राहून शिक्षण घेत आहेत. आश्रमशाळांमध्ये बोअरवेल, हातपंप, विहीर आदी पाणीपुरवठ्याच्या सुविधा आहेत. विद्यार्थ्यांना गढूळ व दूषित पाण्यापासून जलजन्य आजार होऊ नये, यासाठी गडचिरोली प्रकल्प कार्यालयाअंतर्गत जलशुद्धीकरण यंत्र बसविण्याच्या योजनेचे नियोजन करण्यात आले. यासाठी प्रकल्प अधिकारी डॉ. विपीन ईटनकर व सहायक प्रकल्प अधिकारी विकास राचेलवार यांनी पुढाकार घेऊन राज्याच्या आदिवासी विकास विभागाकडे पाठपुरावा केला. त्यानंतर डॉ. ईटनकर यांनी राज्य शासनाकडून आश्रमशाळा व वसतिगृहाच्या या सुविधांसाठी जवळपास अडीच कोटींचा निधी प्राप्त करून घेतला आहे.आश्रमशाळांमध्ये जलशुद्धीकरण यंत्र बसविण्याचे काम दर्जेदार व गुणवत्तापूर्ण व्हावे, यासाठी शासकीय यंत्रणेला हे काम सोपविण्यात आले आहे. डिसेंबर अखेर हे काम पूर्ण होणार असल्याने नवीन वर्षापासून आश्रमशाळेतील विद्यार्थ्यांना पिण्याचे शुद्ध व थंड पाणी मिळणार आहे.२१ वसतिगृहातयोजना कार्यान्वितगडचिरोली प्रकल्पाअंतर्गत नाविण्यपूर्ण (टीएसपी) योजनेअंतर्गत सर्वच २१ शासकीय वसतिगृहांमध्ये जलशुद्धीकरण यंत्र बसविण्यात आले आहे. यासाठी प्रत्येक वसतिगृहाला जवळपास ५० हजार रूपयांचा खर्च करण्यात आला आहे. त्यामुळे वसतिगृहातील विद्यार्थ्यांना पिण्याचे शुद्ध व थंड पाणी मिळत आहे. या योजनेमुळे विद्यार्थी समाधानी आहेत.