शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai: मुंबईकरांसाठी खुशखबर...! नव्या इमारतीतील घरांसाठी नोंदणी शुल्क माफ
2
आजचे राशीभविष्य - २१ नोव्हेंबर २०२५, कार्यपूर्ती, यश आणि कीर्ती मिळविण्याच्या दृष्टीने अनुकूल दिवस
3
Elections: मुंबईत ११.८० लाख तर, ठाण्यात ४.२१ लाख मतदार वाढले; महिला मतदारांची संख्या अधिक!
4
SC: राज्यपाल, राष्ट्रपतींना विधेयकांच्या मंजुरीसाठी डेडलाइन देता येणार नाही, न्यायालयाचा महत्त्वपूर्ण निर्णय
5
India- Israel: भारत-इस्रायल समृद्धीचे नवे पर्व सुरू, मुक्त व्यापारासाठी उभयतांत सहमती
6
काँग्रेस सिद्धारामय्यांना हटवणार? कर्नाटकात CM पदावरून पुन्हा वाद पेटला, डीके गटातील आमदारांनी दिल्लीत तळ ठोकला
7
चीन-जपान तणावात भारताची 'बल्ले-बल्ले'! झाला बंपर फायदा, बाजार 11% नं वधारला; आता ट्रम्प टॅरिफचं 'नो-टेंशन'!
8
पाकिस्तानचे डोळे उघडले! चक्क चक्क चिनी कंपन्यांना ठणकावले; म्हणाले, 'आमची लूट थांबवा, अन्यथा काम बंद करा'
9
"बौद्ध धर्माचे पालन करतो, पण..., आज जो काही आहे तो..."; निवृत्तीपूर्वी CJI बीआर गवई यांचं मोठं विधान!
10
विशेष लेख: मिस्टर/मिसेस 'पसेंटेज' आणि बंगल्यावरचे 'ठेके'
11
लेख: बिन भिंतींच्या उघड्या शाळेत तुमचे स्वागत आहे...
12
आजचा अग्रलेख: पुन्हा गोंधळात गोंधळ!
13
जेव्हा मुख्यमंत्री नितीश कुमार पंतप्रधान मोदींच्या पायाला स्पर्श करण्यासाठी वाकले..., पाटणा विमानतळावरील 'आदराचं' अद्भुत दृश्य - Video
14
भाजपने आणखी एक नगरपालिका बिनविरोध जिंकली; मविआच्या तिन्ही उमेदवारांनी अर्ज मागे घेतले... 
15
Breaking: भारत - इस्रायल समृद्धीच्या नव्या पर्वाचे 'टेक ऑफ'; मुक्त व्यापार करार, थेट विमानसेवा अन् बरंच काही...
16
मोठी बातमी! लुधियाना टोल प्लाझाजवळ पोलीस आणि दहशतवाद्यांमध्ये भीषण चकमक; परिसरात गोळीबाराचा आवाज
17
IND vs SA: शुबमन गिलच्या दुखापतीबद्दल बॅटिंग कोचने दिली महत्त्वाची अपडेट, म्हणाले...
18
२०० महिलांनी कोर्टातच घेतला जीव; मालेगावात जे घडता घडता राहिलं ते नागपूरमध्ये झालं होतं
19
राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाला धक्का, अनिल देशमुख यांचे पुत्र सलिल देशमुख यांचा राजीनामा
20
Viral : जगातला सगळ्यात आळशी व्यक्ती! स्पर्धा जिंकण्यासाठी तब्बल 'इतके' तास गादीवर झोपून राहिला
Daily Top 2Weekly Top 5

परीक्षांच्या तारखांमुळे स्पर्धा परीक्षा देणारे विद्यार्थी गाेंधळात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 7, 2021 04:46 IST

मार्च २०२०मध्ये आयाेजित करण्यात आलेली राज्य सेवेची पूर्व परीक्षा तब्बल एक वर्ष उशिरा म्हणजेच फेब्रुवारी महिन्यात घेण्यात आली. कंबाईन ...

मार्च २०२०मध्ये आयाेजित करण्यात आलेली राज्य सेवेची पूर्व परीक्षा तब्बल एक वर्ष उशिरा म्हणजेच फेब्रुवारी महिन्यात घेण्यात आली. कंबाईन परीक्षा तर दीड वर्षांपासून झालीच नाही. अनेक परीक्षा नियाेजित वेळेत घेतल्या जात नाहीत. परीक्षा घेतली तर त्याचा निकाल लावला जात नाही. निकाल घाेषित केला तर नाेकरी दिली जात नसल्याने एमपीएससी परीक्षा देणारे युवक गाेंधळात सापडले आहेत. तलाठी, ग्रामसेवक, लिपीक, आराेग्य सेवक आदी पदेही रिक्त आहेत. ही पदेसुद्धा भरण्यात आली नाहीत. ग्रामीण भागातील अनेक युवक या परीक्षेच्या माध्यमातून नाेकरी मिळवितात. मात्र, या नाेकऱ्याही मिळवणे कठीण झाले आहे.

बाॅक्स

माेठ्या बॅनरचे अतिक्रमण

एमपीएससी मार्गदर्शन केंद्र माेठा बॅनर असलेल्या संस्था चालवित हाेत्या. काेराेनापूर्वी त्यांना फारसा प्रतिसाद मिळत नव्हता. मात्र, काेराेना कालावधीत अनेक संस्थांनी ऑनलाईन क्लासेस सुरू केले आहेत. त्यामुळे युवक माेठ्या बॅनरचे क्लास करण्यास पसंती दर्शवत असल्याचे दिसून येत आहे. याचा फटका लहान संस्थांना बसत आहे.

बाॅक्स

यावर्षी तरी भरती हाेणार काय

- मागील दाेन वर्षांपासून नाेकर भरती झाली नाही. काही युवक मागील अनेक वर्षांपासून अभ्यास करीत आहेत. अनेकांचे वय निघून जाण्याच्या मार्गावर आहे. यावर्षी तरी भरती हाेणार की नाही, अशी चिंता युवकांना लागली आहे.

- तलाठी, ग्रामसेवक, आराेग्यसेवक, वनरक्षक यांसारख्या पदांची तरी भरती करण्यात यावी, अशी मागणी युवकांनी केली आहे.

काेट

लाखाे रुपये खर्चून स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्राचा सेटअप उभारण्यात आला. मात्र, मागील दीड वर्षांपासून काेराेनामुळे क्लासेस घेण्यास मनाई करण्यात आली आहे. तेव्हापासूनच संस्था अडचणीत आली आहे. कर्ज घेऊन सेटअप उभारला आहे. कर्जाचे हप्ते भरणेही कठीण झाले आहे. दीड वर्षात आलेले लाखाे रुपयांचे लाईटबिल भरण्यात आले आहे. ही स्थिती आणखी काही दिवस कायम राहिल्यास संस्था चालविणे कठीण हाेईल.

- संताेष बाेलूवार, स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्रप्रमुख

’’’’’’’’’’’’’’’’’’’’’’’’’’’’’’’’’’’’’’’’’’’’’’’’’’’’’’’’’’’’’’’’’’’’’

काेट

वय निघून चालले

एका निश्चित वेळी परीक्षा हाेणार आहे, असे गृहीत धरून अभ्यास केला जाते. मात्र, वेळाेवेळी परीक्षा पुढे ढकलण्यात आल्याने पुन्हा रिव्हिजन करावी लागत आहे. यामुळे निराशा येते. परीक्षा झाल्यानंतर मी शहरातील खाेली साेडून गावाकडे येईन, असे आई-वडिलांना सांगितले आहे. मात्र, परीक्षा पुढे ढकलल्याने शहरातच राहावे लागत आहे. त्यामुळे निराश झालो आहे.

- मंगेश माेहुर्ले, परीक्षार्थी

...........................................................................

मागील दाेन वर्षाांपासून एमपीएससीच्या परीक्षा झाल्या नाहीत. एमपीएससीच्या तयारीसाठी शहरात राहून आर्थिक व मानसिक खच्चीकरण हाेत आहे. अधिक काळ तग धरणे शक्य नाही. शासनाने परीक्षा लवकरात लवकर घ्यावी. वय निघून जात असल्याने चिंता निर्माण झाली आहे.

- अजय वेलादी, परीक्षार्थी