शहरं
Join us  
Trending Stories
1
पावसाचा हाहाकार! चीनमध्ये १.८४ लाख कोटींचं नुकसान; पाकिस्तानमध्ये ३०० जणांचा मृत्यू, भारतात...
2
"जे उचकायचं ते उचका, मी कोणाच्या बापाला घाबरत नाही"; चित्रा वाघांचा मनोज जरांगेंवर पलटवार
3
'पहिला देश, नंतर व्यापार'! डोनाल्ड ट्रम्प यांच्या 'टॅरिफ'नंतरही भारत झुकला नाही; मोदी सरकारने दिला हा संदेश
4
विरारमध्ये दुर्घटना बचावकार्य युद्धपातळीवर सुरू, जिल्हाधिकाऱ्यांनी घेतला बचावकार्याचा आढावा
5
Nikki Murder Case : निक्कीच्या मृत्यूचं गूढ आणखी वाढलं, 'या' पुराव्यांमुळे बदलली तपासाची दिशा, पोलीसही हैराण
6
"आता माझ्याकडे मृत्यूशिवाय पर्याय नाही, म्हणून..."; भाजपा नेत्यानं मुख्यमंत्र्यांकडे मागितलं इच्छामरण
7
गंगेचा प्रवाह धोका? गंगोत्री ग्लेशियर १० टक्के वितळला, पाणी होतंय कमी; IIT इंदूरच्या संशोधनात काय? 
8
'आम्ही तिला मारलं नाही' निक्कीच्या सासरच्या लोकांचा दावा! पण पतीच्या एका कृतीने वाढला संशय
9
ऑनलाईन गेमिंगचे व्यसन जडले, तरुणाने घरातील दागिने चोरले अन् गेममध्ये उडवले 'इतके' पैसे!
10
भारतीय औषध कंपन्यांसमोर डोनाल्ड ट्रम्प झुकले! ५० टक्के टॅरिफमधून दिली सूट, नेमके कारण काय?
11
लव्ह मॅरेज, २ आलिशान शोरूम आणि ३६ पानी पत्र...; कोट्यवधीची संपत्ती तरीही उद्योगपतीचं कुटुंब संपलं कसं?
12
शेजाऱ्यांना खुश करण्यासाठी मार्क झुकेरबर्ग वाटतायेत 'हेडफोन'; का वैतागले आहेत शेजारी?
13
टाटानं केली नव्या 'एआय अँड सर्व्हिस ट्रांसफॉर्मेशन' युनिटची स्थापन, काय असणार काम? कुणाला मिळाली जबाबदारी? जाणून घ्या
14
बॉलिवूड सेलिब्रिटींच्या घरी बाप्पाचे आगमन, पाहा खास PHOTOS
15
एका वर्षापूर्वी झालेला बेपत्ता; आता केदारनाथ मंदिराजवळ सापडला भाविकाचा सांगाडा
16
इस्रायलप्रमाणे युद्धाची तयारी करत आहे 'हा' देश, ८१ प्रदेशांमध्ये काम सुरू!
17
"भारत आणि अमेरिका यांच्यात लवकरच होणार 'मुक्त व्यापार करार'!"; माजी परराष्ट्र सचिवांचं मोठं विधान, आणखी काय म्हणाले?
18
महाराष्ट्राच्या सीमेवर भयंकर चकमक; 'सी- ६०' दलाकडून भर पावसात चार नक्षल्यांचा खात्मा
19
भयंकर... पाचवीतील विद्यार्थिनीने शाळेतच घेतलं पेटवून, कुटुंबीय म्हणाले, 'तिच्यावर अत्याचार...'
20
हे लक्षात ठेवाच! कमी पाणी प्यायल्याने वाढू शकते स्ट्रेस लेव्हल; दररोज किती प्यावं पाणी?

वसतिगृहातील विद्यार्थ्यांचे आंदोलन

By admin | Updated: January 17, 2015 22:59 IST

भोजन कंत्राटदाराने आदिवासी वसतिगृहातील विद्यार्थ्यांना जेवण देण्यास नकार दिल्याने संतप्त झालेल्या विद्यार्थ्यांनी प्रकल्प कार्यालयावर धडक मोर्चा काढला. मात्र अधिकारी उपस्थित

गडचिरोली : भोजन कंत्राटदाराने आदिवासी वसतिगृहातील विद्यार्थ्यांना जेवण देण्यास नकार दिल्याने संतप्त झालेल्या विद्यार्थ्यांनी प्रकल्प कार्यालयावर धडक मोर्चा काढला. मात्र अधिकारी उपस्थित नसल्याने जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक दिली व धरणे आंदोलन केले. त्यानंतर वसतिगृहातील समस्यांबाबत पालकमंत्री अम्ब्रीशराव आत्राम यांच्याशी चर्चा केली. आदिवासी मुलांच्या शासकीय वसतिगृहातील विद्यार्थ्यांनी जेवण मिळत नसल्याच्या कारणावरून प्रकल्प कार्यालयावर धडक दिली. काही दिवसांपूर्वी विविध मागण्यांसाठी विद्यार्थ्यांनी प्रकल्प कार्यालयापुढे आंदोलन केले होते. याची दखल घेत प्रकल्प अधिकारी पी. शिवशंकर यांनी वसतिगृहाची पाहणी केली असता, विद्यार्थ्यांनी आक्रमक पवित्रा घेत प्रकल्प अधिकाऱ्यांना कोंडून ठेवले. त्यानंतर काही पदाधिकाऱ्यांच्या मध्यस्थीनंतर पी. शिवशंकर यांची सुटका करण्यात आली. यासंदर्भात सहायक प्रकल्प अधिकारी दशरथ कुळमेथे यांनी गडचिरोली पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. गैरकायद्याची मंडळी जमवून धक्काबुक्की करणे, शिविगाळ करणे, गाडीत कोंबून ठेवणे तसेच शासकीय कामात अडथळा आणल्याच्या कारणावरून आविसंचे प्रा. दौलत धुर्वे व आठ विद्यार्थ्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला होता. या प्रकरणाच्या निषेधार्थ विद्यार्थ्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन केले. तसेच जोपर्यंत जेवण मिळणार नाही, तोपर्यंत हटणार नाही, अशी भूमिका घेतली. दशरथ कुळमेथे यांनी जेवणाची पर्यायी व्यवस्था केल्याचे सांगितले. मात्र पालकमंत्री व जिल्हाधिकाऱ्यांशी चर्चा केल्याशिवाय हटणार नाही, असे स्पष्टपणे सांगितले. त्यानंतर प्रा. दौलत धुर्वे यांच्या नेतृत्वातील शिष्टमंडळाला राज्यमंत्री अम्ब्रीशराव आत्राम यांच्याशी चर्चेला पाचारण करण्यात आले. विद्यार्थ्यांच्या जेवणाची सोय करण्यात यावी, विद्यार्थ्यांवरील गुन्हे मागे घेणे यासंदर्भात उपविभागीय अधिकाऱ्यांशी चर्चा केली जाईल, असे आश्वासन आत्राम यांनी दिले.