शहरं
Join us  
Trending Stories
1
'बाभळीचं झाड सोडून आंब्याच्या झाडाखाली या'; ठाकरेंच्या आमदाराला भाजपच्या मंत्र्याकडून ऑफर
2
पाकिस्तानला जाणारे असे किती पाणी रोखू शकतो भारत? सिंधू जल कराराने तीन युद्धे झेलली, पण...
3
Western Railway Megablock: पश्चिम रेल्वेवर ३५ तासांचा मेगाब्लॉक, २६ ते २८ एप्रिलदरम्यान तब्बल १६३ लोकल फेऱ्या रद्द
4
पुढील ४ दिवस 'या' बँका बंद राहणार! आरबीआयकडून ३० एप्रिलपर्यंत सुट्ट्यांची यादी जाहीर
5
"न्यूयॉर्क टाइम्स, तो दहशतवादी हल्लाच होता!’’ त्या उल्लेखावरून आघाडीच्या वृत्तपत्राला अमेरिकन सरकारने झापले  
6
बदल्याची आग पेटली! लश्कर-ए-तोयबाच्या टॉप कमांडरला भारतीय जवानांनी ठार केले
7
रेल्वे स्थानकावर ओळखीतून आठ महिन्यांच्या बाळाचे अपहरण..! रिक्षाचालकाच्या मदतीने असा उलगडला गुन्हा
8
EPFO ३ दिवसांत देणार ५ लाख रुपये, कागदपत्रांशिवायच होईल काम; काय आहे सुविधा?
9
मुलाला चांगले मार्क्स देऊन वर्गात पहिला आणतो; शिक्षकांकडून महिला पालकावर वारंवार बलात्कार
10
याचीच तर वाट पाहत होता...! आता भारताला एलओसी बंधनकारक नाही, सैन्य आरपार घुसू शकते; शिमला कराराच्या बेड्या तुटल्या
11
Navi Mumbai Crime: बेलापूरमध्ये विकासकाने घरातच गोळी झाडून केली आत्महत्या, प्रकरण काय?
12
टॅरिफमुळे जागतिक व्यापार घसरणार; जागतिक व्यापार संघटनेने व्यक्त केली भीती
13
ISI ची साथ, ५ दहशतवाद्यांना घेऊन सैफुल्लाहनं रचला कट; पहलगाम हल्ल्यात पाकचा बुरखा फाटला
14
Shakti Dubey : शाब्बास पोरी! ४ वेळा अपयश अन् पाचव्या प्रयत्नात 'नंबर वन'; शक्ती दुबेची अभिमानास्पद कामगिरी
15
भारतात पाकिस्तानी डिग्री अवैध, तरीही एवढे भारतीय विद्यार्थी शिक्षण घेतायत; ना मिळणार नोकरी, ना उच्चशिक्षण... 
16
Pahalgam Terror Attack : "विनय नरवाल यांच्या पत्नीला खोटं सांगितलं की ते जिवंत आहेत, त्यानंतर मी खूप वेळा रडलो"
17
Swami Samartha: स्वामी पुण्यतिथीनिमित्त जाणून घ्या स्वामींनी भक्तांना दिलेला आदेश, उपासना आणि संकल्प!
18
जागतिक बाजारपेठेत तेजी असूनही भारतीय शेअर बाजार का कोसळला? 'ही' आहेत ३ मोठी कारणे
19
"पीडितांना सतत तेच बोलायला लावणं क्लेशदायक आहे", मीडिया आणि राजकारण्यांवर संतापली मराठी अभिनेत्री
20
Gensol Engineering च्या प्रमोटरना ईडीनं घेतलं ताब्यात, फंड डायव्हर्जन प्रकरणी मोठी कारवाई

गडचिरोलीतील विद्यार्थ्यांना महाविद्यालयीन कामासाठी घालावा लागतो ४०० किमीचा हेलपाटा

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 25, 2025 15:47 IST

Gadchiroli : १३ वर्षे उलटूनही गडचिरोलीत सहसंचालक कार्यालय झाले नाहीत

दिलीप दहेलकर लोकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली : स्थानिक गोंडवाना विद्यापीठाशी संलग्नित असलेल्या महाविद्यालयातील व विद्यापीठातील कर्मचाऱ्यांना आजही शेकडो किलोमीटर दूर असलेल्या नागपूर येथील सहसंचालक (उच्च शिक्षण) कार्यालयाच्या फेऱ्या माराव्या लागत आहेत. व विशेष म्हणजे सिरोंचा तालुक्यातील महाविद्यालयातील लिपिकांना विविध शैक्षणिक कामासाठी ४०० किमी अंतर कापून नागपूरला जावे लागते. त्यातल्या त्यात अंतर जास्त असल्याने एका दिवसात परत अहेरी उपविभागात जाणे कर्मचाऱ्यांना शक्य होत नाही.

आदिवासी बहूल अतिदुर्गम भागातील गोरगरीब विद्यार्थ्यांसाठी शिक्षणाचा प्रवाह तयार करून उच्च शिक्षणाचा मार्ग मिळावा, त्यांच्या गरजा व सोयींचा स्तर उंचावण्यासाठी म्हणून गडचिरोली येथे गोंडवाना विद्यापीठाची स्थापना करण्यात आली. गोंडवाना विद्यापीठाच्या स्थापनेमुळे गडचिरोलीसारख्या अतिदुर्गम भागातील आदिवासीबांधवांच्या मुला-मुलींना उच्च शिक्षण घेता येणे सोईस्कर झाले. मात्र, सहसंचालक कार्यालय नसल्याने मोठी अडचण निर्माण झाली आहे.

दोन्ही जिल्ह्यांना अडसरचंद्रपूर व गडचिरोली या दोन्ही जिल्ह्यातील महाविद्यालयात कार्यरत शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना कामासाठी नागपूर येथील सहसंचालक (उच्च शिक्षण) कार्यालयात जावे लागते. गडचिरोलीत विद्यापीठ होऊनही नागपूरच्या चकरा कायमच आहेत. 

आश्वासन हवेत, कार्यवाही पडली थंडबस्त्यात

  • राज्याचे तत्कालीन उच्च व तंत्र शिक्षण मंत्री सोना शिक्षकेतर कर्मचारी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांना सहसंचालक (उच्च शिक्षण) कार्यालयाची गडचिरोली येथे निर्मिती करण्याचे आश्वासन दिले होते. त्या अनुषंगाने बरीच कार्यवाहीसुद्धा पूर्ण झाली होती.
  • परंतु कालांतराने आश्वासन आणि कार्यवाही थंड बस्त्यात पडल्यामुळे गडचिरोली येथे सहसंचालक (उच्च शिक्षण) कार्यालय निर्मिती होण्याच्या पूर्ण आशा मावळल्या गेल्या आहेत. याकडे राज्य शासनासह लोकप्रतिनिधीचे दुर्लक्ष होत आहे.

दीड वर्षातच गुंडाळली गडचिरोलीतील सेवाकोराना संकटाचा कालावधी संपल्यानंतर गडचिरोली येथील गोंडवाना विद्यापीठात सहसंचालक (उच्च शिक्षण) कार्यालयीन कामकाजाची सुविधा करून देण्यात आली होती. महिन्यातून एक दिवस नागपूर कार्यालयातील सहसंचालक व दोन ते तीन कर्मचारी गडचिरोली येथे येऊन कॉलेजची प्रशासकीय कामे करीत होती. मात्र सहसंचालक कार्यालयाने केवळ दीड वर्षांत सदर अस्थायी कार्यालय गुंडाळले. आता नागपूरवरून कुणीही अधिकारी व कर्मचारी येथे येत नाही. त्यामुळे लिपिकांना नागपूरला जावे लागते.

टॅग्स :GadchiroliगडचिरोलीEducationशिक्षण