शहरं
Join us  
Trending Stories
1
हैदराबादमध्ये अमित शाह यांच्याविरोधात गुन्हा दाखल, नेमकं काय घडलं? जाणून घ्या संपूर्ण प्रकरण
2
IPL 2024 MI vs KKR: Mumbai Indians ने घरच्या मैदानावर लाज आणली! १२ वर्षांनी कोलकाताचा वानखेडेवर दमदार विजय
3
किराडपुऱ्यात आग, सिलिंडर, विजेच्या तारांमुळे सलग तीन स्फोट; चिमुकलीचा मृत्यू, ८ जण भाजले
4
"काय बोलावं सुचत नाहीये, काही प्रश्न..."; Mumbai Indians च्या लाजिरवाण्या पराभवानंतर Hardik Pandya काय म्हणाला, वाचा
5
रोहित वेमुला दलित नव्हता, आईनं तयार केलं होतं बनावट जात प्रामाणपत्र! तेलंगणा पोलिसांकडून सर्व आरोपींना क्लीन चिट
6
T20 World Cup 2024 मध्ये Virat Kohli ने ओपनिंग करावी, Rohit Sharma ने 'या' नंबरवर खेळावं; माजी भारतीय कर्णधाराचा अजब सल्ला
7
कोथळे खून खटल्यात आता कोणाची नियुक्ती? उज्वल निकम यांचा राजीनामा; राज्य शासनाच्या निर्णयाकडे लक्ष
8
IPL2024 MI vs KKR: नुसते आले नि गेले... रोहित, इशान, तिलक, हार्दिक स्वस्तात बाद; Mumbai Indians चा डाव गडगडला! 
9
“PM मोदींनी १० वर्षांत काय केले ते सांगावे, काम पूर्ण झाले की राम मंदिरात जाणार”: शरद पवार
10
Andre Russell Run Out, IPL 2024 MI vs KKR: नुसता गोंधळ! व्यंकटेश धावलाच नाही, रसेल मात्र कुठच्या कुठे पोहोचला अन् मग... (Video)
11
अमित शाह फेक व्हिडिओप्रकरणी दिल्ली पोलिसांची कारवाई; काँग्रेस नेते अरुण रेड्डींना अटक
12
IPL 2024 Mumbai Indians vs Kolkata Knight Riders: KKRला 'व्यंकेटश' प्रसन्न! अर्धशतकवीर अय्यर एकटा भिडला, पण Nuwan Thushara - Jasprit Bumrah ने मुंबईला तारलं
13
४०० पार हा मोदींचा जुमला, भाजप २०० पारही जाणार नाही; प्रकाश आंबेडकरांचा दावा
14
Tilak Varma Catch Video, IPL 2024 MI vs KKR: धडामsss... कॅच घ्यायला धावले अन् दोघे एकमेकांवर धडकले, तरीही तिलक वर्माने घेतला 'सुपर कॅच' (Video)
15
'आईने मोठ्या विश्वासाने...', रायबरेलीतून उमेदवारी अर्ज दाखल केल्यानंतर राहुल गांधींच्या भावना
16
“सांगलीत तिरंगी नाही थेट लढत, चंद्रहार पाटील...”; विशाल पाटील यांचा ठाकरे गटावर पलटवार
17
"बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानाचे सरंक्षण करणार..." राहुल गांधींचा भाजपवर हल्लाबोल
18
IPL 2024 MI vs KKR: मुंबई इंडियन्सच्या प्लेईंग XI मधून Rohit Sharma गायब! Hardik Pandya ने टाकला नवा 'डाव'
19
“एकनाथ खडसेंची भूमिका संधीसाधूपणाची, आधी राजीनामा द्या अन् मग प्रचार करा”: गिरीश महाजन
20
कितीही उमेदवार द्या, श्रीकांत शिंदे यांचाच विजय पक्का; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना विश्वास

धान पऱ्हे वाचविण्यासाठी धडपड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 01, 2020 5:00 AM

वातावरणात प्रचंड उकाडा निर्माण झाला असून आठवडाभरापासून आरमोरी तालुक्यासह गडचिरोली जिल्ह्यात पावसाचा पत्ता नाही. आणखी चार ते पाच दिवस जिल्ह्यात पाऊस न बरसल्यास धान उत्पादक शेतकऱ्यांना दुबार पेरणीचे संकट येण्याची दाट शक्यता आहे. पावसाचे रोहणी व मृग नक्षत्र हे दोन नक्षत्र संपले. २१ जूनला आर्द्रा नक्षत्राची सुरूवात झाली. आठवडाभराचा कालावधी उलटूनही या नक्षत्रात दमदार पाऊस बरसला नाही.

ठळक मुद्देपावसाने मारली दडी : सिंचन विहीर, शेततळ्यामुळे झाली सिंचन सुविधा

लोकमत न्यूज नेटवर्कवैरागड : १५ जून रोजी झालेल्या जोरदार पावसाने अनेक शेतकऱ्यांनी बाह्य मशागत करून धान पऱ्हे टाकले. पण त्यानंतर पावसाने कायमची दडी मारली. परिणामी धान पऱ्हे धोक्यात आले आहे. या धान पऱ्ह्याला वाचविण्यासाठी शेतकरी गेल्या चार पाच दिवसांपासून धडपड करीत आहेत.वातावरणात प्रचंड उकाडा निर्माण झाला असून आठवडाभरापासून आरमोरी तालुक्यासह गडचिरोली जिल्ह्यात पावसाचा पत्ता नाही. आणखी चार ते पाच दिवस जिल्ह्यात पाऊस न बरसल्यास धान उत्पादक शेतकऱ्यांना दुबार पेरणीचे संकट येण्याची दाट शक्यता आहे.पावसाचे रोहणी व मृग नक्षत्र हे दोन नक्षत्र संपले. २१ जूनला आर्द्रा नक्षत्राची सुरूवात झाली. आठवडाभराचा कालावधी उलटूनही या नक्षत्रात दमदार पाऊस बरसला नाही. परिणामी शेतकऱ्यांचे डोळे आभाळाकडे लागले आहेत. ज्या शेतकऱ्यांनी धान पऱ्हे टाकले ते धान पऱ्हे टाकले मात्र पावसाअभावी अशा पऱ्ह्यांची वाढ झाली नाही. आता हे पऱ्हे करपू लागले असल्याने शेतकऱ्यांची चिंता अधिकच वाढली आहे.आरमोरी तालुक्याच्या वैरागड, वनखी, वासाळा, चामोर्शी माल या भागात गेल्यात तीन-चार वर्षात अनेक शेतकऱ्यांनी शासकीय योजनेतून शेततळे, सिंचन विहीर, मोटारपंप, बोअर आदी सिंचन सुुविधा केल्या. परिणामी आरमोरी तालुक्यातील २५ एकरपेक्षा अधिक शेतजमीन ओलिताखाली आली. सिंचन सुविधा असलेल्या शेतकऱ्यांनी मोटारपंपच्या सहाय्याने शेतीला पाणीपुरवठा करून पऱ्हे वाचविण्याचा प्रयत्न करीत आहेत. तर काही शेतकऱ्यांनी मोटारपंपच्या पाण्यावर धान पीक रोवणीचे काम हाती घेतले आहे. मिळेल त्या स्त्रोतातून शेतकरी शेतात पाणी पुरवठा करीत आहेत.खरीप हंगामातील पेरणीसाठी बराच वेळ आहे. त्यामुळे ज्या शेतकऱ्यांनी घाईघाईने पेरणी केली आणि आता पावसाअभावी धान पºहे करपले. ज्या शेतकऱ्यांचे धान पऱ्हे करपले त्यांनी आता पानपऱ्ह्यांची पेरणी करावी.- टी. डी. ढगे, तालुका कृषी अधिकारी, आरमोरी.

टॅग्स :Farmerशेतकरीagricultureशेती