शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानवर हसावं की रडावं.... आता म्हणे मोहसीन नक्वीला गोल्ड मेडल देणार, सन्मान करणार !
2
लाखोंच्या गर्दीत हरवलेला 'मुन्ना' काही मिनिटांत 'अण्णा'च्या गळ्यात; बापलेकांची भावनिक भेट
3
सानिया मिर्झाशी घटस्फोट, आता शोएब मलिकचे सना जावेदशीही लग्न तुटणार? VIDEO मुळे उडाली खळबळ
4
नवी मुंबई विमानतळाला दि.बा.पाटील यांचेच नाव लागणार; CM फडणवीसांचे कृती समितीला आश्वासन
5
ट्रॅक्टरमध्ये बसून थेट बांधावर... सोलापूरच्या अधिकाऱ्यांची तत्परता, शेतकऱ्यांना दिला धीर
6
'फिट' है तो 'हिट' है... बॉलिवूड अभिनेत्रीचा कमालीचा फिटनेस, या वयातही चाहत्यांना करते घायाळ
7
२ वर्षांपेक्षा कमी वयाच्या मुलांना कफ सिरप देऊ नका, केंद्राचा सल्ला; राजस्थान, मध्य प्रदेशात ११ बालकांचा मृत्यू
8
वेळागर समुद्रात आठजण बुडाले; तिघांचे मृतदेह हाती, एकीचा जीव वाचला, किनाऱ्यावर आक्रोश
9
राज्यात अतिवृष्टी, पूरस्थिती; अकरावी ऑनलाइन प्रवेश प्रक्रियेची ४-६ ऑक्टोबरला अंतिम विशेष फेरी
10
शेतकऱ्यांसाठी काँग्रेस रस्त्यावर; नुकसानग्रस्तांना तत्काळ मदत मिळण्यासाठी राज्यभर आंदोलन
11
“बावळट-मूर्ख, मनोज जरांगेंसारखा नेता मिळणे मराठ्यांचे दुर्दैव”; लक्ष्मण हाकेंचा हल्लाबोल
12
"तुम्ही आम्हाला शिकवू नका..."; भारताने पाकिस्तानला चांगलंच सुनावलं, UN मध्ये काय घडलं?
13
आशाबाई, अंबिका अन् सुनीता... सोलापुरात दोन दिवसांत तीन महिलांची हत्या, कारण एकच
14
नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला दि.बा. पाटलांचे नाव; PM मोदींची राज्य सरकारच्या निर्णयाला मंजुरी
15
IND vs AUS : तिलक वर्माचं शतक थोडक्यात हुकलं; ऑस्ट्रेलियाविरुद्ध अभिषेकवर 'गोल्डन डक'ची नामुष्की
16
RSS च्या पथसंचलनात ढोल वाजवणाऱ्या स्वयंसेवकाचा हृदयविकाराने मृत्यू; व्हिडिओ व्हायरल
17
वैभव खेडेकरांचा तीनदा भाजपा प्रवेश रखडला, आता शिवसेनेत जाणार? शिंदे गटाचे नेते स्पष्टच बोलले
18
काँग्रेसनेही निवडणुकांसाठी कंबर कसली! नागपुरात ४, ५ ऑक्टोबरला विचारमंथन कार्यशाळा
19
IND vs WI: ‘ध्रुव तारा’ चमकला! पहिल्या सेंच्युरीनंतर बॅटची बंदूक करून 'बाप-माणसाला' सेल्युट! (VIDEO)
20
Business: २ मित्रांनी सोडली कॉर्पोरेट नोकरी, दूध विकून झाले कोट्यधीश, तयार केला मोठा ब्रँड!

धान पऱ्हे वाचविण्यासाठी धडपड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 1, 2020 05:00 IST

वातावरणात प्रचंड उकाडा निर्माण झाला असून आठवडाभरापासून आरमोरी तालुक्यासह गडचिरोली जिल्ह्यात पावसाचा पत्ता नाही. आणखी चार ते पाच दिवस जिल्ह्यात पाऊस न बरसल्यास धान उत्पादक शेतकऱ्यांना दुबार पेरणीचे संकट येण्याची दाट शक्यता आहे. पावसाचे रोहणी व मृग नक्षत्र हे दोन नक्षत्र संपले. २१ जूनला आर्द्रा नक्षत्राची सुरूवात झाली. आठवडाभराचा कालावधी उलटूनही या नक्षत्रात दमदार पाऊस बरसला नाही.

ठळक मुद्देपावसाने मारली दडी : सिंचन विहीर, शेततळ्यामुळे झाली सिंचन सुविधा

लोकमत न्यूज नेटवर्कवैरागड : १५ जून रोजी झालेल्या जोरदार पावसाने अनेक शेतकऱ्यांनी बाह्य मशागत करून धान पऱ्हे टाकले. पण त्यानंतर पावसाने कायमची दडी मारली. परिणामी धान पऱ्हे धोक्यात आले आहे. या धान पऱ्ह्याला वाचविण्यासाठी शेतकरी गेल्या चार पाच दिवसांपासून धडपड करीत आहेत.वातावरणात प्रचंड उकाडा निर्माण झाला असून आठवडाभरापासून आरमोरी तालुक्यासह गडचिरोली जिल्ह्यात पावसाचा पत्ता नाही. आणखी चार ते पाच दिवस जिल्ह्यात पाऊस न बरसल्यास धान उत्पादक शेतकऱ्यांना दुबार पेरणीचे संकट येण्याची दाट शक्यता आहे.पावसाचे रोहणी व मृग नक्षत्र हे दोन नक्षत्र संपले. २१ जूनला आर्द्रा नक्षत्राची सुरूवात झाली. आठवडाभराचा कालावधी उलटूनही या नक्षत्रात दमदार पाऊस बरसला नाही. परिणामी शेतकऱ्यांचे डोळे आभाळाकडे लागले आहेत. ज्या शेतकऱ्यांनी धान पऱ्हे टाकले ते धान पऱ्हे टाकले मात्र पावसाअभावी अशा पऱ्ह्यांची वाढ झाली नाही. आता हे पऱ्हे करपू लागले असल्याने शेतकऱ्यांची चिंता अधिकच वाढली आहे.आरमोरी तालुक्याच्या वैरागड, वनखी, वासाळा, चामोर्शी माल या भागात गेल्यात तीन-चार वर्षात अनेक शेतकऱ्यांनी शासकीय योजनेतून शेततळे, सिंचन विहीर, मोटारपंप, बोअर आदी सिंचन सुुविधा केल्या. परिणामी आरमोरी तालुक्यातील २५ एकरपेक्षा अधिक शेतजमीन ओलिताखाली आली. सिंचन सुविधा असलेल्या शेतकऱ्यांनी मोटारपंपच्या सहाय्याने शेतीला पाणीपुरवठा करून पऱ्हे वाचविण्याचा प्रयत्न करीत आहेत. तर काही शेतकऱ्यांनी मोटारपंपच्या पाण्यावर धान पीक रोवणीचे काम हाती घेतले आहे. मिळेल त्या स्त्रोतातून शेतकरी शेतात पाणी पुरवठा करीत आहेत.खरीप हंगामातील पेरणीसाठी बराच वेळ आहे. त्यामुळे ज्या शेतकऱ्यांनी घाईघाईने पेरणी केली आणि आता पावसाअभावी धान पºहे करपले. ज्या शेतकऱ्यांचे धान पऱ्हे करपले त्यांनी आता पानपऱ्ह्यांची पेरणी करावी.- टी. डी. ढगे, तालुका कृषी अधिकारी, आरमोरी.

टॅग्स :Farmerशेतकरीagricultureशेती