शहरं
Join us  
Trending Stories
1
'ना पारसी ना मुंबईकर', Tata Trust मध्ये नवा वाद! मेहली मिस्त्रींचं श्रीनिवासन-विजय सिंग यांच्या नियुक्तीला आव्हान, प्रकरण काय?
2
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
3
“बारामती पोटनिवडणुकीत पाठिंबा द्या”; सुनेत्रा पवार यांचा उद्धव ठाकरेंना फोन, घडामोडींना वेग
4
रिक्षा परमिट हवे, तर मग मराठी येणे अनिवार्य; परवाने पुनर्तपासणीचे प्रताप सरनाईकांचे निर्देश
5
“ती बोलत नाही, बेशुद्ध...”; ७ वर्षांनी मोठ्या लिव्ह-इन पार्टनरची हत्या, २० दिवसांनी सत्य समोर
6
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
7
VIDEO: सूर्याचा 'रहमान डकैत' स्टाईल FA9LA डान्स; Dhurandhar ची क्रेझ क्रिकेटच्या मैदानातही
8
'तू मरून जा, नाही तर तुला मारणार!' आरमोरीत हनी ट्रॅप, ब्लॅकमेलिंग अन् तरुणावर विषप्रयोग, तरुणीसह दोघांवर गुन्हा दाखल 
9
लखनौमध्ये रेल्वे सिग्नल बॉक्स उडवण्याचा मोठा कट उधळला; ISI च्या ४ संशयितांना अटक
10
Video - निसर्गाच्या देणगीला भेसळीचा विळखा; तुम्ही पिताय ते नारळपाणी खरंच 'नॅचरल' आहे का?
11
हजारो भारतीयांसह ३० हजार जणांना कामावरून काढणाऱ्या कंपनीच्या ऑफिसवर इराणने केला हल्ला 
12
रात्रीस खेळ चाले! झोपेतच घात, सौदी दूतावास बेचिराक; इराणचा प्रहार, अमेरिकेने विचारही केला नाही
13
Mithun Chakraborty : "मी पश्चिम बंगालचा बांगलादेश होऊ देणार नाही, ओवैसी रिअल लीडर"; मिथुन चक्रवर्ती यांचं मोठं विधान
14
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अधीर रंजन चौधरी यांच्यावर हल्ला, बंगालमध्ये काँग्रेस-तृणमूलचे कार्यकर्ते भिडले  
15
संकष्ट चतुर्थी २०२६: संकष्टीला करा राशीनुसार दिलेले उपाय; 'ही' गणेशसेवा पालटून टाकेल तुमचं आयुष्य!
16
IPL 2026: मराठमोळ्या आयुष म्हात्रेबद्दल अंपायरने केली मोठ्ठी चूक! सारेच हैराण; काय घडलं?
17
खळबळजनक!!! २०० किलो बनावट पद्धतीने पिकवलेले आंबे जप्त; श्वसनाच्या आजारांचा होता धोका
18
Gold-Silver Price Fall: खुशखबर! सोनं-चांदी झाली स्वस्त; खरेदी करणाऱ्यांसाठी 'गोल्डन चान्स'
19
दोन लढाऊ विमाने पाडली, २ चॉपर उद्ध्वस्त, पायलट बेपत्ता, २४ तासांत इराणचा अमेरिकेला जबर दणका
20
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
Daily Top 2Weekly Top 5

स्वतंत्र विदर्भ राज्य निर्मितीचा लढा तीव्र

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 3, 2018 01:23 IST

संयुक्त महाराष्ट्रात राहून वैदर्भीय जनतेला न्याय मिळाला नाही. शासनाकडून सापत्नक वागूणक मिळत असल्याने विदर्भाचा विकास झाला नाही. त्यामुळे आता तरी सरकारने स्वतंत्र विदर्भ राज्य निर्माण करावे, तशी रितसर घोषणा करावी,.....

ठळक मुद्देगडचिरोलीत धरणे, अहेरीत निदर्शने : विदर्भवादी पदाधिकारी व कार्यकर्ते सामूहिक उपोषणावर

लोकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली/अहेरी : संयुक्त महाराष्ट्रात राहून वैदर्भीय जनतेला न्याय मिळाला नाही. शासनाकडून सापत्नक वागूणक मिळत असल्याने विदर्भाचा विकास झाला नाही. त्यामुळे आता तरी सरकारने स्वतंत्र विदर्भ राज्य निर्माण करावे, तशी रितसर घोषणा करावी, या मागणीला घेऊन विदर्भ राज्य आंदोलन समिती गडचिरोली व अहेरीच्या वतीने २ आॅक्टोबर रोजी मंगळवारला धरणे देण्यात आले. अहेरीत सरकारच्या विरोधात निदर्शने करण्यात आली.गडचिरोली येथे इंदिरा गांधी चौकात विदर्भ राज्य आंदोलन समितीचे जिल्हा समन्वयक अरूण मुनघाटे यांच्या नेतृत्वात दिवसभर धरणे देण्यात आली. यावेळी जिल्हा सचिव देविदास मडावी, जिल्हा उपाध्यक्ष योगेंद्र नांदगाये, महिला आघाडी जिल्हाध्यक्ष मनीषा तामशेटवार, मनोहर हेपट, उद्धवराव डांगे, राजू नैताम, रमेश भुरसे, प्रतिभा चौधरी, मुकूंदा उंदीरवाडे, दादाराव चुधरी, दादाजी चापले, गोविंदा बानबले, पंडित पुडके, सुधाकर डोईजड, प्रवीण ब्राह्मणवाडे, दत्तात्रय बर्लावार, गोवर्धन चव्हाण, दत्तात्रय खरवडे, गुरूदेव भोपये, विनायक बांदुरकर, जनार्धन साखरे, हंसराज उराडे, बाळू मडावी, प्रभाकर बारापात्रे, प्रदीप महाजन, मनीषा सजनपवार आदी पदाधिकारी व कार्यकर्ते सहभागी झाले होते.भाजपच्या पदाधिकाऱ्यांनी २०१४ च्या निवडणुकीपूर्वी स्वतंत्र विदर्भ राज्याची निर्मिती करू, असे आश्वासन वैदर्भीय जनतेला दिले होते. मात्र त्यानंतर या प्रश्नाकडे सत्ताधारी भाजप पक्षाचे दुर्लक्ष झाले. विदर्भ राज्य आंदोलन समितीच्या वतीने गेल्या पाच वर्षांपासून विदर्भ राज्याच्या मागणीसाठी धरणे, मोर्चे, उपोषण, निदर्शने व इतर अनेक आंदोलने लोकशाही मार्गाने करण्यात आली. मात्र विदर्भ राज्याच्या निर्मितीबाबत सरकारने निर्णय घेतला नाही. विदर्भाच्या विकासाकडे शासनाचे दुर्लक्ष असल्याने स्वतंत्र विदर्भ राज्याची निर्मिती हाच एकमेव पर्याय आहे, असे गडचिरोली येथे झालेल्या आंदोलनात समितीच्या पदाधिकाºयांनी सांगितले.विदर्भ राज्य आंदोलन समिती व अहेरी जिल्हा निर्माण कृती समितीच्या वतीने विदर्भ राज्याच्या मागणीसाठी तहसील कार्यालयासमोर निदर्शने करण्यात आली. आंदोलनाचे नेतृत्व समितीचे अध्यक्ष रघुनाथ तलांडे यांनी केले. यावेळी प्रा.नागसेन मेश्राम, रवी भांदककर, विलास रापर्तीवार, प्रशांत जोशी, श्रीनिवास भंडारी, मोहन मेश्राम, प्रदीप देशपांडे, पार्वता मडावी, वंदना सडमेक, सुमन पोरतेट, नागू आत्राम, विमल मडावी, गंगू मेश्राम, शैला कुसराम, किरण भांदककर आदी उपस्थित होते. स्वतंत्र विदर्भ राज्याची निर्मिती करण्यात यावी, अशा मागणीचे निवेदन तहसीलदारांना देण्यात आले. हे निवेदन नायब तहसीलदार गुरूनुले यांनी स्वीकारला.

टॅग्स :Vidarbhaविदर्भ