शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानवर ‘फिरकी बाॅम्ब’; इंडियाचा मैदानावरही 'बदला'; हायव्होल्टेज सामन्यात पाकचा दणदणीत पराभव
2
‘जिल्हा परिषदां’ना बळ मिळेल? पूर्वी जिल्हा परिषद अध्यक्षांना राज्यमंत्री पदाचा दर्जा होता
3
सायबर भामट्यांनी साेडले खात्यात केवळ ८६ रुपये; बोलण्यात गुंतवून पाठवली लिंक
4
मी शिवभक्त, विष गिळून टाकतो, पंतप्रधान मोदींचा विरोधकांवर हल्लाबोल; काँग्रेसने घुसखोरांना प्रोत्साहन दिले, गरिबांना नाकारले
5
महाराष्ट्रात एका वर्षात ‘आयुष्मान’चे लाभार्थी तिप्पट; ग्रामीण भागापर्यंत विस्तार करण्याचे राज्यासमोर आव्हान
6
मोबाइलमध्ये अडकलेली तरुणाई सरस्वतीच्या दरबारात नेणार : विश्वास पाटील
7
प्रभादेवी तिकीट कार्यालयाचे स्थलांतर कुठे? २ ते ३ दिवसांमध्ये जागा निश्चित करणार
8
बांधकामातील बदल, कराने वाढला कोस्टल रोडचा खर्च; महत्त्वाकांक्षी प्रकल्पाच्या शेवटच्या टप्प्यात २ हजार कोटींची वाढ
9
नेपाळच्या आगीत कोण आपली पोळी भाजते आहे?
10
साहित्य संमेलनाध्यक्षपदी ‘पानिपत’कार विश्वास पाटील ; १ ते ४ जानेवारीदरम्यान संमेलन होणार
11
पहलगाम हल्ल्यातील शहीदांना श्रद्धांजली, आजचा विजय भारतीय सैन्यदलाला समर्पित - सूर्यकुमार यादव
12
IND vs PAK : आम्ही काहीच विसरलेलो नाही! दुबईतून टीम इंडियाचा पाकला स्पष्ट संदेश
13
IND vs PAK : सूर्यानं सिक्सर मारत संपवली मॅच! टीम इंडियाचा दबावात दिमाखदार विजय
14
भारत कणखर, अमेरिका झाला हतबल; म्हणे, “आमच्याकडून २५ किलो मक्याचं एक पोतं घ्यायला तयार नाही”
15
“महाराष्ट्रात सामाजिक वीण उसवतेय, समाजात कटूता निर्माण होणारे निर्णय घेतले जातायत”: शरद पवार
16
IND vs PAK : कुलदीप यादवची हॅटट्रिक हुकली; पण पाक विरुद्ध ३ विकेट्स घेत साधला साधला मोठा डाव
17
“ओबीसी असो किंवा मराठा असो, सगळ्या समाजाचे हित हेच सरकार करू शकते”: CM देवेंद्र फडणवीस
18
IND vs PAK : पाकच्या National Anthem ऐवजी DJ वाल्या बाबूनं वाजवलं भलतंच गाणं; व्हिडिओ व्हायरल
19
IND vs PAK : परंपरा मोडत भारतीयांची भावना जपली! सूर्यानं हात न मिळवता पाक कॅप्टनकडे फिरवली पाठ (VIDEO)

स्वतंत्र विदर्भ राज्य निर्मितीचा लढा तीव्र

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 3, 2018 01:23 IST

संयुक्त महाराष्ट्रात राहून वैदर्भीय जनतेला न्याय मिळाला नाही. शासनाकडून सापत्नक वागूणक मिळत असल्याने विदर्भाचा विकास झाला नाही. त्यामुळे आता तरी सरकारने स्वतंत्र विदर्भ राज्य निर्माण करावे, तशी रितसर घोषणा करावी,.....

ठळक मुद्देगडचिरोलीत धरणे, अहेरीत निदर्शने : विदर्भवादी पदाधिकारी व कार्यकर्ते सामूहिक उपोषणावर

लोकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली/अहेरी : संयुक्त महाराष्ट्रात राहून वैदर्भीय जनतेला न्याय मिळाला नाही. शासनाकडून सापत्नक वागूणक मिळत असल्याने विदर्भाचा विकास झाला नाही. त्यामुळे आता तरी सरकारने स्वतंत्र विदर्भ राज्य निर्माण करावे, तशी रितसर घोषणा करावी, या मागणीला घेऊन विदर्भ राज्य आंदोलन समिती गडचिरोली व अहेरीच्या वतीने २ आॅक्टोबर रोजी मंगळवारला धरणे देण्यात आले. अहेरीत सरकारच्या विरोधात निदर्शने करण्यात आली.गडचिरोली येथे इंदिरा गांधी चौकात विदर्भ राज्य आंदोलन समितीचे जिल्हा समन्वयक अरूण मुनघाटे यांच्या नेतृत्वात दिवसभर धरणे देण्यात आली. यावेळी जिल्हा सचिव देविदास मडावी, जिल्हा उपाध्यक्ष योगेंद्र नांदगाये, महिला आघाडी जिल्हाध्यक्ष मनीषा तामशेटवार, मनोहर हेपट, उद्धवराव डांगे, राजू नैताम, रमेश भुरसे, प्रतिभा चौधरी, मुकूंदा उंदीरवाडे, दादाराव चुधरी, दादाजी चापले, गोविंदा बानबले, पंडित पुडके, सुधाकर डोईजड, प्रवीण ब्राह्मणवाडे, दत्तात्रय बर्लावार, गोवर्धन चव्हाण, दत्तात्रय खरवडे, गुरूदेव भोपये, विनायक बांदुरकर, जनार्धन साखरे, हंसराज उराडे, बाळू मडावी, प्रभाकर बारापात्रे, प्रदीप महाजन, मनीषा सजनपवार आदी पदाधिकारी व कार्यकर्ते सहभागी झाले होते.भाजपच्या पदाधिकाऱ्यांनी २०१४ च्या निवडणुकीपूर्वी स्वतंत्र विदर्भ राज्याची निर्मिती करू, असे आश्वासन वैदर्भीय जनतेला दिले होते. मात्र त्यानंतर या प्रश्नाकडे सत्ताधारी भाजप पक्षाचे दुर्लक्ष झाले. विदर्भ राज्य आंदोलन समितीच्या वतीने गेल्या पाच वर्षांपासून विदर्भ राज्याच्या मागणीसाठी धरणे, मोर्चे, उपोषण, निदर्शने व इतर अनेक आंदोलने लोकशाही मार्गाने करण्यात आली. मात्र विदर्भ राज्याच्या निर्मितीबाबत सरकारने निर्णय घेतला नाही. विदर्भाच्या विकासाकडे शासनाचे दुर्लक्ष असल्याने स्वतंत्र विदर्भ राज्याची निर्मिती हाच एकमेव पर्याय आहे, असे गडचिरोली येथे झालेल्या आंदोलनात समितीच्या पदाधिकाºयांनी सांगितले.विदर्भ राज्य आंदोलन समिती व अहेरी जिल्हा निर्माण कृती समितीच्या वतीने विदर्भ राज्याच्या मागणीसाठी तहसील कार्यालयासमोर निदर्शने करण्यात आली. आंदोलनाचे नेतृत्व समितीचे अध्यक्ष रघुनाथ तलांडे यांनी केले. यावेळी प्रा.नागसेन मेश्राम, रवी भांदककर, विलास रापर्तीवार, प्रशांत जोशी, श्रीनिवास भंडारी, मोहन मेश्राम, प्रदीप देशपांडे, पार्वता मडावी, वंदना सडमेक, सुमन पोरतेट, नागू आत्राम, विमल मडावी, गंगू मेश्राम, शैला कुसराम, किरण भांदककर आदी उपस्थित होते. स्वतंत्र विदर्भ राज्याची निर्मिती करण्यात यावी, अशा मागणीचे निवेदन तहसीलदारांना देण्यात आले. हे निवेदन नायब तहसीलदार गुरूनुले यांनी स्वीकारला.

टॅग्स :Vidarbhaविदर्भ