शहरं
Join us  
Trending Stories
1
ठाकरे बंधू अधिकृतपणे एकत्र येण्याआधीच ठाकरे गट-मनसेत महापौर पदावरून रस्सीखेच? नेत्यांचे दावे
2
“देवाभाऊ जाहिरातींचा खर्च पूरग्रस्तांना द्यायला हवा होता”; ठाकरे गटाचा भाजपावर पलटवार
3
Video - गरबा खेळताना हार्टअटॅक! नवऱ्यासोबत नाचताना पडली अन्...; ४ महिन्यांपूर्वी झालेलं लग्न
4
मंदिराजवळ कुणी बिगर हिंदू प्रसाद विकत असेल तर त्याला...; साध्वी प्रज्ञासिंह ठाकूर यांचं वादग्रस्त विधान
5
करुर येथील चेंगराचेंगरीसाठी पोलिसांनी विजयला ठरवले जबाबदार, म्हणाले तो सभेला जाणीवपूर्वक उशिरा आला कारण...
6
"सूर्यकुमारने माझ्याशी दोन वेळा हस्तांदोलन केले, पण जगासमोर..."; पाकिस्तानी कर्णधाराचा दावा
7
मौलाना तौकीर रजा, पेट्रोल बॉम्ब, अवैध शस्त्रास्त्रं अन्...; FIR मध्ये पोलिसांनी केले मोठे खुलासे, तुम्हालाही धक्का बसेल!
8
Tamil Nadu Stampede: हेमा मालिनींच्या नेतृत्वात एनडीएचे शिष्टमंडळ करणार ४१ जणांच्या मृत्यूची चौकशी; पीडित कुटुंबांची घेणार भेट
9
Navratri 2025: नवरात्रीचे शेवटचे दोन दिवस महत्त्वाचे; घरी कुंकुमार्चन करून मिळवा देवी कृपा!
10
"राहुल गांधींच्या केसाला धक्का लावाल तर याद राखा’’, गोळ्या झाडण्याच्या धमकीनंतर काँग्रेसचा इशारा 
11
शाब्बास पोरा! ६ वेळा नापास, ३ वेळा UPSC क्रॅक; शेतकरी वडिलांच्या सल्ल्याने लेक झाला IPS
12
Navratri 2025: अश्विन शुद्ध सप्तमीला सरस्वतीला आवाहन आणि दशमीला पूजन; ३ दिवसांचा शारदोत्सव का?
13
सलग ७ व्या दिवशी शेअर बाजारात पडझड! तरीही गुंतवणूकदारांनी कमावले १.१८ लाख कोटी! काय आहे कारण?
14
ट्रम्प टॅरिफचा परिणाम नाही! 'या' मल्टीबॅगर स्टॉकला लागलं अपर सर्किट; १ वर्षात ११२१% चा रिटर्न
15
ऐश्वर्याला पाहताच चाहती भावुक झाली, रडायलाच लागली अन्...; अभिनेत्रीच्या कृतीचं होतंय कौतुक
16
खोल, अंधाऱ्या विहिरीत पडली महिला, तब्बल ५४ तास दिली मृत्यूशी झुंज, अखेरीस...  
17
"...तर विचारधारा बदलत नाही"; RSS च्या व्यासपीठावर जाण्यास कमलताईंचा नकार, पण मुलगा राजेंद्र गवईंची वेगळी भूमिका
18
पगार वाढला तरी महिनाअखेरीस खिसा रिकामाच? तुम्हीही 'पगार विरुद्ध जीवनशैली'च्या सापळ्यात अडकलात?
19
खळबळजनक! पोलीस अधिकारी बनून गरब्याला VIP एन्ट्री; आयोजकांना संशय येताच पोलखोल अन्...
20
Maruti ची ऐतिहासिक कामगिरी; फोर्ड आणि फॉक्सवॅगनरख्या दिग्गज कंपन्यांना मागे टाकले...

सिरोंचा तालुक्यात दमदार पाऊस

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 10, 2020 05:00 IST

आदिवासी विकास महामंडळामार्फत तालुक्यातील अमरादी येथे धान खरेदी केंद्र सुरू करण्यात आले. यावर्षी शासनाने अधिकचा भाव दिल्याने धानाची खरेदी वाढली. गोदाम फुल्ल झाल्याने काही धान ताडपत्री झाकून उघड्यावरच ठेवण्यात आले होते. तसेच काही शेतकºयांचे काटे झाले नसल्याने त्यांचेही धान केंद्राच्या परिसरात ठेवले होते.

ठळक मुद्देशेतकऱ्यांचे लाखोंचे नुकसान : अमरादी केंद्रावरील धान भिजले; परिसरात साचले पाणी

लोकमत न्यूज नेटवर्कसिरोंचा : शनिवारी रात्री जवळपास ११ वाजताच्या सुमारास सिरोंचा तालुक्यात दमदार पाऊस झाला. या पावसामुळे तालुक्यातील अमरादी येथील धान खरेदी केंद्रावरील शेकडो क्विंटल धान भिजले आहे. त्यामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे.आदिवासी विकास महामंडळामार्फत तालुक्यातील अमरादी येथे धान खरेदी केंद्र सुरू करण्यात आले. यावर्षी शासनाने अधिकचा भाव दिल्याने धानाची खरेदी वाढली. गोदाम फुल्ल झाल्याने काही धान ताडपत्री झाकून उघड्यावरच ठेवण्यात आले होते. तसेच काही शेतकºयांचे काटे झाले नसल्याने त्यांचेही धान केंद्राच्या परिसरात ठेवले होते. मागील चार दिवसांपासून जिल्ह्यात ढगाळ वातावरण असल्याने शेतकरी व केंद्र संचालकांनी धानावर ताडपत्री झाकल्या. मात्र शनिवारी रात्री सिरोंचा तालुक्यात मुसळधार पाऊस झाला. हवेमुळे काही धानाच्या ढिगांवरील ताडपत्री उडून गेल्या. परिणामी पावसाचे पाणी धानामध्ये शिरले आहे.धान केंद्राच्या परिसरात पाणी जमा झाले आहे. या पाण्यामुळे खालच्या बाजूस असलेले धानाचे पोते पूर्णपणे ओले झाले आहेत. जमिनीवर लाकडी बल्ल्या ठेवून त्यावर पोत्यांची थप्पी ठेवण्यात आली होती. मात्र पावसाचे पाणी साचल्याने खालचे धान ओले झाले आहेत. काही ठिकाणी तर अगदी जमिनीवरच धानाचे पोते ठेवले आहेत. या ठिकाणी आता मोठ्या प्रमाणात चिखल निर्माण झाले आहे. त्यामुळे काम करताना अडचण होत आहे.धान सडण्याचा धोकाएकदा भिजलेले धान वाळवले तरी या धानातील तांदूळ काळा पडतो. तसेच तांदळाचा उग्र वास येते. मागील चार दिवसांपासून ढगाळ वातावरण कायम असल्याने धान वाळू घालणे सुध्दा शक्य नाही. त्यामुळे सदर धान पूर्णपणे कुजण्याचा धोका निर्माण झाला आहे. शेकडो क्विंटल धानाची थप्पी लावली आहे. एवढी थप्पी काढून पुन्हा धान वाळू टाकणे, अशक्य आहे. त्यामुळे जेवढे धान भिजले आहे, ते धान पूर्णपणे कुजण्याची शक्यता आहे. यामध्ये शेतकरी व आदिवासी विकास महामंडळाच्याही धानाचा समावेश आहे. त्यामुळे याचा फटका शासन व शेतकºयांना बसणार आहे.अवकाळी पाऊस व ढगाळ वातावरणाने कापूस काळवंडलागडचिरोली जिल्ह्यात कापसाचा पेरा वाढत आहे. सिंचनाची सुविधा नसल्याने बहुतांश शेतकरी कोरडवाहू कापसाची लागवड करतात. या कापसाचा जवळपास दुसरा तोडा सुरू झाला होता. मात्र चार दिवसांपासून अधूनमधून पडत असलेल्या पावसामुळे कापूस काढणीचे काम जवळपास ठप्प पडले आहे. पावसामुळे कापसाचे बोंड ओले झाले आहेत. ढगाळ वातावरणाने कापूस वाळत नसल्याने ते काळे पडत आहेत. तसेच काही कापसाचे बोंड जमिनीवर पडल्याने ते मातीमोल झाले आहेत. मुसळधार पावसाने ज्वारी, मका पिकाचेही मोठे नुकसान झाले आहे. या कापसाला कमी भाव मिळणार आहे.

टॅग्स :Rainपाऊस