शहरं
Join us  
Trending Stories
1
Asia Cup 2025 : आधी टीम इंडियानं हँडशेक न केल्याची बोंब! आता UAE विरुद्धच्या मॅचआधी PAK चं नवं सोंग!
2
मीनाताई ठाकरे यांच्या पुतळ्याची विटंबना; CM देवेंद्र फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
3
कुणबी प्रमाणपत्र कसे काढले जाते? १, २ नाही, १२ ते १६ कागदपत्रे आवश्यक; पाहा, पूर्ण प्रक्रिया
4
पंतप्रधान नरेंद्र मोदींना वाढदिवशी राहुल गांधींने पाठवले 'विशेष' पत्र; केली एक खास मागणी
5
"ह्या... हू... काय तुम्ही? कधी रे सुधारणार...? परत मी बोललो की...!" अजित दादांनी 'त्यांना' झाप-झाप झापलं
6
चलो दिल्ली! मनोज जरांगेंनी केली मोठी घोषणा; मराठा समाजाचे अधिवेशन घेणार, महत्त्वाचे कारण समोर
7
ह्युंदाईच्या या SUV ची किंमत ₹6 लाखही नव्हती, नव्या GST नंतर ₹86156 नं स्वस्त झाली; वरून ₹50000 चा डिस्काउंटही!
8
"क्लेमोर, वायर, पावडर... सगळं तयार होतं !" गुप्त माहितीने गडचिरोली पोलिसांनी रोखला भीषण कट
9
पाक आशिया कप स्पर्धेतून Out? सामान बसमध्ये अन् पाक खेळाडू हॉटेलमध्ये! नेमकं काय घडलं?
10
वाघाला घोरताना कधी पाहिलंय? VIDEO पाहून नेटकरी म्हणतायत, "हे तर आमच्या बाबांसारखेच..."
11
नवरात्रीचा मुहूर्त? पंतप्रधान मोदी नव्या ठिकाणाहून कामकाज पाहणार; PMOचा पत्ता बदलणार
12
"भेटायला येतो असा मी मित्रासारखा हट्ट केला होता पण...", प्रियाच्या आठवणीत अभिजीत भावुक
13
Video - पैशांचा पाऊस! चालत्या ट्रेनमधून उडवल्या ५०० च्या नोटा; गोळा करण्यासाठी लोकांची झुंबड
14
बच्चू कडूंना कधीच सोडणार नाही म्हणणारे माजी आमदार सोडून गेले; काँग्रेसमध्ये पक्ष प्रवेश
15
सारख्या नावाचे दिवस गेले... सेम चेहराही शोधावा लागणार; यापुढे EVM वर उमेदवाराचा रंगीत फोटो छापणार...
16
प्रसिद्धीचा मुद्दा, अजितदादांचा फडणवीसांकडे रोख;  म्हणाले, “जाहिरात करावी तर देवाभाऊंसारखी”
17
समुद्रात दडलाय सोन्याचा खजिना; किंमत 2000 अब्ज डॉलर्सपेक्षा जास्त, काढणार कसा?
18
आरोपीला पकडण्यासाठी गेलेल्या पोलिसांवर प्राणघातक हल्ला: अनेक पोलिस एम्समध्ये दाखल
19
कार अन् ट्रकचा भीषण अपघात; एकाच कुटुंबातील सात जणांचा जागीच मृत्यू
20
ICC T20I Rankings : नंबर वन अभिषेक शर्मानं साधला मोठा डाव; कॅप्टन सूर्यासह तिलक वर्मा घाट्यात

एसटी कर्मचाऱ्यांच्या संपाने ‘त्यांच्या’ माहेराची वाट बिकट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 6, 2021 05:00 IST

भाऊबीजेच्या सणासाठी प्रत्येक बहीण भावाच्या घरी जातेच. बहीण येणार नसेल तर भावाचे कुटुंब तरी बहिणीच्या घरी जाते. त्यामुळे भाऊबीजेसाठी बसस्थानकांवर माेठ्या प्रमाणात प्रवाशांची गर्दी वाढते. या कालावधीत एसटीला माेठ्या प्रमाणात प्रवासी मिळत असल्याने या कालावधीला गर्दीचा हंगाम संबाेधले जात हाेते. मात्र विलीनीकरणाच्या मागणीसाठी राज्यभरातील एसटी कर्मचाऱ्यांनी कामबंद आंदाेलन सुरू केले आहे. त्यामुळे दिवाळीच्या पूर्वीपासूनच एसटीची सेवा ठप्प पडली आहे. 

लाेकमत न्यूज नेटवर्कगडचिराेली : दिवाळीच्या सणादरम्यान भाऊबीजेसाठी दरवर्षी माहेरापर्यंत साेडून देणाऱ्या एसटीची चाके कर्मचाऱ्यांच्या आंदाेलनामुळे पूर्णपणे थांबली आहेत. त्यामुळे माहेराला कसे जावे, असा प्रश्न अनेक बहिणींना पडला आहे. भाऊबीजेच्या सणासाठी प्रत्येक बहीण भावाच्या घरी जातेच. बहीण येणार नसेल तर भावाचे कुटुंब तरी बहिणीच्या घरी जाते. त्यामुळे भाऊबीजेसाठी बसस्थानकांवर माेठ्या प्रमाणात प्रवाशांची गर्दी वाढते. या कालावधीत एसटीला माेठ्या प्रमाणात प्रवासी मिळत असल्याने या कालावधीला गर्दीचा हंगाम संबाेधले जात हाेते. मात्र विलीनीकरणाच्या मागणीसाठी राज्यभरातील एसटी कर्मचाऱ्यांनी कामबंद आंदाेलन सुरू केले आहे. त्यामुळे दिवाळीच्या पूर्वीपासूनच एसटीची सेवा ठप्प पडली आहे. दुसऱ्या गावावरून दिवाळीसाठी गावाकडे परत येणाऱ्यांनाही खासगी वाहनांचाच आधार घ्यावा लागला. आताही संप आणखी किती दिवस चालेल हे सांगता येत नाही. त्यामुळे प्रवाशांचे हालच हाेणार आहेत. अशा स्थितीत संप कधी मिटणार याकडे प्रवाशांचे लक्ष लागले आहे.

खासगी वाहने हाऊसफुल्ल-    एसटी कर्मचाऱ्यांच्या आंदाेलनाचा पुरेपूर फायदा खासगी वाहतूकधारकांनी घेणे सुरू केले आहे. बसस्थानकासमाेरच वाहने उभी करून प्रवाशांची उचल केली जात आहे. मागील आठ दिवसांपासून खासगी प्रवासी वाहने प्रवाशांनी फुल भरून जात आहेत. एसटी कर्मचाऱ्यांच्या आंदाेलनामुळे खासगी वाहतूकदारांची चांदी झाली आहे. 

कमी खर्चात अधिक उत्पन्नाची संधी गमावली

काेराेनातून सावरत असलेल्या एसटीला दिवाळीच्या कालावधीतून उत्पन्न मिळवून परिस्थिती सुधारण्याची संधी हाेती. मात्र ही संधी कामबंद आंदाेलनाने गमावल्या गेली आहे. दिवाळीपूर्वीचे उत्पन्न तर आधीच बुडाले आहेत. आंदाेलनाचा तिढा न सुटल्यास दिवाळीनंतरच्याही उत्पन्नावर पाणी फेरावे लागण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे ताेडगा निघून आंदाेलन संपावे, अशी मागणी प्रवाशांकडून हाेत आहे. 

एसटीने नुकतीच तिकीट वाढ केली आहे. तसेच डिझेलचे दर प्रतिलीटर १० रुपयांनी कमी झाले. कमी खर्चात अधिक उत्पन्न मिळविण्याची संधी हाेती. मात्र ही  संधी एसटीने गमावली आहे. 

माझे माहेर अमरावती जिल्ह्यातील आहे. आजपर्यंत आम्ही गडचिराेलीवरून जाणाऱ्या अमरावती बसने माहेरी जात हाेताे. मात्र यावर्षी बसेस बंद आहेत. खासगी वाहनांमध्ये प्रचंड गर्दी उसळणार आहे. त्यातच काेराेनाची भिती आहे. त्यामुळे यावर्षी भावाकडे जाणार नाही.- उज्वला चाैधरी

दिवाळीच्या सणादरम्यान शक्यताे संपूर्ण कुटुंबच दुसऱ्या गावाला जाण्यासाठी घराबाहेर पडते. त्यामुळे दुचाकी वाहनाने प्रवास करणे शक्य हाेत नाही. चारचाकी वाहनच आवश्यक राहते. मात्र बहुतांश कुटुंबांकडे चारचाकी वाहने नाहीत. ज्यांच्याकडे चारचाकी वाहन नाही. अशा कुटुंबाचे कुटुंबांचे हाल हाेणार आहेत. बस बंद असल्याने अनेक बहिणींनी यावर्षी भावाच्या गावाला न जाण्याचा निर्णय घेतला आहे.

 

टॅग्स :state transportएसटीStrikeसंप