शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्या दहशतवाद्यांवर पहिला प्रहार, आसिफ शेख आणि आदिलची घरं सुरक्षा दलांकडून उद्ध्वस्त
2
पहलगाम हल्ला: पाकिस्तानबद्दल आता भूमिका काय? अमेरिकेच्या परराष्ट्र मंत्रालयाने थेट उत्तर देणं टाळलं
3
OLA चे ७५ शोरूम बंद, अजून १२१ बंद करण्याच्या सूचना; RTO ची धडक कारवाई, कारण काय?
4
Stock Market Today: मे सीरिजच्या पहिल्याच दिवशी शेअर बाजारात तेजी; Sensex २५० अंकांनी वधारला, रियल्टी-मेटलमध्ये तेजी
5
सीमेपलीकडील सूत्रधार अन् दहशतवाद्यांचे दोन गुप्त संवाद गुप्तचर यंत्रणांनी पकडले
6
घर-कार खरेदी करणं झालं स्वस्त; २ मोठ्या सरकारी बँकांनी व्याजदर केले कमी, तुम्हीही आहात का ग्राहक?
7
LoCवर संघर्षाचा भडका! पाकिस्तानी सैन्याकडून रात्रभर गोळीबार, भारतीय लष्कराकडून चोख प्रत्युत्तर
8
पहलगाम दहशतवादी हल्ल्यातील पीडितांसाठी NSE चा पुढाकार, १ कोटींची मदत करणार
9
पुण्यातील बंडगार्डन, कोंढवा, लष्कर आणि कोरेगाव पार्क परिसरात १११ 'पाकिस्तानी' वास्तव्यास
10
सज्ज राहा...सीमेवर पाकसोबत संपूर्ण युद्ध नव्हे, तर कारगिलसारखे लहान युद्ध होऊ शकते
11
Today Horoscope: आज आर्थिक लाभ होतील, मैत्रिणी भेटतील; तुमची राशी काय सांगतेय?
12
उरलेसुरले अस्तित्वही पूर्णपणे उद्ध्वस्त करण्याची हीच ती वेळ; PM नरेंद्र मोदींचा निर्धार
13
भारत-पाक यांच्यात संघर्ष वाढणार; सिंधू जल अन् सिमला करार स्थगित केल्याने काय होईल?
14
एक घाव अन् दोन तुकडेच! भारताला फक्त प्रतिकारात्मक नव्हे, तर प्रतिबंधात्मक पावले उचलावी लागतील
15
आम्ही कायम तुमच्यासोबत... दहशत झुगारून काश्मिरात देशभरातून पर्यटकांचा ओघ कायम! 
16
आम्ही कपाळाच्या टिकल्या काढल्या, तरी मारले...; गनबोटे यांच्या पत्नी संगीता यांची आपबीती
17
‘राग’ येऊ द्या, पण आपल्याच पायावर कुऱ्हाड मारू नका; पर्यटनस्थळी जागता पाहारा का नाही?
18
तोल गेला, आईच्या हातातून निसटले बाळ; २१ व्या मजल्यावरून पडून बाळाचा मृत्यू
19
Pahalgam Attack: ‘मिनी स्वित्झर्लंड’ला इतकी मोठी गर्दी असताना एकही लष्करी जवान नव्हता
20
महाराष्ट्राची भाग्यरेषा उजळणार, ‘समृद्धी’चा अंतिम टप्पा लोकार्पणाच्या उंबरठ्यावर

एसटी कर्मचाऱ्यांच्या संपाने ‘त्यांच्या’ माहेराची वाट बिकट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 6, 2021 05:00 IST

भाऊबीजेच्या सणासाठी प्रत्येक बहीण भावाच्या घरी जातेच. बहीण येणार नसेल तर भावाचे कुटुंब तरी बहिणीच्या घरी जाते. त्यामुळे भाऊबीजेसाठी बसस्थानकांवर माेठ्या प्रमाणात प्रवाशांची गर्दी वाढते. या कालावधीत एसटीला माेठ्या प्रमाणात प्रवासी मिळत असल्याने या कालावधीला गर्दीचा हंगाम संबाेधले जात हाेते. मात्र विलीनीकरणाच्या मागणीसाठी राज्यभरातील एसटी कर्मचाऱ्यांनी कामबंद आंदाेलन सुरू केले आहे. त्यामुळे दिवाळीच्या पूर्वीपासूनच एसटीची सेवा ठप्प पडली आहे. 

लाेकमत न्यूज नेटवर्कगडचिराेली : दिवाळीच्या सणादरम्यान भाऊबीजेसाठी दरवर्षी माहेरापर्यंत साेडून देणाऱ्या एसटीची चाके कर्मचाऱ्यांच्या आंदाेलनामुळे पूर्णपणे थांबली आहेत. त्यामुळे माहेराला कसे जावे, असा प्रश्न अनेक बहिणींना पडला आहे. भाऊबीजेच्या सणासाठी प्रत्येक बहीण भावाच्या घरी जातेच. बहीण येणार नसेल तर भावाचे कुटुंब तरी बहिणीच्या घरी जाते. त्यामुळे भाऊबीजेसाठी बसस्थानकांवर माेठ्या प्रमाणात प्रवाशांची गर्दी वाढते. या कालावधीत एसटीला माेठ्या प्रमाणात प्रवासी मिळत असल्याने या कालावधीला गर्दीचा हंगाम संबाेधले जात हाेते. मात्र विलीनीकरणाच्या मागणीसाठी राज्यभरातील एसटी कर्मचाऱ्यांनी कामबंद आंदाेलन सुरू केले आहे. त्यामुळे दिवाळीच्या पूर्वीपासूनच एसटीची सेवा ठप्प पडली आहे. दुसऱ्या गावावरून दिवाळीसाठी गावाकडे परत येणाऱ्यांनाही खासगी वाहनांचाच आधार घ्यावा लागला. आताही संप आणखी किती दिवस चालेल हे सांगता येत नाही. त्यामुळे प्रवाशांचे हालच हाेणार आहेत. अशा स्थितीत संप कधी मिटणार याकडे प्रवाशांचे लक्ष लागले आहे.

खासगी वाहने हाऊसफुल्ल-    एसटी कर्मचाऱ्यांच्या आंदाेलनाचा पुरेपूर फायदा खासगी वाहतूकधारकांनी घेणे सुरू केले आहे. बसस्थानकासमाेरच वाहने उभी करून प्रवाशांची उचल केली जात आहे. मागील आठ दिवसांपासून खासगी प्रवासी वाहने प्रवाशांनी फुल भरून जात आहेत. एसटी कर्मचाऱ्यांच्या आंदाेलनामुळे खासगी वाहतूकदारांची चांदी झाली आहे. 

कमी खर्चात अधिक उत्पन्नाची संधी गमावली

काेराेनातून सावरत असलेल्या एसटीला दिवाळीच्या कालावधीतून उत्पन्न मिळवून परिस्थिती सुधारण्याची संधी हाेती. मात्र ही संधी कामबंद आंदाेलनाने गमावल्या गेली आहे. दिवाळीपूर्वीचे उत्पन्न तर आधीच बुडाले आहेत. आंदाेलनाचा तिढा न सुटल्यास दिवाळीनंतरच्याही उत्पन्नावर पाणी फेरावे लागण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे ताेडगा निघून आंदाेलन संपावे, अशी मागणी प्रवाशांकडून हाेत आहे. 

एसटीने नुकतीच तिकीट वाढ केली आहे. तसेच डिझेलचे दर प्रतिलीटर १० रुपयांनी कमी झाले. कमी खर्चात अधिक उत्पन्न मिळविण्याची संधी हाेती. मात्र ही  संधी एसटीने गमावली आहे. 

माझे माहेर अमरावती जिल्ह्यातील आहे. आजपर्यंत आम्ही गडचिराेलीवरून जाणाऱ्या अमरावती बसने माहेरी जात हाेताे. मात्र यावर्षी बसेस बंद आहेत. खासगी वाहनांमध्ये प्रचंड गर्दी उसळणार आहे. त्यातच काेराेनाची भिती आहे. त्यामुळे यावर्षी भावाकडे जाणार नाही.- उज्वला चाैधरी

दिवाळीच्या सणादरम्यान शक्यताे संपूर्ण कुटुंबच दुसऱ्या गावाला जाण्यासाठी घराबाहेर पडते. त्यामुळे दुचाकी वाहनाने प्रवास करणे शक्य हाेत नाही. चारचाकी वाहनच आवश्यक राहते. मात्र बहुतांश कुटुंबांकडे चारचाकी वाहने नाहीत. ज्यांच्याकडे चारचाकी वाहन नाही. अशा कुटुंबाचे कुटुंबांचे हाल हाेणार आहेत. बस बंद असल्याने अनेक बहिणींनी यावर्षी भावाच्या गावाला न जाण्याचा निर्णय घेतला आहे.

 

टॅग्स :state transportएसटीStrikeसंप