शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतासाठी नवीन संकट? अमेरिकेसह सात देश करत आहेत मोठी तयारी; रशियासोबत कनेक्शन
2
आता चीनला जाण्यासाठी भारतातून मिळणार थेट विमान सेवा; प्रवाशांचा वेळ अन् पैसा वाचणार
3
युक्रेन युद्धानंतर पुतिन पहिल्यांदाच भारत दौऱ्यावर येणार, अनेक करारांवर स्वाक्षऱ्या होणार
4
शटडाऊनमुळे अमेरिका मोठ्या संकटात; ७.५० लाख सरकारी कर्मचाऱ्यांवर टांगती तलवार
5
चार आरोपींवर १९ वर्षांनंतर झाले आरोप निश्चित मालेगाव बॉम्बस्फोट; विशेष न्यायालयांत सुनावणी
6
राशीभविष्य २ ऑक्टोबर २०२५: आज कामात यश मिळून आर्थिक लाभ होतील, नशिबाची साथ मिळेल
7
टीका, हल्ले झाले तरी संघाने कधीही कटुता बाळगली नाही; पंतप्रधान मोदी यांचे प्रतिपादन : ‘राष्ट्र प्रथम’ हे संघाचे तत्त्व महत्त्वाचे
8
केंद्रीय मंत्रिमंडळाची दसरा भेट : ४९.१९ लाख केंद्रीय कर्मचाऱ्यांसह ६८.७२ लाख निवृत्तीवेतनधारकांना मिळणार लाभ
9
आज गाजणार मेळावे! वाचा महाराष्ट्रातील सर्व महत्त्वाच्या सभांचे वेळापत्रक आणि प्रमुख मुद्दे
10
भ्रष्टाचारात महाराष्ट्र सलग तिसऱ्या वर्षी देशात टॉप; पुण्यात सर्वाधिक लाचखोर!
11
ईएमआय भरले म्हणून पती संयुक्त मालमत्तेवर एकट्याने मालकीचा दावा करू शकत नाही!
12
५७ केंद्रीय विद्यालयांना केंद्राने दिली मंजुरी; महाराष्ट्रातील चार जिल्ह्यांचा यादीत समावेश
13
रा. स्व. संघाने शिकवली फक्त शिस्त आणि सेवा! मुख्यमंत्री फडणवीसांनी सांगितली संघ शाखेतील प्रार्थनेची शक्ती
14
संघ शताब्दी आणि राज्यघटना; शताब्दीच्या उंबरठ्यावर रा.स्व.संघ आणि 'अमृतमहोत्सवी' संविधान!
15
अनुकंपाच्या तब्बल ५,१८७ उमेदवारांना मिळणार नियुक्तिपत्रे; एकाच दिवशी १० हजार जण नोकरीत हाेणार रुजू
16
ट्रम्प यांच्या योजनेला हमास मान्यता देईना; इस्रायलने गाझावर केलेल्या हल्ल्यात १६ जण ठार
17
शताब्दी वर्षात संघाचे ध्येय: 'राष्ट्रसेवेत' समाजाचा सहभाग! स्वयंसेवकांचे कुटुंब कसे बनले संघाच्या कार्याचे केंद्र?
18
"माझ्या पतीची बिनशर्त सुटका करा..."; सोनम वांगचुक यांच्या पत्नीचे थेट राष्ट्रपतींना पत्र
19
भिवंडीतील मानकोली येथे वह्या बनवणाऱ्या कंपनीच्या गोदामाला आग; सुदैवाने जीवितहानी नाही
20
महाराष्ट्रातील हॉटेल, दुकाने आता २४ तास सुरू राहणार; पण 'या' आस्थापनांवर मात्र निर्बंध कायम

नगर परिषद व महामार्गाच्या वादात अडकले पथदिवे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 2, 2021 05:00 IST

नगर परिषद प्रशासनाच्या म्हणण्यानुसार, पहिली चार वर्षे महामार्गावरील पथदिव्यांची देखभाल व दुरुस्ती करण्याची जबाबदारी नॅशनल हायवे विभागाची आहे. तसेच ज्या ठिकाणावरून वाहनांना एका बाजूने दुसऱ्या बाजूला जाण्यासाठी माेकळी जागा साेडण्यात आली आहे. त्या ठिकाणी सिमेंट काँक्रिटीमध्येच केबल टाकण्यात आली आहे. भविष्यात केबल तुटल्यास संपूर्ण महामार्ग खाेदावा लागणार आहे.

लाेकमत न्यूज नेटवर्कगडचिराेली : शहरातील पथदिव्यांचे काम नॅशनल हायवे विभागाने याेग्य पद्धतीने केले नसल्याचा ठपका ठेवत नगर परिषदेने  या पथदिव्यांचा ताबा स्वत:कडे घेण्यास नकार दिला आहे. त्यामुळे पथदिव्यांचे खांब लावण्याचे काम तीन महिन्यांपासून पूर्ण हाेऊनही त्यावर पथदिवे लागू शकले नाहीत. परिणामी, शहरवासीयांना अंधाराचा सामना करावा लागत आहे.नगर परिषद प्रशासनाच्या म्हणण्यानुसार, पहिली चार वर्षे महामार्गावरील पथदिव्यांची देखभाल व दुरुस्ती करण्याची जबाबदारी नॅशनल हायवे विभागाची आहे. तसेच ज्या ठिकाणावरून वाहनांना एका बाजूने दुसऱ्या बाजूला जाण्यासाठी माेकळी जागा साेडण्यात आली आहे. त्या ठिकाणी सिमेंट काँक्रिटीमध्येच केबल टाकण्यात आली आहे. भविष्यात केबल तुटल्यास संपूर्ण महामार्ग खाेदावा लागणार आहे. वास्तविक, या ठिकाणी पाइप टाकून त्यामध्ये केबल टाकणे आवश्यक हाेते. मात्र असे करण्यात आले नाही. भविष्यात केबल तुटल्यास नगर परिषदेला फार माेठा खर्च करावा लागणार आहे. त्यामुळे नगर परिषदेच्या म्हणण्यानुसार सदर काम सदाेष आहे. काम सदाेष असताना त्याचा ताबा घेण्यास नगर परिषदेने नकार दिला आहे. त्यामुळे पथदिव्यांचे खांब उभारून आता जवळपास तीन महिन्यांचा कालावधी पूर्ण झाला आहे. मात्र अजूनपर्यंत पथदिवे लावण्यात आलेले नाहीत. शहरातून प्रशस्त राष्ट्रीय महामार्गाचे काम झाले आहे. रात्री व पहाटेच्या सुमारास अनेक नागरिक फिरण्यासाठी जातात. मात्र नागरिकांना अंधाराचा सामना करावा लागत आहे. विशेष म्हणजे, ताबा घेण्यासंदर्भात नॅशनल हायवेने नगरपालिकेला पत्र दिल्यानंतर सदाेष कामासंदर्भात चर्चा उत्तर देण्यासाठी नगर परिषदेने १७ ऑगस्ट व १ सप्टेंबर राेजी दाेनवेळा पत्र दिले आहे. मात्र पत्राचे उत्तर दिले नाही, असा आराेप नगर परिषद प्रशासनाने केला आहे. 

मीटरच्या मागणीचा अर्जही केला नाहीपथदिव्यांसाठी स्वतंत्र मीटर बसवावा लागणार आहे. त्यासाठी नगर परिषदेने महावितरणच्या नावाने अर्ज तयार करून ठेवला आहे. मात्र सदाेष कामाचा तिढा अजूनपर्यंत सुटला नाही. त्यामुळे मीटरच्या मागणीचा अर्ज महावितरणकडे सादर करण्यात आला नाही. त्यामुळे पथदिवे लागण्यास आणखी किती दिवसांचा कालावधी लागेल हे अनिश्चित आहे.

 

टॅग्स :highwayमहामार्ग