शहरं
Join us  
Trending Stories
1
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
2
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
3
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
4
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
5
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
6
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
7
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
8
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
9
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
10
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
11
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
12
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
13
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
14
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
15
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
16
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
17
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा
18
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार
19
जम्मू-काश्मीरच्या कठुआ जिल्ह्यात दिसले 4 संशयित, सुरक्षा दलांनी सुरू केली शोध मोहीम...
20
ज्याच्यासाठी लिंग परिवर्तन केलं, त्याचं दुसऱ्यावरच प्रेम जडलं...! सनीची मारिया बनलेली किन्नर पोहोचली पोलीस ठाण्यात, अन् मग...

नगर परिषद व महामार्गाच्या वादात अडकले पथदिवे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 2, 2021 05:00 IST

नगर परिषद प्रशासनाच्या म्हणण्यानुसार, पहिली चार वर्षे महामार्गावरील पथदिव्यांची देखभाल व दुरुस्ती करण्याची जबाबदारी नॅशनल हायवे विभागाची आहे. तसेच ज्या ठिकाणावरून वाहनांना एका बाजूने दुसऱ्या बाजूला जाण्यासाठी माेकळी जागा साेडण्यात आली आहे. त्या ठिकाणी सिमेंट काँक्रिटीमध्येच केबल टाकण्यात आली आहे. भविष्यात केबल तुटल्यास संपूर्ण महामार्ग खाेदावा लागणार आहे.

लाेकमत न्यूज नेटवर्कगडचिराेली : शहरातील पथदिव्यांचे काम नॅशनल हायवे विभागाने याेग्य पद्धतीने केले नसल्याचा ठपका ठेवत नगर परिषदेने  या पथदिव्यांचा ताबा स्वत:कडे घेण्यास नकार दिला आहे. त्यामुळे पथदिव्यांचे खांब लावण्याचे काम तीन महिन्यांपासून पूर्ण हाेऊनही त्यावर पथदिवे लागू शकले नाहीत. परिणामी, शहरवासीयांना अंधाराचा सामना करावा लागत आहे.नगर परिषद प्रशासनाच्या म्हणण्यानुसार, पहिली चार वर्षे महामार्गावरील पथदिव्यांची देखभाल व दुरुस्ती करण्याची जबाबदारी नॅशनल हायवे विभागाची आहे. तसेच ज्या ठिकाणावरून वाहनांना एका बाजूने दुसऱ्या बाजूला जाण्यासाठी माेकळी जागा साेडण्यात आली आहे. त्या ठिकाणी सिमेंट काँक्रिटीमध्येच केबल टाकण्यात आली आहे. भविष्यात केबल तुटल्यास संपूर्ण महामार्ग खाेदावा लागणार आहे. वास्तविक, या ठिकाणी पाइप टाकून त्यामध्ये केबल टाकणे आवश्यक हाेते. मात्र असे करण्यात आले नाही. भविष्यात केबल तुटल्यास नगर परिषदेला फार माेठा खर्च करावा लागणार आहे. त्यामुळे नगर परिषदेच्या म्हणण्यानुसार सदर काम सदाेष आहे. काम सदाेष असताना त्याचा ताबा घेण्यास नगर परिषदेने नकार दिला आहे. त्यामुळे पथदिव्यांचे खांब उभारून आता जवळपास तीन महिन्यांचा कालावधी पूर्ण झाला आहे. मात्र अजूनपर्यंत पथदिवे लावण्यात आलेले नाहीत. शहरातून प्रशस्त राष्ट्रीय महामार्गाचे काम झाले आहे. रात्री व पहाटेच्या सुमारास अनेक नागरिक फिरण्यासाठी जातात. मात्र नागरिकांना अंधाराचा सामना करावा लागत आहे. विशेष म्हणजे, ताबा घेण्यासंदर्भात नॅशनल हायवेने नगरपालिकेला पत्र दिल्यानंतर सदाेष कामासंदर्भात चर्चा उत्तर देण्यासाठी नगर परिषदेने १७ ऑगस्ट व १ सप्टेंबर राेजी दाेनवेळा पत्र दिले आहे. मात्र पत्राचे उत्तर दिले नाही, असा आराेप नगर परिषद प्रशासनाने केला आहे. 

मीटरच्या मागणीचा अर्जही केला नाहीपथदिव्यांसाठी स्वतंत्र मीटर बसवावा लागणार आहे. त्यासाठी नगर परिषदेने महावितरणच्या नावाने अर्ज तयार करून ठेवला आहे. मात्र सदाेष कामाचा तिढा अजूनपर्यंत सुटला नाही. त्यामुळे मीटरच्या मागणीचा अर्ज महावितरणकडे सादर करण्यात आला नाही. त्यामुळे पथदिवे लागण्यास आणखी किती दिवसांचा कालावधी लागेल हे अनिश्चित आहे.

 

टॅग्स :highwayमहामार्ग