शहरं
Join us  
Trending Stories
1
निष्काळजीपणाचा कळस! सरकारी शाळेत मध्यान्ह भोजन खाल्ल्यानंतर ९० मुलं पडली आजारी
2
Mumbai: विरार- दादर लोकलच्या दरवाज्यात मनोरूग्णाचा धुडगूस, महिलांच्या सुरक्षिततेचा प्रश्‍न ऐरणीवर
3
GST कपातीनंतर ५, १०, २० रुपयांच्या बिस्किट, चिप्सची किंमतही घटणार की…?, कंपन्यांनी दिली अशी माहिती  
4
'चुल्लूभर पानी में डूब मरो...' भारत-पाकिस्तान क्रिकेट सामन्यावरून ओवैसी भाजपवर संतापले!
5
नफा वाढूनही फ्लिपकार्टला ५,१८९ कोटी रुपयांचा तोटा! एक निर्णय कंपनीच्या अंगलट?
6
खूशखबर! Instagram ची मोठी घोषणा; आता पटापट वाढेल रीच, पोस्ट करा अनलिमिटेड स्टोरी
7
‘सॉरी... आम्ही हे जग सोडतोय’, CA च्या पत्नीनं मुलासह १३ व्या मजल्यावरून मारली उडी, समोर आलं धक्कादायक कारण
8
पंजाब की शेरनी! चालत्या ऑटोमध्ये चोरांशी लढली, जीव धोक्यात घालून मदत मागितली अन्...
9
Pakistan: पाकिस्तानात दहशतवाद्यांच्या हल्ल्यात १९ सैनिकांचा मृत्यू; ४५ दहशतवाद्यांचा खात्मा
10
सूर्या, पांड्या की आफ्रिदी... IND vs PAK सामन्यात 'हे' १० खेळाडू ठरू शकतात 'गेमचेंजर'
11
'दशावतार' सिनेमासाठी रजनीकांतचा झालेला विचार? दिग्दर्शक म्हणाले- "दिलीप प्रभावळकरांनी नकार दिला असता तर..."
12
युपीआय व्यवहारांच्या नियमांत मोठे बदल; विमा, गुंतवणूक, क्रेडिट कार्ड पेमेंटसाठी मर्यादा वाढली
13
Dashavtar: दिलीप प्रभावळकरांच्या 'दशावतार'ने मनं जिंकली; दुसऱ्या दिवशी कमावले तब्बल 'इतके' कोटी
14
आजचे राशीभविष्य- १४ सप्टेंबर २०२५: आजचा दिवस फायद्याने भरलेला, पण हितशत्रूंपासून सावध राहा
15
गुन्हेगारी पार्श्वभूमी, तुरुंगवास आणि..., कोण आहे टॉमी रॉबिन्सन, ज्याच्या आवाहनानंतर लंडनमध्ये निघाला लाखोंचा मोर्चा
16
World Boxing Championship: भारताच्या लेकीचा 'गोल्डन पंच' ! जास्मिन लंबोरियाने बॉक्सिंग चॅम्पियनशिपमध्ये जिंकलं सुवर्ण
17
"तुम्हाला काय वाटतं याला काही महत्त्व नसतं..."; IND vs PAK सामन्यावर सुनील गावसकरांचे मत
18
लंडनमध्ये १ लाखाहून अधिक स्थलांतर विरोधी आंदोलक रस्त्यावर उतरले, अनेक पोलिसांवर हल्ला
19
मतपेढीच्या राजकारणामुळे ईशान्य भारताचे मोठे नुकसान : पंतप्रधान मोदी
20
पोलिसांच्या ८ तासांच्या ड्युटीचे काय झाले? मनुष्यबळ वाढल्यास ८ तासांची ड्युटी शक्य

जिमलगट्टा परिसराला वादळाचा तडाखा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 1, 2020 05:01 IST

मागील आठ दिवसापासून जिल्ह्याचे तापमान ४५ अंशांच्या वर पोहोचले होते. त्यामुळे दुपारी व रात्री असह्य उकाडा जाणवत होता. दुपारच्या सुमारास कडक ऊन्हामुळे घराबाहेर पडणे कठीण होत होते. मात्र रविवारी सकाळपासूनच थंड वारे वाहण्यास सुरूवात झाली. तसेच ढगाळ वातावरण असल्यामुळे उकाड्यापासून काही प्रमाणात नागरिकांना दिलासा मिळाला.

ठळक मुद्देजोरदार पाऊस : घरांवरील टिनाचे पत्रे उडून गेले; कवेलू कोसळल्याने नुकसान

लोकमत न्यूज नेटवर्कजिमलगट्टा : जिमलगट्टा परिसरात शनिवारी सायंकाळच्या सुमारास वादळासह पाऊस झाले. प्रचंड वेगाच्या वादळामुळे अनेक नागरिकांच्या घरावरील टिनाचे छत उडून गेले आहे. त्यामुळे नागरिकांचे नुकसान झाले आहे.मागील आठ दिवसापासून जिल्ह्याचे तापमान ४५ अंशांच्या वर पोहोचले होते. त्यामुळे दुपारी व रात्री असह्य उकाडा जाणवत होता. दुपारच्या सुमारास कडक ऊन्हामुळे घराबाहेर पडणे कठीण होत होते. मात्र रविवारी सकाळपासूनच थंड वारे वाहण्यास सुरूवात झाली. तसेच ढगाळ वातावरण असल्यामुळे उकाड्यापासून काही प्रमाणात नागरिकांना दिलासा मिळाला. जिमलगट्टा परिसरात शनिवारी सायंकाळच्या सुमारास वादळासह पाऊस झाला. जिमलगट्टा परिसरातील अनेक नागरिकांची घरे टिन व कौलारू आहेत. वादळाचा सर्वाधिक फटका टिनाच्या घरांना बसला. जिमलगट्टा येथील स्वामी मार्लीवार यांच्या घरावरील टिनाचे पत्रे उडून गेले. पत्रे उडून गेल्यानंतर पाऊस झाल्याने घरातील साहित्याचे नुकसान झाले. तसेच मेडपल्ली येथील सुधाकर येलम यांच्यासह १० ते १५ नागरिकांच्या घरांवरील कवेलु व टिन उडून गेले. ऐन पावसाळ्याच्या तोंडावर नुकसान झाल्याने घरांची डागडुजी कशी करावी, असा प्रश्न निर्माण झाला आहे. मुलचेरा तालुक्यात दुपारच्या सुमारास वादळी पाऊस झाला. विजांच्या कडकडाटासह मुसळधार पाऊस झाल्याने वातावरणात गारवा निर्माण झाला. पाऊस झाल्याने शेतकरी खरीपपूर्व हंगामाच्या कामांना सुरूवात करणार आहे.वादळामुळे मेडपल्ली येथील सुधाकर येलम यांच्या घरावरील टिनाचे पत्रे घरापासून जवळपास ५० मीटर अंतरावर असे उडून गेले.मुलचेरा येथे रविवारी दुपारी २ वाजताच्या सुमारास जोरदार पाऊस झाला. रस्त्यांवर असे पाणी साचले होते.

 

टॅग्स :Rainपाऊस