शहरं
Join us  
Trending Stories
1
Iran Israel ceasefire: इराण-इस्रायलमधील १२ दिवसांचे युद्ध संपले; डोनाल्ड ट्रम्प यांनी केली मोठी घोषणा, काय म्हणाले?
2
Election 2025: प्रभाग रचनेचा प्रस्ताव देणार आता निवडणूक आयोगाला, सरकारचा सुधारित आदेश
3
भारताला तेलाची नाही चिंता; मित्र येतो कामी! इराणकडून आयात शून्य, पण...
4
MSRTC: एसटी गेली 'खड्ड्यात'; ३७ वर्षे तोट्याचा प्रवास, एसटी महामंडळाची श्वेतपत्रिका जाहीर
5
रतन टाटा यांचे उरलेले शेअर्स 'त्या' दोन संस्थांनाच; मुंबई उच्च न्यायालयाने दिला महत्त्वाचा निकाल
6
इराणचा पलटवार...! कतारमधील अमेरिकेच्या सर्वात मोठ्या एअरबेसवर डागली 6 क्षेपणास्त्रे
7
स्पर्धा परीक्षेप्रमाणे सरळसेवा भरती परीक्षेसाठीही 'पर्सेटाइल' पद्धत; 'क' गट नोकर भरतीसाठी एमपीएससीचा निर्णय
8
IND vs ENG मालिके दरम्यान दु:खद बातमी! भारताच्या दिग्गज फिरकीपटूचं निधन; लंडनमध्ये घेतला अखेरचा श्वास
9
आखाती देशांत तणाव वाढण्याची चिन्हे, अनेक ठिकाणी एअरस्पेस बंद; एअर इंडिया, इंडिगोकडून सूचना जारी
10
इराण हल्ल्याचा तीव्र शब्दांत निषेध; कतारने क्षेपणास्त्रे हवेतच रोखली, जीवितहानी झाली नसल्याचा दावा
11
“त्रिभाषा सूत्रावर सर्व संबंधितांशी बोलूनच अंतिम निर्णय घेणार”; CM फडणवीसांनी केले स्पष्ट
12
ENG vs IND : फलंदाजांनी आपलं काम केलं! टीम इंडियानं हा मंत्र जपला तर विजय पक्का, पण...
13
“स्वसंरक्षणाचा इराणला पूर्ण अधिकार”; रशियाने स्पष्टच सांगितले, तणाव वाढण्याची चिन्हे
14
ठरले! महादेव बाबर NCPमध्ये करणार प्रवेश; DCM अजित पवार राहणार उपस्थित, पुण्यात ताकद वाढणार
15
Iran strikes US air base: इराणचे प्रत्युत्तर; कतारमधील अमेरिकन लष्करी तळांवर जोरदार मिसाईल हल्ला
16
कुर्ला-सायनदरम्यान ओव्हरहेड वायर तुटली; मध्य रेल्वेच्या जलद फेऱ्या ठप्प, प्रवाशांचे हाल
17
"...तेलाच्या किमती कमी ठेवा, मी बघतोय!" इराण-इस्रायल युद्धादरम्यान डोनाल्ड ट्रम्प यांचं मोठं विधान
18
ENG vs IND: KL राहुल-पंतच्या सेंच्युरीनंतर जड्डूची उपयुक्त खेळी! इंग्लंडसमोर ३७१ धावांचे टार्गेट
19
इस्रायलचा इराणवर मोठा हल्ला, ५० हून अधिक लढाऊ विमानांचा कहर; महत्त्वाच्या लष्करी तळांवर तुफान बॉम्बिंग
20
"२०२२ मध्ये केवळ वादळ होतं, २०२७ मध्ये....", पोटनिवडणुकीच्या निकालानं केजरीवाल खूश, केली मोठी भविष्यवाणी

वादळाने धानाचे पीक कोसळले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 29, 2020 05:00 IST

वादळामुळे सिरोंचा तालुक्यातील अनेक गावांचा वीज पुरवठा खंडित झाला. तसेच उन्हाळी धान कोसळले. अजूनपर्यंत धान पूर्णपणे भरले नाही. अशातच कोसळल्याने धानाचे लोंब पूर्णपणे भरत नाही. परिणामी उत्पादनात कमालीची घट होण्याची शक्यता वर्तविली जात आहे. शेतकऱ्यांनी लाखो रुपये खर्चुन धानाची लागवड केली. हातात आलेले पीक नष्ट होताना बघून शेतकरी चिंतेत पडला आहे.

ठळक मुद्देसिरोंचा तालुक्यातील शेतकऱ्यांना फटका : उत्पादनात कमालीची घट होण्याची शक्यता

लोकमत न्यूज नेटवर्कसिरोंचा : सोमवारी सायंकाळी व रात्री झालेल्या अवकाळी पावसामुळे सिरोंचा तालुक्यातील उन्हाळी धान कोसळले आहे. यामुळे उत्पादनात कमालीची घट होण्याची शक्यता वर्तविली जात आहे.सिरोंचा तालुक्यातील अनेक शेतकऱ्यांकडे बोअर व सिंचन विहिरी आहेत. तसेच गोदावरी, प्राणहिता नदीजवळ जमीन असलेले शेतकरी उन्हाळी धानपिकाची लागवड करतात. यावर्षी आजपर्यंत वातावरण चांगले असल्याने उन्हाळी धानपीक जोमाने वाढले होते. त्यामुळे उत्पादन वाढेल, अशी अपेक्षा शेतकरीवर्ग करीत असतानाच सोमवारी रात्री सिरोंचा तालुक्यात मेघ गर्जना व जोराच्या वादळासह पाऊस झाला. वादळामुळे सिरोंचा तालुक्यातील अनेक गावांचा वीज पुरवठा खंडित झाला. तसेच उन्हाळी धान कोसळले. अजूनपर्यंत धान पूर्णपणे भरले नाही. अशातच कोसळल्याने धानाचे लोंब पूर्णपणे भरत नाही. परिणामी उत्पादनात कमालीची घट होण्याची शक्यता वर्तविली जात आहे. शेतकऱ्यांनी लाखो रुपये खर्चुन धानाची लागवड केली. हातात आलेले पीक नष्ट होताना बघून शेतकरी चिंतेत पडला आहे. नुकसानीचे सर्वेक्षण करून मदत देण्याची मागणी होत आहे.खरीप धानाच्या तुलनेत उन्हाळी धानाच्या लागवडीचा खर्च अधिक राहते. वेळोवेळी पाणी द्यावे लागत असल्याने मोटारपंपाचे वीज बिलाचाही भरणा करावा लागतो. तसेच उन्हाळ्यात धानावर विविध किडींचा प्रादुर्भाव होण्याची शक्यता असल्याने कीटक नाशकांचाही खर्च अधिक राहते.फळबागा व इतर पिकांनाही बसला फटकासिरोंचा तालुक्यातील आसरअल्ली, अंकिसा, वडधम, रंगयापल्ली, झिंगानूर, रेगुंठा, मोयाबीनपेठा या परिसरात प्रामुख्याने धानपिकाबरोबरच मिरची, मका, कापूस, आंबा आदी फळबाग पिकांचेही उत्पादन घेतले जाते. सोमवारी झालेल्या वादळामुळे आंबे जमिनीवर तुटून पडले आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. मिरची पिकाचा शेवटचा तोडा सुरू आहे. काही शेतकºयांनी सदर मिरची वाळविण्यासाठी टाकली असताना वादळामुळे मिरची उडून गेली. तर काही मिरचीचे ढीग पाण्यातही सापडले. त्यामुळे मिरची पिकाचे सुद्धा मोठे नुकसान झाले आहे. वादळामुळे अनेकांच्या घरावरील छत उडून गेले. मात्र तालुक्यात कोणतीही जीवितहानी झाली नाही.

टॅग्स :agricultureशेतीFarmerशेतकरी