शहरं
Join us  
Trending Stories
1
शटडाऊनमुळे अमेरिका मोठ्या संकटात; ७.५० लाख सरकारी कर्मचाऱ्यांवर टांगती तलवार
2
टीका, हल्ले झाले तरी संघाने कधीही कटुता बाळगली नाही; पंतप्रधान मोदी यांचे प्रतिपादन : ‘राष्ट्र प्रथम’ हे संघाचे तत्त्व महत्त्वाचे
3
"कतारवर हल्ला म्हणजे अमेरिकेवर हल्ला, पुन्हा असं घडलं तर..."; ट्रम्प यांचा इस्रायलला इशारा
4
महाराष्ट्रात 'जम्बो'भरती! ४ ऑक्टोबरला एकाचवेळी तब्बल १०,३०९ उमेदवार शासकीय सेवेत होणार दाखल
5
"माझ्या पतीची बिनशर्त सुटका करा..."; सोनम वांगचुक यांच्या पत्नीचे थेट राष्ट्रपतींना पत्र
6
भिवंडीतील मानकोली येथे वह्या बनवणाऱ्या कंपनीच्या गोदामाला आग; सुदैवाने जीवितहानी नाही
7
महाराष्ट्रातील हॉटेल, दुकाने आता २४ तास सुरू राहणार; पण 'या' आस्थापनांवर मात्र निर्बंध कायम
8
“मराठा समाजाला आरक्षणाची अत्यंत गरज, पण सरकारने...”; खासदार शाहू महाराजांनी व्यक्त केली खंत
9
ठाणे महापालिकेच्या अतिक्रमण विभागप्रमुखाला २५ लाखांची लाच घेताना अटक; अगोदर घेतलेले १० लाख
10
मंत्रालयातील लूटीला चाप बसणार! सल्लागारांच्या नियुक्त्यांमध्ये पारदर्शकता आणण्यासाठी निर्णय
11
GST घटला, पण सरकारचा खजिना भरला, सप्टेंबर महिन्यात झाली विक्रमी कमाई   
12
ICC Womens World Cup : 'लेडी मॅक्सवेल'ची विक्रमी सेंच्युरी; असा पराक्रम करणारी ठरली पहिली बॅटर
13
मुंबई मनपा निवडणुकीपूर्वी उद्धवसेनेला मोठा धक्का; ‘या’ गटाचे प्रमुख, पदाधिकारी शिवसेनेत
14
VIDEO: परंपरा.. प्रतिष्ठा.. अनुशासन.. 'या' ठिकाणी पुरूष साडी नेसून करतात गरबा, कारण...
15
“वाट कसली पाहता? शेतकरी भाजपात आल्यावर कर्जमुक्ती करणार का?”; उद्धव ठाकरेंचा थेट सवाल
16
संविधान सत्याग्रह पदयात्रेदरम्यान पोलिसांकडून पाळत, काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षांचे सरकारला आव्हान, म्हणाले...
17
NHIDCL: एनएचआयडीसीएलमध्ये नोकरी, 'या' पदांसाठी भरती; १ लाख ५० हजारांपर्यंत पगार!
18
वय वर्ष ३१, संपत्ती ₹२१,१९० कोटी! कोण आहे भारतातील सर्वात तरुण अब्जाधीश? काय काम करतो?
19
लोकसंख्येतील बदल घुसखोरीपेक्षाही घातक...! असं का म्हणाले पंतप्रधान मोदी? देशाला दिला गंभीर इशारा
20
'ओला दुष्काळ जाहीर करा', उद्धव ठाकरेंनी दाखवले CM फडणवीसांचे पत्र, म्हणाले, "मलाही वेदना झाल्या.."

वादळाने धानाचे पीक कोसळले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 29, 2020 05:00 IST

वादळामुळे सिरोंचा तालुक्यातील अनेक गावांचा वीज पुरवठा खंडित झाला. तसेच उन्हाळी धान कोसळले. अजूनपर्यंत धान पूर्णपणे भरले नाही. अशातच कोसळल्याने धानाचे लोंब पूर्णपणे भरत नाही. परिणामी उत्पादनात कमालीची घट होण्याची शक्यता वर्तविली जात आहे. शेतकऱ्यांनी लाखो रुपये खर्चुन धानाची लागवड केली. हातात आलेले पीक नष्ट होताना बघून शेतकरी चिंतेत पडला आहे.

ठळक मुद्देसिरोंचा तालुक्यातील शेतकऱ्यांना फटका : उत्पादनात कमालीची घट होण्याची शक्यता

लोकमत न्यूज नेटवर्कसिरोंचा : सोमवारी सायंकाळी व रात्री झालेल्या अवकाळी पावसामुळे सिरोंचा तालुक्यातील उन्हाळी धान कोसळले आहे. यामुळे उत्पादनात कमालीची घट होण्याची शक्यता वर्तविली जात आहे.सिरोंचा तालुक्यातील अनेक शेतकऱ्यांकडे बोअर व सिंचन विहिरी आहेत. तसेच गोदावरी, प्राणहिता नदीजवळ जमीन असलेले शेतकरी उन्हाळी धानपिकाची लागवड करतात. यावर्षी आजपर्यंत वातावरण चांगले असल्याने उन्हाळी धानपीक जोमाने वाढले होते. त्यामुळे उत्पादन वाढेल, अशी अपेक्षा शेतकरीवर्ग करीत असतानाच सोमवारी रात्री सिरोंचा तालुक्यात मेघ गर्जना व जोराच्या वादळासह पाऊस झाला. वादळामुळे सिरोंचा तालुक्यातील अनेक गावांचा वीज पुरवठा खंडित झाला. तसेच उन्हाळी धान कोसळले. अजूनपर्यंत धान पूर्णपणे भरले नाही. अशातच कोसळल्याने धानाचे लोंब पूर्णपणे भरत नाही. परिणामी उत्पादनात कमालीची घट होण्याची शक्यता वर्तविली जात आहे. शेतकऱ्यांनी लाखो रुपये खर्चुन धानाची लागवड केली. हातात आलेले पीक नष्ट होताना बघून शेतकरी चिंतेत पडला आहे. नुकसानीचे सर्वेक्षण करून मदत देण्याची मागणी होत आहे.खरीप धानाच्या तुलनेत उन्हाळी धानाच्या लागवडीचा खर्च अधिक राहते. वेळोवेळी पाणी द्यावे लागत असल्याने मोटारपंपाचे वीज बिलाचाही भरणा करावा लागतो. तसेच उन्हाळ्यात धानावर विविध किडींचा प्रादुर्भाव होण्याची शक्यता असल्याने कीटक नाशकांचाही खर्च अधिक राहते.फळबागा व इतर पिकांनाही बसला फटकासिरोंचा तालुक्यातील आसरअल्ली, अंकिसा, वडधम, रंगयापल्ली, झिंगानूर, रेगुंठा, मोयाबीनपेठा या परिसरात प्रामुख्याने धानपिकाबरोबरच मिरची, मका, कापूस, आंबा आदी फळबाग पिकांचेही उत्पादन घेतले जाते. सोमवारी झालेल्या वादळामुळे आंबे जमिनीवर तुटून पडले आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. मिरची पिकाचा शेवटचा तोडा सुरू आहे. काही शेतकºयांनी सदर मिरची वाळविण्यासाठी टाकली असताना वादळामुळे मिरची उडून गेली. तर काही मिरचीचे ढीग पाण्यातही सापडले. त्यामुळे मिरची पिकाचे सुद्धा मोठे नुकसान झाले आहे. वादळामुळे अनेकांच्या घरावरील छत उडून गेले. मात्र तालुक्यात कोणतीही जीवितहानी झाली नाही.

टॅग्स :agricultureशेतीFarmerशेतकरी