शहरं
Join us  
Trending Stories
1
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
2
Mumbai: मुंबईतील चारकोपच्या राजाचे १७७ दिवसांनी विसर्जन; ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप!
3
"शिंदे गटाच्या मोर्चाचे लक्ष्य चुकले; मोर्चाच काढायचा तर फडणवीसांच्या बंगल्यावर काढा’’, हर्षवर्धन सपकाळ यांचा टोला 
4
मोठी बातमी: सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात पोलिसांवर नव्हे, अज्ञातांवर खुनाचा गुन्हा
5
Akash Deep Maiden Fifty : 'नाईट वॉचमन' आकाशदीपनं उडवली इंग्लंडची झोप! ठोकली सॉलिड 'फिफ्टी'
6
जिममध्ये व्यायाम करत असतानाच आला हार्ट ॲटॅक, उदयोन्मुख क्रिकेटपटूचा मृत्यू
7
राज्यात दोन-तीन भागात गुन्हेगारी वाढतेय, त्यात पुणे येतं; याला जबाबदार कोण? - सुप्रिया सुळे
8
राजा रघुवंशीच्या भावाच्या पत्नीने केला सनसनाटी दावा, म्हणाली, "माझ्या मुलाचा बाप…’’
9
Viral Video: नाशकात दुचाकीवरून आलेल्या सोनसाखळी चोराला महिलेनं दाखवला इंगा!
10
कॉफीसोबत झुरळंही रगडली जातात, कॉफीत असतातच झुरळं! खोटं वाटतंय, वाचा FDA काय सांगतेय..
11
IND vs ENG ...तर भारतीय गोलंदाजाला ठोसा मारला असता; आकाशदीपसंदर्भात काय म्हणाला पाँटिंग?
12
"...तर तुम्हालाही अटक होईल"; राज ठाकरेंनी दिलेल्या आव्हानावर CM फडणवीस स्पष्टच बोलले
13
संजय बांगरची 'ट्रान्सजेंडर' मुलगी अनाया बांगर हिची धडाकेबाज फटकेबाजी, पाहा फलंदाजीचा VIDEO
14
जागे राहा, सतर्क राहा, महाराष्ट्र विकला जाऊ देऊ नका; मनसे प्रमुख राज ठाकरेंचं जनतेला आवाहन
15
"शाहरुखपेक्षा विकी कौशलने सॅम बहादूरमध्ये चांगलं काम केलं होतं", राष्ट्रीय पुरस्कारावर लेखिकेची पोस्ट
16
Yavat Violence: "बाहेरून आलेले लोक तिथे..." यवत हिंसाचाऱ्याच्या घटनेवर सुप्रिया सुळेंची प्रतिक्रिया
17
SIP चे दिवस गेले? आता लाँच होणार SIF; 'या' कंपनीला SEBI कडून मिळाली मंजुरी
18
Ritual: एखाद्या व्यक्तीच्या निधनानंतर घरात तीन दिवस का केला जात नाही स्वयंपाक? वाचा शास्त्र!
19
झुनझुनवालांनी 'या' कंपनीचे सर्व शेअर्स विकले, ३ वर्षात १११% रिटर्न; Zerodha च्या निखिल कामथांचीही आहे गुंतवणूक
20
"१५-२० वर्ष इथे राहूनही मराठी येत नसेल तर लाज वाटली पाहिजे...", श्रुती मराठे स्षष्टच बोलली

जंगलतोड सुरूच

By admin | Updated: August 17, 2014 23:10 IST

वनविभागाकडून वनतस्करांवर आळा घालण्यासाठी शर्तीचे प्रयत्न केले जात असले तरी अजुनपर्यंत याला यश प्राप्त झाले नाही. सहा महिन्यात सुमारे ११ हजार ४४९ झाडांची तोड करण्यात आली आहे.

गडचिरोली : वनविभागाकडून वनतस्करांवर आळा घालण्यासाठी शर्तीचे प्रयत्न केले जात असले तरी अजुनपर्यंत याला यश प्राप्त झाले नाही. सहा महिन्यात सुमारे ११ हजार ४४९ झाडांची तोड करण्यात आली आहे. याच सहा महिन्यात वनविभागाच्या कर्मचाऱ्यांनी व फिरत्या पथकांनी वनतस्करांकडून सुमारे १२ लाख ४६ हजार ३५५ रूपयांचा माल जप्त केला आहे. एकुण १ हजार ७८४ वनगुन्हे घडले आहेत. यावरून जंगलतोड किती मोठ्या प्रमाणात सुरू आहे, हे लक्षात येते. महत्त्वाचे म्हणजे, सर्वात जास्त वृक्षतोड गडचिरोली वनविभागात झाली आहे. गडचिरोली जिल्ह्यात एकूण भूभागाच्या सुमारे ७८ टक्के भूभाग जंगलांने व्यापला आहे. यातील बहुतांश जंगल आरक्षित आहे. जंगलाचे संरक्षण करण्यासाठी स्वतंत्र वनवृत्त कार्यालय, ५ विभागीय कार्यालय व हजारो वनकर्मचारी कार्यरत आहेत. पाचही वनविभागात स्वतंत्र फिरते पथक स्थापन करण्यात आले आहेत. या पथकाच्या माध्यमातून संपूर्ण जंगल परिसरात रात्रंदिवस कडक पहारा ठेवला जातो. स्थानिक नागरिकांच्या सहकार्याशिवाय वनांचे संरक्षण करणे, शक्य नाही हे लक्षात आल्यानंतर राज्य शासनाने संयुक्त वनव्यवस्थापन समित्यांची स्थापना केली आहे. या वनसमित्यांच्या सदस्यांना वनविभागाकडून जंगलाच्या माध्यमातून रोजागाराचे साधन पूरविले जातात. त्याचबरोबर गावकऱ्यांकडून जंगल कटाई होऊ नये यासाठी गावकऱ्यांना गॅसचे वाटपही करण्यात येत आहे. वनविभागाने वनकर्मचाऱ्यांना पेट्रोलिंगसाठी ४३ मोटारसायकल, हजारो मोबाईल पुरविले आहेत. या सर्व उपाययोजना करूनही जंगलतोडीवर नियंत्रण मिळविण्यात वनविभागाला पूर्णपणे यश प्राप्त झालेले नाही. १ जानेवारी ते ३० जून या सहा महिन्यात सुमारे ११ हजार ४४९ झाडांची तोड करण्यात आली आहे. यामुळे शासनाचे सुमारे १ कोटी १७ लाख ५९ हजार ११९ रूपयांचे नुकसान झाले आहे. वनविभागाच्या कर्मचाऱ्यांनी १२ लाख ४६ हजार ३५५ रूपये किंमतीचा माल वनतस्कारांकडून हस्तगत केला आहे. सहा महिन्यात एकुण १ हजार ७८४ वनगुन्हे घडले आहेत. सिरोंचा तालुक्यातून सर्वात जास्त वनतस्करी होत असल्याने या विभागात सर्वाधिक वृक्षतोड होत असल्याचा आरोप होत असला तरी प्रत्यक्षात सर्वाधिक वृक्षतोड मात्र गडचिरोली वनविभागात झाली आहे. यावरून या विभागातील कर्मचाऱ्यांच्या कार्यशैलीवर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे. (नगर प्रतिनिधी)