शहरं
Join us  
Trending Stories
1
Video: माजी मंत्री तानाजी सावंत यांचा बंगला पाण्याखाली; दोन-दोन टोयोटा फॉर्च्युनर पुरात बुडाल्या...
2
सुनेत्रा अजित पवार यांचे NCP कार्यकर्त्यांना आवाहन; म्हणाल्या, “अतिवृष्टी हातात नाही, पण...”
3
अभूतपूर्व परिस्थितीत तातडीच्या मदतीसह कायमस्वरुपी मदतीची गरज; अन्यथा शेती मोठ्या समस्येत - शरद पवार
4
PM मेलोनींच्या इटलीमध्ये हजारो आंदोलक रस्त्यावर, बस-रेल्वे गाड्यांची तोडफोड; 60 पोलीस जखमी
5
पेनी स्टॉक बनला मल्टीबॅगर, एका वर्षात केलं मालामाल; १ लाखांचे झाले ६८ लाखांपेक्षा अधिक
6
Accident Video: दोन बाईकचा थरकाप उडवणारा अपघात; हवेत उडाले, नंतर फूट दूर जाऊन पडले
7
फक्त डेटा डिलिट करणं पुरेसं नाही! जुना फोन विकण्यापूर्वी 'या' ५ सीक्रेट गोष्टी करायलाच हव्यात
8
"पाकिस्तानचे तुकडे तुकडे होतील, बॉम्बहल्ला ही तर सुरुवात..."; इस्लामाबादच्या शत्रूचा इशारा
9
Navratri 2025: वडापावची क्रेव्हिंग होतेय? झटपट करा 'हा' उपासाचा कुरकुरीत बटाटेवडा
10
काय सांगता? स्लिम होण्याचा ट्रेंड जीवघेणा; बारीक लोकांमध्ये अकाली मृत्यूचा धोका तिप्पट
11
नाना पाटेकर सरसावले, 'ऑपरेशन सिंदूर'नंतर Pakच्या गोळीबारात बाधित झालेल्या कुटुंबांना ४२ लाखांची मदत
12
जीएसटीने आणखी अवघड केले...! पार्ले-जी बिस्कीट पुडा ५ रुपयांचा आता ४.४५ ला, १ रुपयाचे चॉकलेट ८८ पैशांना...
13
Gold Silver Price Today: आजही सोन्या-चांदीचे भाव नव्या विक्रमी पातळीवर; सोन्याच्या दरात प्रति तोळा ₹१,३४३ तर चांदी ₹१,१८१ ने महागली
14
Mumbai Local: एसी लोकलच्या टपावर चढला तरूण; क्षणात होत्याचं नव्हत झालं; दिवा स्थानकावरील घटना!
15
...म्हणून डोंबिवलीत काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्याला भाजपाच्या कार्यकर्त्यांनी नेसवली साडी, व्हिडीओ व्हायरल
16
नवरात्री २०२५: वातीभोवती काजळी धरली? १ सोपा उपाय; वात नीट राहील अन् दिवा अजिबात विझणार नाही
17
"निरपराध लोकांची काय चूक होती? आम्ही निषेध करणार"; हवाई हल्ल्यात ३० जणांचा मृत्यू, पाकिस्तानमधील जनता संतापली
18
GST कपातीनंतर सरकारची आणखी एक गुड न्यूज! २५ लाख महिलांना मिळणार मोफत गॅस कनेक्शन
19
ओला दुष्काळ जाहीर करणार का? देवेंद्र फडणवीस म्हणाले, 'त्याकरिता जेवढ्या पद्धतीची..."
20
"...ही चांगली गोष्ट नाही!"; राहुल गांधी यांच्या 'मत चोरी' संदर्भातील आरोपांवरून शरद पवार यांचं मोठं विधान, नेमकं काय म्हणाले?

जंगलतोड सुरूच

By admin | Updated: August 17, 2014 23:10 IST

वनविभागाकडून वनतस्करांवर आळा घालण्यासाठी शर्तीचे प्रयत्न केले जात असले तरी अजुनपर्यंत याला यश प्राप्त झाले नाही. सहा महिन्यात सुमारे ११ हजार ४४९ झाडांची तोड करण्यात आली आहे.

गडचिरोली : वनविभागाकडून वनतस्करांवर आळा घालण्यासाठी शर्तीचे प्रयत्न केले जात असले तरी अजुनपर्यंत याला यश प्राप्त झाले नाही. सहा महिन्यात सुमारे ११ हजार ४४९ झाडांची तोड करण्यात आली आहे. याच सहा महिन्यात वनविभागाच्या कर्मचाऱ्यांनी व फिरत्या पथकांनी वनतस्करांकडून सुमारे १२ लाख ४६ हजार ३५५ रूपयांचा माल जप्त केला आहे. एकुण १ हजार ७८४ वनगुन्हे घडले आहेत. यावरून जंगलतोड किती मोठ्या प्रमाणात सुरू आहे, हे लक्षात येते. महत्त्वाचे म्हणजे, सर्वात जास्त वृक्षतोड गडचिरोली वनविभागात झाली आहे. गडचिरोली जिल्ह्यात एकूण भूभागाच्या सुमारे ७८ टक्के भूभाग जंगलांने व्यापला आहे. यातील बहुतांश जंगल आरक्षित आहे. जंगलाचे संरक्षण करण्यासाठी स्वतंत्र वनवृत्त कार्यालय, ५ विभागीय कार्यालय व हजारो वनकर्मचारी कार्यरत आहेत. पाचही वनविभागात स्वतंत्र फिरते पथक स्थापन करण्यात आले आहेत. या पथकाच्या माध्यमातून संपूर्ण जंगल परिसरात रात्रंदिवस कडक पहारा ठेवला जातो. स्थानिक नागरिकांच्या सहकार्याशिवाय वनांचे संरक्षण करणे, शक्य नाही हे लक्षात आल्यानंतर राज्य शासनाने संयुक्त वनव्यवस्थापन समित्यांची स्थापना केली आहे. या वनसमित्यांच्या सदस्यांना वनविभागाकडून जंगलाच्या माध्यमातून रोजागाराचे साधन पूरविले जातात. त्याचबरोबर गावकऱ्यांकडून जंगल कटाई होऊ नये यासाठी गावकऱ्यांना गॅसचे वाटपही करण्यात येत आहे. वनविभागाने वनकर्मचाऱ्यांना पेट्रोलिंगसाठी ४३ मोटारसायकल, हजारो मोबाईल पुरविले आहेत. या सर्व उपाययोजना करूनही जंगलतोडीवर नियंत्रण मिळविण्यात वनविभागाला पूर्णपणे यश प्राप्त झालेले नाही. १ जानेवारी ते ३० जून या सहा महिन्यात सुमारे ११ हजार ४४९ झाडांची तोड करण्यात आली आहे. यामुळे शासनाचे सुमारे १ कोटी १७ लाख ५९ हजार ११९ रूपयांचे नुकसान झाले आहे. वनविभागाच्या कर्मचाऱ्यांनी १२ लाख ४६ हजार ३५५ रूपये किंमतीचा माल वनतस्कारांकडून हस्तगत केला आहे. सहा महिन्यात एकुण १ हजार ७८४ वनगुन्हे घडले आहेत. सिरोंचा तालुक्यातून सर्वात जास्त वनतस्करी होत असल्याने या विभागात सर्वाधिक वृक्षतोड होत असल्याचा आरोप होत असला तरी प्रत्यक्षात सर्वाधिक वृक्षतोड मात्र गडचिरोली वनविभागात झाली आहे. यावरून या विभागातील कर्मचाऱ्यांच्या कार्यशैलीवर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे. (नगर प्रतिनिधी)