शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तान करतोय हल्ले, भारतानं पाठवली 'अनमोल' मदत...; दिल्लीच्या निर्णयानं अफगाणिस्तानचं मन जिंकलं, मुनीरला मिरची लागणार!
2
मेक्सिकोच्या सुपरमार्केटमध्ये भीषण स्फोट, २३ जणांचा मृत्यू; नेमके काय घडले?
3
IND W vs SA W Final : वनडे 'क्वीन' स्मृतीनं रचला इतिहास! मितालीचा विक्रम मोडत ठरली 'नंबर वन'
4
शत्रूच्या हालचालींवर भारताची करडी नजर! ISRO ने लॉन्च केले नौदलाचे सर्वात शक्तिशाली सॅटेलाईट
5
'दहशतवादी हल्ल्याचा कट अमेरिकेने रचला, पाकिस्तानने घडवून आणला'; शेख हसीना यांनी मौन सोडले
6
अभिषेक शर्माचा मोठा कारनामा! हिटमॅन रोहितसह गब्बरचा विक्रम मोडत रचला नवा इतिहास
7
"राज ठाकरे हे फेक नॅरेटीव्हच्या बाबतीत राहुल गांधींशी स्पर्धा करत आहेत का?", भाजपाचा सवाल
8
'ऑपरेशन सिंदूरद्वारे विस्फोट पाकिस्तानात, अन् झोप उडाली काँग्रेसची', पीएम मोदींचा घणाघात...
9
IND vs AUS : वॉशिंग्टनची अति 'सुंदर' बॅटिंग! विक्रमी विजयासह टीम इंडियानं केली ऑस्ट्रेलियाची बरोबरी
10
सरकारी निवासस्थानी प्रेयसीसोबत झोपले होते अधिकारी, पत्नीने रंगेहात पकडले आणि घरात कोंडले, त्यानंतर... 
11
शिंदेसेना म्हणजे दिल्या भाकरीचे अन् सांगितल्या कामाचे; अंबादास दानवेंची खरमरीत टीका
12
धोक्याची घंटा! फोन, लॅपटॉपचा जास्त वापर घातक; तरुणांमध्ये वाढली 'ड्राय आईज'ची समस्या
13
'सरकारने SIT ची घोषणा केली, पण नियुक्तीच नाही'; सुषमा अंधारे फलटण पोलीस ठाण्यात जाऊन विचारणार जाब
14
लोअर बर्थ आरक्षणाचे नियम बदलले! 'या' प्रवाशांना मिळणार प्राधान्य; बसणे-झोपण्याच्या वेळेतही बदल
15
IND vs SA Womens World Cup 2025 Final :आफ्रिकेनं जिंकला टॉस, फायनल जिंकण्यासाठी टीम इंडिया सेट करणार टार्गेट
16
Crime: पोलिसांनी गाडी थांबवली, माजी आमदार म्हणाले,"कागदपत्रे नाहीत, गाडीही चोरीची!"
17
"दिल्लीमध्ये बसून गणित करणाऱ्यांनी येऊन बघावं, हवा कोणत्या दिशेची आहे?"; PM मोदींकडून बिहारच्या जनतेला मोठी आश्वासनं
18
'गाझा' नंतर आता इस्रायलची नजर या मुस्लिम देशावर, भयंकर हल्ला करण्याची धमकी
19
Rahul Gandhi : राहुल गांधींनी मासे पकडण्यासाठी तलावात मारली उडी अन्...; Video तुफान व्हायरल
20
टीनएजर्ससाठी अलर्ट! सुंदर दिसण्याची हौस भलतीच महागात; 'स्किनकेअर'ची क्रेझ धोकादायक

रेल्वेमार्ग रखडण्यास राज्य सरकारच जबाबदार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 27, 2021 05:00 IST

२०११ ला या रेल्वेमार्गाला मंजुरी मिळाली. त्यावेळी या कामाची किंमत ४०० कोटी होती. त्यानंतर २०१४ ला मी खासदार झाल्यानंतर या कामातील त्रुटी दूर करण्याचा प्रयत्न केला. तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही या कामासाठी राज्य सरकारचा वाटा उचलण्याचे  संमतीपत्र  दिले  होते. दरम्यान, वन्यजीव विभागाने वडसा-आरमोरी मार्गात वन्यजीवांचा वावर असल्याचे सांगत एनओसी दिली नाही.

लाेकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली : वडसा ते गडचिरोली या रेल्वेमार्गाचे काम कुठे अडले? याबाबत लोक मला विचारत आहेत. पण, हे काम राज्य सरकारमुळेच अडले आहे. सरकारने या कामाच्या वाढलेल्या किमतीचा ५० टक्के वाटा उचलण्याबाबतचे संमतीपत्रच दिले नाही. ते मिळाले असते तर केंद्राने  आपल्या वाट्यातील काही निधी तातडीने देऊन हे काम सुरू केले असते, असा दावा गडचिरोली-चिमूरचे खासदार तथा भाजपच्या अनुसूचित जमाती आघाडीचे राष्ट्रीय महामंत्री अशोक नेते यांनी येथे पत्रपरिषदेत बोलताना केला. महाविकास आघाडी सरकारच्या कामकाजाविषयी माहिती देण्यासाठी आयोजित पत्रपरिषेदत त्यांनी सध्या ऐरणीवर असलेल्या रेल्वेच्या मुद्द्यावर आपले स्पष्टीकरण दिले. खा. नेते म्हणाले, मी १९९९ मध्ये आमदार झाल्यानंतर सर्वप्रथम वडसा-गडचिरोली रेल्वेमार्गाबाबत अशासकीय ठराव मांडून या मुद्द्याकडे लक्ष वेधले होते. तेव्हापासून माझा या मुद्द्यावरील पाठपुरावा सुरू आहे. अटलबिहारी वाजपेयी पंतप्रधान असताना यासंदर्भातील प्रस्ताव घेऊन आमचे एक शिष्टमंडळ त्यांच्याकडे गेले होते. त्यांना या जिल्ह्यात रेल्वेची गरज का आहे हे पटवून दिले. त्यांनी रेल्वेमंत्रालयाकडे प्रस्ताव पाठवून तातडीने कार्यवाही करण्याचे निर्देश दिले होते. २०११ ला या रेल्वेमार्गाला मंजुरी मिळाली. त्यावेळी या कामाची किंमत ४०० कोटी होती. त्यानंतर २०१४ ला मी खासदार झाल्यानंतर या कामातील त्रुटी दूर करण्याचा प्रयत्न केला. तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही या कामासाठी राज्य सरकारचा वाटा उचलण्याचे  संमतीपत्र  दिले  होते. दरम्यान, वन्यजीव विभागाने वडसा-आरमोरी मार्गात वन्यजीवांचा वावर असल्याचे सांगत एनओसी दिली नाही. त्यावर तोडगा म्हणून वन्यप्राण्यांसाठी अंडरपास (भुयारी मार्ग) न ठेवता रेल्वेमार्गच उड्डाणपुलावरून करण्याचे सूचविले आहे. या कामाचा खर्च आता वाढून तो १०९६ कोटीवर पोहोचला आहे, असे   खासदार  नेते  म्हणाले. पत्रपरिषदेला अनुसूचित जमाती आघाडीचे प्रदेश सरचिटणीस प्रकाश गेडाम, रमेश भुरसे, जि.प.सभापती रंजिता कोडापे, न.प.उपाध्यक्ष अनिल कुनघाडकर, अनिल पोहणकर, वर्षा शेडमाके, जनार्धन साखरे आदी उपस्थित होते.

मुख्यमंत्री, पालकमंत्र्यांनी लक्ष द्यावेया कामासाठी राज्य शासनाने खर्चाचा ५० टक्के वाटा उचलणे आवश्यक आहे. राज्य शासनाने त्यांच्या वाट्याचे ५७८ कोटी निधी देण्यासंबंधीचे संमतीपत्र द्यावे आणि हे काम सुरू करण्यासाठी ७७ कोटी तातडीने उपलब्ध करावे, अशी मागणी खा.नेते यांनी केली. यासंदर्भात आपण मुख्यमंत्री यांना दोन वेळा विनंती केली. तसेच पालकमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडेही मागणी केली असून त्यांनी याकडे लक्ष द्यावे, अशी अपेक्षा खा.नेते यांनी व्यक्त केली.

 

टॅग्स :Ashok Neteअशोक नेतेrailwayरेल्वे