शहरं
Join us  
Trending Stories
1
Video: मोहम्मद युसूफने खालची पातळी गाठली! लाईव्ह टीव्हीवर सूर्यकुमारच्या नावाचा अभद्र उच्चार...
2
मालेगाव ब्लास्ट प्रकरण : साध्वी प्रज्ञासिंह ठाकूर यांच्यासह ७ जणांच्या निर्दोष मुक्ततेविरोधात उच्च न्यायालयात सुनावणी, आली मोठी अपडेट
3
“चुकीच्या गोष्टी सुरू, खाडाखोड करून कुणबी नोंदी; रिपोर्ट मुख्यमंत्र्यांना देणार”: छगन भुजबळ
4
RSS च्या विचारानुसार नरेंद्र मोदी ७५ वर्षानंतर वानप्रस्थाश्रमात जाण्याचा राजधर्म पाळतील का?, काँग्रेसचा सवाल
5
राज ठाकरे यांच्याशी अधिकृत युती कधी जाहीर करणार?; उद्धव ठाकरे यांनी सरळ सांगितले, म्हणाले…
6
'बीडच्या रेल्वेखाली जीवन संपविणारा मी पहिला असेल'; तरुणाचे मुख्यमंत्र्यांना पत्र, कारण काय?
7
जगातील 'असे' ५ देश, ज्यांच्याकडे सैन्य दलच नाही! मग कोण करत देशाची सुरक्षा?
8
Navratri 2025: नवरात्रीत प्या झेंडूच्या फुलांचा चहा, मिळवा निरोगी डोळे, रक्तशुद्धी आणि नितळ त्वचा
9
“देवाभाऊंच्या जाहिरातीला कोट्यवधी उधळले, तेच पैसे शेतकऱ्यांना दिले असते तर...”: उद्धव ठाकरे
10
दुसऱ्या धर्मात केलं लग्न, आता नवरा गेला सोडून; अभिनेत्री ढसाढसा रडली, म्हणाली, "प्लीज परत ये..."
11
६८ वर्षीय बॉलिवूड अभिनेत्रीची कॅन्सरशी झुंज, म्हणाली- "आता सर्जरी करणं शक्य नाही, त्यामुळे..."
12
टीम इंडियाला ज्या ज्या कंपन्यांनी स्पॉन्सर केले, त्यापैकी तीन कंपन्या बुडाल्या, बंद झाल्या...
13
'जत्रा २' येणार का? दिग्दर्शक केदार शिंदे म्हणाले, "मनापासून इच्छा आहे पण..."
14
बाजारात 'सुपर' तेजी! सेन्सेक्स-निफ्टीमध्ये मोठी उसळी; 'या' शेअर्समध्ये सर्वाधिक वाढ
15
भारतावर आणखी टॅरिफ लावण्याची धमकी अमेरिकेवरच उलटू शकते, जाणून घ्या का?
16
गायीने कहरच केला... धावता-धावता उडी मारून थेट कौलावरच चढली, Video पाहून व्हाल थक्क
17
Pitru Paksha 2025: पितृ पक्षात एखादी अंत्ययात्रा दिसणे शुभ की अशुभ? काय करावे उपाय? वाचा
18
सोन्याच्या किंमतीनं रचला इतिहा, विक्रमी पातळीवर पोहोचला भाव; पटापट चेक करा सोन्या-चांदीचा लेटेस्ट रेट!
19
झोमॅटोने रचला नवा विक्रम! टाटा-अदानी समुहातील मोठ्या कंपन्यांनाही 'या' बाबतीत टाकलं मागे

रेल्वेमार्ग रखडण्यास राज्य सरकारच जबाबदार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 27, 2021 05:00 IST

२०११ ला या रेल्वेमार्गाला मंजुरी मिळाली. त्यावेळी या कामाची किंमत ४०० कोटी होती. त्यानंतर २०१४ ला मी खासदार झाल्यानंतर या कामातील त्रुटी दूर करण्याचा प्रयत्न केला. तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही या कामासाठी राज्य सरकारचा वाटा उचलण्याचे  संमतीपत्र  दिले  होते. दरम्यान, वन्यजीव विभागाने वडसा-आरमोरी मार्गात वन्यजीवांचा वावर असल्याचे सांगत एनओसी दिली नाही.

लाेकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली : वडसा ते गडचिरोली या रेल्वेमार्गाचे काम कुठे अडले? याबाबत लोक मला विचारत आहेत. पण, हे काम राज्य सरकारमुळेच अडले आहे. सरकारने या कामाच्या वाढलेल्या किमतीचा ५० टक्के वाटा उचलण्याबाबतचे संमतीपत्रच दिले नाही. ते मिळाले असते तर केंद्राने  आपल्या वाट्यातील काही निधी तातडीने देऊन हे काम सुरू केले असते, असा दावा गडचिरोली-चिमूरचे खासदार तथा भाजपच्या अनुसूचित जमाती आघाडीचे राष्ट्रीय महामंत्री अशोक नेते यांनी येथे पत्रपरिषदेत बोलताना केला. महाविकास आघाडी सरकारच्या कामकाजाविषयी माहिती देण्यासाठी आयोजित पत्रपरिषेदत त्यांनी सध्या ऐरणीवर असलेल्या रेल्वेच्या मुद्द्यावर आपले स्पष्टीकरण दिले. खा. नेते म्हणाले, मी १९९९ मध्ये आमदार झाल्यानंतर सर्वप्रथम वडसा-गडचिरोली रेल्वेमार्गाबाबत अशासकीय ठराव मांडून या मुद्द्याकडे लक्ष वेधले होते. तेव्हापासून माझा या मुद्द्यावरील पाठपुरावा सुरू आहे. अटलबिहारी वाजपेयी पंतप्रधान असताना यासंदर्भातील प्रस्ताव घेऊन आमचे एक शिष्टमंडळ त्यांच्याकडे गेले होते. त्यांना या जिल्ह्यात रेल्वेची गरज का आहे हे पटवून दिले. त्यांनी रेल्वेमंत्रालयाकडे प्रस्ताव पाठवून तातडीने कार्यवाही करण्याचे निर्देश दिले होते. २०११ ला या रेल्वेमार्गाला मंजुरी मिळाली. त्यावेळी या कामाची किंमत ४०० कोटी होती. त्यानंतर २०१४ ला मी खासदार झाल्यानंतर या कामातील त्रुटी दूर करण्याचा प्रयत्न केला. तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही या कामासाठी राज्य सरकारचा वाटा उचलण्याचे  संमतीपत्र  दिले  होते. दरम्यान, वन्यजीव विभागाने वडसा-आरमोरी मार्गात वन्यजीवांचा वावर असल्याचे सांगत एनओसी दिली नाही. त्यावर तोडगा म्हणून वन्यप्राण्यांसाठी अंडरपास (भुयारी मार्ग) न ठेवता रेल्वेमार्गच उड्डाणपुलावरून करण्याचे सूचविले आहे. या कामाचा खर्च आता वाढून तो १०९६ कोटीवर पोहोचला आहे, असे   खासदार  नेते  म्हणाले. पत्रपरिषदेला अनुसूचित जमाती आघाडीचे प्रदेश सरचिटणीस प्रकाश गेडाम, रमेश भुरसे, जि.प.सभापती रंजिता कोडापे, न.प.उपाध्यक्ष अनिल कुनघाडकर, अनिल पोहणकर, वर्षा शेडमाके, जनार्धन साखरे आदी उपस्थित होते.

मुख्यमंत्री, पालकमंत्र्यांनी लक्ष द्यावेया कामासाठी राज्य शासनाने खर्चाचा ५० टक्के वाटा उचलणे आवश्यक आहे. राज्य शासनाने त्यांच्या वाट्याचे ५७८ कोटी निधी देण्यासंबंधीचे संमतीपत्र द्यावे आणि हे काम सुरू करण्यासाठी ७७ कोटी तातडीने उपलब्ध करावे, अशी मागणी खा.नेते यांनी केली. यासंदर्भात आपण मुख्यमंत्री यांना दोन वेळा विनंती केली. तसेच पालकमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडेही मागणी केली असून त्यांनी याकडे लक्ष द्यावे, अशी अपेक्षा खा.नेते यांनी व्यक्त केली.

 

टॅग्स :Ashok Neteअशोक नेतेrailwayरेल्वे