शहरं
Join us  
Trending Stories
1
Video: "अजित पवार, सगळ्यांचा नाद करायचा, पण..."; भाजपा नेते राजन पाटलांच्या मुलाचं थेट चॅलेंज
2
भारताला 'हिंदू राष्ट्र' घोषित करण्याची गरज नाही, हिंदू म्हणजे अशी व्यक्ती जी...- मोहन भागवत
3
"मुलाच्या मनात माझा आदर वाढेल"; डिनर पार्टीत ट्रम्प यांनी रोनाल्डोसोबत शेअर केला घरातला खास किस्सा
4
Mumbai Airport: मुंबई विमानतळ २० नोव्हेंबर रोजी ६ तास बंद राहणार, कारण काय?
5
अनगरात 'सही'चा खेळ! अर्ज बाद होताच उज्ज्वला थिटेंचा आरोप, 'मुलगा सोबत असूनही सही राहिलीच कशी?
6
FD-RD विसरा! सुरक्षित गुंतवणूक हवी असल्यास FMP ठरेल स्मार्ट चॅाईस, लो रिस्क हाय रिटर्नचा स्मार्ट कॅाम्बो
7
भाजपाची घराणेशाही! एकाच कुटुंबातील ६ जणांना तिकीट; पत्नी, भाऊ, वहिनी, मेहुणा... सगळेच रिंगणात
8
Mahayuti: भाजप- शिंदे गटात माजी नगरसेवक फोडण्याची स्पर्धा, निवडणुकीपूर्वी महायुतीत अंतर्गत वाद शिगेला!
9
शेअर बाजारात आजही घसरण, २५,९०० च्या खाली निफ्टी; IT Stocks मध्ये मोठी खरेदी
10
Video: "लोकशाहीचा गळा घोटण्याचं काम..."; अजित पवारांच्या राष्ट्रवादीचा घणाघात, भाजपावर निशाणा
11
Delhi Blast: युनूस सरकारचा दावा खोटा; अटकेत असलेला इख्तियार बांगलादेशचा पर्दाफाश करणार !
12
आजचे राशीभविष्य - १९ नोव्हेंबर २०२५, जुनी येणी, प्रवास, अर्थ प्राप्ती इत्यादीसाठी आजचा दिवस अनुकूल
13
Politics: "मला आणि माझा मुलाला मारण्याचा कट" भाजपमध्ये प्रवेश केलेल्या नेत्याचा शिंदेसेनेवर गंभीर आरोप!
14
Supreme Court: स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांवर टांगती तलवार, आरक्षणाच्या मर्यादेवर आज सुनावणी!
15
Mumbai Airport: विमानतळ परिसरातील मार्ग आजपासून २ दिवस बंद; 'या' पर्यायी मार्गाचा करा वापर!
16
CNG Supply: मुंबईकरांना मोठा दिलासा! ३ दिवसांनंतर सीएनजी पुरवठा पूर्ववत, प्रवाशांनी सोडला सुटकेचा निःश्वास
17
Farmers Relief: मुसळधार पाऊस किंवा वन्य प्राण्यांनी पीक तुडवले, नुकसान भरपाई मिळणार,  पण एक अट!
18
Mahayuti: एकमेकांचे माजी नगरसेवक, पदाधिकारी पळवण्यावरून महायुतीत घमासान! 
19
Government Decision: 'नोटरी'वर झालेले जमीन व्यवहारही आता कायदेशीर; ३ कोटी नागरिकांना मोठा दिलासा
20
एकाचवेळा तीन बिबट्यांच्या घराला घिरट्या; शिकारीच्या शोधात आलेले सीसीटीव्ही कॅमेरात कैद 
Daily Top 2Weekly Top 5

वडसा-गडचिरोली रेल्वे मार्गाच्या कामाचा मुहूर्त काढा

By admin | Updated: February 25, 2016 01:15 IST

बहुप्रतीक्षित वडसा-गडचिरोली या रेल्वे मार्गाबाबत सातत्याने प्रत्येक रेल्वे अर्थसंकल्पात चर्चा केली जाते. मात्र प्रत्यक्ष कामाला सुरूवात झालेली नाही.

रेल्वे अर्थसंकल्पाकडून अपेक्षा : वडसा रेल्वेस्थानकावर हवी तिसरी लाईनगडचिरोली : बहुप्रतीक्षित वडसा-गडचिरोली या रेल्वे मार्गाबाबत सातत्याने प्रत्येक रेल्वे अर्थसंकल्पात चर्चा केली जाते. मात्र प्रत्यक्ष कामाला सुरूवात झालेली नाही. त्यामुळे यावर्षीच्या रेल्वे अर्थसंकल्पात या मार्गासाठी भरीव आर्थिक तरतूद होऊन प्रत्यक्ष कामाला सुरूवात व्हावी, अशी अपेक्षा गडचिरोलीवासीयांनी व्यक्त केली आहे.वडसा-गडचिरोली हा ५० किमी लांबीचा रेल्वे मार्ग असून या रेल्वे मार्गाची किमत ४०३ कोटी रूपयांवर गेली आहे. आतापर्यंत २८४ कोटी रूपये रक्कम प्राप्त झाली असून १५ किमी जागेचे अधिग्रहण रेल्वे मार्गासाठी करावे लागणार आहे. याबाबतचा प्रस्ताव राज्य सरकारकडे पाठविण्यात आला आहे. गेल्या वर्षी डिसेंबर महिन्यात राज्य सरकारने आपल्या वाट्याची रक्कम २३४.६८ कोटी रूपये देण्याला मंजुरी दिली. केंद्रीय रेल्वे अर्थसंकल्पात निधीची तरतूद होऊन या रेल्वे मार्गाचे काम यावर्षात सुरू व्हावे, अशी अपेक्षा जिल्ह्यातील जनतेला आहे. देसाईगंज रेल्वे स्थानकाच्या विस्तारीकरणाचे काही काम सध्या सुरू आहे. मागील दोन वर्षांपासून देसाईगंज येथील रेल्वेच्या भूमिगत पुलाचे काम रखडलेल्या स्थितीतच आहे, ते मार्चपर्यंत पूर्ण होईल, असे सांगण्यात आले होते. मात्र तशी स्थिती प्रत्यक्षात नाही. वडसा हे गोंदिया ते चांदाफोर्ट या रेल्वे मार्गावरचे महत्त्वाचे स्टेशन आहे. येथे दोन फलाट व दोन रेल्वे लाईन आहे. तिसरी लाईन स्थानक परिसरात टाकण्यात यावी, अशी मागणी अनेक वर्षापासूनची आहे. तसेच वडसा रेल्वे स्थानकावर रेल्वे पोलिसांचे ठाणे नाही. साध्या चोरीची तक्रार देण्यासाठी नागभिड रेल्वेस्थानक गाठावे लागते. त्यामुळे येथे रेल्वे पोलिसांची चौकी सुरू करावी, अशीही मागणी आहे. देसाईगंज व गडचिरोली येथील रेल्वे आरक्षण केंद्राच्या वेळा वाढविण्यात आल्याचे सांगण्यात आले. मात्र त्याची अंमलबजावणी सुरू झालेली नाही. गडचिरोलीच्या केंद्राची वेळ वाढवावी, अशी मागणी आहे. याशिवाय अहेरी उपविभागातील नागरिकांच्या सोयीसाठी आलापल्ली येथे एक रेल्वे आरक्षीत तिकीट केंद्र सुरू करावे, अशीही मागणी आहे. या भागातील प्रवाशांना बल्लारशहा येथे तिकीटसाठी जावे लागते. (जिल्हा प्रतिनिधी)आदिवासी बहूल अतिदुर्गम व नक्षलग्रस्त जिल्हा भौगोलिक दृष्ट्या लांबचलांब असल्याने आलापल्ली, सिरोंचा, मुलचेरा या ठिकाणी नवीन तिकीट आरक्षण केंद्र सुरू करावे, पूर्व विदर्भात रेल्वेस्थानक मध्यवर्ती असल्याने साऊथ ईस्ट या मार्गाने धावणाऱ्या गाड्या गोंदिया-वडसा-चंद्रपूर या मार्गाने वळत्या कराव्या, वडसा रेल्वेस्थानकावरील भूमीगत पुलाचे बांधकाम सुरू असले तरी उड्डाण पुलाच्या कामासाठी निधीची तरतूद करावी, वडसा-गडचिरोली या नवीन मार्गाच्या कामाला तत्काळ सुरूवात करावी, वडसा-नागभिड-नागपूर या रेल्वेमार्गाला ब्रॉडगेजमध्ये रूपांतरीत करून त्याचे काम सुरू करावे, वडसा रेल्वेस्थानकावर लांब पल्ल्याच्या गाड्यांना थांबा द्यावा, महिलांसाठी स्वतंत्र प्रतीक्षालय, आरक्षीत प्रवाशांसाठी प्रतीक्षालय, स्वतंत्र रेल्वे पोलीस स्टेशन, व्हीआयपी रूम आदी अपेक्षा या रेल्वे अर्थसंकल्पातून पूर्ण व्हाव्या.- डॉ. विष्णू आर. वैरागडे, सदस्य, रेल्वे सल्लागार समिती, देसाईगंज