शहरं
Join us  
Trending Stories
1
'सर्व भारतीयांचा DNA एकच; हिंदू राष्ट्र म्हणजे...', RSS प्रमुख मोहन भागवतांचे मोठे विधान
2
डोनाल्ड ट्रम्प यांचा ४ वेळा फोन, पण PM मोदींचा बोलण्यास नकार; जर्मन वृत्तपत्राचा दावा
3
डीएचएलसह अनेक कंपन्यांनी अमेरिकेकडे पाठवणारे पार्सल थांबवले! डोनाल्ड ट्रम्प यांच्यामुळे उडाला गोंधळ
4
फोनमधील 'या' सेटिंग्ज बदलाल तर वाचेल बराच इंटरनेट डेटा! अनेकांना माहीत नाहीत सोप्या टिप्स
5
प्रेरणादायी अध्यात्मिक वक्त्या जया किशोरी यांच्या हस्ते होणार श्रीमंत भाऊसाहेब रंगारी बाप्पाची प्राणप्रतिष्ठा!
6
सिंहगडावर 'त्या' ५ दिवसांत काय काय घडलं? बेपत्ता झालेल्या गौतम गायकवाडने सांगितला थरार
7
काश्मीर खोऱ्यातील तीन मंडळांना गणेश मूर्ती प्रदान; पुनीत बालन यांच्यासह मानाच्या गणेश मंडळाचा स्तुत्य उपक्रम!
8
वैष्णोदेवी यात्रा मार्गावर मोठा अपघात; भूस्खलनामुळे ५ भाविकांचा मृत्यू, १४ जखमी
9
Vidarbha Weather Alert: पावसाचा विदर्भाकडे मोर्चा; अनेक ठिकाणी मुसळधार कोसळणार; कोणत्या जिल्ह्यांना अलर्ट?
10
आणखी एक 'निक्की', हुंड्याने घेतला संजूचा जीव; मुलीसह स्वतःला पेटवलं, चिठ्ठीत म्हणाली...
11
किचनमधील 'या' वस्तूंमुळे दुप्पट वाढतो कॅन्सरचा धोका; डॉक्टर म्हणाले, आताच उचला अन् बाहेर फेका
12
७ मुलांची आई २२ वर्षांच्या भाच्याच्या प्रेमात पडली, पळून जायचा प्लॅन केला अन् पतीचे तीन लाखही केले लांपास!
13
बदल्याची आग! लव्ह मॅरेजनंतर पहिल्यांदा गावी आलं कपल; कुटुंब झालं हैवान, केली जावयाची हत्या
14
"मुंबईत येणारच, न्यायदेवता नक्कीच न्याय देईल", हायकोर्टाच्या निर्णयानंतरही मनोज जरांगे ठाम
15
पाकिस्तानला आसिम मुनीर यांचं किती कौतुक! 'ऑपरेशन सिंदूर'मध्ये आपटल्यानंतरही सरकारने दिलं मोठ बक्षीस
16
दक्षिण कोरियाचे राष्ट्राध्यक्ष ली व्हाईट हाऊसमध्ये, ट्रम्प यांची घेतली भेट! चर्चेत झाला किम जोंग उनचा उल्लेख
17
झाली का गणपती पूजेची तयारी? काय राहिलं, काय घेतलं? झटपट तपासून घ्या पूजा साहित्य 
18
Nikki Murder Case : "न्यायाच्या बदल्यात न्याय, रक्ताच्या बदल्यात रक्त, आम्ही मुलगी गमावली"; निक्कीच्या आईचा टाहो
19
संधी मिळताच मोलकरणीने मारला डल्ला, घरातून ३५ लाखांचे दागिने, १० लाखांची रक्कम लंपास
20
Yavatmal: 'ती' गोष्ट लपवण्यासाठी रात्रीस 'खेळ'?; ग्रामसभेच्या आदल्या दिवशीच फोडले ग्रामपंचायत कार्यालय अन्...

इल्लूर येथील पेपर मिल सुरू करा

By admin | Updated: October 17, 2016 02:11 IST

इल्लूर येथील पेपर मिल कारखाना मागील चार महिन्यांपासून बंद आहे. त्यामुळे कामगारांवर उपासमारीची पाळी आली आहे.

निवेदन : चार महिन्यांपासून कारखाना बंदआष्टी : इल्लूर येथील पेपर मिल कारखाना मागील चार महिन्यांपासून बंद आहे. त्यामुळे कामगारांवर उपासमारीची पाळी आली आहे. इल्लूर पेपर मिलमधील समस्या सोडवून तत्काळ पेपर मिल सुरू करावी, अशा मागणीचे निवेदन कामगारांनी भारतीय मजदूर संघाचे केंद्रीय महामंत्री विरजेश उपाध्याय यांना दिले आहे.निवेदनात म्हटले आहे की, पेपरमिल बंद राहण्यासाठी व्यवस्थापन जबाबदार आहे. मागील अनेक वर्षांपासून पेपर मिल व्यवस्थापनाच्या चुकीच्या धोरणामुळे व मालकाचे व्यवस्थापनावर नियंत्रण नसल्यामुळे येथील व्यवस्थापन आपल्या मनमर्जीने कारभार करीत आहे. त्याचे परिणाम येथील कामगारांना सोसावे लागत आहे. बहुतांश कामगार या पेपर मिलच्या भरवशावरच आपले जीवन जगत आहेत. मात्र मागील चार महिन्यांपासून पेपर मिल बंद असल्याने कामगारांचे वेतनही थकले आहे. परिणामी कामगारांना आर्थिक संकटांचा सामना करावा लागत आहे. केंद्र सरकार, राज्य सरकार व पेपर मिलच्या दिल्ली येथील मुख्य कार्यालयातील अधिकाऱ्यांशी चर्चा करून इल्लूर येथील पेपर मिल सुरू करण्यासाठी प्रयत्न करू, असे आश्वासन विरजेश उपाध्याय यांनी दिले.निवेदन देतेवेळी भारतीय मजदूर संघाचे शैलेश गुजे, मनोहर साळवे, राजनाथ कुशवाह, विनायक जंगमवार, अनंत प्रधान, भास्कर राऊत, दयाराम कामडी, गजानन किरणापुरे, राजेंद्र पातर, मोहन जोरगलवार, गिरीधर बामनकर उपस्थित होते. (प्रतिनिधी)