शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'
2
मनसेकडून प्रतिसभागृह, आदित्य ठाकरेंना निमंत्रण; भाजपा नाराज, सहभागी होण्यास नकार
3
दिल्ली-मुंबई महामार्गावर थरकाप उडवणारा अपघात; स्वच्छता कर्मचाऱ्यांना चिरडले, ६ ठार, ५ गंभीर जखमी
4
“...तर भेटी घेण्यात काही गैर नाही”; शिंदेसेनेत प्रवेशाच्या चर्चा, चंद्रहार पाटील थेट बोलले
5
आयपीएलचा अर्धा हंगाम संपला, प्लेऑफसह ऑरेंज आणि पर्पल कॅपची शर्यतही झाली रंगतादार, कोण आघाडीवर? वाचा  
6
Gensol विरोधात इरेडानं दाखल केली तक्रार; दोन्ही कंपन्यांच्या शेअर्समध्ये भूकंप, तुमच्याकडे आहे का?
7
महाराष्ट्रातले पोलीस अकार्यक्षम; शिंदेसेनेच्या आमदाराचा महायुती सरकारलाच घरचा आहेर
8
एकीकडे युद्धाचे सावट, त्यात पाकिस्तानमधील लाहोर विमानतळावर भीषण आग, उड्डाणं रद्द, प्रवासी अडकले
9
ती माझी मैत्रीण! दहशतवादी हल्ल्यात शहीद झालेल्या विनय नरवाल यांच्या पत्नीबाबत एल्विश यादवचा खुलासा, म्हणाला- "तो फोटो पाहिल्यानंतर..."
10
अमेरिकेच्या बाजारात विकणार केवळ मेड इन इंडिया आयफोन; चीनला जोरदार झटका
11
“चिमुकल्यांना हृदयरोग, १ कोटी खर्च, भारतात उपचार घेऊ द्या”; पाकमधील पालकांचे सरकारला साकडे
12
कधीही, कुठेही, मोहिमेसाठी तयार! भारतीय नौदलाचा पाकिस्तानला संदेश
13
"जर सिंधु नदीचं पाणी रोखलं तर...": पाकिस्तानी PM शहबाज शरीफ यांची भारताला पोकळ धमकी
14
Vastu Shastra: वास्तुशास्त्रानुसार तव्यावरच्या पहिल्या पोळीवर हक्क कुणाचा? वाचा आणि कृती करा!
15
जळगाव: घरात घुसला म्हणून वाचला! वाढदिवसाचं सेलिब्रेशन करतानाच आले अन् झाडल्या गोळ्या
16
भारत-पाकिस्तानमध्ये तणाव, डोनाल्ड ट्रम्प यांनी स्वतःला केलं दूर; म्हणाले, 'त्यांचं ते मिटवून घेतील'
17
'सिंधूतून आमचे पाणी वाहणार, नाहीतर भारताचे रक्त'; पाणी रोखताच पाकचे माजी मंत्री बिलावल भुत्तोंचा थयथयाट
18
पहलगाम हल्ल्यात हिंदूच टार्गेट! आधी पॅन्ट काढल्या अन् 'खतना' न केलेल्यांचीच हत्या; तपास पथकाकडून मोठा खुलासा
19
दोन मित्र आणि पहारेकऱ्याची हत्या, मग कापलं गुप्तांग, आरोपी अटकेत, समोर आलं धक्कादायक कारण
20
शनी गोचर २०२५: 'या' ५ राशींच्या आयुष्यात वादळाची शक्यता, आर्थिक बाजू सांभाळा!

प्रवाशांच्या वर्दळीने फुलू लागली एसटी बसस्थानके

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 6, 2020 05:00 IST

केंद्र शासनाने २२ मार्च रोजी जनता संचारबंदीचे आवाहन केले होते. त्यानंतर लगेच लॉकडाऊन जाहीर करण्यात आले. तेव्हापासून जवळपास दोन महिने एसटीची चाके पूर्णपणे थांबली आहेत. त्यांनतर मे महिन्यापासून काही प्रमाणात जिल्ह्यातच बसफेऱ्या सोडण्यास परवानगी देण्यात आली होती. मात्र जिल्हांतर्गत प्रवास हा जास्तीत जास्त १०० किमी पर्यंतचा राहत असल्याने नागरिक हा प्रवास स्वत:च्या दुचाकी किंवा चारचाकीने करीत होते.

ठळक मुद्देबसफेऱ्यांमध्ये वाढ। प्रवासाची बंधने हटविल्याने नागरिकांचा कल

लोकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली : आंतरजिल्हा प्रवासासाठी असलेली ई-पासची सक्ती रद्द केल्यानंतर एसटीची चाके पूर्वपदावर येण्यास सुरूवात झाली आहेत. आंतरजिल्हा प्रवास करणाऱ्या प्रवाशांची संख्या वाढत चालली असल्याने फेऱ्यांची संख्याही वाढविली जात आहे.केंद्र शासनाने २२ मार्च रोजी जनता संचारबंदीचे आवाहन केले होते. त्यानंतर लगेच लॉकडाऊन जाहीर करण्यात आले. तेव्हापासून जवळपास दोन महिने एसटीची चाके पूर्णपणे थांबली आहेत. त्यांनतर मे महिन्यापासून काही प्रमाणात जिल्ह्यातच बसफेऱ्या सोडण्यास परवानगी देण्यात आली होती. मात्र जिल्हांतर्गत प्रवास हा जास्तीत जास्त १०० किमी पर्यंतचा राहत असल्याने नागरिक हा प्रवास स्वत:च्या दुचाकी किंवा चारचाकीने करीत होते. त्यामुळे बसला मर्यादीतच प्रवाशी मिळत होते. परिणामी बसफेऱ्याही मर्यादीत प्रमाणातच सोडल्या जात होत्या. २ सप्टेंबरपासून आंतरजिल्हा प्रवासाची बंधने पूर्णपणे काढण्यात आली आहेत. तेव्हापासून एसटीची गरज नागरिकांना निर्माण झाली आहे. लॉकडाउनच्या कालावधीत अनेकांची दुसऱ्या जिल्ह्यातील कामे थांबली होती. प्रवासाची बंधने हटविल्यानंतर ही कामे करण्यास वेग आला आहे. तसेच नातेवाईकांना भेटण्यासाठीही नागरिक दुसऱ्या जिल्ह्यात प्रवास करीत असल्याने प्रवाशांची संख्या वाढत आहे. प्रवाशांची संख्या लक्षात घेऊन अधिक बसफेऱ्या सोडल्या जात आहेत. गडचिरोली आगारातून शनिवारी नागपूरसाठी १०, चंद्रपूरसाठी १४, यवतमाळ १, चामोर्शी-मुलसाठी काही फेऱ्या सोडण्यात आल्या आहेत. सध्या जवळपास १०० फेऱ्या सोडल्या जात आहेत. सोमवारपासून नवीन आठवड्याला सुरूवात होणार असल्याने प्रवाशांची संख्या वाढण्याची शक्यता असल्याने पुन्हा फेऱ्या वाढविल्या जाणार आहेत.१५ टक्के उत्पन्न व फेऱ्याआंतरजिल्हा प्रवासावरील बंधने हटविल्यानंतर प्रवाशांची संख्या वाढत चालली आहे. लॉकडाऊनपूर्वी गडचिरोली आगारातून दरदिवशी ६२० बसफेऱ्या सोडल्या जात होत्या. त्यातुन जवळपास १० लाख रूपयांचे उत्पन्न मिळत होते. आता जवळपास १०० फेऱ्या सोडण्यात येत आहेत. त्यातून १ लाख रूपयांचे उत्पन्न मिळत आहे. सोमवारपासून नागपूरसाठी पुन्हा फेऱ्या वाढविण्यात येणार आहेत. कोरोनाच्या रूग्णांची संख्या वाढतच चालली आहे. त्यामुळे बसमध्ये अर्धेच प्रवाशी बसविण्याचे निर्देश शासनाने दिले आहेत. त्यामुळे फेºया जरी वाढल्या तरी उत्पन्न वाढीवर मर्यादा येणार आहेत. सध्या ४० ते ४५ एवढे भारमान मिळत आहे.

टॅग्स :state transportएसटीpassengerप्रवासी