शहरं
Join us  
Trending Stories
1
विमान अपघातात सापडलेली भगवदगीता, कृष्ण मूर्ती कोणाची? एअर इंडियाची क्रू मेंबर असलेल्या पनवेलच्या लेकीची...
2
इराणच्या आकाशात इस्रायलची विमाने, गॅस रिफायनरीवर हल्ला; डिफेंस सिस्टीम उध्वस्त
3
आयुष्यात कधीच विमानात बसणार नाही; व्हिडीओ रेकॉर्ड करणाऱ्या आर्यनने घेतली धास्ती, पोलीस चौकशीनंतर...
4
अमेरिकेत मोठी घटना! दोन खासदारांवर घरात घुसून गोळीबार; महिला खासदार, पतीचा मृत्यू
5
नीट-यूजीचा निकाल जाहीर! राजस्थानचा महेश कुमार पहिला, तर महाराष्ट्राचा कृष्णांग जोशी तिसरा
6
एअर इंडियाकडून मदत जाहीर, मृतांच्या नातेवाईकांना २५ लाखांची मदत देणार; टाटा सन्सचेही १ कोटी मिळणार...
7
दुबईतील ६७ मजली गगनचुंबी इमारतीला भीषण आग; ३,८२० रहिवाशांना बाहेर काढले
8
पहिल्या डावात झिरो, तोच फायनलचा हिरो! मार्करम हा शतकातील असा पहिला 'शतकवीर' ज्यानं...
9
उल्हासनगरला पावसाने झोडपले, नाल्यावरील पूल कोसळला 
10
टेम्बा बावुमाच्या कॅप्टन्सीला तोड नाही; आतापर्यंत एक टेस्ट नाही हारला! ऑस्ट्रेलिया तोंड पाडून घरला
11
Ahmedabad Plane Crash : "माणुसकी दाखवा, माझी मुलगी रुग्णालयात..."; विमान अपघातानंतर डॉक्टरची हात जोडून विनंती
12
राज-उद्धव ठाकरे एकत्र आले तर महापालिका निवडणुकीत ५४ टक्के मते मिळतील; सर्व्हे आल्याचा शिवसेना नेत्याचा दावा
13
बलात्कार करणाऱ्याला महिलेने घडवली जन्माची अद्दल; विळ्याने नराधमाचे गुप्तांगच कापले
14
लंच ब्रेक झाला म्हणून २० वर्षीय तरुणी घरी गेली; बेडरुममध्ये तिचा बॉस... 
15
SA Won WTC Final 2025 : 'चोकर्स'चा शिक्का पुसला, द. आफ्रिकेने इतिहास रचला; ऑस्ट्रेलियाला हरवून २७ वर्षांनी जिंकली ICC ट्रॉफी! मार्करमचे धमाकेदार शतक
16
Israel Rran War: 'हल्ले थांबवा नाहीतर तेहरानला आग लावू'; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इराणच्या खोमेनींना इशारा
17
आत्महत्येबाबत इन्स्टावर तरूणाने टाकली पोस्ट; १२ मिनिटांत पोलिसांनी फासावरून खाली उतरवला
18
WTC 2025 Final Prize Money : चांदीची गदा अन् IPL चॅम्पियन्स RCB पेक्षा अधिक रक्कम; दक्षिण आफ्रिकेसह कोणत्या संघाला किती बक्षीस मिळालं?
19
रोज विमाने उडतात, पण या विमानातून आवाजच येत नव्हता...; व्हिडीओ काढणाऱ्या तरुणाच्या काकीला वाटले...
20
इराण-इस्रायल युद्ध लांबलं तर 'या' महत्वाच्या वस्तू महागणार! जाणून घ्या, या देशांकडून काय-काय आयात करतो भारत?

प्रवाशांच्या वर्दळीने फुलू लागली एसटी बसस्थानके

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 6, 2020 05:00 IST

केंद्र शासनाने २२ मार्च रोजी जनता संचारबंदीचे आवाहन केले होते. त्यानंतर लगेच लॉकडाऊन जाहीर करण्यात आले. तेव्हापासून जवळपास दोन महिने एसटीची चाके पूर्णपणे थांबली आहेत. त्यांनतर मे महिन्यापासून काही प्रमाणात जिल्ह्यातच बसफेऱ्या सोडण्यास परवानगी देण्यात आली होती. मात्र जिल्हांतर्गत प्रवास हा जास्तीत जास्त १०० किमी पर्यंतचा राहत असल्याने नागरिक हा प्रवास स्वत:च्या दुचाकी किंवा चारचाकीने करीत होते.

ठळक मुद्देबसफेऱ्यांमध्ये वाढ। प्रवासाची बंधने हटविल्याने नागरिकांचा कल

लोकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली : आंतरजिल्हा प्रवासासाठी असलेली ई-पासची सक्ती रद्द केल्यानंतर एसटीची चाके पूर्वपदावर येण्यास सुरूवात झाली आहेत. आंतरजिल्हा प्रवास करणाऱ्या प्रवाशांची संख्या वाढत चालली असल्याने फेऱ्यांची संख्याही वाढविली जात आहे.केंद्र शासनाने २२ मार्च रोजी जनता संचारबंदीचे आवाहन केले होते. त्यानंतर लगेच लॉकडाऊन जाहीर करण्यात आले. तेव्हापासून जवळपास दोन महिने एसटीची चाके पूर्णपणे थांबली आहेत. त्यांनतर मे महिन्यापासून काही प्रमाणात जिल्ह्यातच बसफेऱ्या सोडण्यास परवानगी देण्यात आली होती. मात्र जिल्हांतर्गत प्रवास हा जास्तीत जास्त १०० किमी पर्यंतचा राहत असल्याने नागरिक हा प्रवास स्वत:च्या दुचाकी किंवा चारचाकीने करीत होते. त्यामुळे बसला मर्यादीतच प्रवाशी मिळत होते. परिणामी बसफेऱ्याही मर्यादीत प्रमाणातच सोडल्या जात होत्या. २ सप्टेंबरपासून आंतरजिल्हा प्रवासाची बंधने पूर्णपणे काढण्यात आली आहेत. तेव्हापासून एसटीची गरज नागरिकांना निर्माण झाली आहे. लॉकडाउनच्या कालावधीत अनेकांची दुसऱ्या जिल्ह्यातील कामे थांबली होती. प्रवासाची बंधने हटविल्यानंतर ही कामे करण्यास वेग आला आहे. तसेच नातेवाईकांना भेटण्यासाठीही नागरिक दुसऱ्या जिल्ह्यात प्रवास करीत असल्याने प्रवाशांची संख्या वाढत आहे. प्रवाशांची संख्या लक्षात घेऊन अधिक बसफेऱ्या सोडल्या जात आहेत. गडचिरोली आगारातून शनिवारी नागपूरसाठी १०, चंद्रपूरसाठी १४, यवतमाळ १, चामोर्शी-मुलसाठी काही फेऱ्या सोडण्यात आल्या आहेत. सध्या जवळपास १०० फेऱ्या सोडल्या जात आहेत. सोमवारपासून नवीन आठवड्याला सुरूवात होणार असल्याने प्रवाशांची संख्या वाढण्याची शक्यता असल्याने पुन्हा फेऱ्या वाढविल्या जाणार आहेत.१५ टक्के उत्पन्न व फेऱ्याआंतरजिल्हा प्रवासावरील बंधने हटविल्यानंतर प्रवाशांची संख्या वाढत चालली आहे. लॉकडाऊनपूर्वी गडचिरोली आगारातून दरदिवशी ६२० बसफेऱ्या सोडल्या जात होत्या. त्यातुन जवळपास १० लाख रूपयांचे उत्पन्न मिळत होते. आता जवळपास १०० फेऱ्या सोडण्यात येत आहेत. त्यातून १ लाख रूपयांचे उत्पन्न मिळत आहे. सोमवारपासून नागपूरसाठी पुन्हा फेऱ्या वाढविण्यात येणार आहेत. कोरोनाच्या रूग्णांची संख्या वाढतच चालली आहे. त्यामुळे बसमध्ये अर्धेच प्रवाशी बसविण्याचे निर्देश शासनाने दिले आहेत. त्यामुळे फेºया जरी वाढल्या तरी उत्पन्न वाढीवर मर्यादा येणार आहेत. सध्या ४० ते ४५ एवढे भारमान मिळत आहे.

टॅग्स :state transportएसटीpassengerप्रवासी