शहरं
Join us  
Trending Stories
1
सोनम वांगचुकच्या अटकेबाबत सर्वोच्च न्यायालयाने केंद्राला नोटीस बजावली; पत्नी गीतांजली यांनी केल्या दोन मागण्या
2
संरक्षण करारानंतर सौदी अरेबियाची पाकिस्तानला आणखी एक मोठी भेट; ३० लाख लोकांना रोजगार मिळणार
3
Manas Polymers Listing: १५३ रुपयांवर लिस्ट झाला हा स्वस्त IPO; पहिल्याच दिवशी गुंतवणूकदारांना ९०%चा फायदा, झाले मालामाल
4
दहा वर्षांपासून मुलांना Coldrif सिरप देतोय; 'त्या' मृत मुलांवर उपचार करणाऱ्या डॉक्टरची प्रतिक्रिया
5
Coldrif Cough Syrup: मुलांच्या जीवावर उठलं कफ सिरप; कंपनीची १६ वर्षांपासून ना झाली वार्षिक बैठक, ना बॅलन्स शीटही झाली अपडेट
6
४ दिवसांपूर्वी शिंदेसेनेत प्रवेश अन् आज भाजपा मंत्री नितेश राणेंवर लावला गंभीर आरोप, म्हणाले...
7
गुंतवणूकदारांसाठी मोठी संधी! टाटा-रिलायन्ससारख्या २४० दिग्गज कंपन्यांत पैसे लावा; कोणी आणली ऑफर?
8
रेखा झुनझुनवालांनी 'या' सरकारी बँकेचे आणखी शेअर खरेदी केले, LIC चाही मोठा डाव; करतोय मालामाल!
9
गाझा युद्धविराम योजना: ट्रम्प-नेतन्याहू यांच्यात फोनवर तुफान वाद! अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांवर संतापले इस्रायलचे पंतप्रधान
10
Cough Syrup : "कफ सिरपने मुलाचा जीव घेतला, उपचारासाठी जमीन गहाण ठेवून ४ लाखांचं कर्ज, पण... "
11
'या' अभिनेत्रीला आदर्श मानते 'सैयारा' गर्ल अनीत पड्डा; म्हणाली, "रिलीजनंतर १० मिनिटं तिच्याशी..."
12
भारतीय नौदलाची ताकद वाढणार! आज अँड्रोथ युद्धनौका मिळणार, जाणून काय आहे खास?
13
"मी माझ्या भावाचा मृतदेह स्वतःच्या हाताने बाहेर काढला", प्रत्यक्षदर्शीने सांगितली आपबीती
14
३ महिने भरपूर पैसा, ४ राशींचे आयुष्यच बदलेल; कल्पनेपलीकडे यश-लाभ, बाबा वेंगांचे मोठे भाकित!
15
हरमनप्रीत कौरचे तेवर! नजरेने धाक दाखवणारी पाकिस्तानी खेळाडू खाली मान घालून पळाली (VIDEO)
16
Mumbai Accident: दादरमध्ये अपघात, 'बेस्ट बस'ला टेम्पो ट्रॅव्हलरची धडक; एक ठार, चार जखमी
17
'या' माशांना वाचवण्यासाठी बांगलादेशनं उतरवलं सैन्य दल; बंगालच्या खाडीत पाठवल्या १७ युद्धनौका
18
Indian shot dead: "मित्रा, तू बरा आहेस ना?" मदतीसाठी आलेल्या भारतीय व्यक्तीचीच गोळी घालून हत्या
19
Tata Capital IPO: प्रतीक्षा संपली! तुमच्या खिशात आहेत का १४,९९६ रुपये? तर बनू शकता टाटांच्या कंपनीचे प्रॉफिट पार्टनर
20
VIRAL : 'सर डोकं दुखतंय...', कर्मचारी आजारी तरीही मॅनेजर सुट्टी देईना! संतापलेल्या तरुणानं काय केलं बघाच  

प्रवाशांच्या वर्दळीने फुलू लागली एसटी बसस्थानके

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 6, 2020 05:00 IST

केंद्र शासनाने २२ मार्च रोजी जनता संचारबंदीचे आवाहन केले होते. त्यानंतर लगेच लॉकडाऊन जाहीर करण्यात आले. तेव्हापासून जवळपास दोन महिने एसटीची चाके पूर्णपणे थांबली आहेत. त्यांनतर मे महिन्यापासून काही प्रमाणात जिल्ह्यातच बसफेऱ्या सोडण्यास परवानगी देण्यात आली होती. मात्र जिल्हांतर्गत प्रवास हा जास्तीत जास्त १०० किमी पर्यंतचा राहत असल्याने नागरिक हा प्रवास स्वत:च्या दुचाकी किंवा चारचाकीने करीत होते.

ठळक मुद्देबसफेऱ्यांमध्ये वाढ। प्रवासाची बंधने हटविल्याने नागरिकांचा कल

लोकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली : आंतरजिल्हा प्रवासासाठी असलेली ई-पासची सक्ती रद्द केल्यानंतर एसटीची चाके पूर्वपदावर येण्यास सुरूवात झाली आहेत. आंतरजिल्हा प्रवास करणाऱ्या प्रवाशांची संख्या वाढत चालली असल्याने फेऱ्यांची संख्याही वाढविली जात आहे.केंद्र शासनाने २२ मार्च रोजी जनता संचारबंदीचे आवाहन केले होते. त्यानंतर लगेच लॉकडाऊन जाहीर करण्यात आले. तेव्हापासून जवळपास दोन महिने एसटीची चाके पूर्णपणे थांबली आहेत. त्यांनतर मे महिन्यापासून काही प्रमाणात जिल्ह्यातच बसफेऱ्या सोडण्यास परवानगी देण्यात आली होती. मात्र जिल्हांतर्गत प्रवास हा जास्तीत जास्त १०० किमी पर्यंतचा राहत असल्याने नागरिक हा प्रवास स्वत:च्या दुचाकी किंवा चारचाकीने करीत होते. त्यामुळे बसला मर्यादीतच प्रवाशी मिळत होते. परिणामी बसफेऱ्याही मर्यादीत प्रमाणातच सोडल्या जात होत्या. २ सप्टेंबरपासून आंतरजिल्हा प्रवासाची बंधने पूर्णपणे काढण्यात आली आहेत. तेव्हापासून एसटीची गरज नागरिकांना निर्माण झाली आहे. लॉकडाउनच्या कालावधीत अनेकांची दुसऱ्या जिल्ह्यातील कामे थांबली होती. प्रवासाची बंधने हटविल्यानंतर ही कामे करण्यास वेग आला आहे. तसेच नातेवाईकांना भेटण्यासाठीही नागरिक दुसऱ्या जिल्ह्यात प्रवास करीत असल्याने प्रवाशांची संख्या वाढत आहे. प्रवाशांची संख्या लक्षात घेऊन अधिक बसफेऱ्या सोडल्या जात आहेत. गडचिरोली आगारातून शनिवारी नागपूरसाठी १०, चंद्रपूरसाठी १४, यवतमाळ १, चामोर्शी-मुलसाठी काही फेऱ्या सोडण्यात आल्या आहेत. सध्या जवळपास १०० फेऱ्या सोडल्या जात आहेत. सोमवारपासून नवीन आठवड्याला सुरूवात होणार असल्याने प्रवाशांची संख्या वाढण्याची शक्यता असल्याने पुन्हा फेऱ्या वाढविल्या जाणार आहेत.१५ टक्के उत्पन्न व फेऱ्याआंतरजिल्हा प्रवासावरील बंधने हटविल्यानंतर प्रवाशांची संख्या वाढत चालली आहे. लॉकडाऊनपूर्वी गडचिरोली आगारातून दरदिवशी ६२० बसफेऱ्या सोडल्या जात होत्या. त्यातुन जवळपास १० लाख रूपयांचे उत्पन्न मिळत होते. आता जवळपास १०० फेऱ्या सोडण्यात येत आहेत. त्यातून १ लाख रूपयांचे उत्पन्न मिळत आहे. सोमवारपासून नागपूरसाठी पुन्हा फेऱ्या वाढविण्यात येणार आहेत. कोरोनाच्या रूग्णांची संख्या वाढतच चालली आहे. त्यामुळे बसमध्ये अर्धेच प्रवाशी बसविण्याचे निर्देश शासनाने दिले आहेत. त्यामुळे फेºया जरी वाढल्या तरी उत्पन्न वाढीवर मर्यादा येणार आहेत. सध्या ४० ते ४५ एवढे भारमान मिळत आहे.

टॅग्स :state transportएसटीpassengerप्रवासी