शहरं
Join us  
Trending Stories
1
"७५ टक्के नगराध्यक्ष महायुतीचे, ४८ टक्के नगरसेवक एकट्या भाजपाचे; एवढा मोठा विजय...," CM फडणवीसांनी आकड्यांसह सांगितली ताकद
2
"कुटुंब आणि लग्न हे केवळ शारीरिक संतुष्टीचे माध्यम नाही तर...", 'लिव्ह-इन रिलेशनशिप'वर मोहन भागवत स्पष्टच बोलले
3
“नगरपालिका निकालाने विरोधकांचे पानिपत, आता मनपासाठी एक दिलाने कामाला लागा”: DCM शिंदे
4
"जर व्हेनेझुएला विरोधात कुठल्याही प्रकारची लष्करी कारवाई झाली तर..."; ब्राझीलच्या राष्ट्राध्यक्षांची अमेरिकेला थेट धमकी!
5
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?
6
प्रियकरासोबत मिळून पतीची हत्या, पण एक चूक नडली अन पोलिसांनी ठोकल्या बेड्या  
7
"पक्षाने जे प्रवेश दिले त्याचा फायदाच झाला"; मुनगंटीवारांच्या नाराजीवर CM फडणवीसांचे भरपाई देण्याचे आश्वासन
8
IND vs PAK : मैदानात फुल राडा! आयुष म्हात्रे–वैभव सूर्यवंशीचा पाक गोलंदाजाशी वाद; VIDEO व्हायरल
9
धावत्या ट्रेनमध्ये प्रेमीयुगुलाचा रोमान्स, VIDEO व्हायरल; नेमका कुठे घडला 'हा' लज्जास्पद प्रकार?
10
‘हा महायुतीचा सामूहिक विजय, आम्ही जिथे लढलो तिथे…”, निकालांनंतर अजित पवारांचं मोठं विधान          
11
'हिंदूंनी एकजुटीने...', बांगलादेशातील हिंदू अत्याचारांवर RSS प्रमुख मोहन भागवतांचे मोठे वक्तव्य
12
भाजपाचे ५ आमदार असतानाही काँग्रेसने दिली मात! चंद्रपुरात विजय वडेट्टीवार ठरले किंगमेकर
13
Daund Local Body Election Result 2025: दौंडला दोन्ही गट सत्तेत; नगराध्यक्षपदी राष्ट्रवादी काँग्रेसच्या दुर्गादेवी जगदाळे
14
एकनाथ शिंदेंच्या ठाण्यातील दोन बालेकिल्ल्यांना भाजपाकडून सुरुंग, अंबरनाथ, बदलापूरमध्ये फुललं कमळ
15
“नगरपालिका निवडणुकीतील महायुतीचा विजय निवडणूक आयोगाच्या आशिर्वादाने”: हर्षवर्धन सपकाळ
16
Nagpur Election News: CM फडणवीसांच्या जिल्ह्यात कोणाचे किती नगराध्यक्ष, भाजपने कुठे-कुठे उधळला गुलाल?
17
४० वर्षांची काँग्रेसची सत्ता उलथवली; धुळ्यात भाजपाचा ऐतिहासिक विजय, ३२ पैकी ३१ जागा आल्या
18
Sanjay Raut : "'तेच' आकडे, 'तेच' मशीन, १२०-१२५..."; संजय राऊतांचा वेगळाच तर्क! संपूर्ण निकालावरच प्रश्नचिन्ह
19
वीज बिल वसुलीसाठी गेलेल्या टीमवर लाठ्या-काठ्यांनी हल्ला; जीव वाचवण्यासाठी कर्मचाऱ्यांची पळापळ
20
IND vs PAK U19 Asia Cup Final : अपराजित युवा टीम इंडियाला फायनलमध्ये पराभवाचा धक्का! पाकनं १३ वर्षांनी उंचावली ट्रॉफी
Daily Top 2Weekly Top 5

अंगणवाडी कर्मचाऱ्यांची अनेक वर्षांपासून आश्वासनांवर बोळवण

By admin | Updated: December 11, 2015 01:59 IST

आपल्या न्याय मागण्यांसाठी राज्यभरातील अंगणवाडी कर्मचारी मागील १० वर्षांपासून सातत्याने मोर्चा,

गडचिरोली : आपल्या न्याय मागण्यांसाठी राज्यभरातील अंगणवाडी कर्मचारी मागील १० वर्षांपासून सातत्याने मोर्चा, धरणे आंदोलन, निवेदन आदींच्या माध्यमातून शासनाचे लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला जात आहे. मात्र या अंगणवाडी कर्मचाऱ्यांना केवळ आश्वासने देऊन राज्य शासन बोळवण करीत असल्याची टिका केली जात आहे. बालकांना पूर्व प्राथमिकचे धडे देण्याबरोबरच गावातील गरोदर मातांना मार्गदर्शन करणे, पोषण आहार पुरविणे, आरोग्याच्या विविध उपक्रमांमध्ये प्रत्यक्ष सहभाग घेण्याचे महत्त्वाचे काम अंगणवाडी सेविका व मदतनीस करतात. संपूर्ण राज्यात एक लाखाहून अधिक अंगणवाडी कर्मचारी कार्यरत आहेत. बालकांच्या पालन पोषणाची महत्त्वाची जबाबदारी अंगणवाडी कर्मचाऱ्यांवर असली तरी त्यांना वेतनश्रेणी देण्यास शासन चालढकल करीत आहे. केवळ तुटपुंजे मानधन देऊन त्यांना राबविले जात आहे. अनेक वर्ष लढा देऊनही शासन त्यांच्याकडे दुर्लक्ष करीत असल्याने शासनाच्या विरोधात संघर्ष तीव्र होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.भामरागड येथे पुष्पा तलांडे यांच्या प्रमुख उपस्थितीत मेळावा पार पडला. या मेळाव्याला प्रा. रमेशचंद्र दहीवडे, सपना रामटेके, वैशाली कोकमुटीवार, नंदा आत्राम, जाणू कड्याम, शारदा मेश्राम, मुन्नी पठाण, संध्या रापर्तीवार आदी उपस्थित होते. अंगणवाडी बाह्य कामांचा बोजा कमी करावा, अशी मागणी करण्यात आली. (नगर प्रतिनिधी)