शहरं
Join us  
Trending Stories
1
“आमचा युद्धसराव झालेला आहे, महापालिका निवडणुकांसाठी तयार”; संजय राऊतांचा निर्धार
2
महापालिका, स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका महायुती एकत्र लढणार का? CM फडणवीस म्हणाले...
3
'ही' आहेत पाकिस्तानातील श्रीमंत शहरं? मुंबई-दिल्लीशी तुलना करायची झाली तर...
4
“आता राज्य सरकारने स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका घेण्यास चालढकल करू नये”: जयंत पाटील
5
कानड्यांनो, बापाला सॉरी म्हणायला लावता राव?; अवधूतने सोनू निगमची बाजू घेत लिहिली कविता
6
भारत-पाकिस्तानमध्ये झालेली युद्धं किती दिवस चालली? एवढ्या दिवसांत उडाला होता पाकड्यांचा फज्जा
7
जादू की झप्पी! रुग्णांना बरं करणारी 'हग थेरपी' आहे तरी काय?, फायदे ऐकून तुम्हीही माराल मिठी
8
माझाही पक्ष आहे, भाजपाने विचारलेही नाही, राहुल गांधींनी सन्मानाची वागणूक दिली: महादेव जानकर
9
Amazon Prime सबस्क्रिप्शनसाठी पैसे खर्च करू नका; Jio, Airtel आणि Vi च्या रिचार्जवर मोफत मिळतंय
10
Nashik: जाधव बंधू हत्येनंतर ठाण्यात आला अन् ओळख लपवून राहू लागला, अखेर पोलिसांना सापडलाच
11
आता बिगुल वाजणार! "४ आठवड्यांच्या आत..."; स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीबद्दल SC चा महत्त्वाचा निकाल
12
मॉकड्रिलमुळे ताज्या झाल्या भारत-पाकिस्तान युद्धाच्या आठवणी; १९६५ आणि १९७१च्या युद्धावेळी काय घडलेलं?
13
सूत जुळलं! ३ मुलांची आई असलेली हॉटेलची मालकीण १९ वर्षीय मजुराच्या पडली प्रेमात अन्...
14
"पहलगाम हल्ल्याच्या तीन दिवस आधी पंतप्रधान मोदींना पाठवला होता गुप्तचर अहवाल"; मल्लिकार्जुन खरगेंचा मोठा दावा
15
Cashless Treatment Scheme: अपघातातील जखमींवर होणार कॅशलेस उपचार, नवी योजना लागू; केंद्राने काढली अधिसूचना
16
बाजार पुन्हा घसरला! बँक ऑफ बडोदाला मोठा धक्का; 'या' सेक्टरमधील शेअर्सही विखुरले
17
भारत-पाक तणावाच्या पार्श्वभूमीवर दिल्लीत LRAD यंत्रणा सज्ज, हल्ल्याची तात्काळ मिळणार सूचना
18
उशीर झाल्याने परीक्षा हुकली, नैराश्यातून विद्यार्थ्याचा आत्महत्येचा प्रयत्न, पोलिसांनी वाचवले प्राण
19
'राम तेरी गंगा मैली'मधील मंदाकिनीच्या भूमिकेसाठी 'रामायण'मधील सीतेनं दिलेलं ऑडिशन, पण...
20
"पाय खूप सुजतात, नीट जेवणही नशिबात नसतं"; केदारनाथच्या पिठ्ठूची डोळे पाणावणारी गोष्ट

अंगणवाडी कर्मचाऱ्यांची अनेक वर्षांपासून आश्वासनांवर बोळवण

By admin | Updated: December 11, 2015 01:59 IST

आपल्या न्याय मागण्यांसाठी राज्यभरातील अंगणवाडी कर्मचारी मागील १० वर्षांपासून सातत्याने मोर्चा,

गडचिरोली : आपल्या न्याय मागण्यांसाठी राज्यभरातील अंगणवाडी कर्मचारी मागील १० वर्षांपासून सातत्याने मोर्चा, धरणे आंदोलन, निवेदन आदींच्या माध्यमातून शासनाचे लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला जात आहे. मात्र या अंगणवाडी कर्मचाऱ्यांना केवळ आश्वासने देऊन राज्य शासन बोळवण करीत असल्याची टिका केली जात आहे. बालकांना पूर्व प्राथमिकचे धडे देण्याबरोबरच गावातील गरोदर मातांना मार्गदर्शन करणे, पोषण आहार पुरविणे, आरोग्याच्या विविध उपक्रमांमध्ये प्रत्यक्ष सहभाग घेण्याचे महत्त्वाचे काम अंगणवाडी सेविका व मदतनीस करतात. संपूर्ण राज्यात एक लाखाहून अधिक अंगणवाडी कर्मचारी कार्यरत आहेत. बालकांच्या पालन पोषणाची महत्त्वाची जबाबदारी अंगणवाडी कर्मचाऱ्यांवर असली तरी त्यांना वेतनश्रेणी देण्यास शासन चालढकल करीत आहे. केवळ तुटपुंजे मानधन देऊन त्यांना राबविले जात आहे. अनेक वर्ष लढा देऊनही शासन त्यांच्याकडे दुर्लक्ष करीत असल्याने शासनाच्या विरोधात संघर्ष तीव्र होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.भामरागड येथे पुष्पा तलांडे यांच्या प्रमुख उपस्थितीत मेळावा पार पडला. या मेळाव्याला प्रा. रमेशचंद्र दहीवडे, सपना रामटेके, वैशाली कोकमुटीवार, नंदा आत्राम, जाणू कड्याम, शारदा मेश्राम, मुन्नी पठाण, संध्या रापर्तीवार आदी उपस्थित होते. अंगणवाडी बाह्य कामांचा बोजा कमी करावा, अशी मागणी करण्यात आली. (नगर प्रतिनिधी)