शहरं
Join us  
Trending Stories
1
"युद्ध थांबवलं नाही तर…’’, भारत-पाकिस्तानमधील संघर्षाचा उल्लेख करत डोनाल्ड ट्रम्प यांचा थायलंड कंबोडियाला इशारा
2
"...मग आम्हाला जगभर कशाला पाठवलं?"; IND vs PAK क्रिकेट शेड्युलवर संतापल्या प्रियंका चतुर्वेदी
3
मुंबई-पुणे महामार्गावर भीषण अपघात! कंटेनरचे ब्रेक फेल, अनेक वाहने एकमेकांवर धडकली...
4
IND vs ENG 4th Test Day 4 Stumps : साडे चार तासांत ३७३ चेंडूंचा सामना; KL राहुल-गिल जोडी जमली; पण लढाई अजून नाही संपली!
5
"जर 6 महिन्यांत मर्सिडीज अथवा बीएमडब्ल्यू हवी असेल तर..." सरन्यायाधीश गवई यांचा नव्या वकीलांना सल्ला
6
Asia Cup 2025: 'असं' झालं तर तब्बल तीन वेळा रंगणार IND vs PAK क्रिकेट सामना, जाणून घ्या
7
Shubman Gill Record : गिलनं साधला मोठा डाव! इंग्लंडच्या मैदानात पाक दिग्गजाला 'धोबीपछाड'
8
तेव्हा लोक म्हणाले होते जणू दुसरी ऐश्वर्याच, सलमान खानची ही हिरोईन आता दिसते अशी 
9
एलियन्सचं रहस्यमय अंतराळ यान नोव्हेंबरमध्ये करणार पृथ्वीवर हल्ला, शास्त्रज्ञांना धक्कादायक दावा
10
नवरा बायकोमध्ये तुफान भांडण, पतीच्या डोक्यात घातला हातोडा, हत्येनंतर दार लावलं अन्...
11
Video: बंगळुरूच्या महिला प्रोफेसरचा मराठमोळ्या 'वाजले की बारा' लावणीवर भन्नाट डान्स
12
"आम्ही खूप दुःखी..."; दिराने वहिनीला कुंकू लावलं अन् धबधब्यात घेतली उडी, प्रेमाचा भयंकर शेवट
13
IND vs ENG : जसप्रीत बुमराहचं 'शतक'; मँचेस्टर कसोटीतील न पटण्याजोगी गोष्ट
14
Asia Cup 2025 चे वेळापत्रक जाहीर! भारत पाकिस्तान पुन्हा एकाच गटात, 'या' दिवशी सामना
15
१४,२९८ पुरुषांना 'लाडकी बहीण'चा लाभ; अजित पवार म्हणाले, 'वसूल करणार, नाही दिले तर...'
16
"सरकार ही निरुपयोगी यंत्रणा, चालत्या गाडीला पंक्चर करण्याचं काम..."; नितीन गडकरींनी सुनावलं
17
बिहार निवडणुकीसाठी काँग्रेसची मोर्चेबांधणी, महाराष्ट्रातील या महिला खासदाराकडे सोपवली मोठी जबाबदारी
18
"बंदुकीच्या धाकाने बांगलादेशात ढकलले जातेय...!" बांगली भाषिक मुस्लिमांवरील कारवाईवरून ओवेसी भडकले
19
IND vs ENG : यशस्वीच्या पदरी लाजिरवाणा 'भोपळा'! साई आला अन् तोही फक्त 'दर्शन' देऊन गेला
20
"राहुल गांधींच्या नशिबात कायम माफी मागणे लिहीले आहे"; केंद्रीय कृषीमंत्र्यांनी काँग्रेसला घेरलं, "१० वर्षांनी पुन्हा..."

व्याघ्र हल्ल्यातील मृतांच्या नातेवाइकांना विशेष भरपाई

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 24, 2025 15:52 IST

संघर्ष रोखण्यासाठी आराखडा : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे निर्देश

लोकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली : जिल्ह्यात वन्यप्राणी व मानव संघर्षावर तोडगा काढण्यासाठी मुख्यमंत्री व पालकमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पुढाकार घेतला आहे. घनदाट जंगलात वाघांचा मुक्त वावर आहे. अनेकदा शेतात कामानिमित्त गेलेल्यांवर वाघ हल्ले करतात. यात निष्पाप नागरिकांना जीव गमवावा लागतो. फेब्रुवारीमध्ये चामोर्शी तालुक्यातील गणपूर (रै.) येथे वाघाच्या हल्ल्यात एका शेतकऱ्याचा मृत्यू झाला होता. याची गंभीर दखल घेत मुख्यमंत्र्यांनी व्याघ्रहल्ले रोखण्यासाठी तीन महिन्यांत आराखडा तयार करा, असे निर्देश दिले. शिवाय पाच वर्षांत व्याघ्रहल्ल्यांत जीव गमावलेल्यांच्या कुटुंबीयांना विशेष भरपाई देण्याचे आदेशही त्यांनी दिले.

मित्रा संस्थेचे मुख्य कार्यकारी अधिकारी प्रवीण परदेशी यांच्या मार्गदर्शनाखाली आराखडा तयार करण्यात येणार आहे. मुख्यमंत्र्यांच्या आदेशानंतर परदेशी यांनी २२ मार्च रोजी नागपुरात वरिष्ठ वन अधिकाऱ्यांची बैठक घेऊन उपाययोजनांवर चर्चा केली व त्यावर तातडीने अंमलबजावणी करण्याचे निर्देश दिले. गडचिरोली, चार्मोशी, आरमोरी, वडसा आणि धानोरा क्षेत्रांत वाघांच्या हल्ल्याच्या घटना अधिक घडल्या. या विषयावर काम करणाऱ्या वाइल्ड लाईफ इन्स्टिट्यूट सारख्या संस्थांच्या तज्ज्ञांची नेमणूक करण्यात येणार आहे.

वरिष्ठ अधिकाऱ्यांची बैठकीला उपस्थितीया बैठकीस राज्याच्या प्रधान मुख्य वनसंरक्षक (वन बल प्रमुख) शोमिता बिस्वास, अपर प्रधान मुख्य वनसंरक्षक विवेक खांडेकर, ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पाचे मुख्य वनसंरक्षक तथा क्षेत्रसंचालक डॉ. रामचंद्र रामगावकर, गडचिरोलीचे मुख्य वनसंरक्षक एस. रमेशकुमार उपस्थित होते. 

वयस्क वाघांपासून धोका अधिकमानव आणि वन्यजीव संघर्षात आढळणारे वाघ हे वयस्कर असल्याचे दिसून येते. यासंदर्भात उपाययोजनांवर बैठकीत चर्चा झाली. नरभक्षक वयस्क वाघांना जेरबंद करण्याऐवजी त्यांचे स्थलांतर करणे योग्य असल्याचे मत यावेळी तज्ज्ञांनी व्यक्त केले.

३ महिन्यांत अतिरिक्त वाघांचे होणार जिल्ह्याबाहेर स्थलांतरअतिरिक्त वाघांबाबत परिस्थितीचे अवलोकन करून योग्य तो निर्णय घेतला जाईल. याचा आराखडा तयार करण्याचे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले.

जिल्ह्यात राबविल्या जाणार या उपाययोजना....

  • चपराळा व प्राणहिता अभयारण्यांत सागवान झाडांचे विरळीकरण करणे व कुरणाचे प्रमाण वाढविण्याचा निर्णय झाला. जेणेकरून तृणभक्षी प्राण्याची संख्या वाढून मांसभक्षी प्राण्यांना खाद्य मिळेल. प्रत्येक गावात पोलिस पाटील यांच्या धर्तीवर वनपाटील नेमण्याचेही यावेळी ठरविण्यात आले.
  • स्थानिकांना जंगलात लाकूड, सरपण गोळा करण्यासाठी जंगलात जावे लागू नये यासाठी गावामध्ये पाइपलाइनद्वारे सीबीजी गॅसपुरवठा करण्यासाठी ग्रामस्थांच्या शेतात गवत उत्पादन करून त्याचा उपयोग सीबीजीसाठी करण्याचा निर्णय यावेळी घेण्यात आला. त्यासाठी सीबीजी गॅस प्लांट उभारण्याचेही ठरविण्यात आले.
  • वन्यप्राण्यांमुळे नुकसान झालेल्या पिकांची भरपाई लवकर देण्यासाठी ई-पंचनामा करणे, वाघांची वाढती संख्या लक्षात घेऊन चपराळा अभयारण्यातील सहा गावांच्या स्थलांतरासाठी स्थानिकांचे सामाजिक, आर्थिक मूल्यांकन, पुनर्वसनासाठी नव्या जागेचा शोध घेणे, आदी उपाययोजना राबविण्याचा निर्णय बैठकीत घेतला.
टॅग्स :Devendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसGadchiroliगडचिरोलीTigerवाघ