शहरं
Join us  
Trending Stories
1
"ऑफर देणारे, अटी ठेवणारेही तेच, त्यामुळे मी..."; राज-उद्धव एकत्र येण्यावर CM फडणवीसांनी व्यक्त केला आनंद
2
"जाऊ दे यार, कामाचं बोला"; राज-उद्धव एकत्र येण्याच्या प्रश्नावर एकनाथ शिंदे चिडले
3
मला स्टार्क वैगेरे व्हायचं नाही; ऑस्ट्रेलियन स्टारशी तुलना केल्यावर आवेश खाननं असा दिला रिप्लाय
4
शेकापच्या संतोष पाटलांच्या दोन्ही मुलांचा वेळास बीचवर एकाच वेळी मृत्यू; बहिणीचा मुलगाही सुमद्रात बुडाला
5
"माय नेम इज खान"! LSG साठी आवेशची 'हिरोगिरी' यॉर्करचा मारा करत RR च्या हातून हिसकावून घेतला सामना
6
रशिया-युक्रेन युद्ध थांबले; तीन दिवस युद्धविराम जाहीर, व्लादिमीर पुतिन यांची घोषणा
7
कॅनडात बस स्टॉपवर भारतीय तरुणीची गोळीबारात हत्या; हल्लेखोरांना दुसऱ्यावर चालवायची होती गोळी
8
Vaibhav Suryavanshi : "छोटा पॅक बडा धमाका"! पहिल्याच बॉलवर सिक्सर.. तेही लॉर्ड शार्दुल ठाकूरसमोर
9
IPL 2025 GT vs DC : बटलर इज बॉस! दिल्ली कॅपिटल्सला पराभूत करत गुजरात टायटन्सनं रचला इतिहास
10
"देशात धार्मिक युद्ध भडकवण्यासाठी सुप्रीम कोर्ट जबाबदार"; मर्यादेबाहेर जाताय म्हणत भाजप खासदाराची टीका
11
वाळूमाफियांची आता खैर नाही! नियमांचे उल्लंघन केल्यास थेट डेपो होणार रद्द, सर्वांना नोटीस जारी
12
ठाकरे बंधू एकत्र येण्याच्या चर्चेवर मनसे नेते नाराज? म्हणाले, “त्यांनी आम्हाला दोनदा फसवलेय”
13
8व्या वेतन आयोगाबाबत मोठी बातमी; सरकार या 35 पदांवर करणार नवीन नियुक्त्या
14
IPL 2025 Video: भरमैदानात झाला राडा !! इशांत शर्मा भडकला, आशुतोषवर बोट रोखलं, नेमकं काय घडलं?
15
राज ठाकरेंशी युती झाल्यास उद्धव ठाकरे महाविकास आघाडीतून बाहेर पडणार का?; संजय राऊत म्हणाले...
16
Big Breaking: तनिषा भिसे मृत्यू प्रकरणात अखेर डॉ. सुश्रुत घैसास यांच्यावर गुन्हा दाखल
17
Vaibhav Suryavanshi : १४ वर्षीय वैभव सूर्यवंशी पदार्पणासह रचणार इतिहास; जाणून घ्या सविस्तर
18
Video - अग्निकल्लोळ! एका ठिणगीमुळे बोटीला भीषण आग; १४८ जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
19
“मुंबई महापालिकेच्या निवडणुकीमुळे राज ठाकरेंची उपयुक्तता सर्वांना वाटत आहे”: छगन भुजबळ
20
“राहुल गांधींचा ‘डरो मत’ संदेश अमलात आणू, एकता, अखंडतेची मशाल घेऊन वाटचाल करू”: सपकाळ

व्याघ्र हल्ल्यातील मृतांच्या नातेवाइकांना विशेष भरपाई

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 24, 2025 15:52 IST

संघर्ष रोखण्यासाठी आराखडा : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे निर्देश

लोकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली : जिल्ह्यात वन्यप्राणी व मानव संघर्षावर तोडगा काढण्यासाठी मुख्यमंत्री व पालकमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पुढाकार घेतला आहे. घनदाट जंगलात वाघांचा मुक्त वावर आहे. अनेकदा शेतात कामानिमित्त गेलेल्यांवर वाघ हल्ले करतात. यात निष्पाप नागरिकांना जीव गमवावा लागतो. फेब्रुवारीमध्ये चामोर्शी तालुक्यातील गणपूर (रै.) येथे वाघाच्या हल्ल्यात एका शेतकऱ्याचा मृत्यू झाला होता. याची गंभीर दखल घेत मुख्यमंत्र्यांनी व्याघ्रहल्ले रोखण्यासाठी तीन महिन्यांत आराखडा तयार करा, असे निर्देश दिले. शिवाय पाच वर्षांत व्याघ्रहल्ल्यांत जीव गमावलेल्यांच्या कुटुंबीयांना विशेष भरपाई देण्याचे आदेशही त्यांनी दिले.

मित्रा संस्थेचे मुख्य कार्यकारी अधिकारी प्रवीण परदेशी यांच्या मार्गदर्शनाखाली आराखडा तयार करण्यात येणार आहे. मुख्यमंत्र्यांच्या आदेशानंतर परदेशी यांनी २२ मार्च रोजी नागपुरात वरिष्ठ वन अधिकाऱ्यांची बैठक घेऊन उपाययोजनांवर चर्चा केली व त्यावर तातडीने अंमलबजावणी करण्याचे निर्देश दिले. गडचिरोली, चार्मोशी, आरमोरी, वडसा आणि धानोरा क्षेत्रांत वाघांच्या हल्ल्याच्या घटना अधिक घडल्या. या विषयावर काम करणाऱ्या वाइल्ड लाईफ इन्स्टिट्यूट सारख्या संस्थांच्या तज्ज्ञांची नेमणूक करण्यात येणार आहे.

वरिष्ठ अधिकाऱ्यांची बैठकीला उपस्थितीया बैठकीस राज्याच्या प्रधान मुख्य वनसंरक्षक (वन बल प्रमुख) शोमिता बिस्वास, अपर प्रधान मुख्य वनसंरक्षक विवेक खांडेकर, ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पाचे मुख्य वनसंरक्षक तथा क्षेत्रसंचालक डॉ. रामचंद्र रामगावकर, गडचिरोलीचे मुख्य वनसंरक्षक एस. रमेशकुमार उपस्थित होते. 

वयस्क वाघांपासून धोका अधिकमानव आणि वन्यजीव संघर्षात आढळणारे वाघ हे वयस्कर असल्याचे दिसून येते. यासंदर्भात उपाययोजनांवर बैठकीत चर्चा झाली. नरभक्षक वयस्क वाघांना जेरबंद करण्याऐवजी त्यांचे स्थलांतर करणे योग्य असल्याचे मत यावेळी तज्ज्ञांनी व्यक्त केले.

३ महिन्यांत अतिरिक्त वाघांचे होणार जिल्ह्याबाहेर स्थलांतरअतिरिक्त वाघांबाबत परिस्थितीचे अवलोकन करून योग्य तो निर्णय घेतला जाईल. याचा आराखडा तयार करण्याचे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले.

जिल्ह्यात राबविल्या जाणार या उपाययोजना....

  • चपराळा व प्राणहिता अभयारण्यांत सागवान झाडांचे विरळीकरण करणे व कुरणाचे प्रमाण वाढविण्याचा निर्णय झाला. जेणेकरून तृणभक्षी प्राण्याची संख्या वाढून मांसभक्षी प्राण्यांना खाद्य मिळेल. प्रत्येक गावात पोलिस पाटील यांच्या धर्तीवर वनपाटील नेमण्याचेही यावेळी ठरविण्यात आले.
  • स्थानिकांना जंगलात लाकूड, सरपण गोळा करण्यासाठी जंगलात जावे लागू नये यासाठी गावामध्ये पाइपलाइनद्वारे सीबीजी गॅसपुरवठा करण्यासाठी ग्रामस्थांच्या शेतात गवत उत्पादन करून त्याचा उपयोग सीबीजीसाठी करण्याचा निर्णय यावेळी घेण्यात आला. त्यासाठी सीबीजी गॅस प्लांट उभारण्याचेही ठरविण्यात आले.
  • वन्यप्राण्यांमुळे नुकसान झालेल्या पिकांची भरपाई लवकर देण्यासाठी ई-पंचनामा करणे, वाघांची वाढती संख्या लक्षात घेऊन चपराळा अभयारण्यातील सहा गावांच्या स्थलांतरासाठी स्थानिकांचे सामाजिक, आर्थिक मूल्यांकन, पुनर्वसनासाठी नव्या जागेचा शोध घेणे, आदी उपाययोजना राबविण्याचा निर्णय बैठकीत घेतला.
टॅग्स :Devendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसGadchiroliगडचिरोलीTigerवाघ