शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी अपडेट: श्रेयस अय्यर ड्रेसिंग रुममध्येच बेशुद्ध पडलेला; वैद्यकीय पथकाने लागलीच धोका ओळखला, नाहीतर...
2
"तेच रडणे, तीच मळमळ, त्याच उलट्या, त्याच फुशारक्या...", भाजपाने उद्धव ठाकरेंना डिवचलं
3
वनप्लस १५ येतोय...! पण १४ क्रमांक का वगळला? चिनी संस्कृतीत असे काय आहे...
4
Bank Holidays November 2025: नोव्हेंबरमध्ये किती दिवस बँका राहणार बंद? पाहा RBI ची हॉलिडे लिस्ट, पटापट आटपा काम
5
"महाराष्ट्रात भाजप कोणाच्याही कुबड्यांवर चालत नाही; सत्तेमुळे तुम्ही समाधानी असाल, पण मी नाही": शाह
6
Tulasi Vivah 2025: विष्णू हे लक्ष्मीपती असूनही दरवर्षी तुळशीशी का लावला जातो विवाह?
7
LIC ची ‘ही’ स्कीम गुंतवणूकदारांना बनवेल कोट्यधीश!; ४ वर्षापर्यंत भरा प्रीमिअम, मिळतील १ कोटी
8
"मी तुला कच्च खाऊन टाकेन"; बायकोने नवऱ्याला गर्लफ्रेंडसोबत रंगेहाथ पकडलं, चपलेने धू-धू धुतलं
9
१०० वर्षांनी महालक्ष्मीसह ४ राजयोग: ७ राशींना सुबत्ता, कल्याण; बक्कळ लाभ, यशाचा मंगलमय काळ!
10
आजचे राशीभविष्य, २८ ऑक्टोबर २०२५: ‘मौनं सर्वार्थ साधनम्’, येणी वसूल होतील; सरकारी लाभ
11
तेव्हा गरजेपेक्षा जास्त कर्मचारी भरले, आता त्यांना बेरोजगार करणार; ॲमेझॉनमध्ये ३०,००० नोकऱ्या धोक्यात
12
चिनी हँडलर, टेलिग्राम ट्रॅप, लाखोंची लूट... ४७ लाखांच्या फसवणुकीचा पर्दाफाश, तिघांना अटक
13
तुमचे अधिकारी वृत्तपत्र वाचत नाहीत का? देशाची प्रतिमा मलिन होतेय; भटक्या कुत्र्यांवरून भडकले कोर्ट
14
Shani Gochar 2025: शनिचा फेरा आपल्या राशीसाठी नेहमीच तापदायक ठरतो का? पाहूया भावानुसार फळ
15
१२ राज्यांमध्ये होणार मतदार याद्यांची पडताळणी; SIR दुसरा टप्पा ४ नोव्हेंबरपासून, महाराष्ट्राचा समावेश नाही
16
मतदाराचे आणि त्याच्या वडिलाचे आडनाव वेगवेगळे, २० हजार मतदारांची नावे संशयास्पद: आदित्य ठाकरे
17
शाळेची नव्हे, धोक्याची घंटा! सरकारी अनास्था आणि 'विनाअनुदानित' इंग्रजी शाळांचा वाढता बाजार
18
सरन्यायाधीश बूटफेक प्रकरण: वकिलावर कारवाई करणार नाही; सर्वोच्च न्यायालयाचे स्पष्टीकरण
19
तातडीने सुनावणीस नकार, पण दोन मागण्या मान्य; मराठा-ओबीसी आरक्षण वादात ओबीसी संघटनेला कोर्टाचा दिलासा
20
'चुका दुरुस्त केल्याशिवाय निवडणुका घेता येणार नाही'; उद्धव ठाकरेंची निवडणूक आयोगावर टीका

व्याघ्र हल्ल्यातील मृतांच्या नातेवाइकांना विशेष भरपाई

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 24, 2025 15:52 IST

संघर्ष रोखण्यासाठी आराखडा : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे निर्देश

लोकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली : जिल्ह्यात वन्यप्राणी व मानव संघर्षावर तोडगा काढण्यासाठी मुख्यमंत्री व पालकमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पुढाकार घेतला आहे. घनदाट जंगलात वाघांचा मुक्त वावर आहे. अनेकदा शेतात कामानिमित्त गेलेल्यांवर वाघ हल्ले करतात. यात निष्पाप नागरिकांना जीव गमवावा लागतो. फेब्रुवारीमध्ये चामोर्शी तालुक्यातील गणपूर (रै.) येथे वाघाच्या हल्ल्यात एका शेतकऱ्याचा मृत्यू झाला होता. याची गंभीर दखल घेत मुख्यमंत्र्यांनी व्याघ्रहल्ले रोखण्यासाठी तीन महिन्यांत आराखडा तयार करा, असे निर्देश दिले. शिवाय पाच वर्षांत व्याघ्रहल्ल्यांत जीव गमावलेल्यांच्या कुटुंबीयांना विशेष भरपाई देण्याचे आदेशही त्यांनी दिले.

मित्रा संस्थेचे मुख्य कार्यकारी अधिकारी प्रवीण परदेशी यांच्या मार्गदर्शनाखाली आराखडा तयार करण्यात येणार आहे. मुख्यमंत्र्यांच्या आदेशानंतर परदेशी यांनी २२ मार्च रोजी नागपुरात वरिष्ठ वन अधिकाऱ्यांची बैठक घेऊन उपाययोजनांवर चर्चा केली व त्यावर तातडीने अंमलबजावणी करण्याचे निर्देश दिले. गडचिरोली, चार्मोशी, आरमोरी, वडसा आणि धानोरा क्षेत्रांत वाघांच्या हल्ल्याच्या घटना अधिक घडल्या. या विषयावर काम करणाऱ्या वाइल्ड लाईफ इन्स्टिट्यूट सारख्या संस्थांच्या तज्ज्ञांची नेमणूक करण्यात येणार आहे.

वरिष्ठ अधिकाऱ्यांची बैठकीला उपस्थितीया बैठकीस राज्याच्या प्रधान मुख्य वनसंरक्षक (वन बल प्रमुख) शोमिता बिस्वास, अपर प्रधान मुख्य वनसंरक्षक विवेक खांडेकर, ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पाचे मुख्य वनसंरक्षक तथा क्षेत्रसंचालक डॉ. रामचंद्र रामगावकर, गडचिरोलीचे मुख्य वनसंरक्षक एस. रमेशकुमार उपस्थित होते. 

वयस्क वाघांपासून धोका अधिकमानव आणि वन्यजीव संघर्षात आढळणारे वाघ हे वयस्कर असल्याचे दिसून येते. यासंदर्भात उपाययोजनांवर बैठकीत चर्चा झाली. नरभक्षक वयस्क वाघांना जेरबंद करण्याऐवजी त्यांचे स्थलांतर करणे योग्य असल्याचे मत यावेळी तज्ज्ञांनी व्यक्त केले.

३ महिन्यांत अतिरिक्त वाघांचे होणार जिल्ह्याबाहेर स्थलांतरअतिरिक्त वाघांबाबत परिस्थितीचे अवलोकन करून योग्य तो निर्णय घेतला जाईल. याचा आराखडा तयार करण्याचे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले.

जिल्ह्यात राबविल्या जाणार या उपाययोजना....

  • चपराळा व प्राणहिता अभयारण्यांत सागवान झाडांचे विरळीकरण करणे व कुरणाचे प्रमाण वाढविण्याचा निर्णय झाला. जेणेकरून तृणभक्षी प्राण्याची संख्या वाढून मांसभक्षी प्राण्यांना खाद्य मिळेल. प्रत्येक गावात पोलिस पाटील यांच्या धर्तीवर वनपाटील नेमण्याचेही यावेळी ठरविण्यात आले.
  • स्थानिकांना जंगलात लाकूड, सरपण गोळा करण्यासाठी जंगलात जावे लागू नये यासाठी गावामध्ये पाइपलाइनद्वारे सीबीजी गॅसपुरवठा करण्यासाठी ग्रामस्थांच्या शेतात गवत उत्पादन करून त्याचा उपयोग सीबीजीसाठी करण्याचा निर्णय यावेळी घेण्यात आला. त्यासाठी सीबीजी गॅस प्लांट उभारण्याचेही ठरविण्यात आले.
  • वन्यप्राण्यांमुळे नुकसान झालेल्या पिकांची भरपाई लवकर देण्यासाठी ई-पंचनामा करणे, वाघांची वाढती संख्या लक्षात घेऊन चपराळा अभयारण्यातील सहा गावांच्या स्थलांतरासाठी स्थानिकांचे सामाजिक, आर्थिक मूल्यांकन, पुनर्वसनासाठी नव्या जागेचा शोध घेणे, आदी उपाययोजना राबविण्याचा निर्णय बैठकीत घेतला.
टॅग्स :Devendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसGadchiroliगडचिरोलीTigerवाघ