शहरं
Join us  
Trending Stories
1
कांदा निर्यातबंदीची मोठी किंमत मोजावी लागली; राज्यातील शेतकऱ्यांना एकरी तीन लाखांचा फटका
2
कितीही असाे तापमानाचा पारा; गाजवा तुमच्या मतदानाचा तोरा
3
याला म्हणतात घबाड! मंत्र्याच्या पीएचा नोकर, पगार फक्त १५ हजार; घरात ३० कोटींचा ढीग
4
काहीही करा, पण मतदानाची टक्केवारी वाढवा; अन्यथा कारवाईस तयार रहा, भाजपश्रेष्ठी धास्तावले
5
दहशतवाद्यांवर २० लाखांचे बक्षीस, दोन संशयित दहशतवाद्यांची रेखाचित्रे जारी; शेकडो जवानांकडून शोधमोहीम
6
ठाकरे गट व महायुती कार्यकर्त्यांत वाद; उज्वल निकमांचा प्रचार करतानाचा प्रसंग
7
कोणत्या भागातून किती लीड मिळते, त्यावर महापालिकेसाठी उमेदवार ठरविले जातील
8
गृहकर्ज थकबाकी वाढली १० लाख कोटी रुपयांनी; रिझर्व्ह बँकेच्या अहवालातून उघडकीस
9
मराठी मते भाजपच्या पारड्यात की काँग्रेसच्या? दोन्ही उमेदवारांना लोकसभा निवडणूक लढवण्याचा अनुभव नाही
10
रशिया अण्वस्त्रांसह लष्करी सराव करणार; अमेरिकेसह पश्चिमी देशांना दिला इशारा
11
...जेव्हा मगरीने भरलेल्या तुडुंब नदीत आईनेच मुलाला फेकून दिले
12
सरकारच्या अनुदानामुळे १५ लाख ईव्हींची विक्री; फेम-२ योजनेतील ९० टक्के निधीचा पाच वर्षांत विनियोग
13
न होणाऱ्या प्रवासाची तिकिटे विकली प्रवाशांना; विमान कंपनीला ७.९ कोटी डॉलरचा दंड
14
ऑर्डर्स वाढल्या, नोकऱ्या मिळाल्या; सेवा क्षेत्रात तेजीचा १४ वर्षांचा उच्चांक, खासगी क्षेत्राचाही विस्तार
15
नवी मुंबई आंतराष्ट्रीय विमानतळावर दिबांच्याच नावाची घोषणा होणार- देवेंद्र फडणवीस
16
CM अरविंद केजरीवालांचा पाय आणखी खोलात; नायब राज्यपालांनी केली NIA चौकशीची मागणी
17
'काँग्रेस तुमचे पैसे वाटेल...' मल्लिकार्जुन खरगेंचे अपूर्ण विधान खोट्या दाव्यासह व्हायरल
18
भारतीय संघाच्या ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेच्या जर्सीचं हटके लॉचिंग! Video Viral 
19
माढ्यात धैर्यशील मोहिते पाटलांची ताकद वाढली! भालके गटाचा पाठिंबा जाहीर; समीकरणे बदलणार?
20
"भाजपा खूप दिवसांपासून दिवास्वप्न पाहतेय..."; नवीन पटनायक यांचा पंतप्रधान मोदींवर पलटवार

शिवराजपुरात स्वयंचलित यंत्राणे केली धानाची पेरणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 21, 2021 4:24 AM

देसाईगंज तालुक्यात धान हे मुख्य पीक असून, एकूण पिकाखालील क्षेत्रापैकी ८० टक्क्यांपेक्षा जास्त क्षेत्रावर धान पिकाची लागवड केली जाते. ...

देसाईगंज तालुक्यात धान हे मुख्य पीक असून, एकूण पिकाखालील क्षेत्रापैकी ८० टक्क्यांपेक्षा जास्त क्षेत्रावर धान पिकाची लागवड केली जाते. यातील ६० टक्के क्षेत्र पावसाच्या पाण्यावर अवलंबून आहे. भात रोवणीची कामे पाऊस आल्यानंतर एकच वेळी सुरुवात होतात. अशावेळी रोवणीच्या कामासाठी मजुरांची टंचाई निर्माण हाेते. सर्वांची रोवणी एकाच वेळेस होणे अशक्यप्राय बाब आहे. पावसातील खंड व मजुरांची टंचाई यामुळे बऱ्याच शेतकऱ्यांचे पऱ्हे ३० ते ५० दिवसांपर्यंत रोपवाटिकेतच असतात. वास्तविक अधिक उत्पादन वाढीसाठी २० ते २५ दिवसांचे रोपे रोवणे आवश्यक असते. यामध्ये जसजसा कालावधी वाढत जाईल. तसतसा उत्पादनावर प्रतिकूल परिणाम होत असते.

नियंत्रित अंतरावर भात लागवड करण्यासाठी ट्रॅक्टर चलित पेरणी यंत्राने भाताची पेरणी करण्याचा सल्ला त्यांना कृषी सहायक योगेश बोरकर यांनी दिला. केवळ आठ किलो बियाणांत आपले एक एकर क्षेत्र त्यांनी पेरणी करून दाखविले. सोबतच खात सुद्धा यंत्राद्वारे दिले. त्यामुळे प्रभावित होऊन शिवराजपूर येथील शेतकऱ्यांनी आपल्या सात एकर क्षेत्रामध्ये या पद्धतीचा अवलंब करीत आहेत. पेर पद्धतीने पेरणी केलेली जमीन ही ८-१० दिवस पाण्याचा ताण सहज सहन करू शकते. त्यामुळे केवळ पावसाच्या पाण्यावर अवलंबून असणाऱ्या कोरडवाहू शेतकऱ्यासाठी ही पद्धत अतिशय उपयुक्त ठरणार आहे. या पद्धतीमधील तांत्रिक बाबी तालुका कृषी अधिकारी नीलेश गेडाम व मंडळ कृषी अधिकारी रूपेश मेश्राम यांनी समजवून दिल्या. यावेळी कृषी सहायक योगेश बोरकर, सुधाकर कोहळे उपस्थित हाेते.

===Photopath===

200621\img-20210620-wa0001.jpg

===Caption===

शिवराजपुर येथून कृषी संजीवनी मोहिमेला सुरवात