शहरं
Join us  
Trending Stories
1
ते जहाज पुन्हा भारताकडे वळले...! चीनकडे का जात होते? 'पिंग शुन'चे गुपित 
2
मध्य पूर्वेतील युद्धातच पाकिस्ताननं रचलं कुभांड; भारताला दिली पोकळ धमकी, कोलकाता टार्गेटवर?
3
“पंजाब माझा आत्मा, केवळ राजकीय आखाडा नाही”; राघव चड्ढा यांचा ‘आप’वर पलटवार, पुरावेच दिले
4
१०० कमांडर, १२ हेलिकॉप्टर अन्...; १९७९ सारखी नाचक्की टाळण्यासाठी अमेरिकेने इराणमध्ये काय काय केले?
5
इराणमध्ये 'सत्तापालट' करायला निघालेल्या ट्रम्प यांची स्वतःची खुर्ची धोक्यात? जनता विरोधात, लोकप्रियताही तळाला
6
आधीच २ तास उशीर, त्यात एक कोच न घेताच ट्रेन सुटली; CSMT स्थानकात अजब प्रकार, प्रवाशांचे हाल
7
आता झाडे बोलणार, स्वतःची ओळखही सांगणार! सोलापुरातील शाळेचा अनोखा प्रयोग, नक्की काय आहे हा प्रकार?
8
हातात लाखोंची रोकड, चक्क THAR मधून घरकामाला यायची 'पारो' मोलकरीण; कोट्यवधीचं गौडबंगाल उघड
9
पेट्रोल-डिझेलनंतर गॅस सिलेंडरच्या किमतीही मोठी वाढ! व्यावसायिक आणि घरगुती एलपीजीचे आजचे दर काय?
10
चारही बाजूंनी गोळीबार, मृत्यू समोर; तरी सुरक्षित पडला बाहेर; अमेरिकन पायलटचा थरारक अनुभव
11
विधान परिषदेसाठी शरद पवारांचा उद्धव ठाकरेंना पाठिंबा?; काँग्रेसने मात्र अंतर राखले! पुढे काय?
12
शेतकरी कर्जमाफी अहवाल लवकरच राज्य सरकारकडे; सदस्यांच्या अभिप्रायानंतर होणार शिक्कामोर्तब
13
Uber: उबर चालकांच्या उत्पन्नात वाढ; कंपनीकडून कमिशन कपात, भाडं वाढणार का?
14
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
15
पेट्रोल ७.४१ रुपयांनी महागले तर डिझेलमध्ये २५ रुपयांची वाढ; 'या' कंपनीने अचानक वाढवल्या किमती
16
रणबीर कपूरच्या 'रामायण'मध्ये अमिताभ बच्चन यांच्या जावयाची एन्ट्री, देवराज इंद्रची भूमिका साकारणार, कोण आहे तो?
17
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
18
रात्री झोपूनही दिवसभर झोप - सुस्ती जाणवत राहते? पाहा काय आहे यामागचं कारण आणि उपाय
19
मतदान की स्वप्नभंग? फोंड्याचे भवितव्य अधांतरी; ९ रोजीच्या निवडणुकीबद्दल साशंकता
20
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
Daily Top 2Weekly Top 5

विदर्भाचा सुकतोय घसा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 31, 2018 12:32 IST

राज्यातल्या सहा प्रादेशिक विभागांपैकी चार विभागात गेल्या वर्षीपेक्षा यावर्षी जलसाठ्याची स्थिती बरी असली तरी विदर्भवासीयांचा घसा आताच कोरडा पडत आहे. त्यात पश्चिम विदर्भातल्या (वऱ्हाड) पाच जिल्ह्यामध्ये राज्यात सर्वाधिक बिकट परिस्थिती आहे.

ठळक मुद्देवऱ्हाडात सर्वाधिक बिकट स्थितीउर्वरित महाराष्ट्रत गतवर्षीपेक्षा जास्त जलसाठा

मनोज ताजने ।लोकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली : राज्यातल्या सहा प्रादेशिक विभागांपैकी चार विभागात गेल्या वर्षीपेक्षा यावर्षी जलसाठ्याची स्थिती बरी असली तरी विदर्भवासीयांचा घसा आताच कोरडा पडत आहे. त्यात पश्चिम विदर्भातल्या (वऱ्हाड) पाच जिल्ह्यामध्ये राज्यात सर्वाधिक बिकट परिस्थिती आहे. त्यामुळे या विभागात उन्हाच्या तीव्र झळा सहन करत पाण्यासाठी वणवण भटकावे लागणार आहे.आजच्या स्थितीत राज्यातील मोठ्या, मध्यम व लघुप्रकल्पांमिळून सरासरी उपयुक्त जलसाठा ४१.९२ टक्के आहे. गेल्यावर्षी याच तारखेला राज्यात ३५.२३ टक्के जलसाठा होता. त्यामुळे गेल्यावर्षीपेक्षा काहीशी बरी स्थिती दिसत असली तरी विदर्भात मात्र हे चित्र उलट आहे. विदर्भातील नागपूर विभागात गेल्यावर्षी २०.८१ टक्के जलसाठा होता, तो यावर्षी १९.९१ टक्के आहे. अमरावती विभागात गेल्यावर्षी ३२.२५ टक्के जलसाठा होता तो आता अवघा २१.३१ टक्के आहे. त्यामुळे एप्रिल, मे आणि जून या तीन महिन्यात विदर्भात पाण्याच्या तीव्र टंचाईला सामोरे जावे लागणार आहे. ही स्थिती सर्वांचीच चिंता वाढविणारी आहे.उन्हाळ्यात मोठ्या प्रकल्पांवर पिण्याच्या पाण्यासोबतच उन्हाळी पिकांचेही नियोजन केले जाते. पण पिण्यासाठीच पाणी नाही तर पिकांना कुठून देणार? अशी स्थिती आहे. विदर्भात मोठ्या प्रकल्पांपैकी बुलडाणा जिल्ह्यातील खडकपूर्णा, गडचिरोली जिल्ह्यातील दिना, चंद्रपूर जिल्ह्यातील असोलामेंढा ही जलाशये कोरडी झाली असून त्यात शून्य टक्के उपयुक्त जलसाठा आहे. काही दिवसात इतर जलाशये रिकामी होतील.

७ मोठ्या प्रकल्पात १० टक्केपेक्षा कमी साठाअकोला जिल्ह्यातील काटेपूर्णा प्रकल्प (९.१९ टक्के), बुलडाणा जिल्ह्यातील खडकपूर्णा (० टक्के), यवतमाळ जिल्ह्यातील अरुणावती (८.८४ टक्के), इसापूर (३.९३ टक्के), नागपूर जिल्ह्यातील गोसीखुर्द (१०.०३ टक्के), गडचिरोली जिल्ह्यातील दिना (० टक्के) आणि चंद्रपूर जिल्ह्यातील असोलामेंढा (० टक्के) या ७ जलाशयांमध्ये १० टक्केपेक्षा कमी जलसाठा आहे.

टॅग्स :Waterपाणी