शहरं
Join us  
Trending Stories
1
पर्यावरणप्रेमींच्या तीव्र विरोधासमोर केंद्र सरकार झुकलं, ‘अरवली’ला वाचवण्यासाठी घेतला मोठा निर्णय   
2
बीडच्या ‘सह्याद्री देवराई’ला भीषण आग; अभिनेते सयाजी शिंदे यांनी जोपासलेली हजारो झाडे संकटात
3
थायलंड-कंबोडिया सीमेवरील विष्णूची मूर्ती बुलडोझरने पाडली, भारताने घेतला तीव्र आक्षेप  
4
बांगलादेशमध्ये हिंसाचार सुरूच, पेट्रोल बॉम्ब हल्ल्यानंतर आता मध्यरात्री ढाका विद्यापीठात मोडतोड
5
नाताळाच्या पूर्वसंध्येला बांगलादेशची राजधानी हादरली, पेट्रोल बॉम्बच्या स्फोटात एकाचा मृत्यू
6
नवीन वर्षात बदलणार काँग्रेसचं 'पॉवर' समीकरण; प्रियांका गांधींना मिळणार महत्त्वाची जबाबदारी
7
IPL 2026 आधीच RCBच्या स्टार खेळाडूला होणार अटक? तब्बल ५ कोटी मोजून घेतलंय संघात
8
पोलिसांवर गुन्हा दाखल करण्याच्या मागणीसाठी सक्षम ताटेची आई व प्रेयसीचा आत्मदहनाचा प्रयत्न, दिला निर्वाणीचा इशारा...
9
‘प्लॅन २०४९’, चीनची भारताच्या अरुणाचल प्रदेशवर नजर, लष्करी बळावर कब्ज्याची तयारी
10
"आम्हाला मतदान केलं तर प्रश्न सोडवू, पण दुसरीकडे केलं तर..."; नितेश राणेंचा मतदारांना इशारा
11
VIDEO: धावत्या ट्रेनमध्ये WWE स्टाईल राडा! 'इंटरसिटी'मध्ये प्रवाशांमध्ये तुफान हाणामारी
12
Sukesh Chandrashekhar : "माय लव्ह, हे तेच घर आहे जे..."; जेलमध्ये असलेल्या सुकेशने जॅकलिनला गिफ्ट केला आलिशान बंगला
13
Vijay Hazare Trophy: ४०० हून अधिक धावांचं लक्ष्य ४७.३ षटकांतच गाठलं, कर्नाटकच्या संघाची इतिहासात नोंद!
14
'मला पंतप्रधान मोदींना भेटायचे आहे', उन्नाव बलात्कार पीडिता राहुल गांधींना म्हणाली...
15
प्रेमविवाह फसला; लग्नाच्या दुसऱ्या दिवसापासून जोडपे झाले वेगळे, ८ दिवसांत घटस्फोट
16
Smartphones: २०२५ मधील 'टॉप ५' पैसा वसूल स्मार्टफोन, यादीत मोठ्या ब्रँड्सचा समावेश!
17
रेल्वे प्रवासादरम्यान माजी मंत्र्यांच्या बॅगवर चोरांचा डल्ला, फोन, रोख रक्कम आणि दागिने लंपास
18
इंडिगोच्या वर्चस्वाला धक्का; केंद्र सरकारकडून ‘या’ दोन नव्या विमान कंपन्यांना मान्यता
19
Prashant Jagtap Resignation: २७ वर्षांची साथ सोडली; प्रशांत जगतापांचा राष्ट्रवादी शरद पवार पक्षाला रामराम
20
“राहुल गांधींसारखे पार्ट टाइम राजकारणी होऊ नका, कठोर मेहनत घेत राहा”; नितीन नबीन यांचा संदेश
Daily Top 2Weekly Top 5

विकलेला मका परत घेणार नाही

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 2, 2020 05:00 IST

लॉट एंट्री न झाल्याचे कारण दाखवून महाराष्ट्र राज्य सहकारी आदिवासी विकास महामंडळाच्या उपप्रादेशिक कार्यालयाने शेतकऱ्यांना मका परत नेण्यासंदर्भात पत्र पाठविले आहे. परंतु शेतकऱ्यांनी आक्रमक पवित्रा घेतला असून खरेदी केंद्रावर विक्री केलेला मका परत घेणार नाही, अशी भूमिका घेतली आहे. या संदर्भातील निवेदन अन्न नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ व धानोरा येथील उपव्यवस्थापकांना दिले आहे.

ठळक मुद्देउपव्यवस्थापकांना निवेदन : धानोरा तालुक्यातील शेतकरी आक्रमक

लोकमत न्यूज नेटवर्कधानोरा : तालुक्यातील शेतकऱ्यांनी यावर्षीच्या उन्हाळ्यात आधारभूत खरेदी केंद्रावर मक्याची विक्री केली होती. परंतु लॉट एंट्री न झाल्याचे कारण दाखवून महाराष्ट्र राज्य सहकारी आदिवासी विकास महामंडळाच्या उपप्रादेशिक कार्यालयाने शेतकऱ्यांना मका परत नेण्यासंदर्भात पत्र पाठविले आहे. परंतु शेतकऱ्यांनी आक्रमक पवित्रा घेतला असून खरेदी केंद्रावर विक्री केलेला मका परत घेणार नाही, अशी भूमिका घेतली आहे. या संदर्भातील निवेदन अन्न नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ व धानोरा येथील उपव्यवस्थापकांना दिले आहे.व्यापाऱ्यांकडून पिळवणूक होऊ नये तसेच मक्याची विक्री करणे सोयीचे व्हावे, यासाठी तालुक्यातील धानोरा, पेंढरी, मुरूमगाव येथे मका खरेदी केंद्र उन्हाळ्यात सुरू करण्यात आले. तसेच ग्रामीण भागातील शेतकऱ्यांना सोयीचे व्हावे यासाठी पेंढरी जि. प. सर्कलमध्ये २५ ते ३० जुलैैपर्यंत पयडी व झाडापापडा येथे मका खरेदी करण्यात आला. परंतु तालुक्यातील १६ शेतकऱ्यांनी विक्री केलेल्या मक्याचे चुकारे मिळाले नाही. त्याकरिता केंद्र सरकारच्या एनईएमएल पोर्टलवर लॉट एंट्री न झाल्याचे कारण दाखवून उपप्रादेशिक कार्यालयाकडून शेतकºयांना पत्र पाठवून आपला मका परत घेऊन जावा, अशी माहिती देण्यात आली. त्यामुळे शेतकरी चिंताग्रस्त असून वेळेवर मका विकावा कुठे या विवंचनेत आहेत. पन्नेमारा, येरकड, कनेली, पेंढरी, पळसगाव, मोहगाव, रांगी, वडगाव, ढवळी, धानोरा, पयडी, झाडापापडा येथील शेतकऱ्यांना मका परत नेण्याबाबत उपप्रादेशिक कार्यालयाने पत्र दिले आहे. या सर्व शेतकऱ्यांनी एकूण १ हजार १७६.५० क्विंटल मका विक्री केला आहे. शेतकऱ्यांनी आधारभूत केंद्रावर विकलेला मक्याचे चुकारे लवकर द्यावे, अशी मागणी आनंदीबाई गावडे, मसरू टेकाम, गांडो आतला, मेहताब कुदराम, चमरू समरथ, मंगेश आतला, जयंती लकडा, परमेश्वर गावडे यांच्यासह अन्य शेतकऱ्यांनी केली.पोर्टलवर नोंद करण्याची जबाबदारी कुणाची?शेतकऱ्यांनी आपल्या मक्याची विक्री होऊन दोन महिने झाले व आता मका परत न्या म्हणून पत्र का देण्यात आले. शेतकऱ्यांनी वेळेवर आपला माल विकावा कुठे, असा प्रश्न उपस्थित केला आहे. शासनाने दिलेल्या मुदतीत मक्याची विक्री शेतकऱ्यांनी केली व केंद्रांनी खरेदीसुद्धा केली. माल खरेदीनंतर पोर्टलवर माहिती टाकण्याची जबाबदारी संबंधित कर्मचाऱ्याची आहे. यात शेतकऱ्यांची काय चुक? असा प्रश्न शेतकरी करीत आहेत. जबाबदार कर्मचाऱ्यावर कारवाई करून शेतकऱ्यांच्या मक्याचे चुकारे अदा करावे, अशी मागणी धानोरा तालुक्यातील शेतकऱ्यानी केली आहे.

 

टॅग्स :agricultureशेती