शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताचा आशिया चषकावर विजयी 'तिलक'; पाकिस्तानला सलग तिसऱ्यांदा नमवले! कुलदीप, तिलक यांचे मोलाचे योगदान
2
लेहमध्ये सलग पाचव्या दिवशी सर्वत्र संचारबंदी; सोनम वांगचुक यांची त्वरित सुटका करण्याची देशभरातून मागणी
3
मोबाइलसारखीच लवकरच  बदलता येईल गॅसची कंपनी; काय बदल होणार? जाणून घ्या
4
आता पूर ओसरेल, मदत मिळेल... पण शेतकऱ्यांसमोर ३ वर्षे संकट! पुराने पळविले जमिनीचे पोषण, पुढील हंगामात धोका
5
विजयसाठी झुंबड ठरली जीवघेणी; तामिळनाडूच्या चेंगराचेंगरीतील मृतांची संख्या ४०वर
6
IND vs PAK Asia Cup Final : दुबईत विजयाचा जल्लोष झाला; पण टीम इंडियानं बहिष्कारानं केला शेवट; नेमकं काय घडलं?
7
केवळ ३.९ टक्के महिलाच रोज करतात व्यायाम : सामाजिक मानसिकता बदलल्याशिवाय महिलांचा फिटनेस अशक्य
8
१७ विद्यार्थिनींचे लैंगिक शोषण, ‘बाबा’ अखेर अटकेत; आग्रा येथून घेतले ताब्यात 
9
‘साधी तक्रार पुरेशी नाही; ती पत्नीछळाचा गुन्हा ठरत नाही’; सर्वोच्च न्यायालयाने काय म्हटले?
10
क्रिकेटपटू, अभिनेते येणार आणखी अडचणीत;  ऑनलाइन बेटिंगप्रकरणी मालमत्तेवर येणार टाच
11
IND vs PAK: आधी 'सिंदूर', आता विजय 'तिलक'! भारताने आशिया कप जिंकला, पाकिस्तान पराभूत
12
IND v PAK: हिंदुस्थान झिंदाबाद! भारत जिंकल्यावर काश्मीरमध्ये लष्करी जवान, नागरिकांचा जल्लोष
13
कोस्टल रोडवर पुन्हा अपघात; कारच्या धडकेत दोघे जखमी
14
IND vs PAK: "खेळाच्या मैदानात 'ऑपरेशन सिंदूर' आणि..."; पंतप्रधान मोदींनी पाकिस्तानला डिवचलं
15
IND vs PAK : सिक्सर मारला तिलक वर्मानं अन् चर्चा गौतम गंभीरची; ड्रेसिंग रुममधील व्हिडिओ व्हायरल
16
IND vs PAK Final : अडचणीत आणणाऱ्या पाकला नडला! तिलक वर्माची कडक फिफ्टी!
17
VIDEO: हिशेब चुकता... हॅरिस रौफची दांडी गुल केल्यावर जसप्रीत बुमराहचं 'मिसाईल' सेलिब्रेशन
18
Suryakumar Yadav Out Or Not Out : सूर्याचा कॅच नीट पकडला की, पाक कॅप्टनकडून चिटींग? (VIDEO)
19
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या बाल व शिशू स्वयंसेवकांचा विजयादशमी उत्सव उत्साहात संपन्न
20
सांगलीत चारित्र्याच्या संशयातून पत्नीची गळा चिरून हत्या, मग पती स्वत:हून पोलिस ठाण्यात हजर

२२ गावांमध्ये लागले सौरदिवे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 18, 2020 06:00 IST

भामरागड, अहेरी व एटापल्ली हे तालुके आदिवासी बहुल आहेत. या तालुक्यामधील गावे घनदाट जंगलांनी व डोंगरदऱ्यांनी वेढली आहेत. त्यामुळे काही गावांमध्ये पारंपरिक वीज पोहोचविणे कठीण आहे. जिल्ह्यातील जवळपास दीडशे गावांपर्यंत अजुनही वीज पोहोचली नाही. यामध्ये प्रामुख्याने भामरागड तालुक्यातील ५४, एटापल्ली तालुक्यातील १९ व अहेरी तालुक्यातील पाच गावांमध्ये वीज पोहोचली नाही.

ठळक मुद्देस्वयंसेवी संस्थांचा उपक्रम : दुर्गम भागातील गावे प्रकाशली

लोकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली : आदर्श मित्र मंडळ, धनकवडी पुणे व श्रीलक्ष्मी नृसिंह पतसंस्था बल्लारपूर तसेच आधार फाऊंडेशन यांच्या संकल्पनेतून गडचिरोली जिल्ह्यातील एटापल्ली, अहेरी, भामरागड या तीन तालुक्यांमधील २२ गावांमध्ये सौरपथदिवे लावण्यात आले आहेत. पुन्हा जवळपास २५ गावांमध्ये अशा प्रकारचे पथदिवे लावले जातील, अशी माहिती डॉ. चरणजितसिंग सलुजा यांनी पत्रकार परिषदेत दिली.भामरागड, अहेरी व एटापल्ली हे तालुके आदिवासी बहुल आहेत. या तालुक्यामधील गावे घनदाट जंगलांनी व डोंगरदऱ्यांनी वेढली आहेत. त्यामुळे काही गावांमध्ये पारंपरिक वीज पोहोचविणे कठीण आहे. जिल्ह्यातील जवळपास दीडशे गावांपर्यंत अजुनही वीज पोहोचली नाही. यामध्ये प्रामुख्याने भामरागड तालुक्यातील ५४, एटापल्ली तालुक्यातील १९ व अहेरी तालुक्यातील पाच गावांमध्ये वीज पोहोचली नाही. प्रत्यक्ष वीज खांब गाडून वीज पोहोचविणे कठीण असल्याने या गावांना सौरदिवे वाटप करण्याचा निर्णय घेतला. २२ गावांमध्ये प्रत्येकी एक याप्रमाणे सौर पथदिवे लावण्यात आले आहेत. तसेच पाच शाळांमध्येही पथदिवे लावले आहेत. तसेच १ हजार १३५ कुटुंबांना सौरदिवे देण्यात आले आहेत. या उपक्रमासाठी पुणे येथील अतुल बेहरे, मंदार बोरकर, दत्तात्रय दारवटकर, विश्वनाथ परदेशी, प्रसाद साप्ते, शारदाबाई नरवा, रत्नप्रभा गिरे, राजेश गिरे, श्रीस्वामी समर्थ ब्राह्मण सेवा संघ नारायणगाव, लक्ष्मीबाई दगडूशेठ हलवाई दत्त मंदिर ट्रस्ट पुणे तसेच स्व. पंडीत वाघ, रूचा वैद्य, मोहन हुल्याळकर, उज्वला देशपांडे यांच्या स्मृतीप्रित्यर्थ त्यांच्या कुटुंबियांनी मदत केली, अशी माहिती डॉ. चरणजितसिंग सलुजा यांनी दिली. पत्रकार परिषदेला श्रीनिवास सुंचूवार, चेतन गायकवाड हजर होते.ही आहेत सौरपथदिवे लागलेली गावे....भामरागड तालुक्यातील तुमरकोठ, तोयनार, मरकनार, मुरूमभिशी, खारडी, कोरपर्शी, कुचेर, मुतेरकुई, अहेरी तालुक्यातील कचलेर, हिनभट्टी, आंबेझरा, तोंडेल, येलचिल टोला, एटापल्ली तालुक्यातील आबारपल्ली, बुर्गी, गुंडापुरी, गोसूमटोला, मासूमटोला या गावांमध्ये वीज पोहोचविण्यात आली आहे.