शहरं
Join us  
Trending Stories
1
आता डिप्लोमसीला काहीच अर्थ राहिला नाही; इस्रायलने हल्ला केला तेव्हाच..., इराणी परराष्ट्र मंत्र्यांचा युरोपवर आरोप
2
"लवकरात लवकर शांतता निर्माण करण्याची गरज"; अमेरिकेच्या हल्ल्यानंतर PM मोदींची इराणच्या राष्ट्राध्यक्षांशी चर्चा
3
आम्ही या ठिकाणांवर हल्ला करतोय...! अमेरिकेने एक दिवस आधीच इराणला दिलेली कल्पना...
4
इराणवरील अमेरिकेच्या हल्ल्यानंतर पाकिस्तानची पहिली प्रतिक्रिया, काय म्हणाला?
5
अणुबॉम्ब केवळ बहाणा, इराणवर हल्ला करण्यामागचा डोनाल्ड ट्रम्प यांचा खरा हेतू वेगळाच, समोर येतेय अशी माहिती
6
सोमवारी प्रदोष शिवरात्रि: पितृदोषातून दिलासा, शिवपूजेसह ‘या’ गोष्टी करून पाहा, चांगले घडेल!
7
७ महिन्यांत १ लाखाचे झाले ३.५ लाख! 'या' डिफेन्स स्टॉकने गुंतवणूकदारांना केलं कोट्यधीश, आता तुमची पाळी?
8
सोमवारी प्रदोष शिवरात्रि: इच्छा पूर्ण होतील, महादेव शुभ करतील; अद्भूत योगात ‘असे’ करा व्रत!
9
खामेनी यांनी राजीनामा द्यावा अन्यथा..; अमेरिकेच्या हल्ल्यानंतर इराणच्या माजी प्रमुखाचा इशारा
10
रात्री तो येतो आणि सकाळी जातो...! घरमालकाने महिलेच्या पतीला फोन करून कळविले, पती येताच...
11
ITR भरताना 'या' २ चुकांमुळे अडकतात पैसे! नाही मिळणार रिफंड, प्राप्तीकर विभागाने अंतिम मुदत वाढवली
12
पहलगाममध्ये दहशतवाद्यांना केली मदत, दिला आश्रय, दोघे अटकेत, तपासातून धक्कादायक माहिती समोर
13
इराणला आधीच लागली होती हल्ल्याची कुणकुण? अणुकेंद्रांच्या सॅटेलाईट फोटोमधून अशी माहिती आली समोर
14
इराण-इस्रायल युद्धातही भारताची 'स्मार्ट' चाल! रशियाच्या सहकार्याने कच्च्या तेलाचं गणित बदललं
15
अमेरिकेचा इराणवर हल्ला; चीन, जपान, ओमान..; कोण काय म्हणाले? जाणून घ्या...
16
४ हजार सायकल स्वारांची दिंडी; राज्याच्या 80 शहरातून निघालेली दिंडी पंढरपुरात विसावली
17
बॉम्ब फोडूनही अमेरिका काही करू शकली नाही! ३७ तास हवेतच होते ६ बी२ बॉम्बर..., इराण म्हणतेय...
18
आतापर्यंत इस्रायली हल्ल्यात इराणचे किती लोक मारले गेले? आकडा जाणून थक्क व्हाल! खामेनेई सैनिकांकडूनही जोरदार प्रत्युत्तर
19
ट्रम्प यांच्या 'या' निर्णयाने जागतिक अर्थव्यवस्थेला धक्का? तुमच्या खिशावर काय परिणाम होणार?
20
जगाचे 'लॉजिस्टिक्स' बदलणाऱ्या अवलियाचे निधन! मालवाहतुकीसाठी पहिल्यांदाच केला असा प्रयोग

हत्तींना काम नाही म्हणून ते वनविभागाला झाले नकोसे!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 1, 2022 14:04 IST

हत्ती हे वनविभागासाठी अभिमानास्पद असताना हत्ती आर्थिकदृष्ट्या परवडत नाही, असे म्हणणे ही बाब लाजिरवाणी असल्याचे संस्थेने म्हटले आहे.

ठळक मुद्देग्रीन प्लॅनेट सोसायटीची खंत, मुख्यमंत्र्यांना पत्र

गडचिरोली : चंद्रपूर आणि गडचिरोली येथील १३ हत्तींचे स्थानांतरण करण्याचे आदेश वनविभागाला आले आहेत. गडचिरोलीत सर्व स्तरातून याला विरोध होत असताना आता ग्रीन प्लॅनेट सोसायटीनेही मुख्यमंत्री, तसेच प्रोजेक्ट एलिफंट डिव्हिजन आणि सेंट्रल झू ॲथाॅरिटी यांना पत्र पाठवून आपला विरोध दर्शविला, तसेच काही मार्गदर्शक सूचनाही केल्या आहेत. आज या हत्तींना काम नाही म्हणून ते वनविभागाला नकोसे झाले, अशी खंतही या संस्थेने व्यक्त केली.

प्रधान मुख्य वनसंरक्षकांनी २३ नोव्हेंबर २०२१ रोजी ताडोबाचे क्षेत्र संचालक आणि गडचिरोलीचे वनसंरक्षक यांना पत्र लिहून १३ हत्तींचे स्थानांतरण जामनगर (गुजरात)च्या राधेकृष्ण टेम्पल वेल्फेअर ट्रस्टला सुपूर्द करण्याची प्रक्रिया पूर्ण करण्याचे आदेश दिले आहेत. हे आदेश देताना त्यांनी केंद्र सरकारच्या विभागांसह महाराष्ट्र शासनाकडूनही त्याबाबत परवानगी मिळाल्याचा उल्लेख केला आहे. यामुळे या सर्व हालचालींची राज्य शासनाला कल्पना असल्याचे स्पष्ट होते. शासनाने हत्तींना बंदिस्त संग्रहालयात नेण्याऐवजी त्यांच्या नैसर्गिक अधिवासात राहू द्यावे, अशी विनंती ग्रीन प्लॅनेट सोसायटीचे अध्यक्ष प्रा. सुरेश चोपणे, कोषाध्यक्ष प्रा. योगेश दुधपचारे आणि सदस्य प्रा. सचिन वझलवार, आदींनी केली आहे.

वन्यजीव विभाग म्हणते, हत्ती पोसायला पैसे नाही

राज्य वन्यजीव विभागाच्या मते कॅम्पमधील सर्व हत्ती निरुत्पादक आणि अप्रशिक्षित आहेत. वन्यजीव विभाग प्रमुखांनी काही प्रसार माध्यमांशी बोलताना ताडोबा आणि गडचिरोली येथे हत्तींची काळजी घ्यायला, त्यांना खाऊ घालायला वनविभागाकडे पैसे नाहीत, त्यांची काळजी घ्यायला पुरेसे कर्मचारी नाहीत असे म्हटले आहे. याला ग्रीन प्लॅनेट सोसायटी या पर्यावरण आणि वन्यजीव क्षेत्रात कार्य करणाऱ्या संस्थेने आक्षेप घेतला आहे. हत्ती हे वनविभागासाठी अभिमानास्पद असताना हत्ती आर्थिकदृष्ट्या परवडत नाही, असे म्हणणे ही बाब लाजिरवाणी असल्याचे संस्थेने म्हटले आहे.

...म्हणून हत्ती येथे राहिले पाहिजेत

१) प्राचीन काळापासून गडचिरोली, चंद्रपूर आणि विदर्भ हा हत्तींचा मूळ अधिवास आहे. गोंड राजाच्या राजचिन्हावरही हत्ती आहे. अधूनमधून गडचिरोलीत जंगली हत्ती येत असतात. त्यामुळे चंद्रपूर आणि गडचिरोली येथील पाळीव हत्ती नैसर्गिक अधिवासात सुरक्षित राहू शकतात. हे हत्ती महाराष्ट्रातील वनात असणे अभिमानास्पद आहे.

२) कमलापूरचे हत्ती पाहण्यासाठी विदर्भातील आणि तेलंगणातील नागरिक येतात. पर्यटन विकास केला तर हत्तीसाठी पुरेसे मनुष्यबळ आणि आर्थिक मदत सहज उपलब्ध होऊ शकते. पर्यटनातून येणाऱ्या पैशावर हत्तींचे संरक्षण, कर्मचारी आणि औषधोपचार सहज करता येईल.

३) गडचिरोलीत वन्यजीवांच्या सर्वाधिक शिकारींच्या घटना घटत असत. परंतु आता जागरूकतेने सर्व ग्रामीण, आदिवासी नागरिक आणि वन्यजीव संस्था एकत्र येऊन हत्ती हलविण्यास विरोध करू लागले आहेत. या निमित्ताने हत्ती आणि वन्यजीवांसाठी वाढते प्रेम पाहून वन्यजीव - मानव संघर्ष कमी होण्यास मदत होईल.

टॅग्स :Governmentसरकारforest departmentवनविभाग