शहरं
Join us  
Trending Stories
1
Waves Summit 2025 मध्ये मुख्यमंत्री फडणवीसांच्या उपस्थितीत ८००० कोटींचे सामंजस्य करार
2
'पहलगाम हल्ल्याबाबत सरकारचे धोरण स्पष्ट नाही', मल्लिकार्जुन खरगेंचा केंद्रावर निशाणा
3
Pahalgam Terror Attack : पाकिस्तानी क्रिकेटरनंतर आता पंतप्रधान शहबाज शरीफ यांच्यावरही भारताचे डिजिटल स्ट्राइक
4
'दोन महिन्यांचे राशन साठवून ठेवा', भारताच्या कारवाईने घाबरेल्या पाकिस्तानचे जनतेला आवाहन
5
Heavy Rain In Jammu & Kashmir : जम्मू-कश्मिरात मुसळधार पाऊस, पाकिस्तानचं टेन्शन वाढवलं! ...तर पुराच्या पाण्यात वाहून जाईल PoK
6
भरधाव कंटेनरने दोन कारला उडविले; पुण्यातील तीन भाविकांचा मृत्यू
7
हिंदू म्हणून गोळ्या झाडल्या, शुद्ध आल्यावर शेजारी मृतदेह पाहिले; सुबोध पाटलांचा थरारक अनुभव
8
श्रीनगरमधील दल सरोवरात वेगवान वाऱ्यांमुळे बोट उलटली, पर्यटकांकडून मदतीसाठी आरडाओरडा
9
उल्हासनगरात बांगलादेशी नागरिक सापडण्याचे सत्र सुरूच, तीन दिवसात ९ बांगलादेशी नागरिकांना अटक 
10
नॅशनल हेराल्ड प्रकरण; राहुल आणि सोनिया गांधींच्या अडचणी वाढल्या, कोर्टाने बजावली नोटीस
11
शिखर धवनने दिली प्रेमाची कबुली..!! कोण आहे Sophie Shine? पहिली भेट कशी झाली?
12
एजाज खानचा 'हाऊस अरेस्ट' शो बंद होणार? महिला आयोगाचं थेट पोलीस महासंचालकांना पत्र
13
“भावाला न्याय मिळत नाही तोपर्यंत चप्पल घालणार नाही”; संतोष देशमुख यांच्या बहिणीचा निर्धार
14
लग्न ठरलं, साखरपुडा झाला, शरीरसंबंधही ठेवले, त्यानंतर... मुंबई इंडियन्सकडून खेळलेल्या खेळाडूवर गंभीर आरोप  
15
पहलगाममधील हल्ल्याचं निमित्त, पूजा करायची असल्याचे सांगून पुजाऱ्याला गंडा, बँक खातं केलं साफ     
16
“जातनिहाय जनगणनेचा मुद्दाही सुप्रीम कोर्टात जाईल, १० वर्षे तरी...”; वकिलांनी कायदाच सांगितला
17
OLA Electric ची डोकेदुखी वाढली, इनसाइडर ट्रेडिंग प्रकरणी SEBI कडून तपास; प्रकरण काय?
18
"मी माझ्या पत्नीवर खरं प्रेम केलं होतं पण तिने..."; तरुणाने Video बनवून स्वत:वर झाडली गोळी
19
"अनेकांची झोप उडवेल आजचा कार्यक्रम, जेथे मेसेज जायला हवा होता, तेथे पोहोचला"; नेमकं काय म्हणाले पीएम मोदी
20
भारतीयांवर लक्ष्मी प्रसन्न! लोकांनी तीन वर्षात 'यु ट्यूब'वरून कमावले तब्बल 21000 कोटी

हत्तींना काम नाही म्हणून ते वनविभागाला झाले नकोसे!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 1, 2022 14:04 IST

हत्ती हे वनविभागासाठी अभिमानास्पद असताना हत्ती आर्थिकदृष्ट्या परवडत नाही, असे म्हणणे ही बाब लाजिरवाणी असल्याचे संस्थेने म्हटले आहे.

ठळक मुद्देग्रीन प्लॅनेट सोसायटीची खंत, मुख्यमंत्र्यांना पत्र

गडचिरोली : चंद्रपूर आणि गडचिरोली येथील १३ हत्तींचे स्थानांतरण करण्याचे आदेश वनविभागाला आले आहेत. गडचिरोलीत सर्व स्तरातून याला विरोध होत असताना आता ग्रीन प्लॅनेट सोसायटीनेही मुख्यमंत्री, तसेच प्रोजेक्ट एलिफंट डिव्हिजन आणि सेंट्रल झू ॲथाॅरिटी यांना पत्र पाठवून आपला विरोध दर्शविला, तसेच काही मार्गदर्शक सूचनाही केल्या आहेत. आज या हत्तींना काम नाही म्हणून ते वनविभागाला नकोसे झाले, अशी खंतही या संस्थेने व्यक्त केली.

प्रधान मुख्य वनसंरक्षकांनी २३ नोव्हेंबर २०२१ रोजी ताडोबाचे क्षेत्र संचालक आणि गडचिरोलीचे वनसंरक्षक यांना पत्र लिहून १३ हत्तींचे स्थानांतरण जामनगर (गुजरात)च्या राधेकृष्ण टेम्पल वेल्फेअर ट्रस्टला सुपूर्द करण्याची प्रक्रिया पूर्ण करण्याचे आदेश दिले आहेत. हे आदेश देताना त्यांनी केंद्र सरकारच्या विभागांसह महाराष्ट्र शासनाकडूनही त्याबाबत परवानगी मिळाल्याचा उल्लेख केला आहे. यामुळे या सर्व हालचालींची राज्य शासनाला कल्पना असल्याचे स्पष्ट होते. शासनाने हत्तींना बंदिस्त संग्रहालयात नेण्याऐवजी त्यांच्या नैसर्गिक अधिवासात राहू द्यावे, अशी विनंती ग्रीन प्लॅनेट सोसायटीचे अध्यक्ष प्रा. सुरेश चोपणे, कोषाध्यक्ष प्रा. योगेश दुधपचारे आणि सदस्य प्रा. सचिन वझलवार, आदींनी केली आहे.

वन्यजीव विभाग म्हणते, हत्ती पोसायला पैसे नाही

राज्य वन्यजीव विभागाच्या मते कॅम्पमधील सर्व हत्ती निरुत्पादक आणि अप्रशिक्षित आहेत. वन्यजीव विभाग प्रमुखांनी काही प्रसार माध्यमांशी बोलताना ताडोबा आणि गडचिरोली येथे हत्तींची काळजी घ्यायला, त्यांना खाऊ घालायला वनविभागाकडे पैसे नाहीत, त्यांची काळजी घ्यायला पुरेसे कर्मचारी नाहीत असे म्हटले आहे. याला ग्रीन प्लॅनेट सोसायटी या पर्यावरण आणि वन्यजीव क्षेत्रात कार्य करणाऱ्या संस्थेने आक्षेप घेतला आहे. हत्ती हे वनविभागासाठी अभिमानास्पद असताना हत्ती आर्थिकदृष्ट्या परवडत नाही, असे म्हणणे ही बाब लाजिरवाणी असल्याचे संस्थेने म्हटले आहे.

...म्हणून हत्ती येथे राहिले पाहिजेत

१) प्राचीन काळापासून गडचिरोली, चंद्रपूर आणि विदर्भ हा हत्तींचा मूळ अधिवास आहे. गोंड राजाच्या राजचिन्हावरही हत्ती आहे. अधूनमधून गडचिरोलीत जंगली हत्ती येत असतात. त्यामुळे चंद्रपूर आणि गडचिरोली येथील पाळीव हत्ती नैसर्गिक अधिवासात सुरक्षित राहू शकतात. हे हत्ती महाराष्ट्रातील वनात असणे अभिमानास्पद आहे.

२) कमलापूरचे हत्ती पाहण्यासाठी विदर्भातील आणि तेलंगणातील नागरिक येतात. पर्यटन विकास केला तर हत्तीसाठी पुरेसे मनुष्यबळ आणि आर्थिक मदत सहज उपलब्ध होऊ शकते. पर्यटनातून येणाऱ्या पैशावर हत्तींचे संरक्षण, कर्मचारी आणि औषधोपचार सहज करता येईल.

३) गडचिरोलीत वन्यजीवांच्या सर्वाधिक शिकारींच्या घटना घटत असत. परंतु आता जागरूकतेने सर्व ग्रामीण, आदिवासी नागरिक आणि वन्यजीव संस्था एकत्र येऊन हत्ती हलविण्यास विरोध करू लागले आहेत. या निमित्ताने हत्ती आणि वन्यजीवांसाठी वाढते प्रेम पाहून वन्यजीव - मानव संघर्ष कमी होण्यास मदत होईल.

टॅग्स :Governmentसरकारforest departmentवनविभाग