लोकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली : कोरोना रोग नियंत्रणाच्या कर्तव्यावर असलेल्या अधिकारी व कर्मचाऱ्यांचा मृत्यू झाल्यास किंवा अपघाती मृत्यू झाल्यास संबंधित कर्मचाºयाच्या कुटुंबाला ५० लाख रुपयांचे सानुग्रह अनुदान देण्यात यावे, अशी मागणी राज्य सरकारी कर्मचारी मध्यवर्ती संघटना जिल्हा शाखा गडचिरोलीच्या वतीने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे करण्यात आली.यासंदर्भात जिल्हाधिकाऱ्यांमार्फत मुख्यमंत्र्यांसह महसूल मंत्री बाळासाहेब थोरात तसेच जिल्ह्याचे पालकमंत्री विजय वडेट्टीवार यांनाही निवेदन देण्यात आहे. निवेदनावर संघटनेचे जिल्हाध्यक्ष एस.पी.चडगुलवार, अध्यक्ष लतिप पठाण आदींच्या स्वाक्षऱ्या आहेत.निवेदनात म्हटल्यानुसार, महाराष्ट्र कोरोनामुक्त करण्यासाठी केंद्र शासनाने जनता कर्फ्यु, संचारबंदी, फिजिकल डिस्टन्स, २१ दिवसांचे लॉकडाऊन, त्यानंतर १९ दिवसांचे लॉकडाऊन घोषित केले आहे. कोरोना संसर्गाला हरविण्यासाठी आपतकालीन प्रतिबंधात्मक उपाययोजनेची अंमलबजावणी शासनाच्या वतीने केली जात आहे. त्याअनुषंगाने जिल्हा आपत्ती व्यवस्थापन कक्षामध्ये नियंत्रण अधिकारी/कर्मचारी तसेच तालुक्यातील आपत्ती निवारनार्थ इन्सिडंट कमांडर म्हणून महसूल विभागातील तहसीलदार, नायब तहसीलदार, अव्वल कारकून, मंडळ अधिकारी, लिपीक, तलाठी, शिपाई, कोतवाल तसेच इतर कार्यालयात अधिकारी व कर्मचाºयांवर जबाबदारी सोपविण्यात आली आहे.निवेदन देताना महसूल कर्मचारी संघटनेचे राज्य उपाध्यक्ष तथा जिल्हाध्यक्ष चंदू प्रधान, देवा निकुरे, नाना ठाकरे, विशाल खरतडे, गणेश गेडाम, धीरज जुमनाके आदींसह इतर पदाधिकारी उपस्थित होते.
-तर कर्मचाऱ्यांच्या कुटुंबाला ५० लाखांचे अनुदान द्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 30, 2020 05:00 IST
यासंदर्भात जिल्हाधिकाऱ्यांमार्फत मुख्यमंत्र्यांसह महसूल मंत्री बाळासाहेब थोरात तसेच जिल्ह्याचे पालकमंत्री विजय वडेट्टीवार यांनाही निवेदन देण्यात आहे. निवेदनावर संघटनेचे जिल्हाध्यक्ष एस.पी.चडगुलवार, अध्यक्ष लतिप पठाण आदींच्या स्वाक्षऱ्या आहेत. निवेदनात म्हटल्यानुसार, महाराष्ट्र कोरोनामुक्त करण्यासाठी केंद्र शासनाने जनता कर्फ्यु, संचारबंदी, फिजिकल डिस्टन्स, २१ दिवसांचे लॉकडाऊन, त्यानंतर १९ दिवसांचे लॉकडाऊन घोषित केले आहे.
-तर कर्मचाऱ्यांच्या कुटुंबाला ५० लाखांचे अनुदान द्या
ठळक मुद्देकर्मचारी संघटनेची मागणी : कोरोनाविरूद्धच्या लढ्यासाठी अग्रेसर