शहरं
Join us  
Trending Stories
1
"दहशतवाद्यांनी कल्पनाही केली नसेल त्यापेक्षा कठोर शिक्षा देणार"; बिहारमधून PM मोदींचा इशारा
2
फ्राईड राईसमध्ये जास्त पडलेल्या मीठानं जीव वाचवला; पहलगाम हल्ल्यातील पीडितांनी सांगितली आपबीती
3
कधीपर्यंत धर्म सांगून गोळ्या खात राहायच्या?; पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर शंकराचार्य स्वामी अविमुक्तेश्वरानंद काय बोलले?
4
काश्मीरमध्ये तणाव असतानाच छत्तीसगडमध्ये नक्षलवाद्यांवर मोठी कारवाई, १००० नक्षल्यांना जवानांनी घेरले, ५ ठार  
5
पहलगाम दहशतवादी हल्लाः पाकिस्तानी उच्चायोगात मागवण्यात आला केक; बॉक्स पाहून एकच प्रश्न, हे 'सेलिब्रेशन' कसलं?
6
Elphinstone Bridge: तारीख निश्चित! एल्फिन्स्टन ब्रिज २५ एप्रिलपासून वाहतुकीसाठी बंद, मुंबईकरांची कोंडी होणार
7
डोळ्यात अश्रू, कपड्यांवर रक्ताचे डाग..! दहशतवादी हल्ल्यात डोळ्यादेखत वडिलांना गमावलेल्या लेकीनेच केले अंत्यसंस्कार
8
Pahalgam Terror Attack : "माझ्या शुभमला परत आणा, मी माझं दुःख कोणाला सांगू, त्याने कोणाचं काय नुकसान केलं होतं?"
9
या सरकारी बँकेनं सुरू केलं लोन कॅम्पेन; कमी व्याजदर आणि शून्य चार्जेसवर मिळणार कर्ज, अखेरची तारीख कधी?
10
पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर खेळाडूही संतापले! सचिन तेंडुलकर ते नीरज चोप्रा.. कोण काय म्हणाले?
11
मुलगी झाली हो..! ; अभिनेता चिराग पाटील दुसऱ्यांदा झाला बाबा, पोस्ट शेअर करत दिली खुशखबर
12
Pahalgam Attack Video: दहशतवाद्यांनी पर्यटकांची अशी केली हत्या; गोळ्या झाडतानाचा व्हिडीओ समोर
13
Indus Waters Treaty: ६५ वर्षे जुना सिंधू पाणी करार काय आहे? पाकिस्तानवर किती परिणाम होईल?; वाचा सविस्तर
14
"मला पहलगाम दहशतवादी हल्ल्याबद्दल आधीच माहित होतं"; 'त्या' व्यक्तीचा पोलिसांना फोन अन्...
15
मोठा खुलासा! लेफ्टनंट विनयने दोन दहशतवाद्यांना पकडलेले; नौदलाचा अधिकारी धारातीर्थी पडला
16
"तुला ठार मारू’’, भारतीय क्रिकेट संघाचा प्रशिक्षक गौतम गंभीरला दहशतवादी संघटनेकडून धमकी
17
‘जीव वाचवण्यासाठी आम्ही…’मृत गनबोटेंच्या पत्नीने शरद पवारांना सांगितला अंगावर काटा आणणारा अनुभव
18
दहशतवादी हल्ल्यातील मृतांच्या कुटुंबियांना इन्शुरन्स क्लेम मिळतो का? काय आहेत विमा नियम?
19
Mumbai Water Cut: मुंबईकरांनो पाणी जपून वापरा! २६ एप्रिलपासून 'या' भागांत २४ तास पाणीपुरवठा राहणार बंद
20
मित्राकडून महागडं गिफ्ट घेतलं तर द्यावा लागू शकतो Tax! ९०% लोकांना Gift वरील टॅक्सचा नियमच माहीत नाही

...तर फडणवीस यांनी गडचिरोलीचे पालकमंत्रीपद सोडावे, काँग्रेस नेते सुभाष धोटेंची मागणी

By संजय तिपाले | Updated: December 1, 2023 15:14 IST

जिल्ह्यात झालेल्या अवकाळी पावसाच्या पाहणीसाठी आमदार सुभाष धोटे जिल्ह्यात आले होते.

गडचिरोली: जिल्ह्यात रानटी हत्ती, वाघांनी धुडगूस घातला आहे. शेतकऱ्यांना पीकविम्याचा लाभ अन् अतिवृष्टीची भरपाई मिळत नाही, लोहवाहतुकीमुळे अपघात वाढले आहेत. जाचक वनकायद्यांमुळे विकासकामे अडली आहेत, पण उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस जिल्ह्यात येत नाहीत. त्यांना निष्क्रिय म्हणणार नाही, पण जमत नसेल तर त्यांनी पालकमंत्रीपद सोडावे व दुसऱ्या कोणाला तरी द्यावे, अशी मागणी काँग्रेसचे चंद्रपूरचे आमदार सुभाष धोटे यांनी येथे १ डिसेंबरला पत्रकार परिषदेत केली.

जिल्ह्यात झालेल्या अवकाळी पावसाच्या पाहणीसाठी आमदार सुभाष धोटे जिल्ह्यात आले होते. पाहणीनंतर त्यांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी माजी खासदार मारोतराव कोवासे, माजी आमदार डॉ. नामदेव उसेंडी. काँग्रेस जिल्हाध्यक्ष महेंद्र ब्राम्हणवाडे, प्रदेश महासचिव डॉ. नामदेव किरसान, महिला आघाडी जिल्हाध्यक्षा ॲड. कविता मोहरकर, युवक काँग्रेसचे प्रदेश सचिव विश्वजित कोवासे, शहराध्यक्ष सतीश विधाते, समशेर खान पठाण उपस्थित हाेते. 

यावेळी आमदार धोटे म्हणाले, जिल्ह्यात काँग्रेसचा एकही आमदार नाही. या भागातील लोकांचे प्रश्न समजून घेऊन विधिमंडळ अधिवेशनात मांडण्यासाठी जिल्ह्यात दौरा केला आहे.  ते म्हणाले, रानटी हत्ती, वाघांचा बंदोबस्त झाला पाहिजे. यासाठी काँग्रेसने चंद्रपूरमध्ये मोर्चा काढला. यावर ११ डिसेंबरला नागपूरला वनमंत्र्यांनी बैठक बोलावली आहे.

आदिवासींनी वनसंवर्धन केले म्हणजे म्हणजे पाप केले का असा सवाल करुन ते म्हणाले, विकासकामे करताना येणाऱ्या अडचणी दूर करण्यासाठी वन कायद्यात शिथिलता आली पाहिजे. याकरता लोकप्रतिनिधींनी बोलले पाहिजे. पालकमंत्रीपद उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे आहे, ते विदर्भाचे असल्याने अपेक्षा आहेत, पण ते पक्षाचे स्टार प्रचारक आहेत. त्यांना राज्याबाहेरही फिरावे  लागते. त्यामुळे त्यांचे दुर्लक्ष झाले आहे. त्यांनी पालकमंत्रीपद सोडावे व धर्मरावबाबा आत्राम किंवा इतर कोणाला तरी जबाबदारी द्यावी,अशी विनंती करणार असल्याचे धोटे यांनी सांगितले.

शेतकऱ्यांना एक रुपयांत पीकविम्याची घोषणा केली, पण लाभ मिळाला नाही, अतिवृष्टी भरपाईपासून शेतकरी वंचित आहेत. आता अवकाळी पावसाचे पंचनामे जलदगतीने करुन भरपाई द्यावी, अशी मागणी सरकारकडे करणार असल्याचे त्यांनी सांगितले. 

सरकारच्या नियोजनाअभावी जातीयवाद वाढलाजेव्हापासून राज्यात महायुतीचे सरकार सत्तेत आले तेव्हापासून जातीजातीत भांडणे सुरु झाली, असा आरोप आमदार सुभाष धोटे यांनी केला. हे खोके सरकार असल्याची टीका करत ते म्हणाले, मराठा- ओबीसी वाद सुरु आहे, आता आदिवासी व धनगर समाजात वाद निर्माण झाला आहे. सरकार सगळ्यांनाच आश्वासन देत आहे, पण प्रश्न सोडविण्यात मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना यश मिळत नाही, अशी टीका त्यांनी केली. 

टॅग्स :GadchiroliगडचिरोलीDevendra Fadnavisदेवेंद्र फडणवीस