शहरं
Join us  
Trending Stories
1
यवत हिंसाचारात कोणाचं किती नुकसान, सध्याची परिस्थिती कशी? जाणून घ्या ताजी अपडेट्स!
2
IND vs ENG 5th Test Day 2, Stumps : दिवसभरात १५ विकेट्स! यशस्वी खेळीसह टीम इंडियाला दिलासा
3
४० वर्षाच्या लढ्याला यश, कोल्हापूरला सर्किट बेंच मंजूर; मुंबई हायकोर्टाचे नोटिफिकेशन प्रसिद्ध
4
IND vs ENG : सिराजसह प्रसिद्ध कृष्णानं मारला 'चौकार'! यजमान इंग्लंडचा पहिला डाव अल्प आघाडीसह संपला
5
ऐसे लोग *** होते है! महबूब मुजावर यांचं नाव घेताच अरविंद सांवत संतापले!
6
IND vs ENG : मियाँ मॅजिक! ओव्हलच्या मैदानात DSP सिराजनं साजरं केलं 'द्विशतक'
7
National Film Awards: 'श्यामची आई' मराठी चित्रपटानं जिंकला राष्ट्रीय पुरस्कार, वाचा विजेत्यांची संपूर्ण यादी…
8
IND vs ENG : जो रुट अन् प्रसिद्ध कृष्णा यांच्यात राडा; भांडण सोडवायला आलेल्या पंचावर KL राहुल चिडला
9
Video: रागावलेल्या सिंहीणपुढे सिंहाचीच झाली 'शेळी'... जंगलच्या राजाची अवस्था पाहून तुम्हालाही येईल हसू
10
आव्वाज कुणाचा... मराठीचा !! 'या' मराठी चित्रपटांना मिळाला राष्ट्रीय पुरस्कार; पाहा विजेत्यांची यादी
11
शेतकऱ्यांसाठी मिळालेली रक्कम अधिकाऱ्यांनी कार खरेदीसाठी उडवली, कृषिमंत्री म्हणाले...   
12
तुर्भ्यात एनएमएमटीच्या भरधाव बसनं ६ जणांना उडवलं, चालकाविरोधात गुन्हा दाखल
13
शेतकऱ्यांच्या हिताशी तडजोड नाही, दबावाखाली करार करणार नाही, २५% टॅरिफबाबत भारताची स्पष्ट भूमिका
14
'किंग' खानच्या राजमुकुटाला राष्ट्रीय पुरस्काराचं 'कोंदण'; विक्रांत मेस्सी, राणी मुखर्जी यांचाही सर्वोच्च सन्मान
15
"पाकिस्तान एक दिवस भारताला तेल विकेल" म्हणत डोनाल्ड ट्रम्प यांनी डिवचलं, भारताची भूमिका काय?
16
Daya Nayak: थर्टी फर्स्टची रात्र अन् छोटा राजन गँगचे दोन शूटर; दया नायक यांच्या पहिल्या एन्काऊंटरची गोष्ट
17
Vivo T4R 5G: अवघ्या १७,४९९ रुपयांत विवोनं आणलाय जबरदस्त फोन, बघताच आवडेल!
18
'भारत-रशिया वेळोवेळी एकमेकांच्या बाजूने उभे', डोनाल्ड ट्रम्प यांच्या टीकेनंतर भारताचे प्रत्युत्तर
19
'फुटबॉलसम्राट' मेस्सी भारतात येणार.. रोहित, विराट, सचिनसोबत वानखेडेवर क्रिकेट मॅच खेळणार!
20
"माझ्याकडे मुस्लीम कामगार, कुणीतरी ओरडलं ही बेकरी..."; यवतमध्ये जमावाने जाळलेल्या बेकरीचं सत्य समोर

...तर फडणवीस यांनी गडचिरोलीचे पालकमंत्रीपद सोडावे, काँग्रेस नेते सुभाष धोटेंची मागणी

By संजय तिपाले | Updated: December 1, 2023 15:14 IST

जिल्ह्यात झालेल्या अवकाळी पावसाच्या पाहणीसाठी आमदार सुभाष धोटे जिल्ह्यात आले होते.

गडचिरोली: जिल्ह्यात रानटी हत्ती, वाघांनी धुडगूस घातला आहे. शेतकऱ्यांना पीकविम्याचा लाभ अन् अतिवृष्टीची भरपाई मिळत नाही, लोहवाहतुकीमुळे अपघात वाढले आहेत. जाचक वनकायद्यांमुळे विकासकामे अडली आहेत, पण उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस जिल्ह्यात येत नाहीत. त्यांना निष्क्रिय म्हणणार नाही, पण जमत नसेल तर त्यांनी पालकमंत्रीपद सोडावे व दुसऱ्या कोणाला तरी द्यावे, अशी मागणी काँग्रेसचे चंद्रपूरचे आमदार सुभाष धोटे यांनी येथे १ डिसेंबरला पत्रकार परिषदेत केली.

जिल्ह्यात झालेल्या अवकाळी पावसाच्या पाहणीसाठी आमदार सुभाष धोटे जिल्ह्यात आले होते. पाहणीनंतर त्यांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी माजी खासदार मारोतराव कोवासे, माजी आमदार डॉ. नामदेव उसेंडी. काँग्रेस जिल्हाध्यक्ष महेंद्र ब्राम्हणवाडे, प्रदेश महासचिव डॉ. नामदेव किरसान, महिला आघाडी जिल्हाध्यक्षा ॲड. कविता मोहरकर, युवक काँग्रेसचे प्रदेश सचिव विश्वजित कोवासे, शहराध्यक्ष सतीश विधाते, समशेर खान पठाण उपस्थित हाेते. 

यावेळी आमदार धोटे म्हणाले, जिल्ह्यात काँग्रेसचा एकही आमदार नाही. या भागातील लोकांचे प्रश्न समजून घेऊन विधिमंडळ अधिवेशनात मांडण्यासाठी जिल्ह्यात दौरा केला आहे.  ते म्हणाले, रानटी हत्ती, वाघांचा बंदोबस्त झाला पाहिजे. यासाठी काँग्रेसने चंद्रपूरमध्ये मोर्चा काढला. यावर ११ डिसेंबरला नागपूरला वनमंत्र्यांनी बैठक बोलावली आहे.

आदिवासींनी वनसंवर्धन केले म्हणजे म्हणजे पाप केले का असा सवाल करुन ते म्हणाले, विकासकामे करताना येणाऱ्या अडचणी दूर करण्यासाठी वन कायद्यात शिथिलता आली पाहिजे. याकरता लोकप्रतिनिधींनी बोलले पाहिजे. पालकमंत्रीपद उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे आहे, ते विदर्भाचे असल्याने अपेक्षा आहेत, पण ते पक्षाचे स्टार प्रचारक आहेत. त्यांना राज्याबाहेरही फिरावे  लागते. त्यामुळे त्यांचे दुर्लक्ष झाले आहे. त्यांनी पालकमंत्रीपद सोडावे व धर्मरावबाबा आत्राम किंवा इतर कोणाला तरी जबाबदारी द्यावी,अशी विनंती करणार असल्याचे धोटे यांनी सांगितले.

शेतकऱ्यांना एक रुपयांत पीकविम्याची घोषणा केली, पण लाभ मिळाला नाही, अतिवृष्टी भरपाईपासून शेतकरी वंचित आहेत. आता अवकाळी पावसाचे पंचनामे जलदगतीने करुन भरपाई द्यावी, अशी मागणी सरकारकडे करणार असल्याचे त्यांनी सांगितले. 

सरकारच्या नियोजनाअभावी जातीयवाद वाढलाजेव्हापासून राज्यात महायुतीचे सरकार सत्तेत आले तेव्हापासून जातीजातीत भांडणे सुरु झाली, असा आरोप आमदार सुभाष धोटे यांनी केला. हे खोके सरकार असल्याची टीका करत ते म्हणाले, मराठा- ओबीसी वाद सुरु आहे, आता आदिवासी व धनगर समाजात वाद निर्माण झाला आहे. सरकार सगळ्यांनाच आश्वासन देत आहे, पण प्रश्न सोडविण्यात मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना यश मिळत नाही, अशी टीका त्यांनी केली. 

टॅग्स :GadchiroliगडचिरोलीDevendra Fadnavisदेवेंद्र फडणवीस