शहरं
Join us  
Trending Stories
1
नगरपरिषद निवडणुकीतील यश भाजपाचंच की 'इनकमिंग'चं?; सुप्रिया सुळेंनी मांडला 'हिशेब'
2
"पालिका निवडणुकांमध्येही देवेंद्र फडणवीसच ‘धुरंधर’; उद्धव ठाकरे 'रेहमान डकैत"; भाजपाची टीका
3
मंत्रिपदाचा आणि जिंकण्याचा संबंध नाही, आत्मचिंतनाची गरज; बावनकुळेंचा मुनगंटीवारांवर निशाणा?
4
"ज्यांच्याकडे मुख्यमंत्रिपद तेही कायम नाही, मी योग्य क्षणी..."; सुधीर मुनगंटीवारांनी थेटच सांगितले
5
हाण की बडीव! रुग्णालयात डॉक्टर-रुग्ण भिडले, एकमेकांच्या जीवावर उठले; लाथाबुक्क्यांनी मारहाण
6
"…तर तुला कोणीच संघाबाहेर काढू शकणार नाही!" १९८३ च्या वर्ल्ड चॅम्पियनकडून संजू सॅमसनला सल्ला
7
बाजारात जोरदार उसळी! गुंतवणूकदारांनी कमावले ३.५ लाख कोटी रुपये; 'ही' ६ कारणे ठरली गेमचेंजर
8
सात दिवसांत खचला नवा रस्ता, आठ फूट खोल खड्ड्यात अडकला टँकर, महिला जखमी   
9
‘पैशांपेक्षा जनतेचा विश्वास आणि सत्तेपेक्षा विचारधारा महत्त्वाची हे मतदारांनी दाखवून दिले’, हर्षवर्धन सपकाळ यांचं विधान
10
VIDEO: तुर्की संसदेत जोरदार राडा ! आधी खासदारांमध्ये बाचाबाची अन् लाथाबुक्क्यांनी हाणामारी
11
ख्रिसमस धमाका! अवघ्या १ रुपयात महिनाभर 'अनलिमिटेड' कॉलिंग आणि डेटा; BSNL ची खास ऑफर
12
Astro Tips: आंघोळीच्या पाण्यात १ वेलची टाकल्याने होणारे लाभ वाचून चकित व्हाल!
13
Jara Hatke: कचरा फेकू नका, विकून पैसे मिळवा! 'या' ॲपची देशभर चर्चा; नेमका प्रकार काय?
14
४ दिवसांपासून सातत्यानं 'या' शेअरला अपर सर्किट; ७४% नं वाढला स्टॉक, तुमच्याकडे आहे का?
15
मस्तच! हात लावताच समजणार संत्र गोड की आंबट? आई-आजीलाही माहीत नसेल ही सुपर ट्रिक
16
डोनाल्ड ट्रम्प यांचा मोठा निर्णय; २९ देशांतील अमेरिकन राजदुतांना तडकाफडकी परत बोलावले; काय आहे कारण?
17
Flashback 2025: वर्षभरात ८ लढती! टीम इंडियाचा 'षटकार' अन् पाकिस्तानला 'ट्रॉफी चोर'चा टॅग
18
बापाचं काळीज! "मॅडम, माझ्या मुलीला मारू नका, हिला आई नाही"; Video पाहून पाणावतील डोळे
19
स्टेट बँक ऑफ इंडियाचं जुनं नाव माहीत आहे? ३४० वर्षांपूर्वी एका ब्रिटीश बँकेपासून झाली होती सुरुवात
20
'भाभीजी घर पर है' मालिकेत परतली शिल्पा शिंदे, भावुक प्रतिक्रिया देत म्हणाली, "मी कधीच चुकीचं..."
Daily Top 2Weekly Top 5

कठाणी नदीतून बंडीद्वारे रेतीची तस्करी

By admin | Updated: October 15, 2014 23:17 IST

रेती घाटातून अवैध रेतीची वाहतूक केल्यास महसूल विभागाचे अधिकारी जबर दंड ठोठावत असल्याने ट्रॅक्टरमालक रेतीची वाहतूक करण्यास पुढे येत नाही. याचा फायदा घेत गडचिरोली येथील काही

गडचिरोली : रेती घाटातून अवैध रेतीची वाहतूक केल्यास महसूल विभागाचे अधिकारी जबर दंड ठोठावत असल्याने ट्रॅक्टरमालक रेतीची वाहतूक करण्यास पुढे येत नाही. याचा फायदा घेत गडचिरोली येथील काही नागरिक बैलबंडीने कठाणी नदीतून सकाळी व सायंकाळच्या सुमारास रेतीची तस्करी करीत आहेत. मात्र याकडे महसूल विभागाच्या अधिकाऱ्यांचे दुर्लक्ष झाले आहे. रेती घाटांचा लिलाव होण्यास आणखी काही महिन्यांचा कालावधी शिल्लक आहे. मात्र मागील एक महिन्यापासून पावसाने उसंत घेतली असल्याने नदीपात्र रिकामे झाले आहे. त्यामुळे यातून रेती काढणे शक्य होत आहे. मात्र अजूनपर्यंत रेती घाटांचा लिलाव झाला नाही. लिलाव झाला नसतांना ट्रॅक्टरद्वारे रेतीची वाहतूक करतेवेळी आढळून आल्यास महसूल विभागाचे अधिकारी हजारोंच्या घरात आर्थिक दंड ठोठावतात. त्यामुळे ट्रॅक्टरमालक रेतीची तस्करी करण्यास धजावत नसल्याचे दिसून येते. उन्हाळ्यामध्ये शहरात प्रचंड पाण्याची व मजूरांची टंचाई भासते. त्यामुळे काही नागरिक पावसाळा किंवा हिवाळ्यात बांधकाम करतात. बांधकामासाठी रेती हा आवश्यक घटक आहे. काही कंत्राटदारांनी शहरात रेती साठवून ठेवली आहे. मात्र सदर कंत्राटदार जादा भावाने रेतीची विक्री करीत असल्याने बांधकाम करणारे व्यावसायिक व नागरिक त्यांच्याकडून रेती घेण्यास तयार होत नाही. याचा फायदा शहरातील बैलबंडीधारकांनी उचलणे सुरू केले आहे. शहरातील जवळपास १० ते १५ बैलबंडीधारक बैलबंडीने रेतीची तस्करी करीत आहेत. सदर नागरिक पहाटेच्या सुमारास नदीघाटावरून जवळपास १० वाजेपर्यंत रेतीची वाहतूक करतात. कठाणी नदी शहरापासून केवळ दोन किमी अंतरावर आहे. दिवसाच्या चार ते पाच बंडी रेती आणली जात आहे. शहरवासीयांना प्रती बंडी ३०० रूपये दराने रेती विकली जात आहे. यातून ते दिवसाकाठी १ हजार ते १ हजार ५०० रूपये दिवसाला कमावित आहेत. बैलबंडीच्या साहाय्याने केवळ घरेलू उपयोगासाठी सदर नागरिक रेती नेत असावे हे गृहित धरून रस्त्यावरून ये- जा करणारे नागरिक याकडे दुर्लक्ष करतात. त्यामुळे त्यांच्या विषयीची तक्रार महसूल किंवा खनिकर्म विभागाकडे करीत नाही. मात्र सदर नागरिक मागील दोन वर्षांपासून रेतीची तस्करी करीत आहेत. मात्र अजूनपर्यंत एकाही बैलबंडीधारकावर कारवाई करण्यात आली नाही. त्यामुळे त्यांची हिंमत आणखी वाढत चालली असून दिवसेंदिवस बैलबंड्यांची संख्याही वाढत जात आहे. काही नागरिकांचा पैसे कमाविण्याचा हा मार्ग बनला आहे. त्यामुळे सदर बैलबंडीधारकांवर महसूल व खनिकर्म विभागाने कारवाई करावी, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे. (नगर प्रतिनिधी)