शहरं
Join us  
Trending Stories
1
Rain Red Alert: पाऊस महाराष्ट्रात मुक्काम ठोकणार; मुंबई पुण्यासह 'या' जिल्ह्यांना सतर्कतेचा इशारा
2
ऑनलाइन दूध ऑर्डर करायला गेल्या अन् १८ लाख गायब झाले; मुंबईतील महिलेची फसवणूक
3
संस्कृतीच्या दहीहंडीत जय जवानचा विश्वविक्रम; कोकण नगर नंतर जय जवानने रचले 10 थर
4
अहिल्यानगर: आधी चार मुलांना ढकललं विहिरीत, नंतर स्वतः घेतली उडी; पत्नीसोबत काय बिनसलं की, कुटुंबच संपवलं? 
5
भारतासोबत मैत्रीचा दिखावा, चीन पाकिस्तानला गरजेपेक्षा जास्त मदत करतेय; पाणबुडी देऊन तणाव वाढवला
6
Jyoti Malhotra : ज्योती पाकिस्तानसाठी हेरगिरी करत होती, तपासात ठोस पुरावे; २५०० पानांचे आरोपपत्र
7
मुंबई विमानतळावर मोठी दुर्घटना टळली, इंडिगो विमानाचा मागचा भाग धावपट्टीवर आदळला
8
पाकिस्तानमध्ये अतिवृष्टी-पुरामुळे प्रचंड विध्वंस, ३०७ जणांचा मृत्यू, अनेकजण बेपत्ता
9
'आई बाबा, चिठ्ठी वाचत असाल, तोपर्यंत मी मेलेलो असेल'; B.Tech करणाऱ्या विद्यार्थ्याने मृत्युला कवटाळलं
10
‘मतचोरी’च्या आरोपांच्या पार्श्वभूमीवर निवडणूक आयोगाची रविवारी पत्रकार परिषद, मोठी घोषणा होणार?
11
अलास्कामध्ये डोनाल्ड ट्रम्प यांना भेटला व्लादिमीर पुतीन यांचा डुप्लिकेट? त्या गोष्टीमुळे केला जातोय असा दावा
12
कोणत्याही खेळाडूवर येणार नाही पंतसारखी वेळ! जाणून घ्या BCCI चा नवा नियम
13
Jyoti Chandekar Death: 'ठरलं तर मग'मधील पूर्णा आजींचं निधन, ज्योती चांदेकर यांनी पुण्यात घेतला अखेरचा श्वास
14
इकडे अलास्कात सुरू होती ट्रम्प-पुतिन यांची 'महाबैठक'; तिकडे युक्रेनमध्ये रशियाने केला मोठा 'खेला'; झेलेन्स्की हादरले!
15
F-22, B-2 बॉम्बर्स, F-35 सारखे सुपरजेट कामाला आले नाहीत; पुतिन यांच्या एका चालीमुळे ट्रम्प अमेरिकेतच ट्रोल झाले
16
गेल्याच वर्षी मृत्यूच्या दाढेतून परत आलेल्या पूर्णा आजी, 'ठरलं तर मग'च्या सेटवरच बेशुद्ध होऊन पडल्या आणि मग...
17
मॅक्सवेलची जिगरबाज खेळी! उलटा फटका मारत हातून निसटलेल्या मॅचसह ऑस्ट्रेलियाला जिंकून दिली मालिका
18
"राजकारणाकडे करिअर म्हणून बघा...", सुप्रिया सुळेंची मल्हार फेस्टमध्ये हजेरी; विद्यार्थ्यांना केलं मार्गदर्शन
19
'आम्ही मुंबईत येऊ नये म्हणून सरकार दंगल घडवून आणणार असेल, तर...'; मनोज जरांगे भडकले
20
Dahi Handi Mumbai: थर लावताना मुंबईमध्ये एका गोविंदाचा मृत्यू, ३० जण जखमी; कुठे घडल्या घटना?

कठाणी नदीतून बंडीद्वारे रेतीची तस्करी

By admin | Updated: October 15, 2014 23:17 IST

रेती घाटातून अवैध रेतीची वाहतूक केल्यास महसूल विभागाचे अधिकारी जबर दंड ठोठावत असल्याने ट्रॅक्टरमालक रेतीची वाहतूक करण्यास पुढे येत नाही. याचा फायदा घेत गडचिरोली येथील काही

गडचिरोली : रेती घाटातून अवैध रेतीची वाहतूक केल्यास महसूल विभागाचे अधिकारी जबर दंड ठोठावत असल्याने ट्रॅक्टरमालक रेतीची वाहतूक करण्यास पुढे येत नाही. याचा फायदा घेत गडचिरोली येथील काही नागरिक बैलबंडीने कठाणी नदीतून सकाळी व सायंकाळच्या सुमारास रेतीची तस्करी करीत आहेत. मात्र याकडे महसूल विभागाच्या अधिकाऱ्यांचे दुर्लक्ष झाले आहे. रेती घाटांचा लिलाव होण्यास आणखी काही महिन्यांचा कालावधी शिल्लक आहे. मात्र मागील एक महिन्यापासून पावसाने उसंत घेतली असल्याने नदीपात्र रिकामे झाले आहे. त्यामुळे यातून रेती काढणे शक्य होत आहे. मात्र अजूनपर्यंत रेती घाटांचा लिलाव झाला नाही. लिलाव झाला नसतांना ट्रॅक्टरद्वारे रेतीची वाहतूक करतेवेळी आढळून आल्यास महसूल विभागाचे अधिकारी हजारोंच्या घरात आर्थिक दंड ठोठावतात. त्यामुळे ट्रॅक्टरमालक रेतीची तस्करी करण्यास धजावत नसल्याचे दिसून येते. उन्हाळ्यामध्ये शहरात प्रचंड पाण्याची व मजूरांची टंचाई भासते. त्यामुळे काही नागरिक पावसाळा किंवा हिवाळ्यात बांधकाम करतात. बांधकामासाठी रेती हा आवश्यक घटक आहे. काही कंत्राटदारांनी शहरात रेती साठवून ठेवली आहे. मात्र सदर कंत्राटदार जादा भावाने रेतीची विक्री करीत असल्याने बांधकाम करणारे व्यावसायिक व नागरिक त्यांच्याकडून रेती घेण्यास तयार होत नाही. याचा फायदा शहरातील बैलबंडीधारकांनी उचलणे सुरू केले आहे. शहरातील जवळपास १० ते १५ बैलबंडीधारक बैलबंडीने रेतीची तस्करी करीत आहेत. सदर नागरिक पहाटेच्या सुमारास नदीघाटावरून जवळपास १० वाजेपर्यंत रेतीची वाहतूक करतात. कठाणी नदी शहरापासून केवळ दोन किमी अंतरावर आहे. दिवसाच्या चार ते पाच बंडी रेती आणली जात आहे. शहरवासीयांना प्रती बंडी ३०० रूपये दराने रेती विकली जात आहे. यातून ते दिवसाकाठी १ हजार ते १ हजार ५०० रूपये दिवसाला कमावित आहेत. बैलबंडीच्या साहाय्याने केवळ घरेलू उपयोगासाठी सदर नागरिक रेती नेत असावे हे गृहित धरून रस्त्यावरून ये- जा करणारे नागरिक याकडे दुर्लक्ष करतात. त्यामुळे त्यांच्या विषयीची तक्रार महसूल किंवा खनिकर्म विभागाकडे करीत नाही. मात्र सदर नागरिक मागील दोन वर्षांपासून रेतीची तस्करी करीत आहेत. मात्र अजूनपर्यंत एकाही बैलबंडीधारकावर कारवाई करण्यात आली नाही. त्यामुळे त्यांची हिंमत आणखी वाढत चालली असून दिवसेंदिवस बैलबंड्यांची संख्याही वाढत जात आहे. काही नागरिकांचा पैसे कमाविण्याचा हा मार्ग बनला आहे. त्यामुळे सदर बैलबंडीधारकांवर महसूल व खनिकर्म विभागाने कारवाई करावी, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे. (नगर प्रतिनिधी)