शहरं
Join us  
Trending Stories
1
पैसेच नव्हते, मग दुसऱ्याच्या तुटलेल्या बॅटने खेळलो, जिंकलोही; तिलक वर्माने सांगितला आपला प्रवास
2
आज हायव्होल्टेज लढत! भारत-पाकिस्तान महिला संघ आज भिडणार, हस्तांदोलन करणार? 
3
रोहित शर्माची उचलबांगडी, ऑस्ट्रेलिया दौऱ्यात शुभमन गिलकडे नेतृत्व; विराटसह संघात ठेवले हेच...
4
‘त्या’ कफ सिरपच्या नमुन्यांत भेसळ; उत्पादन, विक्री थांबवण्याचे आदेश
5
पाकव्याप्त काश्मीरमध्ये आंदोलन, शरीफ नरमले; आंदोलन मागेही घेतले
6
केंद्रीय गृह व सहकार मंत्री अमित शाह यांचे शिर्डी विमानतळावर आगमन
7
आयटीनंतर ॲाटो क्षेत्रातही कर्मचारी कपात, ही कंपनी ३००० कर्मचाऱ्यांना कामावरून काढणार   
8
“RSS-BJPने ओबीसींचा घात केला, मोहन भागवत कधी गजानन महाराजांच्या दर्शनाला गेले का”: आंबेडकर
9
टॉपर तरुणीला गुंगीचे औषध देऊन अत्याचार; स्वतःला संपवायला निघालेल्या माय-लेकीला माजी सैनिकाने वाचवलं
10
"भारत माझी मातृभूमी, तर पाकिस्तान…’’, दानिश कनेरियाचं मोठं विधान, नागरिकत्वाबाबत म्हणाला  
11
...तर रोहित-विराटवर वनडे वर्ल्ड कप स्पर्धेआधीच निवृत्ती घेण्याची वेळ येणार?
12
भारतीय तरुणांना फसवून सायबर गुन्ह्यांसाठी जुंपणारी आंतरराष्ट्रीय टोळी उघडकीस; दोघे अटकेत, भारतीय आरोपींसह चिनी कनेक्शन आले समोर 
13
बिहारमध्ये लालू यादवांच्या निवासस्थांनी उमेदवारीवरून गोंधळ, घरात घुसले कार्यकर्ते, म्हणाले, आम्हाला...  
14
पावसाच्या 'बॅटिंग'च्या जोरावर श्रीलंकेनं उघडलं खातं; पाकला पराभूत करताच टीम इंडिया होईल टॉपर
15
अमेरिकेत भारतीय विद्यार्थ्याची गोळ्या घालून हत्या; शिक्षणासोबत पेट्रोल पंपावर करत होता पार्ट-टाईम काम
16
“राहुल गांधी यांचा पासपोर्ट जप्त करावा अन् कायदेशीर कारवाई करावी”; भाजपा नेत्यांची मागणी
17
रोहित शर्माने कप्तानी सोडली की त्याला हटवलं? निवड समिती अध्यक्ष अजित आगरकरांनी स्पष्टच सांगितलं, म्हणाले...
18
निसर्ग अशांतच! अतिवृष्टीनंतर आता ‘शक्ती’ चक्रीवादळाचा धोका; किनारपट्टी भागात सतर्कतेचा इशारा
19
वनडे क्रिकेटच्या इतिहासातील सर्वात यशस्वी कर्णधार; रोहित शर्मा दुसरा, मग पहिला कोण?
20
फर्रुखाबादमधील कोचिंग सेंटरमध्ये भीषण स्फोट; एकाचा मृत्यू, सहा जण जखमी

कठाणी नदीतून बंडीद्वारे रेतीची तस्करी

By admin | Updated: October 15, 2014 23:17 IST

रेती घाटातून अवैध रेतीची वाहतूक केल्यास महसूल विभागाचे अधिकारी जबर दंड ठोठावत असल्याने ट्रॅक्टरमालक रेतीची वाहतूक करण्यास पुढे येत नाही. याचा फायदा घेत गडचिरोली येथील काही

गडचिरोली : रेती घाटातून अवैध रेतीची वाहतूक केल्यास महसूल विभागाचे अधिकारी जबर दंड ठोठावत असल्याने ट्रॅक्टरमालक रेतीची वाहतूक करण्यास पुढे येत नाही. याचा फायदा घेत गडचिरोली येथील काही नागरिक बैलबंडीने कठाणी नदीतून सकाळी व सायंकाळच्या सुमारास रेतीची तस्करी करीत आहेत. मात्र याकडे महसूल विभागाच्या अधिकाऱ्यांचे दुर्लक्ष झाले आहे. रेती घाटांचा लिलाव होण्यास आणखी काही महिन्यांचा कालावधी शिल्लक आहे. मात्र मागील एक महिन्यापासून पावसाने उसंत घेतली असल्याने नदीपात्र रिकामे झाले आहे. त्यामुळे यातून रेती काढणे शक्य होत आहे. मात्र अजूनपर्यंत रेती घाटांचा लिलाव झाला नाही. लिलाव झाला नसतांना ट्रॅक्टरद्वारे रेतीची वाहतूक करतेवेळी आढळून आल्यास महसूल विभागाचे अधिकारी हजारोंच्या घरात आर्थिक दंड ठोठावतात. त्यामुळे ट्रॅक्टरमालक रेतीची तस्करी करण्यास धजावत नसल्याचे दिसून येते. उन्हाळ्यामध्ये शहरात प्रचंड पाण्याची व मजूरांची टंचाई भासते. त्यामुळे काही नागरिक पावसाळा किंवा हिवाळ्यात बांधकाम करतात. बांधकामासाठी रेती हा आवश्यक घटक आहे. काही कंत्राटदारांनी शहरात रेती साठवून ठेवली आहे. मात्र सदर कंत्राटदार जादा भावाने रेतीची विक्री करीत असल्याने बांधकाम करणारे व्यावसायिक व नागरिक त्यांच्याकडून रेती घेण्यास तयार होत नाही. याचा फायदा शहरातील बैलबंडीधारकांनी उचलणे सुरू केले आहे. शहरातील जवळपास १० ते १५ बैलबंडीधारक बैलबंडीने रेतीची तस्करी करीत आहेत. सदर नागरिक पहाटेच्या सुमारास नदीघाटावरून जवळपास १० वाजेपर्यंत रेतीची वाहतूक करतात. कठाणी नदी शहरापासून केवळ दोन किमी अंतरावर आहे. दिवसाच्या चार ते पाच बंडी रेती आणली जात आहे. शहरवासीयांना प्रती बंडी ३०० रूपये दराने रेती विकली जात आहे. यातून ते दिवसाकाठी १ हजार ते १ हजार ५०० रूपये दिवसाला कमावित आहेत. बैलबंडीच्या साहाय्याने केवळ घरेलू उपयोगासाठी सदर नागरिक रेती नेत असावे हे गृहित धरून रस्त्यावरून ये- जा करणारे नागरिक याकडे दुर्लक्ष करतात. त्यामुळे त्यांच्या विषयीची तक्रार महसूल किंवा खनिकर्म विभागाकडे करीत नाही. मात्र सदर नागरिक मागील दोन वर्षांपासून रेतीची तस्करी करीत आहेत. मात्र अजूनपर्यंत एकाही बैलबंडीधारकावर कारवाई करण्यात आली नाही. त्यामुळे त्यांची हिंमत आणखी वाढत चालली असून दिवसेंदिवस बैलबंड्यांची संख्याही वाढत जात आहे. काही नागरिकांचा पैसे कमाविण्याचा हा मार्ग बनला आहे. त्यामुळे सदर बैलबंडीधारकांवर महसूल व खनिकर्म विभागाने कारवाई करावी, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे. (नगर प्रतिनिधी)