शहरं
Join us  
Trending Stories
1
ड्रीम-11ने भारतीय संघाची स्पॉन्सरशिप सोडली! आशिया कपपूर्वीच BCCI ला मोठा धक्का; किती पैसा मिळायचा?
2
म्हणे, परमेश्वराचे बोलावणे आले, आम्ही ८ सप्टेंबरला देहत्याग करणार, अनंतपुरात २० भाविकांच्या निर्णयाने प्रशासनात खळबळ
3
Dream 11 आता सुरू करणार 'हा' नवा बिझनेस; ऑनलाइन मनी गेमिंग बॅननंतर नव्या क्षेत्रात एन्ट्री घेण्याची तयारी
4
१७ चौकार, पाच षटकार.. १४२ धावांचा धमाका; ऑस्ट्रेलियन 'हेड'मास्तरांनी घेतली आफ्रिकेची शाळा
5
शेअर बाजाराची जबरदस्त सुरुवात; मोठ्या तेजीसह उघडले 'या' कंपन्यांचे शेअर्स
6
भटक्या कुत्र्यांचे प्रकरण: SC आदेशानंतर केंद्राचे राज्यांना निर्देश; ७० टक्के श्वानांचे लसीकरण अनिवार्य
7
'चांगली डील मिळेल तिथूनच तेल खरेदी करू'; अमेरिकेच्या टॅरिफवर भारताची रोखठोक भूमिका
8
जनावरासारखी कोंबली होती माणसं; भाविकांच्या ट्रॉलीला कंटेनरची धडक, ८ मृत्यूमुखी, ४३ गंभीर जखमी
9
Wife सोबत एकत्र Post Office च्या 'या' स्कीममध्ये करा गुंतवणूक, महिन्याला मिळेल ₹९२५० चं फिक्स व्याज
10
साप्ताहिक राशीभविष्य: ६ राशींना सकारात्मक, विविध लाभ; ६ राशींना संमिश्र; पैसे उसने देऊ नये!
11
आजचे राशीभविष्य, २५ ऑगस्ट २०२५: आजचा दिवस लाभदायी, वाद-विवाद टाळा, वाणीवर संयम ठेवा !
12
'निवडणूक आयोग-भाजपचे साटेलोटे; मतांची चोरी करू देणार नाही', राहुल गांधींनी ठणकावले
13
साहेब ! पाचवीतील विद्यार्थ्याचा पास संपला म्हणून त्यास भर पावसात बसमधून खाली उतरणार का?
14
विशेष लेख: जरा संभलके, बडे धोखे है इस राह में...
15
भारताने रशियाच्या तेलाबद्दल ट्रम्प यांचे मत गांभीर्याने घ्यावे, निक्की हेली यांचं विधान
16
झारखंडचे माजी मुख्यमंत्री चंपई सोरेन नजरकैदेत, नेमके प्रकरण काय? 
17
मंदिरांत राजकीय उपक्रम नकोत; खातरजमा करा, केरळमधील देवस्वोम मंडळांना कोर्टाचे निर्देश
18
युक्रेनने रशियावर मोठा हल्ला केला, अणुऊर्जा प्रकल्पाजवळ ड्रोन हल्ला; स्वातंत्र्यदिनी मोठी कारवाई केली
19
अधिक काम करतो, पण मोबदलाही द्या; वाढत्या कामामुळे होतोय जगण्यावर नकारात्मक परिणाम
20
दिल्ली पोलिसांचे वॉरंट्स आता व्हॉट्सॲपद्वारे, पोलिस ठाण्यातून व्हिडीओ कॉन्फरन्सद्वारे साक्ष 

धान्य व तेलाच्या भावात प्रचंड घसरण

By admin | Updated: June 6, 2014 00:01 IST

२६ मे २0१४ ला केंद्रातील राष्ट्रीय लोकशाही आघाडीचे सरकार नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात स्थापन झाले. त्यानंतर सरकारने अजुनही महागाई कमी करण्यासाठी पावले उचलली नसली तरी तेल व डाळ तसेच धान्याच्या

गडचिरोली : २६ मे २0१४ ला केंद्रातील राष्ट्रीय लोकशाही आघाडीचे सरकार नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात स्थापन झाले. त्यानंतर सरकारने अजुनही महागाई कमी करण्यासाठी पावले उचलली नसली तरी तेल व डाळ तसेच धान्याच्या किंमतीत मोठी घसरण बाजारात झालेली आहे. त्यामुळे सर्वसामान्य ग्राहकांना ‘अच्छे दिन आए है’ ची चाहूल लागली आहे. या मालाची साठवणूक करून ठेवणार्‍या व्यापार्‍यांना मात्र मोठा आर्थिक फटका बसला आहे. सरकारने महागाई कमी करण्यासाठी पावले उचलली नसली तरी सरकारपुढे या दृष्टीकोनातून काम करेल या भीतीनेच बाजारात ही भावाबाबतची घसरण झाली, असे व्यापार्‍यांचे म्हणणे आहे. सोयाबीन तेलाचे भाव ८८ रूपये होते. ते आता ८२ रूपये किलोवर आले आहेत. शेंगदाना तेल ११0 रूपये किलो होते. ते ९५ रूपयावर आले आहे. तुरीची डाळ ७२ रूपये किलो होती. ती ६८ रूपयावर आली आहे. हरभरा डाळ ४0 रूपये किलो होती. ती ३४ रूपये किलोवर आली आहे. लाल मिरची ६0 रूपये किलो होती. ती ५0 रूपयांवर आली आहे. साखर ३५ रूपये किलो होती. ती ३२ रूपये किलोवर आली आहे. गहू ३0 रूपये किलो होते. ते २५ रूपये किलोवर आले आहे. तर तांदूळ ३0 रूपये किलो होते. ते २८ रूपयांवर आले आहे. व्यापार्‍यांकडून दराचीही घसरण होण्यात सरकारचा कोणताही निर्णय कारणीभूत नाही. मात्र भाव घसरलेले आहेत. साखरेच्या किंमती किलो मागे ३ रूपयाने कमी झाले आहे. तर तेलाच्याही किंमती १0 ते १५ रूपयांनी कमी झाले आहे. मोठय़ा शहरांमध्ये या मालाची साठवणूक करून ठेवणार्‍या व्यापार्‍यांना भावात घसरण झाल्यामुळे लाखो रूपयाचा फटका बसला आहे. महाराष्ट्रात साखर कारखानदारीचे हित लक्षात घेऊन साखरेचे भाव यापूर्वी कमी होऊ दिल्या जात नव्हते. परंतु मोदी सरकार येताच साखरेचेही भाव घसरले आहे. त्यामुळे कारखानदारांनाही मोठा फटका यामुळे बसला आहे. सर्वसामान्य ग्राहकांना मात्र भावात घसरण झाल्याने दिलासा मिळाला आहे. (जिल्हा प्रतिनिधी)