शहरं
Join us  
Trending Stories
1
"भारताकडे केवळ २ पर्याय आहेत..."; शाहांच्या विधानानंतर पाकिस्तानचा थयथयाट, थेट युद्धाची धमकी
2
"अमेरिका भूतकाळातून काही शिकली नाही, बळाद्वारे शांतता प्रस्थापित होत नाही’’, इराणवरील हल्ल्यावरून रशिया,चीनचा टोला
3
Shiv Sena UBT: मराठवाड्यात उद्धव ठाकरेंना मोठा झटका, मोठ्या नेत्याने सोडली साथ!
4
रॅलीमध्ये कारखाली चिरडून एकाचा मृत्यू; जगन मोहन रेड्डींविरोधात गुन्हा दाखल
5
परीक्षेत कमी गुण मिळाले, जाब विचारताच उलट बोलली, वडिलांकडून मुलीला बेदम मारहाण, तडफडून मृत्यू, सांगलीतील धक्कादायक घटना 
6
इराण जे सांगतोय ते भारत आणि चीन होऊच देणार नाहीत, दोघंही मोठे व्यापारी; अमेरिकेचं गणित समजून घ्या?
7
इराणवर हल्ला करण्यासाठी अमेरिकेने भारतीय हवाई क्षेत्राचा वापर केला? सरकारने स्पष्टीकरण दिले
8
Post Office ची सुपरहिट स्कीम; महिन्याला ₹३००० ची गुंतवणूक, ₹२.१४ लाखांचा रिटर्न निश्चित
9
"ते बोलण्यात व्यस्त, आम्ही कामात मग्न" उद्धव ठाकरेंना टोमणा, शहरात लावले पोस्टर!
10
Stock Market Today: इराण-इस्रायल युद्धाची भीती; ५३४ अंकांनी घसरुन शेअर बाजाराची सुरुवाती, IT-रियल्टीमध्ये मोठी विक्री
11
फिल्म सिटीमध्ये भीषण आग, 'अनुपमा' मालिकेचा सेट जळून खाक
12
इस्त्रायल-इराण युद्धाचा भारताला फटका बसणार! फक्त १६ दिवस पुरेल एवढाच LPG गॅसचा साठा
13
Maharashtra Rain: लहरी पावसाने शेतकऱ्यांना रखडविले, केवळ २२ लाख हेक्टरवर पेरण्या पूर्ण  
14
ई-बाइक टॅक्सी सेवा नको! राज्य परिवहन विभागास नागरिकांच्या सूचना
15
Todays Horoscope: 'या' राशींच्या लोकांचं नशीब फळफळणार! कसा असेल तुमचा आजचा दिवस? जाणून घ्या
16
...तर नाराजी घ्यायची ताकद ठेवावी लागते; शरद पवारांनी मांडली स्पष्ट भूमिका
17
धारावीत उभारणार मल्टी ट्रान्सपोर्ट हब; एमएमआरडीए लवकरच तयार करणार आराखडा
18
युद्धाचा भडका, तेल खरेदीचा झपाटा! महागाई वाढणार, भारताच्या व्यापाराला मोठा  फटका
19
लेख: कमी जागा कोण घेणार? भाजप की शिंदेंची शिवसेना?
20
Mumbai: २ कोटी ३६ लाख... बंद विमा पॉलिसीतील पैशांसाठी दादरमधील आजोबांनी गमावली आयुष्याची जमापुंजी

सहा लक्षवेधी व पन्नास तारांकित प्रश्न मांडणार

By admin | Updated: November 30, 2015 01:15 IST

१९८० च्या वनकायद्यामुळे जिल्ह्यात मोठे, मध्यम व लघु अशा प्रकारचे अनेक सिंचन प्रकल्प रखडले आहे.

देवराव होळी यांची माहिती : लोकमत कार्यालयाला दिली सदिच्छा भेटगडचिरोली : १९८० च्या वनकायद्यामुळे जिल्ह्यात मोठे, मध्यम व लघु अशा प्रकारचे अनेक सिंचन प्रकल्प रखडले आहे. राज्यघटनेच्या पाचव्या अनुसूचीचा आधार घेऊन यावर निर्णय घेतल्यास मध्यम व लहान सिंचन प्रकल्पांना केवळ सात हजार हेक्टर क्षेत्र वनजमीन लागणार आहे. जिल्ह्यातील सिंचन, आरोग्य, शिक्षण व उद्योग या संदर्भातील ज्वलंत प्रश्नांवर राज्य विधिमंडळाच्या येत्या हिवाळी अधिवेशनात आपण ६ लक्षवेधी व ५० तारांकित प्रश्न मांडणार आहोत, अशी माहिती आमदार डॉ. देवराव होळी यांनी ‘लोकमत’ला दिली. आ. डॉ. देवराव होळी यांनी शनिवारी लोकमतच्या गडचिरोली जिल्हा कार्यालयाला सदिच्छा भेट दिली. यावेळी त्यांनी जिल्हा विकास व समस्यांबाबत मुक्त संवाद साधला. यावेळी लोकमतचे जिल्हा कार्यालय प्रमुख डॉ. गणेश जैन तसेच भाजपचे पदाधिकारी प्रकाश अर्जुनवार, रमेश भुरसे, नंदकिशोर काबरा उपस्थित होते. यावेळी माहिती देताना आ. डॉ. होळी म्हणाले, वैद्यकीय अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या पदभरतीला शासनाकडून मान्यता मिळाली नसल्यामुळे गडचिरोलीचे महिला व बाल रूग्णालय सुरू होण्यास विलंब होत आहे. या संदर्भात आपण राज्यपाल सी. विद्यासागर राव यांची नुकतीच भेट घेऊन त्यांच्याशी चर्चा केली. गडचिरोली जिल्ह्यातील आरोग्य विभागाच्या पद भरतीला मान्यता देण्याची मागणी त्यांच्याकडे रेटून धरली. सामान्य, ग्रामीण व उपजिल्हा रूग्णालयात पदव्युत्तर डॉक्टर उपलब्ध होत नसतील तर गडचिरोली जिल्ह्याला विशेष बाब म्हणून पदवीधर डॉक्टरांना संधी देऊन जिल्ह्यातील डॉक्टरांच्या पदाचा अनुशेष भरून काढावा, अशी विनंतीही त्यांच्याकडे केली आहे. जिल्ह्यात अनेक कोल्हापूरी बंधारे व उपसा सिंचन योजनेचे काम मार्गी लागल्याचे कागदोपत्री दाखविण्यात आले आहे. मात्र अनेक उपसा सिंचन योजना व कोल्हापुरी बंधाऱ्याचे काम अपूर्ण असून प्रलंबित आहेत. शासनाकडून जिल्हा विकासासाठी मोठ्या प्रमाणात निधी येतो. या निधी खर्चाची टक्केवारीही १०० टक्केच्या आसपास आहे. मात्र प्रत्यक्षात जिल्ह्याचा विकास झालेला दिसून येत नाही, अशी खंत व्यक्त करीत जिल्ह्याचा विकास आराखडा अद्यापही तयार करण्यात न आल्याने जिल्हा विकासाची गती प्रशासकीय यंत्रणेच्या उदासीन प्रवृत्तीमुळे मंदावली असल्याचा आरोपही आ. डॉ. होळी यांनी केला. (स्थानिक प्रतिनिधी)जलयुक्त शिवारची प्रभावी अंमलबजावणी नाहीराज्याच्या जलयुक्त शिवार अभियानांतर्गत गडचिरोली जिल्ह्यात जलसंधारणाच्या कामावर कोट्यवधी रूपये खर्च झाले आहेत. मात्र प्रशासकीय यंत्रणेचे योग्य नियोजन व लोकसहभागाअभावी जलयुक्त शिवार योजनेची गडचिरोली जिल्ह्यात प्रभावी अंमलबजावणी झाली नाही, अशीही खंत आ. डॉ. देवराव होळी यांनी व्यक्त केली.