शहरं
Join us  
Trending Stories
1
Pahalgam Terror Attack : मोठं यश...! पहलगाम हल्ल्यात दहशतवाद्यांना मदत करणाऱ्या मोहम्मद कटारियाला अटक; असा पकडला
2
३ दिवस भारताचे मंत्री, अधिकारी अमेरिकेत तळ ठोकून; ट्रेड डील, ट्रम्प टॅरिफ, H1B व्हिसावर चर्चा
3
पूरग्रस्तांच्या मदतीसाठी भाजपा खासदार, आमदारांचा मोठा निर्णय, एक महिन्याचे वेतन देणार!
4
IND vs BAN : बांगलादेशच्या नव्या कॅप्टननं नशीब काढलं, पण तो गडबडला! सूर्या म्हणाला, आमच्या मनासारखं झालं
5
एकीकडे डोनाल्ड ट्रम्प यांची 'बोंबाबोंब', दुसरीकडे रशियाने मात्र थेट इराणसोबत केला अणू करार
6
राज ठाकरेंचे CM फडणवीसांना पत्र; सरकारला ५ महत्त्वाच्या सूचना, मदत-जाहिरातबाजीवरून टोचले कान
7
“शेतकऱ्यांना सर्व प्रकारची मदत, ड्रोनने केलेले पंचनामे मान्य करणार”; CM फडणवीसांची ग्वाही
8
त्याला अजून फाशी का दिली नाही? मुख्यमंत्र्यांची हत्या करणाऱ्या आरोपीच्या याचिकेवर कोर्टाने सरकारला फटकारलं
9
सरकार शेतकऱ्यांचे आहे, चिंता करू नका! एकनाथ शिंदे यांनी नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना दिला धीर
10
वायरल 'बाल्कनी' हिमनगाचे केवळ टोक? ९९८ कोटींचा इंडोरा–दिगोरी उड्डाणपूलामुळे प्रभावित मालमत्तांची यादी तयार करण्याचे आदेश
11
“पूरग्रस्त प्रत्येक कुटुंबाला १० किलो गहू-तांदूळ, केंद्राची मदत १०० टक्के येईल”: छगन भुजबळ
12
"प्रत्येकाला स्वाभिमान असतो, त्याने..."; शाहीन शाह आफ्रिदीकडून हॅरिस रौफच्या कृतीचे समर्थन
13
“बॅगवरचा फोटो कसला पाहता, मदत पाहा”; एकनाथ शिंदे शेतकऱ्यांच्या बांधावर, केली नुकसानीची पाहणी
14
बापासमोरच दोन वर्षाच्या मुलाला जबड्यात धरून बिबट्या पसार; १५० जवानांकडून शोधमोहिम, मृतदेह सापडला
15
आपली मुलगी राजकारणात येणार? मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस स्पष्टच बोलले, म्हणाले...
16
लवकरच बाजारात येतेय Toyota ची Mini Fortuner! महाराष्ट्रातल्या 'या' शहरात होणार उत्पादन; किती असू शकते किंमत? जाणून घ्या
17
तंत्रज्ञानाची किमया! सॅमसंगने AI Home केलं लाँच; आता घर होईल स्मार्ट, फक्त एक क्लिक अन्...
18
तांत्रिक बिघाड की मोसादचा हात? संयुक्त राष्ट्रांत पॅलेस्टाईनवर चर्चा होताच ४ बड्या नेत्यांचा माईक बंद  
19
पद्मश्री ज्येष्ठ लेखक एस. एल. भैरप्पा काळाच्या पडद्याआड; पंतप्रधान मोदींसह राष्ट्रपतींनी वाहिली श्रद्धांजली
20
लडाखमधील आंदोलनाला हिंसक वळण, जाळपोळ, लेहमध्ये ४ जणांचा मृत्यू, ७० जण जखमी 

सहा लक्षवेधी व पन्नास तारांकित प्रश्न मांडणार

By admin | Updated: November 30, 2015 01:15 IST

१९८० च्या वनकायद्यामुळे जिल्ह्यात मोठे, मध्यम व लघु अशा प्रकारचे अनेक सिंचन प्रकल्प रखडले आहे.

देवराव होळी यांची माहिती : लोकमत कार्यालयाला दिली सदिच्छा भेटगडचिरोली : १९८० च्या वनकायद्यामुळे जिल्ह्यात मोठे, मध्यम व लघु अशा प्रकारचे अनेक सिंचन प्रकल्प रखडले आहे. राज्यघटनेच्या पाचव्या अनुसूचीचा आधार घेऊन यावर निर्णय घेतल्यास मध्यम व लहान सिंचन प्रकल्पांना केवळ सात हजार हेक्टर क्षेत्र वनजमीन लागणार आहे. जिल्ह्यातील सिंचन, आरोग्य, शिक्षण व उद्योग या संदर्भातील ज्वलंत प्रश्नांवर राज्य विधिमंडळाच्या येत्या हिवाळी अधिवेशनात आपण ६ लक्षवेधी व ५० तारांकित प्रश्न मांडणार आहोत, अशी माहिती आमदार डॉ. देवराव होळी यांनी ‘लोकमत’ला दिली. आ. डॉ. देवराव होळी यांनी शनिवारी लोकमतच्या गडचिरोली जिल्हा कार्यालयाला सदिच्छा भेट दिली. यावेळी त्यांनी जिल्हा विकास व समस्यांबाबत मुक्त संवाद साधला. यावेळी लोकमतचे जिल्हा कार्यालय प्रमुख डॉ. गणेश जैन तसेच भाजपचे पदाधिकारी प्रकाश अर्जुनवार, रमेश भुरसे, नंदकिशोर काबरा उपस्थित होते. यावेळी माहिती देताना आ. डॉ. होळी म्हणाले, वैद्यकीय अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या पदभरतीला शासनाकडून मान्यता मिळाली नसल्यामुळे गडचिरोलीचे महिला व बाल रूग्णालय सुरू होण्यास विलंब होत आहे. या संदर्भात आपण राज्यपाल सी. विद्यासागर राव यांची नुकतीच भेट घेऊन त्यांच्याशी चर्चा केली. गडचिरोली जिल्ह्यातील आरोग्य विभागाच्या पद भरतीला मान्यता देण्याची मागणी त्यांच्याकडे रेटून धरली. सामान्य, ग्रामीण व उपजिल्हा रूग्णालयात पदव्युत्तर डॉक्टर उपलब्ध होत नसतील तर गडचिरोली जिल्ह्याला विशेष बाब म्हणून पदवीधर डॉक्टरांना संधी देऊन जिल्ह्यातील डॉक्टरांच्या पदाचा अनुशेष भरून काढावा, अशी विनंतीही त्यांच्याकडे केली आहे. जिल्ह्यात अनेक कोल्हापूरी बंधारे व उपसा सिंचन योजनेचे काम मार्गी लागल्याचे कागदोपत्री दाखविण्यात आले आहे. मात्र अनेक उपसा सिंचन योजना व कोल्हापुरी बंधाऱ्याचे काम अपूर्ण असून प्रलंबित आहेत. शासनाकडून जिल्हा विकासासाठी मोठ्या प्रमाणात निधी येतो. या निधी खर्चाची टक्केवारीही १०० टक्केच्या आसपास आहे. मात्र प्रत्यक्षात जिल्ह्याचा विकास झालेला दिसून येत नाही, अशी खंत व्यक्त करीत जिल्ह्याचा विकास आराखडा अद्यापही तयार करण्यात न आल्याने जिल्हा विकासाची गती प्रशासकीय यंत्रणेच्या उदासीन प्रवृत्तीमुळे मंदावली असल्याचा आरोपही आ. डॉ. होळी यांनी केला. (स्थानिक प्रतिनिधी)जलयुक्त शिवारची प्रभावी अंमलबजावणी नाहीराज्याच्या जलयुक्त शिवार अभियानांतर्गत गडचिरोली जिल्ह्यात जलसंधारणाच्या कामावर कोट्यवधी रूपये खर्च झाले आहेत. मात्र प्रशासकीय यंत्रणेचे योग्य नियोजन व लोकसहभागाअभावी जलयुक्त शिवार योजनेची गडचिरोली जिल्ह्यात प्रभावी अंमलबजावणी झाली नाही, अशीही खंत आ. डॉ. देवराव होळी यांनी व्यक्त केली.