शहरं
Join us  
Trending Stories
1
अहमदाबाद विमान अपघातातील मृतांचा आकडा वाढला; डॉक्टर, विद्यार्थी, नातेवाईकांचे मृतदेह सापडले
2
इराणकडून जोरदार प्रतिहल्ला, इस्राइलवर डागली शेकडो क्षेपणास्त्रे आणि ड्रोन, तेल अवीवमध्ये स्फोट, काही नागरिक जखमी 
3
Lalbaugcha Raja 2025: लालबागच्या राजाचा पाद्य पूजन सोहळा थाटात संपन्न! यंदा मंडळाचे ९२ वे वर्ष
4
कशी होणार हवाई प्रवाशांची सुरक्षा? ‘स्टाफ’वर कामाचा मोठा ताण; ‘डीजीसीए’त ४८% पदे रिक्त
5
अपघातानंतर विमान उद्योगावर आले संकटाचे ढग; प्रवासी घटण्याची भीती
6
आजचे राशीभविष्य : १४ जून २०२५; कार्यालयीन कामासाठी प्रवास घडेल, व्यापारात फायदा होईल
7
"अजूनही लोक वाचू शकले असते, परंतु...", विमान अपघातात वाचलेल्या एकमेव प्रवाशाने केला दावा
8
जवळची माणसे गेली, सारी स्वप्ने उद्ध्वस्त झाली, विमान अपघातात नातेवाईक गमावलेल्यांचा आक्रोश
9
विमान प्रवास आता पूर्वीइतका धोकादायक नाही? अशी आहे मागच्या काही दशकांतील आकडेवारी
10
गाझात बिनशर्त युद्धबंदीच्या ठरावावर भारत राहिला तटस्थ
11
मार्करमचे झुंजार नाबाद शतक, दक्षिण आफ्रिका कसोटी विश्वविजेतेपदापासून ६९ धावांनी दूर, ऑस्ट्रेलिया बॅकफूटवर
12
काहीतरी मोठे घडणार...! दोन लढाऊ विमानांच्या संरक्षणात नेतन्याहूंनी देश सोडला; खासगी कंपन्यांची विमानेही इस्रायलबाहेर निघाली...
13
कराडची कन्या 'त्या' विमान अपघातात गमावली! शहरवासीयांमधून हळहळ व्यक्त
14
इराणमध्ये पुन्हा इस्रायलची लढाऊ विमाने घुसली; हल्ले सुरु, प्रत्युत्तरात येमेनहून मिसाईल डागली
15
पाकिस्ताननंतर इराणचे हवाई क्षेत्रही बंद; विमानांना सौदीच्या आकाशातून जावे लागणार 
16
१२ हजार ४०० झाडे तोडण्याऐवजी मेट्रो कारशेडसाठी पर्यायी जागांचा व्हावा विचार; मुख्यमंत्र्यांना स्थानिक भाजपा नेत्याचे साकडे 
17
इराणवर हल्ला केल्यानंतर नेतन्याहूंचा पंतप्रधान मोदींनी फोन, काय झाली चर्चा...
18
डॉक्टरांची मेस चालविणारी आजी आणि दोन वर्षांची नात बेपत्ता; ना मृतांमध्ये नाव, ना जखमींमध्ये... मुलगा शोधतोय
19
मोठी अपडेट! सात मृतदेहांची ओळख पटली; विजय रुपाणींच्या मृतदेहाची ओळख पटलेली नाही, मृतांचा आकडा...
20
एसी कॉम्प्रेसर फुटल्यामुळे माहीममध्ये मोठी आग; होरपळून दोघांचा मृत्यू 

सहा महिन्यांचे मानधन थकले, ग्रा.पं. कर्मचाऱ्यांची दिवाळी अंधारात

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 22, 2024 15:16 IST

प्रशासनाकडून होतेय दिरंगाई : जिल्ह्यातील आठशेवर कुंटुंबे आर्थिक संकटात

लोकमत न्यूज नेटवर्क गडचिरोली : प्रशासनाच्या नियोजनशून्यतेमुळे जिल्हाभरातील ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांचे एप्रिल ते सप्टेंबरपर्यंतचे सहा महिन्यांचे मानधन थकीत असून, मानधन अदा करण्याबाबत गतीने कार्यवाही होत नसल्याने ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांची दिवाळी अंधारात जाण्याची शक्यता आहे. दरम्यान या कर्मचाऱ्यांचे आठशेवर कुंटुंबे आर्थिक संकटात सापडले आहेत.

कर वसुलीची अट रद्द करण्यात यावी. आकृतिबंधात सुधारणा करावी, एप्रिल ते सप्टेंबर या सहा महिन्यांचे थकीत असलेले मानधन दिवाळीपूर्वी अदा करण्यात यावे, अशा प्रकारच्या मागणीचे निवेदन उपमुख्य कार्यकारी अधिकारी व गडचिरोलीच्या गटविकास अधिकाऱ्यांकडे लेखी स्वरूपात कर्मचाऱ्यांनी दिले आहे. 

गडचिरोली जिल्ह्यात एकूण ४५८ ग्रामपंचायती असून, यामध्ये जवळपास ८१४ कर्मचारी नियमित मासिक मानधनावर काम करीत आहे. यामध्ये लिपीक, पाणीपुरवठा कर्मचारी, तसेच शिपाई आदी कर्मचाऱ्यांचा समावेश आहे. एप्रिल ते सप्टेंबर २०२४ चे थकीत वेतन, तसेच ९ महिन्यांचे (सप्टेंबर २०२० ते मे २०२१) पर्यंतच्या फरकाची रक्कम (एरिअस) दिवाळीपूर्वी ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांच्या वैयक्तिक खात्यात जमा करण्याच्या सूचना वरिष्ठ अधिकाऱ्यांनी कराव्या, असे निवेदनात म्हटले आहे. 

ग्रामपंचायत कर्मचारी आर्थिकदृष्ट्या कमकुवत असून, आम्हा कर्मचाऱ्यांचे एप्रिल ते सप्टेंबर २०२४ चे थकीत वेतन, तसेच ९ महिन्यांचे (सप्टेंबर २०२० ते मे २०२१) पर्यंतचे फरकाची रक्कम (एरिअस) अजूनही ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांना न मिळाल्याने उपासमारीची वेळ आली असून , मानसिक संतुलन ढासळले यापूर्वी आपल्या स्तरावरून पंचायत समितीला ग्रामपंचायत कर्मचारी, सरपंच व उपसरपंच यांचे वेतन अदा करण्यात आलेले होते. परंतु, पंचायत समिती स्तरावरून प्रत्यक्ष ग्रामपंचायत कर्मचारी, सरपंच व उपसरपंच यांच्या वैयक्तिक खात्यात रक्कम जमा न करता काही पंचायत समिती स्तरावरून ग्रामपंचायतच्या सामान्य निधी खात्यात रक्कम जमा केलेली आहे, त्यामुळे अद्यापही ग्रामपंचायत कर्मचारी, सरपंच व उपसरपंच यांना रक्कम मिळालेली नाही.

ग्रामपंचायत कर्मचारी, सरपंच व उपसरपंच यांच्या वैयक्तिक खात्यात जमा करण्याच्या जिल्हा परिषद स्तरावरून सूचना पंचायत समित्यांना देण्यात यावी. जेणेकरून दिवाळीपूर्वी रक्कम उपभोगण्यास मिळेल, अशी मागणी ग्रा. प. कर्मचाऱ्यांनी केली आहे. 

तुटपुंजे मानधनही वेळेवर मिळेना ग्राम पंचायत कर्मचाऱ्यांना लोकसंख्येच्या आधारावर मानधन दिले जाते. शासनाकडून मानधन मिळत असले तरी ते मानधन तुटपुंजे असून ते वेळेवर मिळत नाही. त्यामुळे कर्मचाऱ्यांना आर्थिक संकटाचा सामना करावा लागतो. प्रशासकीय दिरंगाई याला कारणीभूत आहे.

"गेल्या सहा महिन्यांपासून आम्हा ग्राम पंचायत कर्मचाऱ्यांचे मानधन प्रलंबित आहे. शासनाकडून निधी येत असला तरी त्याची विल्हेवाट लावण्याची प्रक्रिया दिरंगाईची आहे. आम्ही ग्रा.पं. स्तरावर कोरोना काळात काम केले. आत्ताही सक्रीय आहोत. मात्र मानधन वेळेवर मिळत नसल्याने मनोबल खचते. आर्थिक अडचणीला सामोरे जावे लागते."- खुमेश हर्षे, अध्यक्ष, ग्रामपंचायत कर्मचारी युनियन, तालुका गडचिरोली

"पूर्वी ग्रा.पं. कर्मचाऱ्यांचे मानधन कर्मचाऱ्यांच्या बचत खात्यात वळते केले जात होते. मात्र काही कर्मचाऱ्यांच्या बँक खात्यात चुका असल्याचे कारण पुढे करून प्रशासनाने ग्रामसेवकाच्या खात्यात ही रक्कम वळती करण्याची कार्यवाही सुरू केली आहे. सहा महिन्यांपासूनचे मानधन आमच्या खात्यात तातडीने देण्यात यावे. अशी आमची मागणी आहे." - गुरुदेव नैताम, सचिव, कर्मचारी युनियन, तालुका गडचिरोली. 

टॅग्स :Gadchiroliगडचिरोली