शहरं
Join us  
Trending Stories
1
"कुटुंब आणि लग्न हे केवळ शारीरिक संतुष्टीचे माध्यम नाही तर...", 'लिव्ह-इन रिलेशनशिप'वर मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
‘ऑपरेशन सिंदूरदरम्यान, अल्लाहच्या मदतीने आम्हाला वाचवले,’ आसिम मुनीरचं मोठं विधान  
3
"७५ टक्के नगराध्यक्ष महायुतीचे, ४८ टक्के नगरसेवक एकट्या भाजपाचे; एवढा मोठा विजय...," CM फडणवीसांनी आकड्यांसह सांगितली ताकद
4
"काँग्रेसचे ४१ नगराध्यक्ष आणि १,००६ नगरसेवक निवडून येणे हा केवळ निकाल नाही, तर..." हर्षवर्धन सपकाळ यांचं मोठं विधान
5
एक फोन कॉल आणि शुभमन गिल झाला वर्ल्डकपच्या संघातून ‘आऊट’, धक्कादायक माहिती समोर
6
मिस्टर अँड मिसेस नगरसेवक! बदलापूरमध्ये डझनभर जोडप्यांनी निवडणूक लढवली; चार जिंकली, तर पाच...
7
भंडारा उधळला आणि भडका उडाला, जेजुरीत विजयी मिरवणुकीला गालबोट; दोघे भाजले, १८ जखमी
8
Smriti Mandhana Record : स्मृती मानधनाचा मोठा पराक्रम! अशी कामगिरी करणारी ठरली पहिली भारतीय बॅटर
9
इलॉन मस्क यांची संपत्ती ७५० अब्ज डॉलर्सच्या पार; भारताच्या टॉप ४० श्रीमंतांएवढी एकट्याची 'माया'
10
"PM मोदींच्या योजनांवरचा आशीर्वाद"; अमित शाहंकडून कौतुकाची थाप, महायुतीच्या विजयाने दिल्लीत जल्लोष
11
“नगरपालिका निकालाने विरोधकांचे पानिपत, आता मनपासाठी एक दिलाने कामाला लागा”: DCM शिंदे
12
"जर व्हेनेझुएला विरोधात कुठल्याही प्रकारची लष्करी कारवाई झाली तर..."; ब्राझीलच्या राष्ट्राध्यक्षांची अमेरिकेला थेट धमकी!
13
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?
14
विनायक चतुर्थी अंगारक योग २०२५: ‘असे’ करा व्रत, गणेश पूजनात ३ गोष्टी हव्याच; पाहा, सोपी पद्धत
15
प्रियकरासोबत मिळून पतीची हत्या, पण एक चूक नडली अन पोलिसांनी ठोकल्या बेड्या  
16
"पक्षाने जे प्रवेश दिले त्याचा फायदाच झाला"; मुनगंटीवारांच्या नाराजीवर CM फडणवीसांचे भरपाई देण्याचे आश्वासन
17
IND vs PAK : मैदानात फुल राडा! आयुष म्हात्रे–वैभव सूर्यवंशीचा पाक गोलंदाजाशी वाद; VIDEO व्हायरल
18
धावत्या ट्रेनमध्ये प्रेमीयुगुलाचा रोमान्स, VIDEO व्हायरल; नेमका कुठे घडला 'हा' लज्जास्पद प्रकार?
19
‘हा महायुतीचा सामूहिक विजय, आम्ही जिथे लढलो तिथे…”, निकालांनंतर अजित पवारांचं मोठं विधान          
20
एकनाथ शिंदेंच्या ठाण्यातील दोन बालेकिल्ल्यांना भाजपाकडून सुरुंग, अंबरनाथ, बदलापूरमध्ये फुललं कमळ
Daily Top 2Weekly Top 5

पक्ष संघटनांमध्ये फेरबदल

By admin | Updated: October 25, 2014 01:19 IST

भारतीय जनता पक्षाला लोकसभा व विधानसभा निवडणुकीत गडचिरोली जिल्ह्यात अभूतपूर्व यश मिळाले आहे.

गडचिरोली : भारतीय जनता पक्षाला लोकसभा व विधानसभा निवडणुकीत गडचिरोली जिल्ह्यात अभूतपूर्व यश मिळाले आहे. भाजपच्या या यशामुळे इतर पक्षांची पूर्णत: दाणादाण उडून गेली. या पार्श्वभूमीवर आगामी काळात भारतीय राष्ट्रीय काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना या प्रमुख पक्षांमध्ये संघटन पातळीवर व्यापक फेरबदल होण्याचे संकेत मिळू लागले आहे. गडचिरोली जिल्ह्यात २००९ मध्ये भारतीय राष्ट्रीय काँग्रेसने प्रचंड यश लोकसभा व विधानसभा निवडणुकीत मिळविले होते. पक्षाचे त्यावेळी खासदार व दोन मतदार संघात आमदारही निवडून आले होते. तत्कालीन राज्यमंत्री आमदार विजय वडेट्टीवार यांच्या नेतृत्वात या निवडणुका लढविल्या गेल्या होत्या. त्यांनीच जिल्ह्यात काँग्रेसच्या यशासाठी फौजफाटा कामी लावून पक्षाला हे यश मिळवून दिले होते. त्यानंतर मात्र तत्कालीन खासदार मारोतराव कोवासे व विजय वडेट्टीवार यांच्यात वितृष्ठ आले. कालांतराने अनेक घटनाक्रम घडत गेले. वडेट्टीवारांच्या मंत्रीपदालाही कोवासेंनी विरोध केला. गडचिरोली जिल्हा काँग्रेसचे अध्यक्षपद मिळविण्यासाठी मोठी मोर्चेबांधणी करण्यात आली होती. मात्र त्यावेळी कोवासे समर्थक असलेल्या हसनअली गिलानींची निवड करण्यात आली. गिलानी कोवासेंपासून दूर झाले व वडेट्टीवार, उसेंडी यांच्या जवळ गेले. लोकसभेत यावेळी काँग्रेसचा दारूण पराभव झाला. विधानसभा निवडणुकीतही आरमोरी वगळता अहेरी व गडचिरोली मतदार संघात काँग्रेसची अनामत रक्कमही जप्त झाली. विधानसभा निवडणुकीच्या काळातच काँग्रेसमधून अरविंद पोरेड्डीवार, प्रकाश पोरेड्डीवार, प्रकाश अर्जुनवार यांच्यासह अनेक नेते, कार्यकर्ते बाहेर पडले. डॉ. नामदेव उसेंडी यांच्याकडे पक्षाचे प्रभारी जिल्हाध्यक्षपद देण्यात आले आहे. मात्र आगामी काळात ब्रम्हपुरीचे आमदार विजय वडेट्टीवार हे गडचिरोली मुख्यालयातच राहणार असल्याची चर्चा आहे. त्यामुळे गडचिरोली व चंद्रपूर या दोन जिल्ह्यातील काँग्रेसचे राजकारण हे त्यांच्या भोवती फिरणार आहे. पुढील दोन वर्षात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका आहेत. त्यामुळे काँग्रेसची बांधणी वडेट्टीवारांच्याच नेतृत्वात होईल, असे संकेत आहे. काँग्रेस पक्षाचे सध्य:स्थितीत मारोतराव कोवासे हे एक प्रमुख नेते आहेत. मात्र ते सक्रीय राजकारणातून अलिप्त आहेत. या पार्श्वभूमीवर पक्ष संघटन बांधणीसाठी वडेट्टीवारांवरच जबाबदारी येण्याची शक्यता आहे. दोन वर्षाने जिल्हा परिषद, नगर परिषद निवडणुका आहेत. या अनुषंगाने काँग्रेस आता पुढची वाटचाल करेल, असे चित्र आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचीही विधानसभा निवडणुकीत मोठी वाताहत झाली आहे. जिल्हाध्यक्ष माजी मंत्री धर्मरावबाबा आत्राम यांचाही पराभव या निवडणुकीत झाला. गडचिरोली व आरमोरी विधानसभा क्षेत्रात राष्ट्रवादी काँग्रेसची अनामत रक्कमही जप्त झाली. सध्या जिल्हा परिषदेचे अध्यक्षपद राष्ट्रवादी काँग्रेसकडे आहे. आगामी काळात पक्ष संघटन मजबुत करण्यासाठी पक्षाला पुन्हा प्रयत्न करावे लागणार आहे. आरमोरी विधानसभा क्षेत्रात पक्षाचे ज्येष्ठ नेते माजी आमदार हरीराम वरखडे असतांनाही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला केवळ २ हजार मतांचा टप्पा गाठता आला. ही अतिशय चिंताजनक बाब आहे. या परिस्थितीत बाराही तालुक्यात पक्ष संघटनेची पुन्हा उभारणी हे राष्ट्रवादी काँग्रेस समोरचे सर्वात मोठे आव्हान राहणार आहे. शिवसेनेचा गड अशी आरमोरी विधानसभा क्षेत्राची ओळख होती. मात्र या निवडणुकीत आरमोरी विधानसभा क्षेत्रातच शिवसेनेचे मोठे पाणीपत झाले. गडावरच्या शिलेदाराची अनामत रक्कमही वाचविता आली नाही. शिवसेनेच्या संघटनपातळीवर मरगळ आली आहे. त्यामुळे शिवसेना संघटनेचीही पुन्हा बांधणी होण्याचे संकेत आहे. जुने शिवसैनिक असलेले प्रा. राजेश कात्रटवार यांच्याकडे गडचिरोलीसह अहेरी विधानसभा क्षेत्राची जबाबदारी जिल्हाप्रमुख म्हणून येण्याची शक्यता नाकारता येत नाही. शिवसेनेला आगामी काळात जिल्ह्यात मजबूत स्थान रोवायचे असल्यास पक्ष संघटनेची बांधणी नव्याने करावी लागणार आहे. यादृष्टीने विधानसभा निवडणुकीच्या पराभवानंतर पक्ष संघटना कामाला लागेल, असे संकेत सेनेच्या काही पदाधिकाऱ्यांनी दिलेले आहे. (जिल्हा प्रतिनिधी)