शहरं
Join us  
Trending Stories
1
दहशतवादी हल्ला करताना धर्म विचारतात का? वडेट्टीवारांचे विधान; CM फडणीस म्हणाले, "इथे बसून…"
2
जीवन संपवण्यापूर्वी डॉ. शिरीष वळसंगकर यांनी चार जणांना केले होते फोन, सीडीआरमधून समोर आली नवी माहिती
3
पाकिस्तानचे पाणी बंद केले हे पूर्णपणे खोटे; सरकारचे पत्र वाचून दाखवत प्रकाश आंबेडकरांचा दावा
4
"विधानसभा निवडणुकीत काँग्रेस शहराध्यक्षाची मला मदत"; भाजपच्या सुरेश खाडे यांचा गौप्यस्फोट
5
Ather Energy IPOसह २ आयपीओ आजपासून गुंतवणूकीसाठी खुले, पाहा GMP सह अन्य डिटेल्स
6
"धर्म विचारून गोळ्या घालण्याइतपत वेळ दहशतवाद्यांकडे असतो का?’’, काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांचा सवाल  
7
Akshaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला साडे तीन मुहूर्तामध्ये स्थान का? जाणून घ्या विविध कारणं!
8
पुणे-पनवेल-पुणे प्रवास अन् सिट्रॉएन ईसी 3 ईव्ही, परतीच्या प्रवासात थोडी एन्झायटी होती...; किती रेंज दिली?...
9
डेटा संपल्यानंतर तुम्ही पब्लिक Wi-Fi वापरता? सावधगिरी बाळगा अन्यथा बँक खातं होईल रिकामं
10
भारताचा मोठा निर्णय! पाकिस्तानातील १६ युट्यूब चॅनेल्सवर घातली बंदी, बघा संपूर्ण यादी
11
अक्षय कुमार नव्हे तर इंडस्ट्रीतील हे तीन कलाकार आहेत परेश रावल यांचे खास मित्र, म्हणाले-
12
Akshaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला पितरांना आठवणीने दाखवा आंब्यांचा नैवेद्य; कारण..
13
"तुमचे बजेट आमच्या लष्करी बजेटइतकेही नाही", ओवैसींनी पाकला सुनावलं, म्हणाले, "तुम्ही भारतापेक्षा अर्धा तास..."
14
सोलापूर बाजार समिती निवडणूक: आमदार सुभाष देशमुख गटाची विजयी सुरूवात
15
Samudra Shastra: तुमच्या बोटांच्या नखावर अर्धचंद्र किंवा पांढरा डाग आहे का? जाणून घ्या महत्त्व!
16
भारतासोबत युद्ध न झालेलेच बरे; युद्धाचा प्रस्ताव घेऊन गेलेल्या शाहबाज यांना नवाझ शरीफ यांचा सल्ला
17
पॅडी दादाने पाहिला सूरज चव्हाणचा 'झापूक झापुक'; कौतुक करत म्हणाले, "सुखद धक्का..."
18
भारतात कोणत्या बँकेचे क्रेडिट कार्ड सर्वाधिक लोकप्रिय?
19
आपल्याच लोकांनी विश्वासघात केला! पहलगाम हल्ल्यात १५ काश्मिरींची ओळख पटली
20
EPFO पोर्टलनं वाढवली युजर्सची डोकेदुखी; लॉग इन पासून पासबुक डाऊनलोडपर्यंत येताहेत समस्या

लोकसभेत शरद पवार, उध्दव ठाकरेंकडे पाहून जनतेचा कौल मिळाला, असं नाही : राज ठाकरे

By संजय तिपाले | Updated: August 22, 2024 18:51 IST

राज ठाकरेंची कोपरखळी: उमेदवारी देताना आयारामांपेक्षा निष्ठावंतांनाच प्राधान्य

गडचिरोली: लोकसभा निवडणुकीत शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांच्या चेहऱ्यांना पाहून लोकांनी महाविकास आघाडीच्या उमेदवारांना मतदान केलं असं नाही, तर भाजपविरोधी वातावरणाचा फायदा त्यांना झाला, अशा शब्दांत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रमुख राज ठाकरे यांनी कोपरखळी मारली. नवनिर्माण यात्रेनिमित्त २२ ऑगस्टला ते जिल्हा दौऱ्यावर होते. यावेळी अनौपचारिक गप्पांमध्ये त्यांनी माध्यमांसमोर अनेक खुलासे केले.

राज ठाकरे यांचे शहरात दुपारी १२ वाजता आगमन झाले. इंदिरा गांधी चौकात त्यांचे पदाधिकाऱ्यांनी स्वागत केले. त्यानंतर ते चंद्रपूर रोडवरील शासकीय विश्रामगृहात पोहोचले. यावेळी तिन्ही विधानसभा मतदारसंघातील पदाधिकाऱ्यांशी त्यांनी एकत्रित संवाद साधला. पुत्र अमित ठाकरे, मनसे नेते अनिल शिदोरे, प्रवक्ते व पक्ष निरीक्षक गजानन काळे, राज्य उपाध्यक्ष सतनामसिंग गुलाटी त्यांच्यासमवेत उपस्थित होते.

यानंतर माध्यमांनी अनौपचारिक चर्चेत त्यांनी सांगितले की, लोकसभा निवडणुकीत मागासवर्गीय व मुस्लीम मतदान महाविकास आघाडीकडे गेले, पण प्रत्येक निवडणुकीची गोष्ट वेगळी असते, त्यामुळे विधानसभेलाही असेच चित्र राहील, असे नाही.

आपण स्वत: निवडणूक लढवणार का या प्रश्नावर त्यांनी थेट नाही असे उत्तर दिले. आगामी विधानसभा निडणूकीत कुणाला कौल मिळेल हे आताच सांगता येत नाही,पण राजकीय परिस्थिती आणि पक्षांची एवढी सरमिसळ झाली आहे की मोठ्या प्रमाणावर बंडखोरी होण्याची शक्यता आहे. इतर पक्षातील बंडखोर आमच्याकडे आल्यास थेट उमेदवारी देणार नाही. आधी आमच्या कार्यकर्त्यांना संधी देऊ नंतर आलेल्यांचा विचार करू, असे सांगून त्यांनी आयारामांनाही सूचक इशारा दिला. विधानसभा निवडणुकीत विदर्भातील बहुतांश जागा लढविणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. निवडणुकीत उमेदवार देताना केवळ लढण्यासाठी नव्हे तर जिंकण्यासाठी दिला जाईल, असेही त्यांनी सांगितले.

निष्क्रिय पदाधिकाऱ्यांना हटविणारजिल्ह्यात मनसेचा तितका प्रभाव नाही. कधी आंदोलन नाही की कुठल्या प्रश्नावर पदाधिकारी बाजू मांडत नाही. संघटनात्मक ताकदही दिसत नाही, याविषयी राज ठाकरे यांनी सांगितले की, नवनिर्माण यात्रेला चांगला प्रतिसाद मिळत आहे. गडचिरोलीतआधी नेहमी येणे व्हायचे, आता खूप वर्षांनी आलो आहे. निष्क्रिय पदाधिकाऱ्यांना हटवून नव्या कार्यकर्त्यांना संधी दिली जाईल, असा इशारा त्यांनी दिला.

अद्याप कोणी संपर्कात नाहीभाजपमध्ये उमेदवारीसाठी भाऊगर्दी आहे. त्यामुळे कोणी संपर्कात आहे का, यावर राज ठाकरे यांनी अद्याप कोणी संपर्कात नाही, असा खुलासा केला. गडचिरोलीत किती जागांवर उमेदवार देणार, हे अद्याप ठरवले नाही, असेही त्यांनी सांगितले.

आदिवासी नृत्याने भारावले राज ठाकरेशासकीय विश्रामगृह परिसरात आगमन झाले तेव्हा स्वागतासाठी आदिवासी नृत्य सादर करण्यात आले. यावेळी जीपमधून उतरून राज ठाकरे हे थेट पारंपरिक आदिवासी वाद्य वाजविणाऱ्या कलावंतांकडे गेले व त्यांच्याशी संवाद साधला. त्यांचा पोशाख व वाद्यांची माहिती जाणून घेतली. यावेळी कलावंतांच्या आग्रहास्तवर त्यांनी त्यांच्यासोबत फोटोही काढला.

टॅग्स :Raj Thackerayराज ठाकरेGadchiroliगडचिरोली