शहरं
Join us  
Trending Stories
1
उज्ज्वला थिटेंना झटका! राजन पाटलांच्या सुनबाईच अनगरच्या नगराध्यक्ष होणार, न्यायालयात नेमके काय घडले?
2
'ब्लॅक फ्रायडे' म्हणजे काळा शुक्रवार...! मग भरमसाठ डिस्काऊंट देऊन साजरा का करतात कंपन्या...? 
3
Travel : कोल्डड्रिंकपेक्षाही स्वस्त पेट्रोल, इतर गोष्टीही खिशाला परवडणाऱ्या; भारतीयांसाठी व्हिसा फ्री आहे 'हे' बेट!
4
दत्त जयंती २०२५: श्री स्वामी समर्थ चरित्र सारामृत पारायण कसे कराल? पाहा, नियम-योग्य पद्धत
5
हर्बालाइफचा नवा 'लिफ्ट ऑफ' – शून्य साखर असलेलं, ऊर्जा देणारं इफर्व्हेसंट ड्रिंक, तुमचा दिवस बनवा अधिक जोमदार 
6
बिहार काँग्रेसच्या पराभवाची फाईल दिल्लीत उघडणार; ६१ उमेदवार जिल्हावार अहवाल सादर करणार
7
भारताला २० वर्षांनी पुन्हा मान! शताब्दी 'राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धा २०३०' चे यजमानपद या शहराच्या पारड्यात...
8
मोठी बातमी! २ कोटी लोकांचे आधार क्रमांक कायमचे बंद झाले; UIDAI ने सुरु केली मोहिम...
9
Cyclone Senyar: 'सेन्यार'ने वेग घेतला! दक्षिण आणि पूर्व किनाऱ्यावर ७२ तास राहणार मोठा धोका
10
Pune Crime: "तिच्या बेडरुममध्ये झोपवलं आणि..."; कोल्हापुरातील व्यक्तीसोबत पुण्यातील महिलेने काय काय केलं?
11
१० रुपयांपेक्षाही कमी किंमतीच्या शेअरची कमाल, झटक्यात २०% वाढला भाव; खरेदीसाठी गुंतवणूकदारांची झुंबड
12
सात जन्माच्या साथीदारानेच केली क्रूरता! पतीमुळे ४ वर्षांच्या चिमुकल्याची आई ९ महिने तडफडत राहिली.. 
13
निवडणूक अधिकाऱ्यांना धोका, आयोगाने बंगाल पोलिसांना पत्र लिहिले; त्या घटनेची आठवून करून दिली
14
सोनिया जी, राहुल जी आन् मी..., कर्नाटक सत्तासंघर्षावर खर्गेंचे मोठे सेंकत! पुढचे 48 तास महत्वाचे; "200% 'तेच' CM होणार"
15
कॅबिनेट बैठकीत चार मोठे निर्णय; रेअर अर्थ मॅग्नेट उत्पादनाला भारतात मोठी गती मिळणार
16
मायक्रोसॉफ्टचा बाजार उठणार की काय? गुगल कॉम्प्युटर, लॅपटॉपसाठी आणतेय ऑपरेटिंग सिस्टीम...
17
टीम इंडियाचा दबदबा संपत चाललाय, काही जण तर..; लाजिरवाण्या पराभवानंतर हर्षा भोगलेंनी सुनावलं
18
पंडित देशमुख खुनाचा मुद्दा २० वर्षांनंतर प्रचारात, मोहोळच्या देशमुखांसोबत काय घडलं होतं?
19
'थोडी वाट पाहा, फोन करतो', मुख्यमंत्री बदलाच्या चर्चेदरम्यान राहुल गांधींचा डीके शिवकुमार यांना मेसेज
20
एकनाथ शिंदे सत्ता मिळवून दिघे साहेबांचे स्वप्न साकारणार की गणेश नाईक पुन्हा दूर ठेवणार?
Daily Top 2Weekly Top 5

‘शेकाप’ही उतरणार मैदानात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 3, 2019 06:00 IST

जिल्ह्यात शिवसेनेच्या वाट्याला एकही जागा दिली नसल्यामुळे जिल्ह्यात सेनेचे अस्तित्वच पणाला लागले आहे. तीनपैकी किमान दोन मतदार संघ सेनेसाठी सोडावे अशी मागणी सेनेच्या नवनियुक्त जिल्हा प्रमुखांनी अलिकडेच केली होती. परंतू दोन तर नाहीच, एकही जागा सेनेला मिळाली नाही.

ठळक मुद्देगडचिरोलीत रंगत वाढणार : अहेरीतून अम्ब्रिशरावच राहणार

लोकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली : काँग्रेस आघाडीतील घटक पक्ष असलेल्या शेतकरी कामगार पक्षाने जिल्ह्यातील तीनही मतदार संघात उमेदवार उभे करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे गडचिरोलीसह तीनही मतदार संघातील रंगत आणखी वाढणार आहे. दरम्यान नामांकन दाखल करण्यासाठी आता केवळ दोन दिवस शिल्लक असताना अहेरी मतदार संघातील ‘सस्पेन्स’ बुधवारी रात्री दूर करत विद्यमान आमदार अम्ब्रिशराव आत्राम यांच्या नावावर अखेर भाजपने शिक्कामोर्तब केल्याचे समजते. त्यामुळे आता या मतदार संघात पुन्हा जुन्याच पद्धतीने लढत होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.मंगळवारी गडचिरोली आणि आरमोरी मतदार संघात भाजप व काँग्रेसने आपल्या उमेदवारांची घोषणा केल्यानंतर बुधवारी अहेरीचा तिढा सुटेल असा अंदाज व्यक्त केला जात होता. मात्र संध्याकाळपर्यंत स्थिती ‘जैसे थे’ होती. मात्र रात्री उशिरा अम्ब्रिशराव यांचे नाव निश्चित झाल्याचे वृत्त धडकले. दरम्यान शेतकरी कामगार पक्षाने गडचिरोली मतदार संघावर दावा करताना ही जागा आपल्याला देण्याची मागणी केली होती. परंतू शेकापला ही जागा न मिळाल्यामुळे तीनही जागांवर उमेदवार उभे करून मैत्रीपूर्ण लढण्याचा निर्णय पक्षाच्या जिल्हा मध्यवर्ती समितीने घेतला असल्याचे जिल्हा चिटणीस रामदास जराते यांनी कळविले.शिवसेनेचे अस्तित्व पणालाजिल्ह्यात शिवसेनेच्या वाट्याला एकही जागा दिली नसल्यामुळे जिल्ह्यात सेनेचे अस्तित्वच पणाला लागले आहे. तीनपैकी किमान दोन मतदार संघ सेनेसाठी सोडावे अशी मागणी सेनेच्या नवनियुक्त जिल्हा प्रमुखांनी अलिकडेच केली होती. परंतू दोन तर नाहीच, एकही जागा सेनेला मिळाली नाही. त्यामुळे सेनेचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते भाजप उमेदवारांच्या प्रचारात सक्रिय राहणार का, असा प्रश्न मतदारांमध्ये चर्चेचा विषय झाला आहे.शेवटच्या दिवशी होणार गर्दीप्रमुख पक्षांच्या अधिकृत उमेदवारांपैकी काही उमेदवार दि.३ ला नाममात्र नामांकन दाखल करणार आहेत. मात्र एबी फॉर्मसह आणि शक्तीप्रदर्शन करत उमेदवारी दाखल करण्यासाठी त्यांनी ४ आॅक्टोबरचा मुहूर्त साधला आहे. त्यामुळे नामांकनाच्या शेवटच्या दिवशी सर्वच मतदार संघात निवडणुकीचा माहौल गरम राहणार आहे.

टॅग्स :Maharashtra Assembly Election 2019महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019